निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय माहीत लिंटी

पण कांग्रेसचे अशोक चव्हाण च निवडून आलेत अस दिसतय प्रथम दर्शी

काँग्रेस - १ रा. काँग्रेस - ४ बाकी शिवसेना भाजप.. महाराष्ट्रात धुतलाच पार.. आता सगळे जण राजिनामा देण्याची भाषा करतील..

विधानसभेत हेच चित्र रहायला पाहिजे त्या शिवाय काँ राकाँ वाले ठिकाणावर येणार नाहीत..

काँग्रेस - १ रा. काँग्रेस - ४ बाकी शिवसेना भाजप.. महाराष्ट्रात धुतलाच पार.. >>>>>अगदी अगदी Happy

मावळात दुसर्‍या क्रमांकावर कोण आहे?

लक्ष्मण जगताप कि नार्वेकर?

Maval 33
APPA ALIAS SHRIRANG CHANDU BARNE Shivsena
JAGTAP LAXMANBHAU PANDURANG Peasants And Workers Party of India

167757 Counting In Progress

निवांत....

अजूनी अधिकृत निकाल नाही अरुण जेटलीबाबत....पण आता ३.२० ला कॉन्ग्रेसच्या कॅ.अमरिंदर सिंग यानी जेटलींच्या विरोधात १ लाख मतांची आघाडी घेतल्याचे दिसते....इतका फरक भरून काढणे केवळ अशक्य वाटते....सबब जेटली यांचा पराभव निश्चित मानला जातो.

अशोकजी मी बराच वेळ हेच म्हणायचा प्रयत्न करत आहे की येथे येऊन सगळे म्हणत आहेत की हे जिंकले ते जिंकले तर तसे नसुन अनेक लोक आघाडीवर आहेत.
आता वर हेडर मधे जिंकलेल्या जागा दाखवल्या आहेत. त्या थोड्या थोड्या वेळाने अपडेट केल्या जातील.

जे जिंकले अथवा हरले म्हणून लिहीलं आहे, ते न्यू़ज चॅनेल आणि साईटवर स्पष्ट दाखवत आहेत.
इलेक्शन कमीशनच्या साईटवर मोदींचं पण काऊंटींग इन प्रोग्रेस दाखवत आहेत बडोदा आणि वाराणसीत पण.

भारतात मोठ्या कालावधीनंतर बहुमताचे ( बिन आघाडीचे ) सरकार येणार आहे असे दिसतेय. त्यामूळे जया, ममता व तत्सम लोकांची मनधरणी न करता काही धोरणे आखता येतील.. हा विजय जितका बीजेपी चा आहे तितकाच भारतीय जनतेच्या विवेकशक्तीचा पण आहे.

Pages