स्त्रियांच्या लग्नाचे वय १८ असावे की २१? कायदा येण्या पुर्वी चर्चा

Submitted by अश्विनीमामी on 20 December, 2021 - 05:37

सरकार मुलींचे लग्नासाठी अधिकृत वय अठरा वरून एकवीस वर नेण्यासाठी कायदा आणायच्या विचारात आहे.

ह्यामुळे बालविवाहांचे प्रमाण कमी होईल. मुलींच्या आरोग्या कडे जास्त लक्ष राहील तरूण वयात बाळंतपणे अंगावर पडणार् नाहीत. त्यांना शिक्ष ण पूर्ण कर ता येइल व रोजगाराच्या सन्माननीय संधी शोधून आर्थिक स्वा तंत्र्याकडे वा टचाल करणे सोपे जाईल. अशी विचार धारा आहे.

अनुसूचित जाती जमाती, आदिवासी ह्यांचे ह्या कायद्याचा वापर करून शोषण होईल. असाही एक विचार प्रवाह आहे.

आपणास काय वाट्ते.?

https://indianexpress.com/article/explained/raising-legal-age-for-marria...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुत्रा कुटुंबाचा हिस्सा असतो .हक्क काय आहेत ह्या पेक्षा जबाबदारी काय आहे ह्याची त्याला जाणीव असते.
म्हणून तर तो माणसाचा मित्र आहे.
तो हजर असणारच

एका मुलीच्या बाबतीत इतर सर्व निर्णय घेतात पन परिणाम तिलाच सहन करून मार्ग काढावा लागतो. म्हणून मी मुलीं च्या बाजूने आहे.
>>> वेल सेड अमा

मुलांना पण स्वतःच्या निर्णयच परिणाम स्वतःच भोगावे लागतात.
पण शक्य होईल तितकी मदत मुलगा असू नाही तर मुलगी पालकच अगदी सर्वोच्च बलिदान देवून करतात.

.

आता पर्यंत च्य इतिहासात स्त्रिया वर अन्याय अत्याचार करणाऱ्या पुरुषांना नष्ट करण्याचे काम पुरुषांनीच केले आहे.
युद्धात ,दंगलीत जेव्हा स्त्री वर अत्याचा शत्रू पक्षा कडून होतो तेव्हा स्वतःचे प्राण अर्पण करून पुरुष च त्याचा विरोध करतात.
अगदी रोज च्या जीवनात स्त्री वर अत्याचार होत असेल तर पुरुषच संघर्ष करतो
अगदी जिवावर उदार होवून.
मग तो भाऊ असतो,पती असतो किंवा बाप असतो.
अगदी अनोळखी पुरुष पण असतात.
मुलगी सुखी होण्यासाठी रक्ताचा पाणी करणारा पण पुरुष च असतो.
स्त्री मुक्ती वाल्यांना मुक्ती म्हणजे काय हे माहीत च नाही.
पुरुषांचा द्वेष,राग करणे म्हणजे स्त्री हित असा काही तरी त्यांचा समज असतो
Dj च्या भाषेत निबार वांग झालेल्या स्त्रिया.
ना त्यांना कुटुंब,ना त्यांना समाजात स्थान.
ना त्यांची कोण दाखल घेतं

Dj च्या भाषेत निबार वांग झालेल्या स्त्रिया.>> अहो हेमंत३३, मी ते फक्त स्त्रीयांना उद्देशून लिहिलेलंच नाही हो. मी ते एक उदाहरण म्हणुन दिलं. ते तुम्ही कुत्रं, मांजर किंवा स्त्री-पुरुष कोणालाही ताडून बघू शकता.

जाई., अहो मी नाही असं काही म्हणत की सर्वांनी लग्न करा म्हणुन. लग्न केलं म्हणुन कोणी निब्बर व्हायचं रहातं का..? लग्न केलं तरी अन न केलं तरी वयोमानानुसार प्रकृतीत फरक पडणारच. फक्त मी एवढंच म्हणालो की ज्यांना लग्न करायचं नाही त्यांनी ते स्पष्टपणे आधीच सांगावं अन्यथा आई-बापांना फार मनस्ताप सोसावा लागतो. अन ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनी ते वेळेत करावं म्हणजे शारिरिक्/मानसिक अवस्था शाबुत असेपर्यंत मुलं-बाळं होऊन त्यांचं आपले हात-पाय-डोकं शाबुत असे पर्यंत व्यवस्थित संगोपन करु शकू.

कृपया कोणी माझ्या निब्बर वांगं या उपम्याचा शिरा करू नका हो..!!

ज्यांनी वाचलेले नसेल त्यांच्यासाठी राजीव साने यांच्या
गल्लत गफलत गहजब मधील स्त्री-वादावरील प्रकरण
स्त्रीवर जोखड नको, स्त्रीवादाचेसुध्दा
स्त्रीचे, व्यक्तिस्वातंत्र्य मिळविणे आणि विकसित करणे, ही प्रक्रिया अनेक टप्प्यातून जात आहे. बहुतेक चळवळींच्या विद्रोही टप्प्यात, जहालमतवाद उफाळून येणे, ही अवस्था अटळ असते. पण या अवस्थेचे, जर सार्वत्रिक तत्त्वज्ञान बनविले गेले तर ते तत्त्वज्ञानच, मुक्तीमार्गातील अडथळा बनू शकते. कारण विभिन्न वर्गांत, देशांत, टप्प्यांवर, पिढ्यांत आणि वयांत सुध्दा आव्हानेही वेगळी आणि उत्तरेही वेगळी असतात.
जगात चळवळी अनेक आहेत. पण जिचा विजय निश्चित आहे आणि नजरेच्या टप्प्यात आहे अशी फक्त एकच चळवळ आहे. ती म्हणजे स्त्रीचळवळ. हे एवढ्या आत्मविश्वासाने म्हणता येते कारण मानवी इतिहासात, निर्णायक व परत मागे जाता न येणाऱ्या अशा काही घटना घडल्या आहेत की ज्यांच्या आधारे विजय निश्चित आहे असे वस्तुनिष्ठपणे म्हणता येते.
१.एकत्र कुटुंबपद्धती नष्टप्राय होणे. (फूट पडू नये याखातर स्त्री पुरुषांना विलग ठेवून त्यांच्यावर संवाद-सहवास-बंदी घातली गेली व कामजीवन अपवित्र मानले गेले. तसेच ज्येष्ठांची हुकुमशाही रुजली) २.लोकशाही येऊन स्त्रीला मताधिकार मिळणे. ३.स्त्रीला घराबाहेर रोजगार मिळणे. ४.गर्भनिरोधक साधने उपलब्ध व प्रचलित होणे. ५.अनेक घरकामांचे औद्योगिकीकरण होणे. ६.संपर्कशक्ती आणि माध्यमे सर्वत्र पोहोचणे. ७.युध्दासकट सर्व व्यवहारातील उपकरणांमुळे ‘शारीरिक ताकद’ अप्रस्तुत बनणे. हे सात, असे भीमटोले आहेत, की ज्यांच्यापुढे पुरुषशाहीचे चलाख प्रतिडाव व सुप्त मानसिक अवशेष, निष्प्रभ ठरणे अटळ आहे.
अनेक कारणांनी स्त्रियांच्या दास्याच्या/दुय्यमतेच्या तीव्रता आणि परी वेगळ्या असतात. ज्यांच्यावर ठोस अत्याचारच होत आहेत त्यांना लागणारी ताबडतोबीची सुटका पुरविण्याचे कार्य वेगळे असते. ज्यांचे दुय्यमपण जास्त सूक्ष्म(सटल) असते त्यांना लागणारी वैचारिक साधने अगदीच वेगळी असतात. सटल अवस्थेत प्रस्तुत ठरणारे सिद्धांत जर ढोबळ अवस्थेत लागू केले तर “बाजारात तुरी आणि भटीण भटाला(!) मारी” असे होऊन आपण का भांडतोय हे कोणालाच कळेनासे होते.
तिसऱ्या पिढीचे वैराग्यविरोधी बंड
स्त्री चळवळीबाबत जरी आशादायक चित्र असले, तरी ‘स्त्रीवादा’ची जी वैचारिक प्रारूपे नेहमीप्रमाणे पश्चिमेत उत्पन्न होऊन( माझा आक्षेप ‘पश्चिमेत’ला अजिबात नाही.) भारतातल्या विद्यापीठांतूनही पाझरत आहेत, ती अनावश्यक गोंधळ निर्माण करीत आहेत. अगोदरच बऱ्यापैकी स्वतंत्र बनलेल्या स्त्रियांच्या, व्यक्ती म्हणून चालू असलेल्या आत्मशोधात, विघ्ने आणत आहेत. कसेही करून त्यांच्यात ग्रस्ततागंड टिकवून ठेवण्यासाठी, ‘खाजवून खरूज काढणे’ व जगातील प्रत्येक गोष्टीकडे पुरुषसत्ताक कारस्थान म्हणून बघणे, ही विघातक शिकवण देऊ पहात आहेत.
अशा नको इतक्या ताणलेल्या स्त्रीवादाविरुध्द, पश्चिमेतील तरुणीच बंड करू लागल्या आहेत. “मी नाही होणार आईसारखी शुष्क”, “या स्त्रीवादी सनातन्यांची दहशत नको”, “रडक्या स्त्रीवादाकडून हसऱ्या स्त्रीवादाकडे”, “स्त्री म्हणून फुलू देणारा स्त्रीवाद”, “विजय साजरा करण्यात वाईट ते काय?” अशा आशयसूत्रांनी युक्त पुस्तके, त्या प्रकाशित करत आहेत. आता हेही विद्यापीठांत पाझरायला विद्यापीठीय विलंब लागेलच. म्हणूनच ही सुवार्ता मी बाहेरच परस्पर देऊन टाकत आहे.
मी स्त्रीवादी असूनही आनंदी कशी(किंवा कसा)? असा प्रश्न पडणे व ज्याअर्थी आनंदी आहे त्याअर्थी प्रस्थापितशरण तर नाही ना?, अशी चिंता वाटणे ही एक गोची असते. दुःखांना वाचा फोडणे, अन्यायाविरुध्द चीड येणे, कुप्रथांवर हल्ला चढविणे, त्यात झीज सोसणे हे आवश्यकच असते. पण ते पुरेसे नसते. मानसिक ऊर्जेचे अर्थशास्त्र कधीच विसरून चालत नाही. संघर्षासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे पुनर्भरण करण्यासाठी आणि एरवीसुध्दा, वट्टात सुखी असावे लागते. तितपत समन्वयवाद म्हणजे संधिसाधूपणा नव्हे. तसेच माझा परिवर्तनवाद हा अस्सल (ऑथेन्टिक) प्रतिसाद म्हणून उमटला पाहिजे. अमुक वर्तुळात प्रतिमा टिकविण्यासाठी, सुखाच्या संधी सोडणे, हाही अहंकाराचा संधिसाधूपणाच असतो. आपल्या ‘मानिसिक अर्थकारणा’चे ऑडिट करण्याचा अधिकार, विद्रोही समूहाच्या स्वयंघोषित धुरीणांना देऊन टाकणे, म्हणजे नवी गुलामी पत्करणे असते. असे केल्याने, ना आपण स्वतःशी प्रामाणिक रहातो, ना चळवळीशी!
तिसऱ्या पिढीचे बंड हे या गोचीतून सुटण्याचे बंड आहे. ‘उलटी अडकणूक म्हणजे सुलटी सुटका नव्हे’, हे त्यांचे सामान्य तत्त्व दिसते. साचेबध्द प्रतिमांच्या आहारी न जाणे, हे महत्वाचे आहेच. पण याचा अर्थ असा नव्हे की उफराट्या-साचेबद्ध प्रतिमांत अडकावे! पारंपरिक स्त्रीची साचेबध्द प्रतिमा विरुध्द विद्रोही स्त्रीची साचेबध्द प्रतिमा, यापैकी कोणतीच ‘मला’ न्याय देणारी नसूही शकते. माझी स्वतःशी सर्वाधिक आत्मीयता ज्यात आहे ते सतत निवडायचे असते. मग ते योगायोगाने पारंपरिकही निघेल! लादलेल्याला शरण न जाणे हे महत्वाचे आहे. माझे स्वातंत्र्य टिकवून, मी पुरुषांना पूरक ठरले किंवा आवडले, तर मी गद्दार ठरते की काय? असा सवाल या मुली उभा करत आहेत.
‘शाही’ झुगारणे म्हणजे पुरुषद्वेष नव्हे
काही प्रमाणात स्त्रियाही पुरुषशाहीच्या एजंट बनतात व काही प्रमाणात पुरुषही पुरुषशाहीचे जाच सोसत असतात. त्यामुळे समोरील व्यक्ती ही स्त्री आहे की पुरुष, एवढ्यावरून ती कोणत्या बाजूने असेल, हे ठरवता येत नाही.
आपल्याला स्त्री-व्यक्ती-धार्जिण्य आणि स्त्री-समूह-वाद यात फरक करता आला पाहिजे. कोणतीही स्वातंत्र्यप्रेमी व्यक्ती (सरासरी स्थिती पाहिल्याने) स्त्री-धार्जिणी असणे स्वाभाविक आहे. पण यातही एक मेख आहे. जे सरासरीने खरे असते, ते प्रत्येक प्रकरणात खरे नसते. त्या त्या प्रकरणातील न्याय्य बाजू कोणती हे प्रकरणाच्या मूल्यमापनात (मेरिट्समध्ये) शिरूनच ठरविले पाहिजे. पण हे भान सुटून, सरासरीवर आधारित बाजू घेणे, म्हणजे काहीवेळा अन्यायाच्या बाजूने उभे राहणे ठरते आणि समूहवादी ठरते. म्हणूनच न्यायप्रेमी व्यक्तीने सर्वच आघाड्यांवर समूहवाद टाळला पाहिजे. स्त्रीची बाजू जास्त आस्थेने समजावून घेणे एवढ्या अर्थाने आपण स्त्री-धार्जिणे असलो पाहिजे, यावर दुमत होऊ नये. मात्र ‘स्त्रीवादी’ असणे ही वेगळी गोष्ट आहे..
जहाल-स्त्रीवाद असे मानतो की, आतापावेतो जमा झालेले सर्व मानवी ज्ञान, बहुतांश पुरुषांनी घडविलेले आणि म्हणून शंकास्पद आहे. मानवाची जगाविषयी, स्वतःविषयी, अशी संपूर्ण समजच, स्त्री-केंद्री ज्ञाननिर्मितीद्वारे बदलणार आहे. या भूमिकेशी मी असहमत आहे. कारण स्त्रीपुरुषांत भेद आहे हे खरे असले तरी समाईक-मानवीही बरेच काही आहे. त्यामुळे स्त्रीवादी ज्ञानशास्त्रच (फेमिनिस्ट एपिस्टेमॉलॉजी) वेगळे असेल, हे शक्य नाही.
जहाल स्त्रीवादाचे दुसरे एक टोक असे की, सर्व मानवी दुर्गुणांचे मूळ हे ‘नर’ असण्यात आणि सद्गुणांचे मूळ ‘मादी’ असण्यात शोधणे! मानवी सद्गुण व दुर्गुण हे प्रत्येक मानवी व्यक्तीत कमीअधिक प्रमाणात असतातच. त्यापैकी वाव कशाला मिळेल हा व्यवस्थेचा प्रश्न असतो. तसेच सद्गुण-दुर्गुण जरी तेच असले, तरी ते कसे अभिव्यक्त होतील, याच्या शैली मात्र स्त्रीविशिष्ट व पुरुषविशिष्ट असतात, हे बऱ्याच अंशी खरे आहे. लहानपणीसुध्दा मुलगे मारामाऱ्या करतात व मुली एकमेकींविषयी अफवा पसरवतात असे एक निरीक्षण आहे. हा शैलीतला भेदसुध्दा सरसकट लागू पडतो असे नाही. व्यक्तीची जनुकीय, संस्कारबध्द आणि स्व-निर्णित जडणघडण अनन्य असतेच. त्यामुळे काही पुरुषांची शैली काहीशी बायकी व तसेच उलटपक्षी स्त्रियातही आढळते.
मुख्य मुद्दा असा की, उफाळून येणारे दुर्गुण हे सत्तास्थानामुळे आहेत की जेंडरमुळे?. गल्लत अशी होते आहे की, सत्तास्थानी पुरुष जास्त प्रमाणात असणे, ही वस्तुस्थिती वेगळी आहे आणि पुरुषांतच नरत्व-अंगभूत जुलुमीपणा असतो हे सामान्यीकरण वेगळे. सत्तास्थानी स्त्रियाही कशा पोचतील, वा सत्तास्थानेच कशी बरखास्त वा सौम्य करता येतील, याचा कार्यक्रम वेगळा आणि त्यांना पुरुषद्वेष्ट्या बनवणे, हा कार्यक्रम वेगळा आहे. जहाल-स्त्रीवादाने, काचोळ्यांच्या होळ्या करणे, लेस्बियनिझमला मुक्तीची आवश्यक अट मानणे, पुरुषांना नकोसे वाटेल असा पेहेराव व आविर्भाव राखणे, अशा प्रतिक्रयावादी गोष्टी केल्या. त्याचवेळी स्वतः (दुर्गुणांसकट) पुरुषासारखे बनण्याचा प्रयत्नही केला.
सर्वच प्रश्नांचे जेंडरीकरण कशाला?
आणखी एक घोटाळा टाळला पाहिजे. स्त्री-व्यक्तीला अनेक प्रश्न असतात. ती कामगारही असेल तर तिला कामगार-प्रश्न असतात. तिला जातीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, वार्धक्याचे असे सगळेच प्रश्न असतात. ते ते प्रश्न हे त्या त्या क्षेत्रानुसार सोडवावे लागतात. कोणताही प्रश्न हा, स्त्रीला आहे याखातर, ‘स्त्रीप्रश्न’ बनत नसतो. इतर प्रश्नांतही स्त्रीत्वाचे अंग असू शकते. उदा कामगार स्त्रीची लैंगिक छळवणूक हा नक्कीच ‘स्त्रीप्रश्न’ आहे. पण उदा. जास्त तास राबवणे हा ‘कामगारप्रश्नच’ आहे. जिथे तिथे ओढून ताणून जेंडर आणणे हे एकारलेपणाचे आणि संभ्रम उत्पन्न करणारे आहे व तेही टाळले पाहिजे.
जिथे अद्याप काहीच यश आलेले नाही, तिथे चळवळ पोहोचवणे, महत्त्वाचे आहे. पण ते सोडून, जिथे बऱ्यापैकी यश आलेले आहे, तिथे कोरून कोरून जेंडर काढत बसण्याचा अट्टाहास कशाला?

स्त्रीवादावरचे वेगळे पैलू राजीव सान्यांच्या वरील प्रतिक्रियेत दिलेल्या लेखात वाचायला मिळतात. सर्व स्त्रियाही सारख्या नाहीत व सर्व पुरुष ही सारखे नाहीत. त्यामुळे स्त्रीवादाकडे पहाण्याचे दृष्टीकोन हे वेगवेगळे असणार. काही स्त्रिया पुरुषप्रधान संस्कृतीच्या बळी ठरतात तसे काही पुरुष सुद्धा जहाल स्त्रीवादाचे बळी ठरतात. असो.

वरच्या संदर्भात नाही पण हे साने सर नेहमी सोपी गोष्ट तर अवघड करून का सांगतात ?>> त्यांना यापेक्षा अधिक सोपे करुन सांगता येत नाही. आपण सुलभीकरण करायला गेलो तर आशयहानी होण्याचा धोका त्यांना अधिक वाटत असावा. Lol

योग्य लेख
आता ह्या स्त्रिया स्त्री वादा ची चळवळ चालवत आहेत त्या बुद्धी नी परिपूर्ण नाहीत फक्त स्त्री चे नेतृत्व करून त्यांचे भविष्य बिघडले तरी स्वतःचा स्वार्थ साधने हाच हेतू असणाऱ्या आहेत
कुटुंब व्यवस्था च स्त्री चे रक्षण ,हक्क, अबाधित राखू शकते.
कुटुंब व्यवस्था नष्ट होणे हे स्त्री साठी सर्वात घातक असेल
स्त्री आणि पुरुष हे एकमेकांचे विरोधी असणे म्हणजे स्त्री मुक्ती नक्कीच नाही
तर स्त्री आणि पुरुष हातात हात घालून समान हक्क मिळवण्यात यशस्वी होणे ही स्त्री मुक्ती आहे.
बिनडोक स्त्री मुक्ती च्या कल्पनेने प्रेरीत स्वार्थी स्त्रिया मुळे स्त्री आणि पुरुष हे एकमेकांचे वैरी म्हणून उभे राहतील आणि ते स्त्री आणि पुरुष आणि एकंदरीत च मानवी वंश नष्ट करतील.
त्या मुळे स्त्रियांनी थोडी स्वतःची बुद्धी पण वापरावी नाही तर त्यांचा उपयोग करून ढोंगी स्त्री मुक्ती वाले च गब्बर होतील.

सोपी गोष्ट तर अवघड करून >> असंच वाटलं! लेखातले विचार बऱ्यापैकी पटले. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मी काढलेला मतितार्थ आहे. ९९% प्रश्न हे "माणसांचे" प्रश्न असतात. पण आपण वरची जेंडरची, जातीची, वंशाची, वयाची लेबलं काढून माणूसकीने त्या प्रश्नाकडे बघत नाही. माणूसकीने बघितलं तर अनेक प्रश्न पटकन सुटतील! What is most personal is most universal (Carl Rogers)

महाराष्ट्र विधानसभेने आज शक्ती कायदा संमत केला.
महिलांविषयक आपत्तीजनक / चुकीच्या / आक्षेपार्ह डिजीटल कमेण्ट्स साठी अजामीनपात्र गुन्हा नोंद होणार. २१ दिवसात आरोपपत्र आणि किमान ३ वर्षांचा कारावास आहे.
https://www.loksatta.com/photos/news/2731734/women-protection-shakti-law...

अरे बापरे.. भक्तांची पंचायत झाली आता. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत लिहिताना हात आखडता घ्यावा लागणार... नाही घेतला तर मग यांना शक्ती लागणार..!!

कोणतं ही कायदा करताना खूप सखोल विचार करणे आवश्यक असते .देशाच्या संसदेत जेव्हा एकदा नवीन कायदा पास होतो तेव्हा खूप सखोल चर्चा होणे आवश्यक असते आणि जिथे गरज आहे तिथे बदल करण्यासाठी सरकार अहंकारी नाही तर लवचिक आणि उदार असावे लागते.

मुळात आपल्या देशात एक सारखी स्थिती नाही खूप विविधता आहे त्याचा खूप खोल विचार होणे आवश्यक असते.
जमीन अधिग्रहण कायदा करताना सरकार नी फक्त विकास कामासाठी जमीन मिळावी हाच हेतू ठेवला होता ..
पण जमीन अधिग्रहण करण्या मुळे संबंधित व्यक्ती वर अनेक प्रकारे परिणाम होतो.
जमीन बागायती असेल तर अर्थाजण करण्याचा मार्ग बंद होतो ,माळरान असेल तर वेगळा परिणाम होतो
आर्थिक नुकसान होण्या बरोबर विस्थपण झाल्या मुळे सामाजिक परिणाम होतो.
ह्या सर्व परिणामाची भरपाई पैशात च होत नाही .कधी पर्यायी जमीन देणे.त्यांना नवीन ठिकाणी स्थायिक होण्यासाठी सरकार नी प्रयत्न करणे आणि योग्य मोबदला देणे हे सर्व आवधश्य असते.
पण फक्त मोबदला दिला की संपले असा संकुचित विचार मुळे विरोध झाला
अगदी हत्या करण्या विषयी पण सखोल विचार केलेला आहे.1,) व्यसनांच्या आहारी असताना केलेली हत्या २) मानसिक स्थिती खराब असलेल्या व्यक्ती नी केलेली हत्या
३) स्वतःचे रक्षण करण्यासाठी केलेली हत्या.
४) लष्करी दल,पोलिस ह्यांच्या कारवाईत झालेली हत्या.
ह्या सर्व हत्याच असतात . समोरचा मरतो .
पण त्याचे वर्गीकरण करून शिक्षेची सूचना केली आहे.
आता जो कायदा आहे मुलीचे लग्नाचे वय १८ वरून २१ करायचे.
कारण स्त्री चे साशक्ती करणं करणे.
पण ह्या विशाल देशात अनेक सामाजिक,आर्थिक,धार्मिक,जातीय ,शैशनिक विविधता असताना ह्या कायद्या चा परिणाम देश भर एक सारखा होणार नाही
लग्नाचे वय २१ केल्या मुळे समाजातील काही हिस्यातील स्त्रियांचे सबलीकरण होईल तर समाजाच्या काही हिस्यतील स्त्री चे खच्चीकरण होईल....हा कायदा त्यांना मारक ठरेल
त्या मुळे कायद्याची अमलबजावणी करताना त्याच कायद्यात विविध cause असणे गरजेचे आहे
आणि परिस्थिती नुसार योग्य तेच कॉज वापरणे पोलिस यंत्रणेने चे आणि न्यायालय चे काम आहे .
तशी तरतूद कायद्यात हवी
त्या मुळे पळवाटा निर्माण झाल्या तरी निरपराध व्यक्ती वर अन्याय होत नाही.

अरे बापरे.. भक्तांची पंचायत झाली आता. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत लिहिताना हात आखडता घ्यावा लागणार... नाही घेतला तर मग यांना शक्ती लागणार..!!

अडाणी सत्ता धारी जेव्हा जाणत्या जनतेला मूर्ख समजतात तेव्हा असे बिनडोक कायदे संमत होतात.
२१ दिवसाच्या आत केस चे आरोप पत्र आणि तीन वर्षात निकाल लागणार हे कलम त्या मध्ये आहे.
जे कुटील कारस्थान चे शिकार होतील त्यांच्यासाठी हे फायद्याचे आहे..पण अट्टल गुन्हेगार, अट्टल बलात्कारी ह्यांच्या साठी ह्या सारखी दुसरी चांगली संधी नाही
दहा ,वीस वर्ष उगाचच केस चालत असते तीन वर्षात जर निकाल लागत असेल तसे बंधन असेल तर अट्टल गुन्हेगार दिवाळी च साजरी करतील..कोर्टात पुरावे जसे दिले जातात,साक्ष कशी दिली जाते,पोलिस यंत्रणा कशी काम करते ह्या विषयी वेगळे सांगायची गरज नाही
फक्त सामान्य,सज्जन लोकांना ह्याचा फटका बसू नये

मला आता असं वाटायला लागलंय की बाळ झाल्यावर हॉस्पिटलमध्येच लग्नं करून टाकावीत. तिथे मुलं मुली दोन्ही सहज असतात. तीन वर्षांच्या गॅपऐवजी तीन दिवसांची सिंबॉलिक गॅप विचारात घ्यावी. घरजावई की घरसून हे छापा काटा करून ठरवावे. मुलीसकट जावई घरी अथवा मुलासकट सुनबाई घरी नांदायला रांगायला घेऊन याव्यात. बारशात लग्नाचा कार्यक्रमही उरकून टाकावा. आपलं मूल जावई / सून होऊन दुसर्‍याकडे गेलेल्या जोडप्यांनी लगेच नविन बाळाच्या प्रयत्नांना लागावे.

एकत्र वाढल्यामुळे जोडप्यात सामंजस्य जास्त असेल. शिवाय अगदी कोवळ्या वयात लग्नं झाल्यामुळे मुलांचे वांगी / आंबे असल्या पदार्थांत रुपांतर होणार नाही. शिवाय लग्नानंतर जबाबदारीची जाणीव होत असल्याने मुलं लवकर लवकर स्वतःच्या पायावर उभी राहून चालायला लागतील.

सरकारनं अशा कायद्याचा विचार करावा अशी मागणी.

संसारात भरीतच होतं बाईचं म्हणून वांग म्हणलं याला माझा आक्षेप नाही .... आंबा, फणस, सीताफळ बाकी काय होईल ती परमेश्वराची कृपा नि काय...

edited

अहो मामी, रांगत्या सुनबाईंना पोसावे नाही का लागणार? शिवाय वरदक्षिणा म्हणून किंवा घरजावई असतील तर आमच्या मुलाला अमुकच ब्रॅंडचा डायपर लागतो वगैरे मागण्या वाढतील.

छान कल्पना आहे. जन्मतःच लग्न करावे. आणि १८ किंवा २१ हे वय घटस्फोटाचे करावे.
जेणेकरून लग्नसंस्थाही शाबूत राहील. आणि योग्य वयात लोकं घटस्फोट घेऊन आपल्याला हवे तसे आयुष्य जगू शकतील.

जेव्हा एखाद्या मुलीचा बाप आपल्या मुलीला वयात येताच घटस्फोट मिळवून देत जावईदान करेल तेव्हाच त्याला पुण्य मिळाले असे समजावे.

ज्या जोडप्यांचे घटस्फोट होणार नाहीत त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी टोचून बोलत राहावे.
एवढा मोठा घोडा झाला, तरी मेला अजून बायकोसोबतच नांदतोय.
लहान परकरातली पोरगी नाहीस तू आता, बाई झालीस, अजून कश्याला नवर्‍याची गरज लागते तुला...
दोन मुले झाली ना आता.. पुरे आता.. त्यांची लग्ने लावा आणि वेगळे व्हा.... वगैरे वगैरे.

<< मुलीसकट जावई घरी अथवा मुलासकट सुनबाई घरी नांदायला रांगायला घेऊन याव्यात. >>
समस्त LGBTQ लोकांना तुम्ही विसरलात, हे नम्रपणे सांगू इच्छितो. उद्या ती मुलगी म्हणाली की माझ्या इच्छेविरुद्ध तुम्ही मुलाशी माझे लग्न लावले, तर पालकांनी काय उत्तर द्यावे?

आपली आत्ताची शिक्षण पद्धती फार उत्तम आहे असं नाही हे खरे आहे पण याच शिक्षण पद्धतीच्या आधारे अनेक भारतीयानी परदेशी जाऊन नावे कमावली आहेत. याचा अर्थ असा होतो की आत्ताची शिक्षण पद्धती फार वाईट आहे असे नाही.

हेमंत :काय क्लॉजेस घालावीत नव्या कायद्यात ते लिहा आपण सरकारास कळ वू शकतो. ट्विट करून.

बाळ गर्भाशयात असतानाच लग्न ठरवा यची एक पद्धत आहे काही जमातीत. त्याला पोटातील भाजी घेणे असे नाव आहे. मामींचा पर्याय त्याच्या जवळ जातो आहे Wink

अ‍ॅडिशनल कलमे सुचेल तशी लिहा.

Pages