आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुहेरी, तुमचे प्रतिसाद वाचताना फुगडी घालत चकवा लागलेल्या रस्त्याने जात असल्यासारखे वाटते. आणि तुमच्याशी चर्चा करताना एखाद्या डोंगराच्या एका बाजूने चढून दुसरीकडून उतरून पुन्हा खालच्या बोगद्याने अलीकडच्याच बाजूला आल्यासारखे.>>>बऱ्याच वेळेला एकाच अंगाने एकाच दृष्टिकोनातून गोष्टी पाहायला जातात असे वाटते त्यामुळे वेगळ्या वाटे वरचे वेगळे परस्पेक्टिव्ह दाखवले तरीही ते उमजत नाही, मनात धरलेल्या एकाच आधीष्ठानाला चिकटून राहायचे असते म्हणून तिथेच परत आणून सोडलेले बरे नाही का? असो.ह्या पुढे प्रतिसाद फक्त वाचेन देणार नाही.तुमचे चालूदया.

दुहेरी, मला असं.सुचवायचं नव्हतं. पण तुम्ही वास्तवापेक्षा तात्त्विक विचार अधिक करता, practicality or real situation vs therory and ideals. असं वाटतं.
आणखीही काही बाबी आहेत. खरं तर मला तुमच्याशी एकास एक सलग चर्चा करायला आवडेल.
मला जशी तुमच्या लेखनात आवर्तनं दिसतात, तसं तुम्हाला माझं एका ठिकाणी चिकटणं दिसत असेल हे मान्य आहे.
पण एकेक पैलू समोर आल्यावर त्यात्यानुसार मत बनवण्यापेक्षा अनेक बाबींचा विचार करून मत बनवावं आणि मग ते मांडावं असा माझा प्रयत्न असतो.

सनव यांचे मनापासून आभार. हे सगळं शब्दखुणांमध्ये घ्यायचं का त्यावर विचार करतो.

अहो उलट तुमचेच आभार.
काही लोकांची करामत - स्वतःच्या पक्षाने सत्तेत असताना घेतलेले अथवा घडू दिलेले वादग्रस्त निर्णय, त्याला सत्ता गेल्यावर स्वतःच अन्यायकारक ठरवून थयथयाट करणे पण स्वतःच्या पक्षाला समर्थन करत राहणे आणि कोणी या विरोधाभासाबद्दल काही बोलल्यावर टॉडलर जसं हातपाय झाडत डोळे घट्ट मिटून 'मॉमी मॉमी' किंचाळत हुकमी रडं काढतात तसं 'मोदी मोदी' म्हणून आक्रस्ताळेपणा करत गळा काढणे याबद्दल लिहायची संधी मिळाली! Rofl

च्च. मोदींनी साडेतीन वर्षांत इतके छान छान निर्णय घेतलेत ना की नावं ठेवायला जागा म्हणून नाही. म्हणून असं करावं लागतं.

पण एकेक पैलू समोर आल्यावर त्यात्यानुसार मत बनवण्यापेक्षा अनेक बाबींचा विचार करून मत बनवावं आणि मग ते मांडावं असा माझा प्रयत्न असतो.
>>>
सगळ्याच धाग्यामध्ये मी पुन्हा आधीच्या अधिष्ठानावर पोहचत नाही आणि बऱ्याच वेळेला पर्यायी मार्ग/दृष्टिकोन मांडलेला असतो.असो.
By going through different path we visit/come across different perspective presented by different people involved and acknowledge them at that point in time, by this sometimes although destination/decision may not change but the overall outlook and atittude to look & deal with whole topic (in future) and people related to that topic as well as approach changes and there are better chances to understand/accept people and sometimes even reach 'suvarna madhya'.
Otherwise there will be only fights and no 'suvarna madhya' to move forward.

असो काही दिवस प्रतिसाद वाचेन ते ही चालतय की.

काही शाकाहारींना आपण शाकाहार करतो म्हणजे आपल्याला काही उच्च नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं आहे. असं वाटत असते. >> हे अगदी खरं आहे. माझ्या मते असं वाटणे ह्युमन बिहेविअर प्रमाणे फार वेगळं/ अ‍ॅबनॉर्मल नसावं. मी इतरांपेक्षा वेगळ/ श्रेष्ठ आहे ही बेसिक उर्मी असावी. हाय टेक मधलं उदा द्यायचं तर एम्बडेड प्रोग्रॅमरला फ्रंट एंडवाल्यांना काही झेपत नाही वाटतं, सगळ्याच प्रोग्रॅमरना टेस्टर करतो ते काम बेकार/ रिपिटीटिव्ह वाटतं, ऑटोमेशन टेस्टरला मॅन्युअल कनिष्ठ वाटतं. हे यच्चयावत सगळी कडे असावं. जसं निर्व्यसनी माणसाला दारु पिणारा महा बेकार वाटतो, आणि आपण कोणी महान आत्मा वाटतो. (कणेकरांची दारु पिणारा सिगरेट ओढणार्‍याला हसतो, सिग्रेट ओढणारा बिडी पिणार्‍याला हसतो स्टाईल हायरार्की)
पण हे वाटणं जेव्हा खाली म्हटलंय त्या लेव्हलला जातं ते सगळ्यात डेंजर आहे.
>>त्या पदार्थांचा स्पर्श कधीकाळी माझ्या ताटाला झालेला असल्याने माझं आहारपावित्र्य भंग होतं, म्हणजेच माझं अन्न पवित्र आहे आणि तुमचं नाही, हा जो आविर्भाव आहे त्याला माझा आक्षेप आहे. दुसर्‍याच्या आहाराबद्दल असं बोलणं हा एक प्रकारचा मानसिक हिंसाचारच आहे. >>
दुसर्‍याने कसं वागायचं हे जेव्हा मी ठरवू लागतो तेव्हा लिमिट क्रॉस होतं असं मला वाटतं.

तुम्ही तुमची प्लेट आणावी, त्यापासून तुम्हाला कोणी रोखलं, तर असाच कल्ला करावा.>>> इति भरत.
माझ्या दि. १७ जानेवारी २०१८ रोजी रात्री २२:४१ वाजता (भारतीय प्रमाणवेळ) दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये मी Ultrasonic Cleaning Machine बसवावी असे सुचवले होते. तसेच एखादी शाकाहारी व्यक्ती स्वतःचे ताट घेऊन येऊ इच्छित असेल किंवा जादा पैसे मोजून Disposable Plate घेऊ इच्छित असेल तर त्यास आडकाठी नसावी, असे मत मांडले होते. वास्तविक यात मांसाहाराला कुठेही नावे ठेवलेली नसतानासुद्धा एका आयडीकडून ‘असे नखरे करायचे असतील तर....’ वगैरे पद्धतीची भाषा वापरून शाकाहाराला ‘घासपूस’ असे हिणवले गेले!
यानंतर मांसाहारसुद्धा कसा शाकाहाराशिवाय अपूर्णच आहे किंवा शाकाहारी पदार्थांशिवाय मांसाहार शिजवता येउच शकत नाही हे सांगितल्यावर ‘त्याच’ आयडीकडून तसेच उद्दामपणे ‘मी बोलणारच घासपूस खाणारे’ असे शाकाहारी व्यक्तींना उद्देशून बोलले गेले.
त्यानंतर दि. १८ जानेवारी २०१८ रोजी रात्री ००:२१ वाजता (भारतीय प्रमाणवेळ) दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये शाकाहारी व्यक्तींना मांसाहाराचा त्रास होण्याचे मूळ कारण (उग्र वास) आणि त्यावरील उपाय (आणताना बंद पिशवीतून आणणे, चिमणीचे duct गच्चीपर्यंत नेणे) असे साधे उपाय सुचवले असताना पुन्हा ‘त्याच’ आयडीकडून ‘वास घरात येत असेल तर घर बंद करून ठेवावे....’ आदी प्रतिक्रिया देण्यात आली. याच प्रतिक्रियेतील एक वाक्य ‘पण आम्ही दरवाजा बंद करणार नाही आणि तुम्ही तुमच्या घरात शिजवू नका असे जर बोलत असेल तर का खपवून घ्यायचे?’ हे कसे चुकीचे आहे हे सांगण्यासाठी मी माझ्या प्रतिक्रियेत ‘आम्ही मांसाहार सोडणार नाही, किंवा इतरांना वास येणार नाही याची काळजी घेणार नाही आणि तरीही आम्हाला शाकाहारी लोकांच्या बिल्डींग /वस्तीमध्ये flat हवा असे बोलत असेल तर का खपवून घ्यायचे/??’ असे वाक्य वापरून त्यापुढे ठळक अक्षरात ‘थोडक्यात बोलायचे तर दोन्ही बाजूंनी बोलता येते, त्यापेक्षा सामंजस्याचा मार्ग महत्वाचा!’ हे वाक्य लिहिले होते. परंतु हे ठळक अक्षरातील वाक्य सोयीस्कररीत्या दुर्लक्षून आधीच्या वाक्यातील केवळ स्वतःच्या सोयीचा असा भाग घेऊन पुन्हा ‘त्याच’ आयडीकडून अतिशय उद्दामपणे ‘मांसाहार सोडणार नाही ...मग शाकाहारी लोकांनी मांसाहारी बना’ असा उर्मटपणे सल्ला दिला गेला. शिवाय अन्य दोन आयडींकडून शाकाहारी व्यक्तींना ‘येड्या’ असे संबोधण्यात आले. त्यापैकीच एका आयडीकडून ‘घर भाड्याने घेताना शाकाहारी आहोत असे खोटे सांगायचे आणि मग सर्व तऱ्हेचे प्राणी शिजवून खायचे’ असा समोरच्या व्यक्तीची फसवणूक करणारा सल्ला देण्यात आला. वास्तविक घर भाड्याने देणारे व्यवहार होण्याआधीच शाकाहाराची अट सांगतात. ते काही ११ महिने पूर्ण झाल्यावर Deposit परत देण्यावेळी ‘तुम्ही मांसाहार केला, म्हणून तुमचे अमुक एक हजार रुपये कापण्यात येत आहेत’ असे सांगून फसवणूक करत नाहीत. अशावेळी आधी शाकाहाराची अट मान्य करून मग मांसाहार करून घरमालकाची फसवणूक करणे कितपत योग्य आहे???

आता हे सारे विवेचन कशासाठी?
तर याच धाग्यावर केलेला ‘शाकाहारी व्यक्ती मांसाहारी व्यक्तींवर दादागिरी करतात’ हा आरोप खोडून काढण्यासाठी.

पण काही शाकाहारींना तेवढ्यामुळे आम्ही नैतिक उच्चासनावर बसलो आहोत आणि मांसाहार करणारे अजूनही आदिमानवाच्याच काळात आहेत, असं वाट असतं की काय?>>> इति भरत. @ १८ जानेवारी २०१८, २१:३७ (भारतीय प्रमाणवेळ)
आपल्या या वाक्यावरून मला माझे शालेय जीवन आठवले. इयत्ता तिसरी मध्ये अश्मयुगीन मानवाचा इतिहास होता. ज्यात असे शिकवले गेले की, अश्मयुगीन मानव हा पूर्वी शिकार करून कच्चे मांस वगैरे खात असे. पुढे पुढे (उत्क्रांतीच्या टप्प्यात) तो शेती करायला शिकला. खखोदेजा!

असो, ही माझी शेवटची पोस्ट.

विक्षिप्त मुलगा, सामिष पदार्थ शिजवले जाताना येणार्‍या वासाचा आणि प्लेटमध्ये आधी कधीतरी कुणीतरी काहीतरी घेऊन खाल्लं असेल म्हणून माझं आहारपावित्र्य भंग होतं असं म्हणण्याचा संबंध नाही.
वासाबद्दल म्हणाल, तर माझ्या बहिणीचा दमा शेजारच्या घरातून मसाले (मिरच्या) कुटताना येणार्‍या वासाने इतका उफाळतो की तिला दोनदा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावं लागलं होतं. कोबी, शेपू या भाज्यांचे वास उग्र असतात. फोडणीने ठसका लागतो. तेव्हा फक्त सामिष भोजन शिजवतानाच वास (असह्य) येतात असं नाही. इथेही जेव्हा कट्टर शाकाहारी लोक मांसाहार्‍यांच्या घरातून येणार्‍या वासाचा त्रास होतो म्हणतात, तेव्हा तो नुसत्या वासाचा त्रास असतो की मांसाहाराचा विशिष्ट वास आणि त्याच्याशी जोडलेल्या आपल्या पावित्र्याच्या, नैतिकतेच्या आणि आणखी कसल्या कसल्या कल्पना?
मांसाहारामुळे आमच्या घराचं पावित्र्य भंग पावतं , अशी कल्पना असल्याने कोणी मांसाहार्‍यांना घर द्यायला नाकारत असतील, तर तोही एक प्रकारचा भेदभावच आहे.
तुमच्या अन्य सदस्यांशी झालेल्या खडाजंगीबद्दल मी टिप्पण्णी करणार नाही. हे मुद्दे तुम्ही स्वतः मांडलेले आहेत.

मानवी प्रगतीचा आणि नैतिकतेचा संबंध लावायचा, तर आणखीही बर्‍याच गोष्टी आहेत.

विक्षिप्त
तुमच्या पेक्षा जास्त मित्रा माझे शाकाहारी आहे . कर्मचारी शाकाहारी आहे. आम्ही सगळे एकमेकांच्या घरी जाऊन जेवण जेवतो. ऑफिस मध्ये एकत्र बसून जेवण जेवतो. त्यातले कित्येक ब्राह्मण ,जैन, गुजराती वगैरे वगैरे विविध पंथ जातींमधले आहे. कुणालाही त्याने शाकाहारी असणे टोचत नाही आणि त्यांना ही आम्ही इतर मांसाहारी असणे टोचत नाही.
पण कोणी नवीन अतिहुशार शाकाहारी जेवणाच्या मेजवर "यार तू मांसाहार खाऊ नकोस मला ते बघून मळमळते" असे बोलतो तेव्हा त्याच्या कॉलरला पकडून आमचेच शाकाहारी लोक त्याला दरवाजातून बाहेर फेकून देतात. कारण असल्या लोकांनीची तीच लायकी असते. कोणी त्याचे जेवण जेवत असताना जर तुम्हाला आवडत नसेल तर तो तुमच्या सारख्या लोकांना मानसिक प्रॉब्लेम आहे. समोरचा तुमच्या तोंडात त्याचे जेवण तर भरवत नाही तरी तुमच्या भावना निव्वळ बघून दुखावतात ? 50 पैकी 2 ज्यांना वास सहन होत नाही तर त्याच्यासाठी 48 लोकांनी चिमण्या वर लावायचे वगैरे कशाला? त्या दोन जणांनी घर का बंद करून घेऊ नये.
ही असली लोक इथे नखरे करतात आणि बाहेर परदेशी गेल्यावर मात्र सगळं चालत. तिथे त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही मस्त वास घेत फिरत असतात. काहीजण हदडतात देखील आणि भारतात येऊन "आम्हाला बघून देखील मळमळत" बोलतात

आणि हो आमच्या घरी जेव्हायला 10 जण आली आणि त्यात 2 जण शाकाहारी असले तर आम्ही त्यांना उपाशी ठेवत नाही बरं त्यांच्यासाठी शाकाहारी जेवण वेगळे बनवतो. आणि ती लोक आवडीने एकत्र बसून जेवतात. " जेवण बनवताना ताट वेगळे आहे ना , शिजवायला कढई वेगळी घेतली का?" असले फालतूचे प्रश्न विचारत नाही बसत.

शाकाहारी आहे म्हणून आम्ही वेगळे आहे श्रेष्ठ आहे असले भाव स्वतः च्या घरात ठेवा. अहंकार इतकाही चांगला नव्हे. उलट निसर्गाला तुमच्या सारख्यामुळेच जास्त नुकसान होते. Wink

शाकाहारी लोक ढेकुण , डास, पाली, झुरळे, मुंग्या मारत नाहित ? कधी पेस्ट कंट्रोल करत नाहि घरात ?

पावित्र्याचा मुद्दा आला म्हणुन विचारले. का फक्त दुसर्याने मारलेले शिजवुन खाल्ले तर पाप लागते ? नुसते मारले तर पाप लागत नाहि का ?

" जेवण बनवताना ताट वेगळे आहे ना , शिजवायला कढई वेगळी घेतली का?"

'शिजवायला कढई वेगळी ' मध्ये काय ऑब्जेक्शन आहे? जनरली एखाद्याने घरी बोलावलेय, बिईंग ग्रेटफुल अँड थँकफुल लोक असे प्रश्न विचारणार नाहीत. पण याचा अर्थ तुम्ही बटर चिकन मसाला बनवून कढई न धुता फक्त चिकन पीस काढून त्यात बटर पनीर बनवून देता का? तसे असेल तर आपण महान आहात.

तुम्ही बटर चिकन मसाला बनवून कढई न धुता फक्त चिकन पीस काढून त्यात बटर पनीर बनवून देता का? ""

इतका मूर्ख विचार फक्त कट्टर लोकच करू शकतात कोणी न धुता कसे देईल? उलट तीच कढई का वापरतील दुसरी कढई वापरण्याचा कोमनसेन्स लोकांना असतो.. आणि असेच 100% लोक करतात. शाकाहारी आहे म्हणून त्याला मुद्दामून मटण मसाल्यात पनीर टाकून देत नाहीत.
आणि असे कुणाला खरंच संशय असेल तर त्यांनी आपल्या घरीच जेवावे Happy

" जेवण बनवताना ताट वेगळे आहे ना , शिजवायला कढई वेगळी घेतली का?" असे प्रध्न कोणी विचारत असेल तर ज्याने जेवायला बोलावले असेल त्याचा अपमान आहे. त्यापेक्षा जेवायला जाउच नये अथवा स्वतःचे जेवण स्वतः घेउन जावे.

"असले फालतूचे प्रश्न विचारत नाही बसत"
यातल्या 'फालतूचे' शब्दावरुन हा समज होणे साहजिक आहे. फालतूचे == युजलेस == 'वेगळी भांडी वापरली/न वापरली' ही बाब तुमच्या मते निग्लिजिबल.

माझा मुस्लिम मित्र मी लहान असताना आम्हा सर्व मित्रांना इदला जेवायला बोलवायचा. मी तेव्हा नोन वेज खात नसल्यामुळे मला तो चिकन काढुन फक्त बिर्याणी द्यायचा. मला ती खाण्यात कधी वावगे वाटले नाहि कारण त्याने जेवायला बोलावणे, सर्व मित्रांनी एकत्र जेवणे (ज्यात ३ हिंदु होते, १ जैन होता आणी हा मुस्लिम ) हे जास्त म्हत्वाचे होते.
शेवटी तुम्हाला सहिष्णु वातावरण करायचे/ठेवायचे आहे का मुद्दाम वेगवेगळे मुद्दे काढुन फुट पाडायची आहे यातच याचे उत्तर आहे.

अनु/ प्रदीप,
वेगळी भांडी वापरली नाहीत = तीच भांडी वापरली = भांडी न धूता वापरली = चिकन काढून त्याच ग्रेव्हीत पनीर घालून दिले
असा विचार का बरं?

पहिल्या पासून लोक म्हणत आहेत , नॉनव्हेज बनवून झाल्यावर भांडे स्वच्छ धुतले असेल तर.....

वेगळी कढई वापरायला ऑब्जेकशन का?
वेगळी कढाई वापरायला कम्पलशन करण्याला ऑब्जेक्शन आहे.

ह्म्म्म.... आमची एक मावशी इतकी कट्टर शाकाहारी आहे की तिच्या सुनेला एवरेस्ट चा चिकन मसाला सुद्धा शाकाहारी भाजीत घालू देत नाही. तिला चिकनमसाल्यत चिकनचे पिसेस असतात असे वाटत असावे.

'भांडी स्वच्छ धुवून' वाल्या मुद्द्याला बर्‍याच आधी अ‍ॅग्री केलेले होते.
जनरली वेगळ्या भांड्यात वाला प्रश्न ज्याने प्रेमाने बोलावलेय अश्या यजमानाला कोणीही विचारणार नाही.

पण आता यापुढे हे वरचे चिकन काढून खालची बिर्याणी द्यायची,त्यात काय होते वगैरे प्रस्तावही मांडतायत.'भांडे स्वच्छ धुणे, त्यात जे पाहिजे ते शिजवणे' आणि 'भांडे धुतले आहे का' हा कन्सर्न कोणाला आल्यास तो 'फालतू'चा समजणे यात किंचीत फरक आहे. कंपेअर धिस विथ 'यात पीनटस नाहीत ना, मला अ‍ॅलर्जी आहे' आणि 'यात अ‍ॅनिमल प्रॉडक्ट नाहीत ना, सध्या मी व्हेगन आहे' आणि बाहेर पाणी पिताना 'फिल्टरचे आहे ना'.
अगेन, हे प्रश्न न विचारणे, तितका बेसिक विश्वास ठेवणे ही पाहुणा म्हणून आलेल्याची मॉरल जबाबदारी.पण काही परिस्थितीत असे प्रश्न विचारुन कन्फर्म करावे लागल्यास त्याला 'मूर्खपणा' आणि 'फालतूपणा' समजणे हे इक्वली अग्रेसिव्ह.

"ह्म्म्म.... आमची एक मावशी इतकी कट्टर शाकाहारी आहे की तिच्या सुनेला एवरेस्ट चा चिकन मसाला सुद्धा शाकाहारी भाजीत घालू देत नाही. तिला चिकनमसाल्यत चिकनचे पिसेस असतात असे वाटत असावे."

हे मेंटल कंडिशनिंग वरची चित्रे पाहून होते.आणि अर्थातच चुकीचे आहे.

सरळ गोष्ट आहे अनुताई.
वर विक्षिप्त सारखी लोक जर एखाद्याला तुझे जेवण बघून मला मळमळते असे बोलतात तर एखाद्याच्या घरी गेल्यावर त्याला अपमानजनक वाटेल असे वरील प्रश्न देखील विचारू शकतात. अतिहुशार आणि अहंकारी लोकांनाचा काही भरोसा नसतो ते स्वतः चे ज्ञान कुठेही प्रदर्शित करतात. Wink
म्हणून म्हणालो की कट्टरता आपापल्या घरातच कोंडून ठेवावी.
ज्याला प्रॉब्लेम असेल त्यांनीच स्वतः पुरता उपाय करावा.
मला आवडत नाही म्हणून तू जेवू नकोस असे म्हणायचा अधिकार ना शाकाहारी लोकांना आहे ना ही मांसाहारी लोकांना आहे

इतका मूर्ख विचार फक्त कट्टर लोकच करू शकतात कोणी न धुता कसे देईल? उलट तीच कढई का वापरतील दुसरी कढई वापरण्याचा कोमनसेन्स लोकांना असतो.. आणि असेच 100% लोक करतात. >> ही माहिती तुम्हाला कोणी दिली? तुम्हाला किचन मध्ये काय चालतं याची खरोखरीच काही माहिती दिसत नाही. तव्यावर ऑम्लेट करा आणि तवा घासून तो वास किती आणि कसा जातो की रहातो त्याचा अभ्यास करा. वास घालवणं सोपं नसतं. मग तो मसाल्याचा असेल की अंड्याचा की बीफचा की पोर्कचा

वि. मु. आणि मी यांच्या मतात किंचीत फरक असावा.
मला कोणीही कोणत्याही घरात्/माझ्या घरात बाहेरुन पार्सल आणून काहीही खाल्लेले चालेल.त्यांच्या आवडीचे पार्सल मी ऑर्डर करुन देईन.कोणतेही वास थोडे ओपन किचन्/खिडक्या उघड्या असल्यास डायल्युटेड घ्यायला चालतात.
वर्षानुवर्षे ओळख, विश्वास असलेल्याला मुद्दाम 'भांडं वेगळं घेतलं आहेस का' वगैरे प्रश्न विचारणे हाही तितकाच उद्धटपणा.
आणि 'भांडे धुवून घेतले काय, किंवा नुसते आधी कंटेंट काढून थोडे व्हेज बनवले काय, व्हेज तर आहे ना' असा अप्रोच न ठेवणे ही खाणे बनवणार्‍याची मॉरल रिस्पॉन्सिबलिटी.

दोन्ही पार्टीनी आपापले तारत्म्य बाळगलेले बरे.

अमित आपल्या किचन मध्ये काय काय चालते याची मला काडीचीही कल्पना नाही Wink
माझया किचन मध्ये काय चालते आणि माझया मित्रांच्या किचन मध्ये काय चालते यावर मात्र 100%विश्वास आहे.

आणि हो चुकून एखादा चिकनचा छोटा पीस खाल्ला गेला तर काही आभाळ कोसळून त्या इसमास हार्टअटक येत नाही. चुकून घटना काही घडतात याचा किती ईश्शु करायचा हे त्या व्यक्तीने ठरवायचे असते. पाण्यातून हवेतून कित्येक अरबो खरबो किटाणू जीवजंतू यांचे सेवन केले जाते. तोंड उघडे करून झोपल्यास मच्छर देखील तोंडात जातो Wink मग काय आभाळ कोसळते ?

"आणि हो चुकून एखादा चिकनचा छोटा पीस खाल्ला गेला तर काही आभाळ कोसळून त्या इसमास हार्टअटक येत नाही. चुकून घटना काही घडतात याचा किती ईश्शु करायचा हे त्या व्यक्तीने ठरवायचे असते."

खरेय. चुकून घडल्यास आत्महत्या कोणीच करत नाही Happy तसेही लावत असलेली लिपस्टिक, खात असलेला डॉमिनोज पिझ्झा, दात घासत असलेली पेस्ट यातले काहीच 'व्हेज असेलच' अशी खात्री आयुष्यात नसते.अंडे टाकून केक फ्लफी बनतो, भारतात मिळणार्‍या तिरामिसू मध्ये बरेच वेळा असतेच.ते चालते.'प्राण्यांना मारुन हाल करुन हिंसा' वाल्या मुद्द्यालाही विशेष अर्थ नाही.प्रिव्हेन्शन, एक्झिक्युशन आणि मॉनिटरिंग प्रचंड कठीण आहे.मुद्दामून 'हे खा.त्यात काय होते? तुला चालेल' म्हणून देणे यावर आक्षेप.

"वा वा. माझा धागा हजारी होऊ शकेल असं दिसतंय."

भरत, या विषयात इतके पोटेन्शियल आहे की थोडे प्रयत्न केल्यास हा धागा 'वर्ल्ड्स लार्जेस्ट कमेंटेड कंटेंट ऑन ड्रुपल' मध्येही जाऊ शकतो. Happy

'असेच 100% लोक करतात' वरून :' माझ्या किचन मध्ये काय चालते आणि माझया मित्रांच्या किचन मध्ये काय चालते यावर मात्र 100%विश्वास आहे' वर आलात. नोट सबसेट छोटा केलाच आणि बदललेल्या सबसेट मध्ये फक्त विश्वास आहे खात्री नाही.

Pages