निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रच्याकने,

कॉन्ग्रेसवाल्यानी मतदान यत्रात गफला करून क्कोणतेही बटन दाबले तरी त्यानाच मते मिळतील अशी काही व्यवस्था केली होती म्हणे , त्यामुळे तर भाजपला एवढ्या शिटा मिळाल्या तर नाहीत? की भाजपनेच असा काही गफला केला होता ? ::अओ:

(की विषय आता चर्चेला नको? :))

पिल्या, ओवेसी निवडुन आलाय्/येतोय
ASADUDDIN OWAISI All India Majlis-E-Ittehadul Muslimeen 409995
DR.BHAGAVANTH RAO Bharatiya Janata Party 307388
S KRISHNA REDDY Indian National Congress 46372
RASHID SHAREEF Telangana Rashtra Samithi 36346
BINGHI RAJASHEKAR Pyramid Party of India 20696
BODDU SAINATH REDDY Yuvajana Sramika Rythu Congress Party 10043

मला आठवताहेत १९८४ मधिल बीजेपीच्या २ सीट्स, आज तीस वर्षानंतर कॉन्ग्रेसला पन्नासचे आसपास आहेत सीटा, तेव्हा इतकेही काही वाईट नाही हां! Wink
बर ते पगारेसाहेब कुठे आहेत? बोलवा ना त्यान्ना!

गामा.. आआप चा फार प्रभाव नाहीये.. सपा बसपा आणि भाजपा ह्यांच्यातच मुख्य लढती झाल्यात आणि त्यात भाजपानी बाजी मारलेली आहे..

काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा. आता मोदींनी चांगले दिवस दाखवावे, दिग्विजयसिंह >>> Lol

आज लक्झरी बस मधून जाताना काही फ़ॉरेनर गाडीत होते. त्याना जेव्हा कळले की भारतात मतमोजणी चालू आहे आणि सरकार बदलणार आहे आनि तरीही दैनन्दिन व्यवहार जणू काही घडलेच नाही इतक्या शान्तपणे चालू आहे हे पाहून त्याना धक्काच बसला...जगात बर्‍याच देशात सत्तान्तर इतक्या सहजी होत नाही. भारतात लोकशाही सत्तातरे इतक्या स्मूथपणे झालीत की कौतुक वाटावे. त्यामुळे सोनिया , राहुल वगैरे इटलीला पळून जातील असे म्हनणे म्हणजे भाजप सरकारवर अविश्वास दाखवणे होईल. ते सुध्धा इथे सेफ़ आहेत याची जाणीव त्याना आहे.

Last Updated at 6:02 PM On 16/5/2014
View vote share

ALL INDIA Result Status
Status Known For 543 out of 543 Constituencies
Party Won Leading Total
Bharatiya Janata Party 121 161 282
Communist Party of India 1 0 1
Communist Party of India (Marxist) 2 7 9
Indian National Congress 18 27 45
Nationalist Congress Party 2 4 6
Aam Aadmi Party 2 2 4
All India Anna Dravida Munnetra Kazhagam 5 32 37
All India N.R. Congress 0 1 1
All India Trinamool Congress 12 22 34
All India United Democratic Front 0 3 3
Biju Janata Dal 0 19 19
Indian National Lok Dal 1 1 2
Indian Union Muslim League 2 0 2
Jammu & Kashmir Peoples Democratic Party 0 3 3
Janata Dal (Secular) 1 1 2
Janata Dal (United) 1 1 2
Jharkhand Mukti Morcha 0 1 1
Kerala Congress (M) 0 1 1
Lok Jan Shakti Party 2 4 6
Naga Peoples Front 0 1 1
National Peoples Party 0 1 1
Pattali Makkal Katchi 0 1 1
Rashtriya Janata Dal 1 3 4
Revolutionary Socialist Party 1 0 1
Samajwadi Party 0 5 5
Shiromani Akali Dal 1 3 4
Shivsena 6 12 18
Sikkim Democratic Front 0 1 1
Telangana Rashtra Samithi 1 10 11
Telugu Desam 0 16 16
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen 0 1 1
Apna Dal 0 2 2
Rashtriya Lok Samta Party 0 3 3
Swabhimani Paksha 0 1 1
Yuvajana Sramika Rythu Congress Party 0 9 9
Independent 0 4 4
Total 180 363 543

रॉबिनहूड,

युक्रेनच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनतेचं खरंच कौतुक आहे. Happy

रच्याकने : फारीनर कोणत्या देशाचे होते?

आ.न.,
-गा.पै.

एखादे मशिन बन्द पडले असेल. अशी तान्त्रिक अडचण असल्यास निवडणूक आयोगाचा सल्ला घेतला जातो. त्या मचिनच्या मताने फ़ार निकालावर परिणाम होण्यासारखा नसेल तर निकाल जाहीर करायला परवानगी दिली जाते. एरव्हीही. मतमोजणी पूर्ण झाल्यावर सर्व आकडेवारी , विरोधी उमेदवाराने फेरमतमोजणी मागितली आहे का, मतमोजणी दरम्यानचे विशेष प्रसण्ग याचा अहवाल आयोगाला तिथल्या निरिक्षकाच्या शिफ़ारषीसह पाठवला जातो.तो अभ्यासून आयोग निकाल जाहीर करायला परवानगी देते. जसजसे निकाल वाढत जातात तसे आयोगाच्या ऑफिसातल्या अधिकार्‍याना ते उरकत नाही मग ही परवानगी रखडते. इकडे मत मोजणी कक्षात सगळे मते मोजून निवान्त परवानगीची वाट पहात बसलेले असतात . (आणि त्याना कोण निवडून आला आहे हे अनधिकृत रित्या माहीतही असते :)) निवडणूक अधिकार्‍याने अधिकृत रित्या जाहीर करीपर्यन्त उमेदवार निवडून आला आहे मानले जात नाही, Validly declared elected.... कळत नाही निकाल का जाहीर होत नाहीये. निवडून आलेल्या उमेदवारास निवडणूक अधिकार्‍याच्या सहीचे प्रमाण पत्र मिळाल्याशिवाय सन्सदेत अथवा विधान सभेत प्रवेश मिळत नाही त्यामुळे तोही सगळा उत्साह आवरून बसलेला असतो. त्यामुळे निकाल रोख्ल्यासारका वाटतो खरा..... पण तसे काही नसते.

जगात बर्‍याच देशात सत्तान्तर इतक्या सहजी होत नाही. >> रॉहु शी सहमत. इतर अनेक देशांत जे चालले आहे त्या पार्श्वभूमीवर तर हे जास्तच उठून दिसते. ते ही भारताचे स्वातंत्र्य/लोकशाही अजिबात टिकणार नाही हे भल्या भल्या सो कॉल्ड "द्रष्ट्या" लोकांनी १९४७ मधे केलेल्या वक्तव्यांनंतरही!

Pages