महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रामदास स्वामी महाराजांचे गुरु

स्वामी शब्दाचा अर्थ समजेल काय?

त्यांना समर्थ किंवा स्वामी हि पदवी कुणी दिली होती हेही शोधून काढा.

कारण त्यांच्या मनाच्या श्लोकात किंवा दासबोधात ते स्वतःला फक्त "रामाचा दास" म्हणूनच संबोधतात

भरत जी
केवळ आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी चौथीच्या पुस्तकांचा संदर्भ देण्याइतकी आपली पातळी खाली यावी याबद्दल आश्चर्य वाटते.
चौथी ते दहावी इतकी पुस्तके आणि त्याच्या साठी असलेले पाठयपुस्तक निर्मिती मंडळाचे सर्वच्या सर्व संदर्भ ग्रंथही नीट वाचून पहा.

एवढा डोंगर पोखरून आपणांस "असा इतिहास कुठेही लिहिलेला नाही" हे झुरळ काढायचे असेल तर काढाच.

आम्ही आपल्याला प्रोत्साहनच देऊ.

परंतु काका साहेब सध्या वयं काक : काक: करत आहेत हि वस्तुस्थिती त्यामुळे बदलणार नाही

किंवा त्यामुळे रामदास स्वामींच्या किंवा शिवरायांच्या उच्च स्थानाला यत्किंचितही धक्का लागणार नाही.

सुबोध खरे, तुम्ही सगळे प्रतिसाद वाचलेत का?

वर काहींनी शालेय पा ठ्यपुस्तकातूनच तसं शिकवलं गेलंय असं म्हटलं, हे दिसलं का तुम्हांला?

की तुम्हांला तुमची लांब लांब पोस्ट लिहायला निमित्त हवं म्हणून उगाच काहीही.

लांब लांब पोस्ट लिहायला निमित्त

हा हा हा

पाठयपुस्तक निर्मिती मंडळाचे सर्वच्या सर्व संदर्भ ग्रंथही नीट वाचून पहा.

काढा डोंगर पोखरून झुरळ

लगे रहो !

https://www.loksatta.com/maharashtra-news/mns-leader-sandeep-deshpande-s...>>>>>> Rofl

किंगमेकर काल बोल्ले होते की त्यांनी म्हणे दाऊदला दम दिला होता. Rofl आत्ता ! जर यांनी दम दिला होता, तर त्याच वेळी मुसक्या बांधुन पकडुन आणायचे ना. हात धरले होते का कोणी याचे. मोदींना फेकू म्हणणार्‍यांनी जरा याची फेकुगिरी बघावी. Proud

दम द्यायला काय हो?

आमच्या शेजारच्या उस्मान ने पण डोनाल्ड ट्रम्पना दम दिला होता कि इराणशी वैर घेऊ नका

तुमचे नामोनिशाण मिटवून टाकलं जाईल.

किन्ग्मेकर माकडाच्या कालच प्रसिद्ध झालेल्या इन्दिरा गांधींबाबतच्या एका वक्तव्यावरुन आता कॉन्ग्रेसचे नेतेही त्याच्यावर दगड मारु लागलेत... इकडचे कॉन्ग्रेसी गुलाम कधी सुरु होताहेत?

मी तर किंगमेकर दिसले की टीव्ही पहीला बंद करते. त्यांचं प्रवर्चन ( बरळंणं ) कोण ऐकणार, बोअर करतात. काँग्रेस आणि राजे समर्थक सगळेच गेलेत विरोधात.

>>> चौथीची इतिहासाची ही दोन पुस्तके मिळाली. त्यात रामदास स्वामी महाराजांचे गुरु होते असे कुठे म्हटले आहे दाखवणार का? >>>

महाराष्ट्रात १५ वर्षे बीग्रेडी राजवट असताना इतिहासाची जुनी पुस्तके बदलून त्यात बीग्रेडी जातीयवादी थापा इतिहास म्हणून लिहिल्या गेल्या. त्यात शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव व समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख कसा असणार?

बीग्रेडी जातीयवादी थापांचा संदर्भ इतिहास म्हणून देणाऱ्यांच्या अकलेची कीव वाटते. उद्या हे कोकाट्या, खेड्या या बीग्रेडींची पुस्तके ऐतिहिसिक बखर म्हणून दाखवतील.

>>> केवळ आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी चौथीच्या पुस्तकांचा संदर्भ देण्याइतकी आपली पातळी खाली यावी याबद्दल आश्चर्य वाटते. >>>

खाली यावी? त्यांची पातळी कायमच तळाला आहे.

महाराष्ट्रात १५ वर्षे बीग्रेडी राजवट असताना इतिहासाची जुनी पुस्तके बदलून त्यात बीग्रेडी जातीयवादी थापा इतिहास म्हणून लिहिल्या गेल्या. त्यात शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव व समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख कसा असणार?
<<

सहमत !
आम्ही वाचलेल्या इतिहासाच्या पुस्तकात, शिवरायांचे गुरु म्हणून दादोजी कोंडदेव यांचाच उल्लेख होता.

उदयनराजेंनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत-
महाविकासआघाडीचे शिल्पकार संजय राऊत

सर्वप्रथम या आक्षेपार्ह स्टेटमेंटचा तीव्र निषेध.
या काँग्रेसप्रणित आघाडीचं सरकार जर केंद्रात आलं तर कागज नही दिखाएंगे म्हणणाऱ्या समस्त रोहिंग्ये, बांगला देशी, पाकिस्तानी मुस्लिमाना हे लोक डोक्यावर घेणार आहेत. कागद दाखवायचे नाहीत याचसाठी तर सगळं आंदोलन सुरू आहे. आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजघराण्याकडेच हे लोक पुरावे मागत आहेत.

प्रसिध्द इतिहासकार प्रा. मा.म.देशमुख यांच्या १९६९ सालातील पुस्तकातील दावा हाही शरद पवारांच्या विधानाशी मिळताजुळता आहे

Karim Lala: पवार, ठाकरे यांचेही करीम लालासोबत फोटो? - karim lalas grandson says that the office of karim lala has photographs of indira gandhi meeting him even we have photograph of sharad pawar and balasaheb thackerays meeitng karim lala | Maharashtra Times - http://mtonline.in/3h6wrY/lmy

हम भी कुछ कम नहीं !

प्रसिध्द इतिहासकार प्रा. मा.म.देशमुख यांच्या १९६९ सालातील पुस्तकातील दावा हाही शरद पवारांच्या विधानाशी मिळताजुळता आहे
नवीन Submitted by सचिन पगारे on 16 January, 2020 - 16:01
>><<

प्रा. मा.म.देशमुखच कश्याला, श्रीमान योगीच्या प्रस्तावनेत, नरहर कुरुंदकरांनी देखील समर्थ रामदास स्वामी छत्रपतींचे गुरु नाहीत असा उल्लेख केला आहे मात्र असे म्हणण्याला कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही असेही ते सांगतात. मग हे पवार कोणत्या पुराव्याच्या आधारे म्हणत आहेत की समर्थ, राजांचे गुरु नाहीत ? समर्थां बरोबर कोणते तरी नाते असल्याशिवाय छत्रपती त्यांना परळी किल्ला वास्तव्यासाठी देतील काय ?

>>योग, हा व्हिडियो पहा. सुंदर सुंदर शब्द सापडतील.
@ भरत. कृ. कुठलिही पोस्ट मला ऊद्देशून लिहू नका.. सडक्या डबक्यात दगड मारायला मला वेळ नाही व ईच्छाही नाही.
आभारी!

अमेरिकेचे भावी अध्यक्ष १९९० मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 'समर्थ रामदास स्वामींना वंदन करताना शिवाजी महाराज' या शिल्पाचे उद्घाटन केले होते.

पवार हे काही इतिहासकार नाहीत. परंतु प्रा. मा.म. देशमुख यांचे १९६९ चे पुस्तक ह्या दाव्यामुळे वादग्रस्त ठरले होते त्याबाबत अत्रेंनी कोर्टात केसही दाखल केली होती

नवीन Submitted by प्रसाद... on 16 January, 2020 - 16:00 >>>

फलकांची अदलाबदल झालेली दिसतेय

>>> महाराजांचे वंशज संभाजीराजे यांचे विधान >>>

Who cares? घडलेला इतिहास आवडत नसला तरी तो नाकारता येत नाही व बदलताही येत नाही.

कर्जमाफीची माहिती देणाऱ्या पोर्टलवर कॅण्डी क्रश गेम... "आता आम्ही गेम खेळत बसायचं का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल.."उध्दव ठाकरे सरकार फक्त शेतकऱ्यांची थट्टा करत आहे !
--
https://www.facebook.com/NarendraDevendra2019/videos/vb.1987491428148412...

Pages