रेणुका शहाणे दिग्दर्शित 'रिटा' हा मराठी सिनेमा आवडला. असे सिनेमे चालतील, न चालतील, त्यांना व्यावसायिक यश मिळेल किंवा नाही ही वेगळी गोष्ट पण कोणीतरी असे प्रामाणिक प्रयत्न करुन वेगळे सिनेमे काढत रहातात ही गोष्टच छान वाटते.
ज्यांनी शांता गोखलेंची मुळ कादंबरी 'रिटा वेलिणकर' वाचली नसेल त्यांना कदाचित हा सिनेमा संथ वाटण्याची शक्यता आहे. पण रेणुकाने स्क्रिप्ट कादंबरीशी प्रामाणिक राहून लिहिले आहे. त्याबद्दल तिचे अभिनंदन. संवाद बहुतेकवेळा कादंबरीमधले जसेच्या तसे ठेवलेले आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे रिटा वेलिणकर कादंबरीतला काळ आणि पोकळ दिखावा असलेल्या, रिटाच्या इंग्रजाळलेल्या आणि स्वार्थी आईवडिलांची जीवनशैली जशीच्यातशी उभी करण्यात रेणुका यशस्वी झाली आहे.
मोहन आगाशेंनी शॅन्क्स वेलिणकरचे बेअरिंग चांगले ठेवले आहे.
पल्लवी जोशी काही प्रसंगांमधे अवघडल्यासारखी काम करते पण रिटा म्हणून ती शोभते. अर्थात पस्तिशीनंतरच्या वयातल्या रिटाच्या भुमिकेला ती न्याय देते तसा २१ वर्षं वयातली म्हणून दाखवली असताना अजिबातच देऊ शकत नाही. त्या वयातला रिटाचा उत्फुल्लपणा, मॅचुअर्ड साळवीच्या प्रेमात पडत असतानाचा तिचा निरागसपणा तिच्या देहबोलीमधे दिसत नाही. सिनेमांमधे पूर्वीचे दिवस दाखवताना त्या वयातल्या भुमिकांसाठी वेगळी तरुण कास्टिंग का करत नाहीत कोण जाणे. प्रौढ वयातले अभिनेते, अभिनेत्री कितीही मेकप केला, वेगळ्या स्टाईलचे कपडे घातले तरी वीसेक वर्षच काय, पण दहा वर्षांनीही तरुण म्हणून शोभून नाहीच दिसू शकत. (अग्निहोत्र या मराठी मालिकेमधे मात्र लहान्-तरुण्-मध्यमवयीन अशा सर्व वयोगटांसाठी अतिशय उत्कृष्ट वेगवेगळे कास्टिंग केले आहे. बहुतेक दिग्दर्शक याबाबतीत जरा कंटाळाच करतात.) पल्लवीने नर्व्हस ब्रेकडाऊन होतानाचा शॉट अप्रतिम दिला आहे.
खटकते ती जॅकी श्रॉफची भुमिका. जॅकी काम चांगलं करतो. साळवी म्हणून त्याचे केले कास्टींग बाह्यतः योग्य आहे. मराठीही तो बरा बोलतो. पण तरी तो भुमिकेशी एकजीव झाल्याचे वाटतच नाही. मिसफिट वाटत रहातो. तशीच ती सई ताम्हणकर. काम चांगलं करते पण तिचं डिक्शन अत्यंत सदोष आहे. कॉन्वेन्टी मराठी उच्चार खटकत रहातात. रेणुका शहाणे आणि मकरंद देशपांडे त्यांच्या रोल्समधे परफेक्ट.
रिटा बघण्यासारखा आहे हे नक्की.
Submitted by शर्मिला फडके on 5 September, 2009 - 23:07
आजच रीता बघितला.अड्व्हन्स बूकिन्ग करुन. सनसिटि.पार्ल्यात.हाउसफुल्ल होता.सिनेमा खुपच छान आहे.शर्मिलाच रिव्हु ला अनुमोदन.आज काल खुपच छ्आन मराठी चिनेमे एका पाठोपाट येत आहेत.खुप छान वाट्त.
सइ मझ्या ओफिस मधल्या मड्म कडे पेइग गेस्ट म्हणुन रहात होती.ति सान्गलि वरुन अलि आहे. अर्थातच कोन्वेन्ट मधे शिक्लेलि आहे. पण तीला कान्न्दे पोहे मधे उत्तम ब्रेक मिळाला. सान्गलि मधुन मुम्बैत येउन पार्ल्यात येउन पेइग गेस्ट म्हनुन राहुन कस काय जमवल बघा.
अरे वा,
गंध, रिटा , निशाणी डावा अंगठा सगळ्या मराठी सिनेमांचे चांगले रिव्ह्युज पाहून छान वाटल.. बघायलाच हवेत !
रॉबिन,
वाचतोयेस ना रे, येतात रे मराठीतही अधुन मधून चांगले मराठी चित्रपट !
Submitted by दीपांजली on 6 September, 2009 - 14:51
एवढ्या महत्वाच्या भुमिकेसाठी जॅकी श्रॉफला का घेतला ? तो कधीच उत्तम अभिनेता नव्हता.
तरूण अभिनेते वयस्कर भुमिका करु शकतात, पण उलटा प्रवास खुपदा केविलवाणा ठरतो.
गंध, रिटा यु ट्युब वर नाही सापडले ईतर कुठे ह्यांच्या लींक्स उपलब्ध आहेत का???
टॉस पाहिला ... जंगलात ट्रिप वर गेलेल्या ग्रृप ला २५ करोड सापडतात मग पैश्यासाठी खुन खोटे पणा सुरु होतो... चित्रपट बघतांना मला पडलेले काही प्रश्न लहान मुलाच्या कानपट्टिवर पोलीस बंदुक ठेवु शकतात का ???? हे कायद्यात आहे का??? ... लहान मुला समोर बंदुकिने गोळ्या घालुन खुन करण्याच्या शॉट (शॉटस) वर सेंसॉरला आपत्ती नाही का????????????.... चित्रपटा बद्दल 'नो कमेंटस'. चित्रपटात वेगळ काय कि मोठ्यांबरोबर लहान मुलाला हि गोळ्या घालतांना दाखवलय!
आत्ताच निडाअं पाहिला एकदम झाक .... पण बुरख्या बाबतच्या सीन मध्ये गडबड झाली कदाचीत... मुस्लीम बायका बुरखा तोंडावरुन बाजुला न करताच परीक्षा देतांना दाखविल्यात दिल्लीचा परीक्षक येतो तेव्हा चा सीन... मग त्या आधीचा "मी तीच कंकु मीटवल" हा सीन.... ये कुछ जम्या नही ... बाकि बेश्ट
'रिटा'साठी माझ्या नणंदेने रेणुका शहाणे ची प्रमुख सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे.तिने पण आवर्जून हा चित्रपट पहा असे सांगितले.आता लोकांचे विचार ऐकून पण पाहिलाच पाहिजे असे वाटायला लागले आहे.
मी पण कालच रिटा पाहिला. अजिबात आवडला नाही. पल्लवी जोशीचे काम चांगले, तांत्रिकदृष्ट्या उत्तम. पण सिनेमा ही एक संपूर्ण कलाकृतीच म्हणुन बघावी अश्या मताचा मी असल्याने नाही आवडला. ही कादंबरी माहिती नाही त्यामुळे जर काही संदर्भ माहिती नसल्याने संपूर्ण आषय न कळल्याची शक्यता आहे.
स्पॉइलर वार्निंगः चित्रपट न बघितलेल्यांनी खालचे वाचू नये.
१. कादंबरीत काळ लक्षात येत नाही. रिटाच्या लहानपणी एकदम विन्टेज गाडी आणि ३६-४० वर्षात एकदम इनोव्हा? तसेच फ्लॅट स्क्रीन एलसीडी वगैरेही दिसतात काही काही शॉट्स मध्ये.
२. मोहन आगाशे आणि सुहासिनी मुळे, दोघेही फार कृत्रीम वाटतात.
३. त्या पूर्ण कथेचा गाभा, रिटाला तिच्या आणि साळवी मधल्या संबंधांबद्दल वाटणारी अपराधी भावना एकदम १५-१६ वर्षांनीच येते?
४. तिचे मानसिक रुग्ण होणे खूपच अचानक होते. पहिल्यांदा एकदा तिच्या शाळेतला एक प्रसंग आणि मग एकदम शेवटचा आरसा फोडते तो प्रसंग ह्यात सलगता येत नाही.
५. अगदी लहानपणी संबंध असलेल्या मैत्रिणीला एकदम पत्र वगैरे लिहून, आणि त्या मैत्रिणीने पण 'मला तर ते देखील मिळाले नाही' (शरीरसुख आणि संसारसुख) असले संवाद सगळा पोतच बिघडवतात.
कॉन्वेन्ट असले म्हणजे माफ करण्याचे कारण काय? भक्ती बर्वेही इंग्रजी माध्यमातून शिकल्या होत्या हे त्यानी सांगून्देखील खरे वाटेल काय? वॉइस कल्चरचा तर तो वस्तुपाठच म्हणावा लागेल. निष्ठा महत्वाची. कष्टाने आत्मसात केले होते सगळे. त्याना ज्यानी पाहिले ऐकले ते भाग्यवान. दूरदर्शन मध्ये बातम्या वचाताना एखाद्या बातमीत जोशी नाव असेल तर ते जोशी महाराष्ट्रीयन आहेत ,राजस्थानी आहेत की यू पीचे आहेत हे त्या आधीच विचारून घेत कारण त्यानुसार जोशी म्हणायचे ज्योशी म्हणायचे हे त्या ठरवत. ज्योती बसूंचा उच्चार त्या न चुकता बॉशु असा करीत. अशा बारकाव्यातून तर मेहनत दिसते आणि फळाला येते....
(रच्याकने मधु सप्रे मराठी माध्यमातून शिकली आहे ही आणखी एक गम्मत.)
Submitted by रॉबीनहूड on 7 September, 2009 - 05:40
आत्ताच मी हॅलो 'Halo' नामक १९९७ चा बाल चित्रपट पाहिला... प्रत्येका ने मस्ट सी असा चित्रपट... जरुर बघा आणी तुमच्या प्रतिक्रीया इथे नोंदवा http://www.maayboli.com/node/10678 ... हॅलो आणी हॅलो सारख्या टचिंग आणी चांगली शीकवण देणार्या चित्रपटां बद्द्ल हितगुज करण्यास हेलो चा स्पेशल धागा ऊघडलाय
एन चन्द्रा चा 'ये मेरा ईंडिया' बघितला, याच नाव पुर्वि 'मुंबई मेरी जान 'असाव ईतका इन्फ्लुयन्स जाणवतो.पिक्चरचा मुळ हेतु, स्टोरिलाईन कुठेच क्लिअर होत नाहि.पिक्चर तुकड्यातुकड्यांनि समोर येतो.
'Daddy cool' पहिल्या ५ मिनीटात बंद केला.
कमिने पाहिला, शाहिद कपुर आणि 'भोपे' मस्त पण, एकुणात 'बात कुछ जमि नही'. ओमकाराच्या मानाने ठिकठाक्..
Submitted by प्राजक्ता on 8 September, 2009 - 13:36
गुलाल पाहिला, डायरेक्शन फक्कड आहे आणी सगळ्यांचा अभीनय, गेट-अप पण छान आहे.
नेमक्या कोणत्या क्रांती साठी सगळे राजपुत लढत असतात... २८ वर्षांचा मुलगा राजस्थान मध्ये वकिली च शीक्षण घ्यायला का जातो म्हणजे त्याचे घरचे, तीथल वातावरण चांगल नाही हे माहित असुन आणी त्यांना तीथल्या रॅगींगचा भयंकर अनुभव असुन त्याला तीथे शीकायला का पाठवतात.... तसच मुलीं बरोबर हि ईतक निंदास्पद रॅगींग होत असुन तीथ मुली कश्या आणी का रहातात-शीकतात... हे सगळ मला तरी ऊलगडल नाही ...
...ज्या मुलीवर निंदास्पद रँगीग केले जात ती ते निमुट पणे सहन करते ...गांजा, सीगरेट पीऊन दु:ख विसरते!!!... मात्र त्याच्या विरोधात उभी रहात नाही हे दाखवलय जे रुचत नाही...
... एक मुलगी सत्ते साठी पुरूषांचा वापर करण्याच त्यांना मुर्ख बनविण्याच धाडस ठेवते तर दुसरी तीचा भयंकर अपमान होऊनही गप्प रहाते... असे दोन विरोधा भास दाखविलेत... मला नाही समजला हा चित्रपट पण डायरेक्शन आणी अभीनय छान असल्याने बोर नाही वाटला... पहातांना स्ट्रेस मात्र जाणवली
जबरी संवाद आहे पण तो movieच्या शेवटाकडे येतो>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> ह्या संवादा साठी म्हणुन मी शेवटचा पार्ट हुडकुन काढला आणी पाहिला पण अखेरच्या १० मीं असा कोणता जबरी संवाद नाही :(... शेवटाकडे म्हणजे किती आधी कुणी जरा सांगेल का????
गुलाल मला पण आवडला. निदान आदल्या दिवशीच पाहिलेल्या शॉर्ट कट पेक्शा फार चांगला होता.पण सास चे च प्रश्ण मला पण पडले.शिवाय अजून १ प्रश्ण...प्लीज मला के के च्या घरात रहाणर्या त्या निळ्या पाया मधे घुंगरू वाल्या पात्राचे रिलेशन आणि प्रयोजन सांगाल का?
पियुष मिश्रा अप्रतिम.हा माणूस इतके दिवस कुठे होता?
रेणुका शहाणे दिग्दर्शित
रेणुका शहाणे दिग्दर्शित 'रिटा' हा मराठी सिनेमा आवडला. असे सिनेमे चालतील, न चालतील, त्यांना व्यावसायिक यश मिळेल किंवा नाही ही वेगळी गोष्ट पण कोणीतरी असे प्रामाणिक प्रयत्न करुन वेगळे सिनेमे काढत रहातात ही गोष्टच छान वाटते.
ज्यांनी शांता गोखलेंची मुळ कादंबरी 'रिटा वेलिणकर' वाचली नसेल त्यांना कदाचित हा सिनेमा संथ वाटण्याची शक्यता आहे. पण रेणुकाने स्क्रिप्ट कादंबरीशी प्रामाणिक राहून लिहिले आहे. त्याबद्दल तिचे अभिनंदन. संवाद बहुतेकवेळा कादंबरीमधले जसेच्या तसे ठेवलेले आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे रिटा वेलिणकर कादंबरीतला काळ आणि पोकळ दिखावा असलेल्या, रिटाच्या इंग्रजाळलेल्या आणि स्वार्थी आईवडिलांची जीवनशैली जशीच्यातशी उभी करण्यात रेणुका यशस्वी झाली आहे.
मोहन आगाशेंनी शॅन्क्स वेलिणकरचे बेअरिंग चांगले ठेवले आहे.
पल्लवी जोशी काही प्रसंगांमधे अवघडल्यासारखी काम करते पण रिटा म्हणून ती शोभते. अर्थात पस्तिशीनंतरच्या वयातल्या रिटाच्या भुमिकेला ती न्याय देते तसा २१ वर्षं वयातली म्हणून दाखवली असताना अजिबातच देऊ शकत नाही. त्या वयातला रिटाचा उत्फुल्लपणा, मॅचुअर्ड साळवीच्या प्रेमात पडत असतानाचा तिचा निरागसपणा तिच्या देहबोलीमधे दिसत नाही. सिनेमांमधे पूर्वीचे दिवस दाखवताना त्या वयातल्या भुमिकांसाठी वेगळी तरुण कास्टिंग का करत नाहीत कोण जाणे. प्रौढ वयातले अभिनेते, अभिनेत्री कितीही मेकप केला, वेगळ्या स्टाईलचे कपडे घातले तरी वीसेक वर्षच काय, पण दहा वर्षांनीही तरुण म्हणून शोभून नाहीच दिसू शकत. (अग्निहोत्र या मराठी मालिकेमधे मात्र लहान्-तरुण्-मध्यमवयीन अशा सर्व वयोगटांसाठी अतिशय उत्कृष्ट वेगवेगळे कास्टिंग केले आहे. बहुतेक दिग्दर्शक याबाबतीत जरा कंटाळाच करतात.) पल्लवीने नर्व्हस ब्रेकडाऊन होतानाचा शॉट अप्रतिम दिला आहे.
खटकते ती जॅकी श्रॉफची भुमिका. जॅकी काम चांगलं करतो. साळवी म्हणून त्याचे केले कास्टींग बाह्यतः योग्य आहे. मराठीही तो बरा बोलतो. पण तरी तो भुमिकेशी एकजीव झाल्याचे वाटतच नाही. मिसफिट वाटत रहातो. तशीच ती सई ताम्हणकर. काम चांगलं करते पण तिचं डिक्शन अत्यंत सदोष आहे. कॉन्वेन्टी मराठी उच्चार खटकत रहातात. रेणुका शहाणे आणि मकरंद देशपांडे त्यांच्या रोल्समधे परफेक्ट.
रिटा बघण्यासारखा आहे हे नक्की.
आजच रीता बघितला.अड्व्हन्स
आजच रीता बघितला.अड्व्हन्स बूकिन्ग करुन. सनसिटि.पार्ल्यात.हाउसफुल्ल होता.सिनेमा खुपच छान आहे.शर्मिलाच रिव्हु ला अनुमोदन.आज काल खुपच छ्आन मराठी चिनेमे एका पाठोपाट येत आहेत.खुप छान वाट्त.
सइ मझ्या ओफिस मधल्या मड्म कडे पेइग गेस्ट म्हणुन रहात होती.ति सान्गलि वरुन अलि आहे. अर्थातच कोन्वेन्ट मधे शिक्लेलि आहे. पण तीला कान्न्दे पोहे मधे उत्तम ब्रेक मिळाला. सान्गलि मधुन मुम्बैत येउन पार्ल्यात येउन पेइग गेस्ट म्हनुन राहुन कस काय जमवल बघा.
अरे वा, गंध, रिटा , निशाणी
अरे वा,
गंध, रिटा , निशाणी डावा अंगठा सगळ्या मराठी सिनेमांचे चांगले रिव्ह्युज पाहून छान वाटल.. बघायलाच हवेत !
रॉबिन,
वाचतोयेस ना रे, येतात रे मराठीतही अधुन मधून चांगले मराठी चित्रपट !
एवढ्या महत्वाच्या भुमिकेसाठी
एवढ्या महत्वाच्या भुमिकेसाठी जॅकी श्रॉफला का घेतला ? तो कधीच उत्तम अभिनेता नव्हता.
तरूण अभिनेते वयस्कर भुमिका करु शकतात, पण उलटा प्रवास खुपदा केविलवाणा ठरतो.
गंध, रिटा यु ट्युब वर नाही
गंध, रिटा यु ट्युब वर नाही सापडले ईतर कुठे ह्यांच्या लींक्स उपलब्ध आहेत का???
टॉस पाहिला ... जंगलात ट्रिप वर गेलेल्या ग्रृप ला २५ करोड सापडतात मग पैश्यासाठी खुन खोटे पणा सुरु होतो... चित्रपट बघतांना मला पडलेले काही प्रश्न लहान मुलाच्या कानपट्टिवर पोलीस बंदुक ठेवु शकतात का ???? हे कायद्यात आहे का??? ... लहान मुला समोर बंदुकिने गोळ्या घालुन खुन करण्याच्या शॉट (शॉटस) वर सेंसॉरला आपत्ती नाही का????????????.... चित्रपटा बद्दल 'नो कमेंटस'. चित्रपटात वेगळ काय कि मोठ्यांबरोबर लहान मुलाला हि गोळ्या घालतांना दाखवलय!
आत्ताच निडाअं पाहिला एकदम झाक
.... पण बुरख्या बाबतच्या सीन मध्ये गडबड झाली कदाचीत... मुस्लीम बायका बुरखा तोंडावरुन बाजुला न करताच परीक्षा देतांना दाखविल्यात दिल्लीचा परीक्षक येतो तेव्हा चा सीन... मग त्या आधीचा "मी तीच कंकु मीटवल" हा सीन.... ये कुछ जम्या नही ... बाकि बेश्ट 
फायनल डेस्टिनेशन पण चांगला
फायनल डेस्टिनेशन पण चांगला चित्रपट आहे. मला आवडला.
कन्सेप्ट पण चांगलि आहे.
आणि ३डी इफेक्ट तर मस्तच.
बघण्यासारखा आहे.
'रिटा'साठी माझ्या नणंदेने
'रिटा'साठी माझ्या नणंदेने रेणुका शहाणे ची प्रमुख सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे.तिने पण आवर्जून हा चित्रपट पहा असे सांगितले.आता लोकांचे विचार ऐकून पण पाहिलाच पाहिजे असे वाटायला लागले आहे.
मी पण कालच रिटा पाहिला.
मी पण कालच रिटा पाहिला. अजिबात आवडला नाही. पल्लवी जोशीचे काम चांगले, तांत्रिकदृष्ट्या उत्तम. पण सिनेमा ही एक संपूर्ण कलाकृतीच म्हणुन बघावी अश्या मताचा मी असल्याने नाही आवडला. ही कादंबरी माहिती नाही त्यामुळे जर काही संदर्भ माहिती नसल्याने संपूर्ण आषय न कळल्याची शक्यता आहे.
स्पॉइलर वार्निंगः चित्रपट न बघितलेल्यांनी खालचे वाचू नये.
१. कादंबरीत काळ लक्षात येत नाही. रिटाच्या लहानपणी एकदम विन्टेज गाडी आणि ३६-४० वर्षात एकदम इनोव्हा? तसेच फ्लॅट स्क्रीन एलसीडी वगैरेही दिसतात काही काही शॉट्स मध्ये.
२. मोहन आगाशे आणि सुहासिनी मुळे, दोघेही फार कृत्रीम वाटतात.
३. त्या पूर्ण कथेचा गाभा, रिटाला तिच्या आणि साळवी मधल्या संबंधांबद्दल वाटणारी अपराधी भावना एकदम १५-१६ वर्षांनीच येते?
४. तिचे मानसिक रुग्ण होणे खूपच अचानक होते. पहिल्यांदा एकदा तिच्या शाळेतला एक प्रसंग आणि मग एकदम शेवटचा आरसा फोडते तो प्रसंग ह्यात सलगता येत नाही.
५. अगदी लहानपणी संबंध असलेल्या मैत्रिणीला एकदम पत्र वगैरे लिहून, आणि त्या मैत्रिणीने पण 'मला तर ते देखील मिळाले नाही' (शरीरसुख आणि संसारसुख) असले संवाद सगळा पोतच बिघडवतात.
कॉन्वेन्ट असले म्हणजे माफ
कॉन्वेन्ट असले म्हणजे माफ करण्याचे कारण काय? भक्ती बर्वेही इंग्रजी माध्यमातून शिकल्या होत्या हे त्यानी सांगून्देखील खरे वाटेल काय? वॉइस कल्चरचा तर तो वस्तुपाठच म्हणावा लागेल. निष्ठा महत्वाची. कष्टाने आत्मसात केले होते सगळे. त्याना ज्यानी पाहिले ऐकले ते भाग्यवान. दूरदर्शन मध्ये बातम्या वचाताना एखाद्या बातमीत जोशी नाव असेल तर ते जोशी महाराष्ट्रीयन आहेत ,राजस्थानी आहेत की यू पीचे आहेत हे त्या आधीच विचारून घेत कारण त्यानुसार जोशी म्हणायचे ज्योशी म्हणायचे हे त्या ठरवत. ज्योती बसूंचा उच्चार त्या न चुकता बॉशु असा करीत. अशा बारकाव्यातून तर मेहनत दिसते आणि फळाला येते....
(रच्याकने मधु सप्रे मराठी माध्यमातून शिकली आहे ही आणखी एक गम्मत.)
...मधु सप्रे शिकली आहे हीच
...मधु सप्रे शिकली आहे हीच मुळात मोठ्ठी गम्मत.
कां अॅन्की? मॉडेल्स
कां अॅन्की? मॉडेल्स शिकलेल्या नसतात कां?
मधू सप्रे कडे पाहून वाटत
मधू सप्रे कडे पाहून वाटत नाही...
अँकी,
अँकी,
मधू सप्रे अॅक्सेंट
मधू सप्रे अॅक्सेंट शेवट्परेन्त खास मराठी. आणी हे असे अपराधी पण फक्त बायकांनाच येतं नेहमी. क्काय
पीडा. हा म्युच्युअल निर्णय असतो ना?
मधु सप्रेला शेखर सुमनने
मधु सप्रेला शेखर सुमनने "मराठी बोल" असंसांगितल्यावर मेहरबानी करून ती "अॅमची मॅटी अॅमची मॅणशे" असं बोलली होती.
मी आज नार्निया एक आणि दोन पाहिले.
आत्ताच मी हॅलो 'Halo' नामक
आत्ताच मी हॅलो 'Halo' नामक १९९७ चा बाल चित्रपट पाहिला... प्रत्येका ने मस्ट सी असा चित्रपट... जरुर बघा आणी तुमच्या प्रतिक्रीया इथे नोंदवा http://www.maayboli.com/node/10678
... हॅलो आणी हॅलो सारख्या टचिंग आणी चांगली शीकवण देणार्या चित्रपटां बद्द्ल हितगुज करण्यास हेलो चा स्पेशल धागा ऊघडलाय 
समान्तर कसा आहे?
समान्तर कसा आहे?
एन चन्द्रा चा 'ये मेरा
एन चन्द्रा चा 'ये मेरा ईंडिया' बघितला, याच नाव पुर्वि 'मुंबई मेरी जान 'असाव ईतका इन्फ्लुयन्स जाणवतो.पिक्चरचा मुळ हेतु, स्टोरिलाईन कुठेच क्लिअर होत नाहि.पिक्चर तुकड्यातुकड्यांनि समोर येतो.
'Daddy cool' पहिल्या ५ मिनीटात बंद केला.
कमिने पाहिला, शाहिद कपुर आणि 'भोपे' मस्त पण, एकुणात 'बात कुछ जमि नही'. ओमकाराच्या मानाने ठिकठाक्..
'Daddy cool' पहिल्या ५
'Daddy cool' पहिल्या ५ मिनीटात बंद केला.>> ह्यात एक जबरी संवाद आहे पण तो movieच्या शेवटाकडे येतो. त्यासाठी बघा
आसामी... संवाद सांग... उगाच
आसामी...
संवाद सांग...
उगाच लोकांना इतकी जास्ती रिस्क का घ्यायला लावतोयस?
का तुला डॅडी कूल च्या पब्लिसिटीचे पैसे मिळतायत....
गुलाल नुकताच पाहिला. एकदम
गुलाल नुकताच पाहिला. एकदम जबरदस्त!
समान्तर कसा आहे?
समान्तर कसा आहे?
गुलाल पाहिला, डायरेक्शन फक्कड
गुलाल पाहिला, डायरेक्शन फक्कड आहे आणी सगळ्यांचा अभीनय, गेट-अप पण छान आहे.
नेमक्या कोणत्या क्रांती साठी सगळे राजपुत लढत असतात... २८ वर्षांचा मुलगा राजस्थान मध्ये वकिली च शीक्षण घ्यायला का जातो म्हणजे त्याचे घरचे, तीथल वातावरण चांगल नाही हे माहित असुन आणी त्यांना तीथल्या रॅगींगचा भयंकर अनुभव असुन त्याला तीथे शीकायला का पाठवतात.... तसच मुलीं बरोबर हि ईतक निंदास्पद रॅगींग होत असुन तीथ मुली कश्या आणी का रहातात-शीकतात... हे सगळ मला तरी ऊलगडल नाही ...
...ज्या मुलीवर निंदास्पद रँगीग केले जात ती ते निमुट पणे सहन करते ...गांजा, सीगरेट पीऊन दु:ख विसरते!!!... मात्र त्याच्या विरोधात उभी रहात नाही हे दाखवलय जे रुचत नाही...
... एक मुलगी सत्ते साठी पुरूषांचा वापर करण्याच त्यांना मुर्ख बनविण्याच धाडस ठेवते तर दुसरी तीचा भयंकर अपमान होऊनही गप्प रहाते... असे दोन विरोधा भास दाखविलेत... मला नाही समजला हा चित्रपट पण डायरेक्शन आणी अभीनय छान असल्याने बोर नाही वाटला... पहातांना स्ट्रेस मात्र जाणवली
ह्यात एक जबरी संवाद आहे पण तो
ह्यात एक जबरी संवाद आहे पण तो movieच्या शेवटाकडे येतो >>>
ह्यावरुन मला दिल्ली ६ मधला आत्याचा किस्सा आठवला
हाय काय नाय काय कोणी पाहिला
हाय काय नाय काय कोणी पाहिला का? कसा आहे?
उगाच लोकांना इतकी जास्ती
उगाच लोकांना इतकी जास्ती रिस्क का घ्यायला लावतोयस?>> नाहि तो ऐकण्यात खरी मजा आहे बाप
जबरी संवाद आहे पण तो
जबरी संवाद आहे पण तो movieच्या शेवटाकडे येतो>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> ह्या संवादा साठी म्हणुन मी शेवटचा पार्ट हुडकुन काढला आणी पाहिला पण अखेरच्या १० मीं असा कोणता जबरी संवाद नाही :(... शेवटाकडे म्हणजे किती आधी कुणी जरा सांगेल का????
शेवटाकडे म्हणजे किती आधी कुणी
शेवटाकडे म्हणजे किती आधी कुणी जरा सांगेल का???? >>आता मिनिटे कोणि मोजली आहेत !!! पण होता मात्र खतरनाक प्रकार.
"शेवटाकडे" चा अर्थ असा की
"शेवटाकडे" चा अर्थ असा की त्यानंतर असामीने मूव्ही बंद केला. तेव्हा आता तो संवाद पहिल्या १० मिनिटातही असू शकतो...
गुलाल मला पण आवडला. निदान
गुलाल मला पण आवडला. निदान आदल्या दिवशीच पाहिलेल्या शॉर्ट कट पेक्शा फार चांगला होता.पण सास चे च प्रश्ण मला पण पडले.शिवाय अजून १ प्रश्ण...प्लीज मला के के च्या घरात रहाणर्या त्या निळ्या पाया मधे घुंगरू वाल्या पात्राचे रिलेशन आणि प्रयोजन सांगाल का?
पियुष मिश्रा अप्रतिम.हा माणूस इतके दिवस कुठे होता?
Pages