Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पंतने अपील मागे घेतले म्हणून
पंतने अपील मागे घेतले म्हणून नॉट आउट असे स्क्रीनवर दाखवले असे तुला वाटत असेल तर कठीण आहे एकूण.
>>>>
पुन्हा वाचा.
अंपायरने नॉट आउट द्यायच्या आधी पंत ने अपील मागे घेतले होते की नंतर घेतले होते अशी चर्चा चालू आहे.
फेरफटका यांची पोस्ट < अंपायरने ऑलरेडी नॉट-आऊट दिला होता > या ऑलरेडी वर चर्चा चालू आहे.
असो...
नियमात बसत असेल तर धाव घेतली
नियमात बसत असेल तर धाव घेतली तर त्यात काहीच चुकीचे नाही नि त्याचा फायदा नाही घेतला तर संघाचे नुकसान झाले आहे.
>>>>>
म्हणजे तेव्हा देखील ते फलंदाज आपली खिलाडी वृत्ती दाखवायला संघाचे नुकसान करतात. त्याच्यावर सुद्धा सेम टीका व्हायला हवी हे मान्य. पण तशी कधी झालेली पाहण्यात आली नाही.
याबाबतीतच लोकांना का इतका चेव येतो..
म्हणजे एखाद्याला अपील करायचे असेल तर ओके.. करा तसे आऊट.. पण एखाद्याला करायचे नसेल आणि नको असेल अशी विकेट तरीही ते ओके असायला हवे. कर्णधाराचा तो अधिकार आहे. अपील हवे तेव्हा मागे घ्यायचा हे समजून घ्यायला हवे. कर्णधाराचा अधिकार अमान्य करणे हे मला अखिलाडू वाटते.
कोणाला हे माहीत आहे का?
कोणाला हे माहीत आहे का?
यावर उद्या बोलूया...
तोपर्यंत खालील लिंक वर त्या घटनेचा व्हिडिओ सुद्धा बघून ठेवा.
The ICC Spirit of Cricket Award of the Decade was won by MS Dhoni, for his decision to recall Ian Bell after a controversial run-out in the 2011 Nottingham Test.
https://youtu.be/hFpSoRlpyMo?si=hzhhbOBYlEVEjrK0
त्याच्यावर सुद्धा सेम टीका
त्याच्यावर सुद्धा सेम टीका व्हायला हवी हे मान्य. पण तशी कधी झालेली पाहण्यात आली नाही. >> हा काय प्रकार आहे ? ह्या सामन्यात तसे झाले आहे का ? जे झाले आहे त्यावर ज्याला ते खटकले आहे त्यावर चर्चा करणार . तिथे अमक्यावर तमक्या प्रकाराच्या वेळी टीका का केली नाही वगैरे फाटे फोडणे म्हणजे आपण मोठे चतुर आर्ग्युमेंट केले असे तुला का वाटते नक्की ? तुला कोणी असे केलेले दिसले (आता परत ते लाईव्ह कव्हरेज होते का नाही हे चेक करून घे हो) तर लिही त्यावर. ज्याला नाही पटणार ते बोंबलतील त्यावर.
कर्णधाराचा अधिकार अमान्य करणे हे मला अखिलाडू वाटते. >> तुला अर्थ न कळणार्या शब्दांमधे समयसूचकता बरोबर अखिलाडू हा शब्द पण अॅड केला.
The ICC Spirit of Cricket
The ICC Spirit of Cricket Award of the Decade was won by MS Dhoni, for his decision to recall Ian Bell after a controversial run-out in the 2011 Nottingham Test. >> ती सिरीज ४-० असे हरलो होतो, ओडीआय मधे ३ किंवा ४ सामने हरलो होतो नि टी २० पण हरलो होतो. म्हणूनच धोनीला मिळालेल्या अवार्डपेक्षा हे जास्त आठवते आहे. बहुधा एकंदर डिमोरलाईजिंग सिरीजमधे भारताला काहीतरी - लहान मुलांना नाही का अटेंडन्स्चे देतात तसे - बक्षिस द्यावे म्हणून दिले असावे
बहुधा एकंदर डिमोरलाईजिंग
बहुधा एकंदर डिमोरलाईजिंग सिरीजमधे भारताला काहीतरी - लहान मुलांना नाही का अटेंडन्स्चे देतात तसे - बक्षिस द्यावे म्हणून दिले असावे Wink
>>>>
हाहा.. धोनी नाव दिसताच.. (जसे वर पंत नाव दिसताच)
बाई दवे, हा पुरस्कार त्याला ९ वर्षांनी मिळाला..
लहान मुलांना असे बक्षीस ९ वर्षांनी देणे कमाल आहे
असो
त्यात धोनीने असे काय केले जे खिलाडी वृत्ती म्हणून बघितले गेले ते बघूया...
पंतने समय सूचकता दाखवली
पंतने समय सूचकता दाखवली म्हणजे वेळीच आपला अधिकार बजावला.
कर्णधार म्हणून त्याला तो अधिकार नियमाने मिळाला आहे. अन्यथा कोणीही आपल्या मनाने वागेल. असे नाही चालत. हे गल्ली क्रिकेट नाहीये. इथे कर्णधाराचे जे अधिकार आहेत ते मान्य करावेच लागतात. इथे गोलंदाज असे म्हणू शकत नाही की मी अपील केले होते तर तू का मध्ये टांग अडवलीस..
आणि हो, एखाद्या कर्णधाराचा हा अधिकार अमान्य करून त्यावर टीका करणे हे मला अखिलाडूच वाटते.
अर्थात वर धोनीने जे केले त्यावर सुद्धा आता इथे टीका होण्याची शक्यता आहे कारण त्यानेही आपला कर्णधार असायचा अधिकार वापरून नियमाने आऊट झालेल्या एका खेळाडूला परत बोलावले आहे.
. पण तशी कधी झालेली पाहण्यात
. त्याच्यावर सुद्धा सेम टीका व्हायला हवी हे मान्य. पण तशी कधी झालेली पाहण्यात आली नाही..
ते सत्तेत असताना त्यांनी पण तसंच केलं होत.... अशा type च अर्ग्युमेण्ट झालं.
याबाबतीतच लोकांना का इतका चेव येतो..
कारण आऊट झालेल्या बॅट्समन ला परत बोलावण योग्य वाटतं नाही.दुसऱ्या उदाहरणामध्ये जसं की चेंडू अंगाला लागल्या मुळे धाव घेतली नसेल तर त्या वेळी एवढं वाईट वाटणार नाही. कारण दोन्हीचा त्यावेळचा होणारा परिणाम वेगळा आहे. क्रिकेट मध्ये विकेट एवढ्या सहजा सहजी मिळतं नाहीत. पण हेच त्याने एका चेंडूमध्ये एक धाव हवी असताना केलं तर मात्र लोकांची reaction वेगळी असेल.
पण संघ हिता पेक्षा कोणताही खेळाडू मोठा नाही. कॅप्टन ला फारच वाईट वाटतं असेल तर match संपल्यावर वैयक्तिक रित्या माफी मागावी पण उगाच क्रिकेट स्पिरिट च्या नावाखाली आऊट झालेल्याना बोलाऊन संघाला अडचणीत टाकणं चुकीचेच आहे.
कारण दोन्हीचा त्यावेळचा
कारण दोन्हीचा त्यावेळचा होणारा परिणाम वेगळा आहे.
>>>>
ओके म्हणजे सामन्यावर किती परिणाम होतो हे बघून ठरवायचे
इथे कोणाला काही सुचले वाटते
इथे कोणाला काही सुचले वाटते नाही
>>
बाऊंड्री वर कॅच पकडताना जर फील्डर चा पाय चुकून दोरीला लागला तर किती बॅटर खिलाडू वृत्तीनं आऊट समजून बाहेर जातात?
बॉलर चा पाय चुकून लाईन च्या थोडा पुढे पडला तर किती वेळा नो बॉल ची रन किंवा फ्री हिट नको असं खिलाडू वृत्तीनी सांगतात?
मग जर बॉलर नी बॉल टाकायच्या आधीच क्रीज सोडून पुढे गेलेल्या रनर ला रन आऊट केलं तर तेच फक्त अखिलाडू कसं ठरतं?
आज पंजाबचा दिवस (संध्याकाळ)
आज पंजाबचा दिवस (संध्याकाळ) नव्हता...
रादर दोन्ही टीम इतके दिवस इतक्या कडाक खेळल्यावर कुणीही हरलं असतं तरी असंच वाटलं असतं...
नाही मी फक्त मानवी प्रवृत्ती
नाही मी फक्त मानवी प्रवृत्ती सांगितली.
उदा, पाकिस्तान विरुद्ध दहा चेंडूत १०० धावा पाहिजे असताना सुटलेला सोपा झेल आणि एका चेंडूत एक धाव पाहिजे असताना सुटलेला सोपा झेल. दोन्ही मध्ये होणारा परिणाम फारच वेगळा असेल.
दोन्ही मध्ये मिसफील्डच आहे पण पहिल्या उदाहरणात कोण जास्त टीका करणार नाही.
मग जर बॉलर नी बॉल टाकायच्या
मग जर बॉलर नी बॉल टाकायच्या आधीच क्रीज सोडून पुढे गेलेल्या रनर ला रन आऊट केलं तर तेच फक्त अखिलाडू कसं ठरतं?
>>>>>
हे अखिलाडू आहे असे कुठे म्हटले आहे का?
माझ्या जुन्या पोस्ट पाहिल्या या विषयावर तर मी अश्विनला आणि या नियमाला सपोर्टच केलेला दिसेल.
माझा मुद्दा आहे की एखाद्या कर्णधाराला नसेल करायचे यावर अपील आणि वॉर्निंग न देता नको असेल अशी विकेट तर त्याचा हक्क अबाधित राहायला हवा. त्याने खिलाडू वृत्ती दाखवायला म्हणून संघाचे नुकसान केले किंवा गोलंदाजाचा इन्सल्ट केला वगैरे टीका करण्यात अर्थ नाही.
पण असो, पंत म्हटलं की अश्या चर्चा आल्याच. डायनॅमिक प्लेअर आहे. असे वाद त्याची पूर्ण कारकीर्द सजवणार आहेत.
पण जिथे तुम्ही टीका करत आहात तसेच काहीसे केलेल्या धोनीला आयसीसीने मोठा पुरस्कार दिला आहे.
अरे हो, संघहिताचा मुद्दा फार
अरे हो, संघहिताचा मुद्दा फार येत आहे.
शेवटच्या दोनतीन ओवर शिल्लक असताना एखादा ९८-९९ वर खेळणारा फलंदाज मोठ्या फटक्याचा प्रयत्न न करता सिंगल घेत असेल तर मग काय म्हणाल?
वैयक्तिक विक्रमाच्या नादात संघहित गंडलेले पाहिले आहे बरेचदा.. झाल्यास टीका त्यावर व्हावी.. यावर कसली करता.
चला शुभ रात्री
बाई दवे, हा पुरस्कार त्याला ९
बाई दवे, हा पुरस्कार त्याला ९ वर्षांनी मिळाला..
लहान मुलांना असे बक्षीस ९ वर्षांनी देणे कमाल आहे >> आय सी सी दर वर्शी हे अवार्ड देते आहे. दहा वर्षांनी दहा वर्षांमधल्या विनर्स मधून फॅन्स व्होट करून दशकातील एक निवडतात.
ICC Spirit of Cricket Award of the Decade nominees
2011 Winner – MS Dhoni (India)
2012 Winner – Daniel Vettori (New Zealand)
2013 Winner – Mahela Jayawardene (Sri Lanka)
2014 Winner – Katherine Brunt (England)
2015 Winner – Brendon McCullum (New Zealand)
2016 Winner – Misbah-ul-Haq (Pakistan)
2017 Winner – Anya Shrubsole (England)
2018 Winner – Kane Williamson (New Zealand)
2019 Winner – Virat Kohli (India)
आता धोनी व्होटींग का जिंकला हे फारसे आश्चर्याचे नाही. जास्तीत जास्त कोहली ची स्पर्धा असू शकली असती इथे. फक्त धोनी, चुम्मा नि रोहित हे शब्द वाक्यात आले म्हणजे सगळेच पवित्र झाले असे नाही.
वैयक्तिक विक्रमाच्या नादात संघहित गंडलेले पाहिले आहे बरेचदा.. झाल्यास टीका त्यावर व्हावी.. यावर कसली करता. >> परत तेच ! तुला खटकते आहे, तर तू कर, कोणी अडवलय ?
पंतने समय सूचकता दाखवली म्हणजे वेळीच आपला अधिकार बजावला. >> अरे मी आधीच लिहिले ना कि "तुला अर्थ न कळणार्या शब्दांमधे समयसूचकता बरोबर अखिलाडू हा शब्द पण अॅड केला." परत परत कशाला लिहीतोस ?
पण जिथे तुम्ही टीका करत आहात
पण जिथे तुम्ही टीका करत आहात तसेच काहीसे केलेल्या धोनीला आयसीसीने मोठा पुरस्कार दिला आहे. >> काहीसे नाही. जमिन अस्मानाचा फरक आहे ह्या दोन प्रकारांमधे पण 'आपला तो बाब्या ' हे झापड काढले तर दिसले असते.
एकापेक्षा जास्त कॅमेरे लागले
एकापेक्षा जास्त कॅमेरे लागले असतात. त्यापैकी तुम्हाला एका कॅमेरातले दिसते. त्याचवेळी जर दुसऱ्या कॅमेऱ्यात काही इंटरेस्टिंग असेल तर ते नंतर दाखवतात. असो.. >>>> अॅक्शन रिप्ले असेल तर दाखवतात. " एकापेक्षा जास्त कॅमेरे असतील तर लाईव्ह कव्हरेज"मध्ये ते घडतय त्या क्रमानेच दाखवतात. हो असोच.
पण जिथे तुम्ही टीका करत आहात
पण जिथे तुम्ही टीका करत आहात तसेच काहीसे केलेल्या धोनीला आयसीसीने मोठा पुरस्कार दिला आहे.
>>
पब्लिक व्होटिंग बेसिस वर
पंत म्हटलं की अश्या चर्चा
पंत म्हटलं की अश्या चर्चा आल्याच. डायनॅमिक प्लेअर आहे
>>
पंत आहे म्हणून नाही रे
कुणीही कप्तान असता अन् असं केलं असतं तर हीच चर्चा झाली असती, फक्त जर येन केन प्रकारेण त्यात कुठल्याही बाजूनी रोहित, धोनी किंवा पंत चा संबंध येता तुझ्या पोस्ट त्यांना धार्जिण्या आल्या असत्या
जसं,
माझ्या जुन्या पोस्ट पाहिल्या या विषयावर तर मी अश्विनला आणि या नियमाला सपोर्टच केलेला दिसेल.
>>
या वेळी असं झालं नाही कारण मग तुला पंत ला चूक म्हणावं लागलं असतं. अन् ते काही तुझ्याकडून होत नाही... मग तुझी नेहमीची स्त्रटेजी.. मारायची पलटी अन् ते समयसूचकता अन् योग्य निर्णय वगैरे गुणगान गाऊन शुगरकोट करायचं किंवा भलते रेफरंस देऊन चर्चा भरकटवायला बघायचं...
या वेळी असं झालं नाही कारण...
या वेळी असं झालं नाही कारण...
>>>>
माझी एक पोस्ट दाखवा जिथे मी राठी चुकला असे लिहिले आहे. त्याचा किंवा कोणाचाही अपील करायचा हक्क अबाधित आहेच. तो आपल्या जागी योग्यच होता म्हटले आहे. पण अपील मागे घेतले म्हणून जी टीका आहे त्यावर माझा आक्षेप आहे. आता यातला फरक समजूनच घ्यायचा नसेल तर पुढे जाऊया.
आता धोनी व्होटींग का जिंकला हे फारसे आश्चर्याचे नाही.
>>>>>
हे समजले नाही. आश्चर्याचे का नाही? धोनीने काही चिटिंग करून जिंकला का तो अवॉर्ड?
परत तेच! तुला खटकते आहे, तर तू कर, कोणी अडवलय?
>>>>
मला खटकते मी कुठे म्हणालो. उलट मी म्हणतोय की अश्या गोष्टी खटकत नाही. फक्त ठराविक नावे आली की काहीना खटकतात तेव्हा मी त्या सिलेक्टिव्ह खटकण्याचा विरोध करतो इतकेच. कारण ती काही नावे माझी आवडीची असतात. चाहता म्हणून चुकीच्या टीकेला विरोध करतो इतकेच.
तसेच काहीसे केलेल्या धोनीला आयसीसीने मोठा पुरस्कार दिला आहे. >> काहीसे नाही. जमिन अस्मानाचा फरक आहे
>>>>>
कुठला जमीन अस्मानाचा फरक?
नियमानुसार आणि स्वतःच्या चुकीने बाद असलेल्या खेळाडूला धोनीने परत बोलवले.
एकापेक्षा जास्त कॅमेरे असतील तर लाईव्ह कव्हरेज"मध्ये ते घडतय त्या क्रमानेच दाखवतात.
>>>
गरजेचे नाही. एखादी विकेट पडल्यावर देखील त्या विकेट आधी काय प्लॅनिंग घडले होते ते दाखवतात.
या केस मध्ये स्क्रीनवर नॉटआउट झळकल्यांवर ते बघून लगेच पंत म्हणाला मी अपील मागे घेतो आणि फलंदाज सुद्धा ते बघूनही पंतनेच वाचवले म्हणून त्याला मिठी मारतो हे तुम्हाला तरी पटते का?
पब्लिक व्होटिंग बेसिस वर
>>>>
दशकातले पब्लिक व्होटिंग बेसिस वर असते. दर वर्षाचे सुद्धा त्यानुसारच असते का? की ते आयसीसी ठरवते? आणि त्यातूनच निवडावे लागते ना?
ती सिरीज ४-० असे हरलो होतो,
ती सिरीज ४-० असे हरलो होतो, ओडीआय मधे ३ किंवा ४ सामने हरलो होतो नि टी २० पण हरलो होतो. म्हणूनच धोनीला मिळालेल्या अवार्डपेक्षा हे जास्त आठवते आहे.
>>>>>>>
धोनीच्या कप्तानीत झालेल्या पराभवाचे आकडे आठवणे आणि विषय नसताना ते इथे देणे यात जराही आश्चर्य वाटले नाहीये
@ केशवकूल
@ केशवकूल
आहात का?
आपल्या पंत ने अखेरच्या सामन्यात धडाकेबाज शतक मारले आहे
“हे तुम्हाला तरी पटते का?” -
“हे तुम्हाला तरी पटते का?” - ह्या विषयावर खंडीभर लेख आणि व्हिडीओज आले आहेत. डोळे झाकून निराधार आर्ग्युमेंट्स करण्यापेक्षा जरा वस्तुस्थिती जाणून घे आणि नंतर लिही.
“विषय नसताना ते इथे देणे”- २०११ च्या कुठल्याश्या पुरस्काराचा विषय तूच इथे सुरू केलायस ना? तसंही विषय नसताना धोनी विषयी लिहीलं हा दावा तू करावास??
जाऊ द्या जास्त भांडू नका.
जाऊ द्या जास्त भांडू नका. आजची मॅच मुंबई हारणार आहे त्यामुळे रात्री दुःखात राहू नका.
फक्त ठराविक नावे आली की
फक्त ठराविक नावे आली की काहीना खटकतात तेव्हा मी त्या सिलेक्टिव्ह खटकण्याचा विरोध करतो इतकेच. >> कमाल करतोस ! जी गोष्ट पंतने केली त्याबद्दल पंतचे नाव घेऊनच लिहिणार ना ? "तीच" (तशीच नाही) गोष्ट अजून कोणी केली असती तर त्याचे नाव घेऊन लिहिले असते. पंतचे नाव लिहून टिका केली म्हणजे सगळ्यांना पंत आवडत नाही वगैरे अगदीच बाळबोध झाले. मागे तू रोहित ड्रॉप कॅचेसमधे ह्या वर्षी लीडवर आहे हे लिहिले तेव्हांही हेच केले होतेस.
हे समजले नाही. >> त्याच पोस्ट मधले कोहलीबद्दल शेवटचे वाक्य बघ . त्यात असलेले इतर खेळाडू कुठल्या देशातले आहेत ते बघ. त्यांना मिळालेले एकंदर व्होट शोध नि ते कुठून आलेत ते बघ, तुला लक्षात येईल.
मागे तू रोहित ड्रॉप कॅचेसमधे
मागे तू रोहित ड्रॉप कॅचेसमधे ह्या वर्षी लीडवर आहे हे लिहिले तेव्हांही हेच केले होतेस.
>>>>>
रोहीत बरेच बाबतीत लीड वर आहे ज्याचा एक भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून अभिमान आहे. ते आकडे दिले की त्रास. आणि कॅच ड्रॉप आकडे मात्र स्वतःहून द्यायचे. हे मस्त आहे
@ २०११ चा विषय.. खिलाडूवृत्ती संदर्भात निघालेला. त्यात भारताचे पराभव मोजून दाखवणे किंवा लहान मुलांना खुश करायला बक्षीस देतात तसे दिले म्हणून चिडवणे यातून धोनीबद्दलचे प्रेम दिसून येते.
असो...
अजून थोडे प्रेम वाढवतो..
आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा फेअर प्ले अवॉर्ड कोणाला मिळाला आहे कल्पना आहे का?
टॉस जिंकून मुंबईने फलंदाजी
टॉस जिंकून मुंबईने फलंदाजी घेतली
कालचा सामना इथे शेजारच्या पिचवर जसा झाला त्यानंतर धाडसी निर्णय
मुंबईने २०० मारले तर निकाल
मुंबईने २०० मारले तर निकाल लागला..
६ ओवर ७९-०
६ ओवर ७९-०
३५ आणि ३८ वर्षांचे दोन प्रौढ पुरुष खेळत आहेत.
.
.
रोहित शर्मा 300 सिक्स आयपीएल
पहिला भारतीय खेळाडू
.
Pages