स्त्रियांच्या लग्नाचे वय १८ असावे की २१? कायदा येण्या पुर्वी चर्चा

Submitted by अश्विनीमामी on 20 December, 2021 - 05:37

सरकार मुलींचे लग्नासाठी अधिकृत वय अठरा वरून एकवीस वर नेण्यासाठी कायदा आणायच्या विचारात आहे.

ह्यामुळे बालविवाहांचे प्रमाण कमी होईल. मुलींच्या आरोग्या कडे जास्त लक्ष राहील तरूण वयात बाळंतपणे अंगावर पडणार् नाहीत. त्यांना शिक्ष ण पूर्ण कर ता येइल व रोजगाराच्या सन्माननीय संधी शोधून आर्थिक स्वा तंत्र्याकडे वा टचाल करणे सोपे जाईल. अशी विचार धारा आहे.

अनुसूचित जाती जमाती, आदिवासी ह्यांचे ह्या कायद्याचा वापर करून शोषण होईल. असाही एक विचार प्रवाह आहे.

आपणास काय वाट्ते.?

https://indianexpress.com/article/explained/raising-legal-age-for-marria...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसाद quote करताना सुरुवातीला कंस नसल्याने अमांनी असं काय लिहिलंय असा प्रश्न पडला. मग पुढे कंस दिसला. आजचा ९:०५ ला लास्ट एडिट केलेला प्रतिसाद.
आधी नाव वाचलं की कुठल्या प्रतिसादावरून उडी मारून जायचं हे कळतं

<त्यांना ह्या कायद्याने मदत होईल. अशी अपेक्षा आहे. >

त्यासाठीच NFHS चे सर्व्हे वाचा म्हटलं होतं. भंवरी देवी प्रकरण का घडलं होतं आठवतंय?

पारंपारीक ज्ञानात राज्यशास्त्र, युद्धशास्त्र, वाणिज्य, साहीत्य, भाषा इ. शिकवत होते. >>> बरोबर आहे पण हे अगदी थोड्या लोकांना - सत्ताधारी वर्ग किंवा सत्तेबरोबर राहणारा (मंत्रीगण, सल्लागार ई). बाकी फारसे कोणी ते शिकतच नसत. इव्हन बहुतांश ब्राह्मणही पूजा-अर्चा, वेद-पुराणे, पौरोहित्य हेच शिकत. नाहीतर शेती. बाकी पारंपारिक व्यवसायातील अगदी (तेव्हाच्या प्रगतीनुसार जितपत होते तितके) तांत्रिक शिक्षण त्या त्या समाजातील लोकांना कुटुंबातून्/समाजातून मिळत होते.

मग राहिले तळागाळातील समजले गेलेले/दलित. त्यांच्या अवस्थेबद्दल, नवीन शिक्षणाने मिळू शकणार्‍या संधीबद्दल आणि त्याकरता आवश्यक असणार्‍या आरक्षणाबद्दल वाद नाहीच.

बाय द वे, या विषयावर भूमिका आधीच ठरवून आलेलो नाही आणि तितकी माहितीही नाही. वाचताना जे प्रश्न पडत आहेत ते लिहीले. त्यावर आलेली उत्तरेही वाचतोय.

१) स्त्री ही नेहमीच शोषित असते आणि आता पण प्रचंड अन्याय स्त्री वर होत आहे हे रडगाणे गाणाऱ्या लोकांची ची कीव वाटते.
२) मी स्वतः किंवा माझ्या आज पर्यंत संपर्कात आलेल्या कोणाच्याच घरी मुलींना दुय्यम वागणूक दिली गेलेली मी पाहिलं नाही
मुलींच्या शिक्षणासाठी आटा पिटा करणारे पालक च बघितले आहेत.
३) वर कोणी तरी कॉमेंट केली आहे पुरुषांना कोवळी बायको मिळावी म्हणून स्त्री चे लग्नाचे वय १८ आहे.
हद्द केली त्या आयडी .
15 वर्षी च मुलींचे प्रथम शारीरिक संबंध येतात असा सर्व्ह आहे ( हे सर्रास सर्वांचे असे नाही ) . Freepress जनरल चा रिपोर्ट आहे .खाली लिंक दिली आहे
मुलांचे पण कोवळ्या वयात च शारीरिक संबंध येतात.
१८ व्यां वर्षी खूप कमी मुली किंवा मुल वर्जिन असतात.
उगाच रडगाणे नको
कुठे तरी एकदा प्रसंग घडला म्हणून.
४) ज्या पालकांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे किंवा एकच मुलगा किंवा मुलगी आहे आणि आर्थिक स्थिती बिकट आहे .
तो मुलांना शिकवायला सक्षम नाही.
तो मुलीचे लग्न करेल आणि मुलाला रोजंदारी वर पाठवेल.
त्याला जबरदस्ती नी मुलीचे लग्न २१ पर्यंत करू नको असे सांगितले तर त्यांनी त्यांचे संगोपन कसे करायचे
अशा मुलांना किंवा मुलींना संगोपन पासून शिक्षण पर्यंत खर्च सरकार नी द्यावा ही मागणी आहे.
पण आता जे मुलींचे वय २१ च हवं लग्नासाठी ह्या साठी रडत आहेत तेच सरकार खर्च देवू लागले की आमचा टॅक्सचा पैसा सरकार उथळत आहे फुक्ट्यांवर अशी बोंब मरतील आणि हेच आयडी आघाडीवर असतील.
नेहमीच आम्ही शोषित# अन्याय ग्रस्त असले रडगाणे नको.
शोषित asal तर प्रतिकार करा.
रडता कशा साठी.

तसं तर फुले दांपत्यांनीही स्त्री शिक्षणात काही नवं केलं नाही, 'आमच्या' बायकांना घरी हिशोब ठिशोब ठेवण्यापुरतं लिहावाचायला घरीच शिकवलं जायचं असं म्हणणारेही लोक आहेत.

म. फुल्यांनी आग्रह धरला म्हणूनच इंग्रजांनी शिक्षण सार्वत्रिक केलं नाहीतर तेव्हाही ट्रिकल डाउन थिअरी सांगणारे लोक होतेच.
------
धर्मशास्त्रात खरंच नक्की अमक्याने असं वागावं आणि वागू नये हे समजायची संधीही नव्हती.

आश्रमव्यवस्थेत सर्व विषयांचे ज्ञान दिले जाई. नंतरच्या अ‍ॅप्लिकेशन प्रमाणे विशेष प्राविण्य दिले जात असावे.
ज्ञानशाखा ज्यांना म्हटले जाते ते विषय वैश्य, ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनाच होते. हल्लीच्या वेदपाठशाळेचं उदाहरण घेऊन अंदाज बांधू नयेत. शिवाय या शिक्षणामुळे प्राचीन काळापासून इतर देशांशी जो व्यापार चालायचा त्यासाठी हेच मनुष्यबळ कामाला येत होते. रेशीममार्गाचा इतिहास पाहिला तर सम्राट अशोकाच्या काळापासून भारताचा व्यापार ग्रीस आणि पलिकडच्या देशांशी व्हायचा. तिकडचे व्यापारी यायचे. सांस्कृतिक देवाण घेवाण व्हायची. या घडामोडींचा फायदा सेवा क्षेत्रात असणार्‍या शेती आणि बलुते यात वेठबिगारी करणार्‍यांना होतच नसणार. ( जिथे वस्तूविनिमय पद्धत होती तिथे श्रम मोफतच म्हणायला पाहीजे).

तेच तर. शेतात राबणाऱ्या कुणब्यापर्यंत हे ज्ञान पोचायला हवेच.
आपल्याकडे प्राथमिक गणिताची सूत्रे गूढ, कोडेयुक्त संस्कृत भाषेत बद्ध झाली. वाणिज्य वगैरे होते का? हुंड्या काढणे, वटवणे, वटणावळ, व्याज मोजणे, हे साधे अंकगणित शिकवले जात असेल कदाचित. पण सगळे फॉर्म्युले एखाद्या कोड्यासारखे लघुरूपात सूत्रबद्ध असायचे.

१२ vya वर्षीची मुलींचे शारीरिक संबंध येतात असा सर्व्ह आहे .
मुलांचे पण कोवळ्या वयात च शारीरिक संबंध येतात.
१८ व्यां वर्षी खूप कमी मुली किंवा मुल वर्जिन असतात.
उगाच रडगाणे नको
कुठे तरी एकदा प्रसंग घडला म्हणून.>> चाइल्ड अब्युज चा डाटा भयावह आहे. १२ वयात त्या मुलीचा कन्सेंट असतो का? तो विचारावा अशी काही पद्धत आहे का? गरज भासते का?

Below 18 कनसेन्ट घेऊनही तो बलात्कारच ठरतो

Rape ची व्याख्याच तशी आहे , any sexual relation with below 18 and any relation with above 18 without consent is a rape

केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा १८ वरून २१ केली, याने काय सध्या होणार? लिव्ह इन मुळे लग्न हा प्रकार नष्ट होणार का? लग्न हा व्यवहार झालाय का? लग्न करण्याचे योग्य वय काय? करियर आणि लग्न या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हेच आजचे तरुण विसरले आहेत का? डिव्होर्स वाढण्याची नेमकी कारणे कोणती?

अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO गौरी कानिटकर यांची मुलाखत.
https://youtu.be/LTohXBesLXI

माझ्या पोस्ट मधील 12 vya वर्षी ऐवजी 15 vya वर्षी असे पकडावे
चुकून 12 vya वर्षी लिहले गेले आहे

मुलींचे लग्नाचे वय २१ करण्यास काहीच हरकत नाही.
महाराष्ट्रात तरी जवळ जवळ २१ च्या पुढेच मुलींची लग्न केली जातात.अपवाद सोडून.
शारीरिक परिपक्व होण्याचे वय हे कमी असले तरी मानसिक दृष्ट्या परिपक्व होण्याचे वय अगदी पंचवीस च्या पुढे आहे
चौपाटीवर वर बसलेली २० वयाची जोडपी जितका बालिश पण करत असतात पण.परिपक्व मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण असलेली जोडपी. संयमित प्रेम व्यक्त करतात.
हे दृश्य नेहमी बघण्यात आहे.
पण प्रश्न हा आहे ज्यांची आर्थिक कुवत नाही,अशा कुटुंबांना मुलगा असू किंवा मुलगी ह्यांचे लग्न लवकर होवू नये असे खरंच मनापासून वाटत असेल तर अशा कुटुंबाची जबाबदारी सरकार नी घ्यावी.
तेव्हा रिझल्ट १००% मिळेल.

आधी नाव वाचलं की कुठल्या प्रतिसादावरून उडी मारून जायचं हे कळतं >> ही सोय परत आणावी अशी मागणी वेमांकडे पुन्हा एकदा नोंदवावीशी वाटते!
अमा, उत्तम पोस्ट. सो कॉल्ड privileged स्त्रियांना देखील कोणती ग्लास सिलिंग्स सामोरी येत असतात हे कळण्याची सहसंवेदना फार कमी पुरूषांमध्ये पाहिली आहे.

लिव्ह इन मुळे लग्न हा प्रकार नष्ट होणार

माणसाला पुढे पृथ्वी वर अस्तित्वात राहण्याची इच्छा आहे की नाही हा प्रश्न आणि त्याचे उत्तर ह्या वर सर्व अवलंबून आहे.
वैयतिक स्वतंत्र,बंधन नकोत,कोणतीच जबाबदारी नको..
ही कारण आहेत लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहण्याची.
करिअर करायचे म्हणून लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहतो .
हे उत्तर काही पटण्यासारखे नाही.
लग्न करून पण करिअर होते.
आणि माणसाचे आयुष्य च किती आहे करिअर करून संपत्ती करून त्याला वारस तरी हवा.
माणूस मेला की कुत्रा पण आठवन काढत नाही.
पण ज्यांनी समाजहित केले आहे त्यांना लोक हजारो वर्ष विसरत नाहीत
करिअर समाजहित करण्यात आहे असा कोण विचार करत नाही
प्रचंड पैसा कमावणे म्हणजे करिअर इतकाच संकुचित अर्थ आहे त्या पाठी.
लिव्ह इन मध्ये मुलांची जबाबदारी कोणालाच नको असते

माणसाचे मुल वयाच्या अगदी 25 वर्ष पर्यंत परावलंबी असते त्या चि लग्न ही संस्था च
जबाबदारी घेते
आणि म्हणून तर आज माणूस इथे आहे..ज्या मूर्ख लोकांना मुलांचे संगोपन पण नको आहे .
फक्त दारू , बाई,पैसा हेच करिअर आहे असे वाटते .
ते काय जबाबदारी घेणार.
लग्न ही संस्था नष्ट झाली की माणूस पण पृथ्वी वरून विलुप्त होईल.

मुलांना कोणत्या वर्षी जन्म देणे हे सर्वोत्तम आहे त्या मुळे सशक्त,मुल जन्माला येईल
ह्या वर संशोधन नक्की झाले असेल फक्त त्याचा निष्कर्ष जाहीर केला जात नाही
तरुण वयात च मुलांना जन्म देणे हा निसर्गाचा नियम आहे आणि माणूस कोणी लाट सहाब नाही त्याला पण तोच नियम लागू आहे.
सर्व प्राणी,पक्षी त्यांच्या मुलांची ते सक्षम होई पर्यंत काळजी घेतात .हा पण निसर्ग नियमच च आहे आणि तसेच वर्तन सर्व प्राणी करतात .
कुत्रा ,मांजर,बैल ,म्हैस, अनेक पक्षी ह्यांची पिल्ल काही दिवसात च सक्षम होतात त्यांना पालकांची गरज लागत नाही.
पण माणूस हा एकमेव प्राणी आहे त्यांच्या मुलांना सक्षम होण्यासाठी खूप वर्ष लागतात
तो पर्यंत त्यांची राहण्याची सोय ,खाण्याची सोय ,बाकी सोय

आणि निसर्ग नियमात नसलेले शिक्षण नोकरी इथपर्यंत पालकांची गरज असते
माणसाच्या मुलाची वयाच्या अगदी पंधरा वर्ष पासून जरी जबाबदारी कोणी घेतली नाही तर शिक्षण खूप लांब ची गोष्ट आहे बेसिक गरज अन्न,वस्त्र,निवारा पण निर्माण करण्यास मानवी मुल कुचकामी आहे
लग्न आणि कुटुंब व्यवस्था ही अशी संस्था आहे ती मुलांना सक्षम होण्या पर्यंत जबाबदारी पालकांवर टाकते
आणि बोनस म्हणून पालकांच्या संपत्ती ची मालकी पण त्यांना देते ती फुकट मिळालेली असते .
लिव्ह इन फक्त सेक्स ची गरज भागवते पण कोणतीच जबाबदारी घेत नाही
वारसा हक्क
कोणाचा ??
आई चा की बापाचं?.
ह्या विषयी काही नियम नाही .
पटत नाही म्हणून मुलाला जन्म देवून आई नी दुसरा पार्टनर शोधलेला असतो बापाने दुसरा partner शोधलेला असतो
ते मुलांची का जबाबदारी घेतील ,त्यांना का वारसा हक्क देतील
मग त्या मुलांनी काय करायचं

लग्न ही संस्था नष्ट झाली की माणूस पण पृथ्वी वरून विलुप्त होईल.
>>>>
छे काहीही काय, जेव्हा लग्न संस्था अस्तित्वात नव्हती तेव्हाचे आदिमानव कुठे विलुप्त झाले.
आणि तशीही आपली लग्नसंस्था गंडलेली आणि अनैसर्गिक आहे. मारून मुटकून एकाच जोडीदारासोबत आयुष्य काढावे लागते. एकापेक्षा जास्त व्यक्तींबद्दल आकर्षण निर्माण झाल्यास तो व्यभिचार ठरतो. सलमानचे लग्न होत नाही म्हणून त्याला लोकं चिडवतात, पण खरे तर लोकं त्याच्यावर जळतात, कारण तो लग्न न करता मजा करतोय.
आणि हो, हे मजा करणे स्त्री-पुरुष दोघांना लागू, अन्यथा पुन्हा ईथे स्त्री ही काय पुरुषांच्या मजेची उपभोगाची वस्तू आहे का असा सोयीने अर्थ नको Happy

अमा, उत्तम पोस्ट. सो कॉल्ड privileged स्त्रियांना देखील कोणती ग्लास सिलिंग्स सामोरी येत असतात हे कळण्याची सहसंवेदना फार कमी पुरूषांमध्ये पाहिली आहे.>>>+ १००००

या धाग्यावर डिजे यांनी निबर , आंबा वगैरे जी भाषा वापरली आहे त्याचा तीव्र निषेध.

जाई. आंबा हे झाड म्हणुन मनोगत लिहिलं आहे. कुणाला कसला आंबा वाटला ते मला माहित नाही. आपलं मन साफ असेल तर डोक्यात काहीबाही येत नाही. आंब्याच्या झाडाचे मनोगत असं शुद्ध स्पष्ट भाषेत लिहिलं आहे.. ते वाचलं नाही का..??

भरताचं निब्बर वांगं बाजारात देखिल खपत नाही अन म्हणुन ते तसंच झाडाला पिकु देतात हे कोणत्याही ठिकाणी डोळे उघडे ठेऊन बघितले तर सहज लक्षात येते. त्यामुळे तीव्र निषेध कशाचा करताय तेही एकदा तपासून घ्या.

बड्या घरचं, खानदानी श्रिमंत घरचं, लाखो रुपयांच्या कुंडीत वढलेलं वांग्याचं रोप आहे म्हणुन त्याची निब्बर अन बेचव वांगी कोणी फुकट दिली तरी घेणार नाही हा मतिथार्थ समजुन घ्या.

Dj तुम्ही योग्य तेच लीहले आहे.
मुळात ज्या स्त्रिया स्वतःला स्त्री हित वादी समजत आहेत .त्यांचे विचार सर्व मान्य केले तर पुरुषांची चांदी होईल .
सुख च सुख .आणि जबाबदारी शून्य.

कुटंब व्यवस्था मुळे च स्त्री सक्षम आहे
नाही तर स्त्री मुक्ती वाल्यांच्या विचारणे चालल तर पुरुषांची दिवाळी च आहे.

डिजे, स्वतःच्या पोस्ट पुन्हा एकदा वाचून पहा. लग्न केव्हा आणि कधी करावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. त्या निर्णयाला निबर वांग वगैरे भाषा वापरून हिणवण हे मन किती साफ आहे ते कळत. अश्या उपमा हिणवण्यासाठीच वापरल्या जातात. कोण्याच्या निर्णयाला अश्या प्रकारे हिणवण्याचा हक्क आपल्याला आहे का हे एकदा स्वतःच्याच मनाला विचारून पहा.
बाकी तुमची लेटेस्ट पोस्ट वाचून काही समजेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. तेव्हा चालू देत.

सलमानचे लग्न होत नाही म्हणून त्याला लोकं चिडवतात, पण खरे तर लोकं त्याच्यावर जळतात, कारण तो लग्न न करता मजा करतोय

त्यांनी जाहीर केले की कोणालाच आर्थिक फायदा किंवा सिनेमात येण्या साठी मदत करणार नाही.
आणि तो गंभीर आजारी झाला कुत्रा पण त्याला हॉस्पिटल मध्ये बघायला जाणार नाही.
म्हाताऱ्या बापलाच जावं लागेल आणि डॉक्टर नी सांगितलेली औषध मेडिकल स्टोअर मधून आणून द्यावी लागतील
कुटुंब हे सर्वोच्च असते कुटुंब च संकट येते तेव्हा हजर असते
सेक्स पार्टनर ( म्हणजे लिव्ह इन वाले) गायब होतात दुसरा शोधतात.

ईथे स्त्री ही काय पुरुषांच्या मजेची उपभोगाची वस्तू आहे का असा सोयीने अर्थ नको

दुर्दैवाने स्त्री वादी स्त्रिया ची तीच भूमिका आहे.
सर्व अवयव दिसतील जेणे करून पुरुष विचलित होईल असेच कपडे वापरा..
ही स्त्री वादी स्त्रिया चीच भूमिका आहे .
पुरुष समोर कमी कपड्यात नाचा त्यांचे मनोरंजन करा बार डान्सर बना ही स्त्री मुक्ती वाल्या स्त्रियांन चीच भूमिका आहे
पुरुष बिचारे विरोध करू लागले की स्त्रियांवर कसा अत्याचार चालू आहे ह्याचे रड गाणे चालू होते

Screenshot_20211223-141310_Chrome.jpg

मानव Lol

Pages