अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया... Happy

ए मउ, तू नासिकची कांय???? नासिकच्या फिमेल अशी भाषा बोलतात..
>><<<<<<<<<
नाय ती नासिकाची नाय... पण ती असचं बोलती

>>>>>>>>>>>>>>
Lol Lol

हो...हो... अगदी.. अगदी... रिया बरोबर बोलतेय
माझ्या मराठीचा गगोकरांना जरा जास्तच अनुभव आहे ना Happy

kiranyake Rofl

आई पप्पांची वाट बघत रात्री आम्हाला घेऊन जेव्हा पायरीवर बसायची समोर शेजारच्या काकू बसलेल्या असायच्या गप्पा मारत. तिथून समोरच पुढे एक टगर दिसायची. माझ्या आईने कित्येकदा आमच्या कॉलनीतल्या याच टगरीजवळ एका बाईला पाहिले होते, ती फक्त रोखून बघायची. पण ती इतर कुणालाच दिसत नसे. काकु तर पाठमोर्‍या असायच्या. आई घाबरायची नाही, फक्त दुर्लक्ष करायची आणि आम्हाला घेऊन घरात निघून जायची.
बीएमसीचे गंजलेले पाईप आमच्या घराच्या बाजुलाच ठेवलेले होते तेव्हा त्या पाईपमध्ये एक लहान बाळ रडण्याचा आवाज कायम घुमायचा.

टगर>>
बहुतेक "तगर" असे असावे.

आई घाबरायची नाही, फक्त दुर्लक्ष करायची >>
बापरे, साक्षात भुतावर "इग्नोरास्त्र" Lol

माझा भूतावर विश्वास नाही. मात्र मला एकदा चकवा कि रानवा म्हणतात त्याचा अनुभव आलेला.
मी अकरावीला असताना एक दिवस सायकलवरून मित्राच्या घरी जात होतो. गाव ४ किमी होते. मित्राचे घर गावाच्या अलीकडे दीड किमी होते. मुख्य डांबरी रस्त्याने जाण्याऐवजी ओहोळाच्या कडेने असलेल्या पायवाटेने जायचे ठरवले. ओहोळाच्या वाटेने जवळ पडायचे. त्या दिवशी मी त्या वाटेने चालतच राहिलो. मित्राच्या घराची वाट मला सापडलीच नाही. वास्तविक मी त्याआधी शेकडो वेळा त्या वाटेने मित्राकडे गेलो होतो. पण त्या दिवशी मला तो रस्ता दिसलाच नाही. शेवटी मी गावात जावून पोहोचलो. त्या रात्री माझ्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली. आमच्या मित्रांमध्ये खूप भांडणे झाली. चकव्याचा आणि त्या घटनेचा काही संबंध असेल का? तो नक्की चकवाच होता का ? आणि चकवा नेमका कशामुळे पडतो? जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

टोच्या, चकव्यावर मी ऐकलेला खात्रीशीर उपाय म्हणजे आपलं बूड जमिनीवर टेकवणं. बाजूला खडक वगैरे असेल तर भिंतीसारखं तिथेही टेकवलेलं चालतं. पण आपल्याला चकवा लागला आहे हे कळायला हवं. मी हा उपाय प्रत्यक्षात करून पाहिलेला नाहीये.
आ.न.,
-गा.पै.

चकव्यावर मी ऐकलेला खात्रीशीर उपाय म्हणजे आपलं बूड जमिनीवर टेकवणं >>>> मी इतका दिवस पायाला किंवा डोक्याला चकवा लागतो असं समजत होतो.. Uhoh

गापै धन्स… पण चकवा का लागतो याबद्दल काही अभ्यास झाला आहे का? आपल्याला सगळे दिसत असते, कळत असते तरी आपण त्यात गुरफटतो. हे कसे घडते? का घडते? याबद्दल कुणाला काही माहिती आहे का ?

टगर की तगर????
मी तगर ऐकलय...

मी शाळेत असताना माझ्या डोळ्यात फुल पडलेलं. (म्हणजे काय हे देवच जाणे)
एक बारीक पांढरा स्पॉट होता.
डॉ कडे गेलो होतोच.
पण सोबत ते फुल काढुन देणारीकडे जात होतो.
त्यावेळी ही असली फुलं घेवुन परातीमध्ये पाणी घेवुन त्यात टाकुन मला त्यात बघायला लावायची एक शेजारीण आज्जी.
काही दिवसानी ओक्के झालेलं.

सगळच अमानवीय.
आमचे फादर बी घाबरलेले. पोराला काय झालं म्हणुन.
एक कसलीशी आयुर्वेदीक माळपण दिलेली गळ्यात की कानात अडकावायला. ते दुसर्‍या कुठल्यातरी गावाला जाउन घेउन आलेले.
मी ते घालुन शाळेतदेखील जात होतो. पक्का ध्यान... Proud

या धाग्यावर सर्वांनीच भीतीदायक किस्से लिहीलेत. सर्वांचं अभिनंदन !

वेळात वेळ काढून इतकं सुंदर लिखाण केल्याबद्दल फूल ना फुलाची पाकळी म्हणून या सर्वांच्या सन्मानार्थ एक गटग आयोजित करण्यात येत आहे. हे गटग किरण्यके यांनी आयोजित केले असून फायनान्सर कवठीचाफा हे आहेत.

वेळ : दि. १३ ९. २०१३ , शुक्रवार, रात्रौ १२ वा.
स्थळ : हडळीचा वाडा, निजामपूर

सर्वांनी आवर्जून यावे ही नम्र विनंती.
धन्यवाद.

मी लहान असताना आमचा मोठा बन्गला होता. मस्त बाग होती. एकदा मी मागच्याबाजूला खेळत असताना मला एक सोनेरीसर रन्गाचा मोठा नाग दिसला होता. कडक उन्हात वेगाने तो सळ्सळत जात होता. मला काय झाल देवजाणे मी अगदी मन्तरल्यासारखी त्याच्याकडे निघाले. आणि त्याच्या आता ४ फुटावर गेल्यावर मला की मी काय करत आहे. एकदम भान आले. मग जोरात ओरडत घ्ररात पळाले. सगळे लोक जमले. त्यानी बाग शोधली ,पण त्याना काही तो नाग मिळाला नाही. कुणीही नाग होता यावर विश्वास नाही ठेवला. तो एवढा मोठा नाग कुठे गेला समजले नाही आणि मी त्याला बघून का मन्तरले गेले होते ते पण कळल नाही. फार लहान होते अर्थात तेव्हा.

माझ्याबाबतीत पण असाच प्रकार झाला होता लहानपणी.
५-७ वर्षांचा असेन तेव्हा गावी अंगणात एका कोपर्‍यात बसलो होतो आणि पुढ्यात जवळ जवळ २-३ फुटांवर १ नाग फणा काढून बसला होता. मी एकटक त्याच्याकडे बघत होतो, कितीवेळ ते माहित नाही. पण पाहतच होतो.
तेवढ्यात शेजारची काकू नाग पाहून ओरडली, तेव्हा भानावर आलो आणि समोर साप पाहून घरात पळालो.
तो नागही तिथुन गायब. शोधले तर अत्त्तापत्ता नाही. २-३ मिनीटात कुठे गायब झाला असावा?

टोच्या,

>> पण चकवा का लागतो याबद्दल काही अभ्यास झाला आहे का?

मला काहीच माहीत नाही का लागतो ते. मला वाटतं की ती एक मनाची अवस्था असावी. नक्की माहीत नाही. माझ्या भावाला बघा कुठे चकवा लागला होता ते!

आ.न.,
-गा.पै.

करणी, नजर लागणे ई . खरच असतं का?
आमच्या घरी घडलेली गोष्ट. अकोल्याच्या आमच्या घरातील परसदारी खूप छान झाडं आहेत. बदामाची,बुचाची,इतर काही फुलझाडं . . त्यातच लिंबाचं पण एक झाड होतं . . अगदी हीरवंगार. कायम खूप लिंबं असायची या झाडाला,मोठी आणि रसरशीत. तर हे झाड अक्षरशः एका रात्रीत पूर्ण वाळून गेलं . अगदी आदल्या दिवसापर्यंत हीरवंगार आणि लिम्बानि लदबदलेलं हे झाड आई सकाळी झाडांना पाणी टाकायला गेली तेव्हा बघते तर झाडाचं पान अन पान वाळलेलं . झाडाचं खोड देखील वाळवी लागल्यासारखं भुसभुशीत. आम्ही सगळेच खूप हळहळलो आणि खूप आश्चर्य ही वाटलं. शेजारी आणि नातेवाइकांचं म्हणणं की कुणीतरी नक्की झाडावर कारणी केली . बाबा कृषी विद्यापीठात होते त्यामुळे त्यांनी झाडाला कसलासा रोग झाला असावा असं काहीतरी सांगून विषय संपवला. पण बाबानाही गच्च बहरलेलं झाड असं एका रात्रीत अचानक वाळून जळून गेल्यासारखं कसं होऊ शकतं याचं पटण्याजोगं उत्तर अजूनही सापडलेलं नाही.
अवांतर: करणी ई. मधले नवशिके झाडांवर आणि प्राण्यांवर आपला प्रयोग (सराव ??) करत असतात आणि त्यातलाच हा प्रकार असावा असं जाणकारांचं म्हणणं आहे. असं काही खरच असेल तर हा जो कोणी नवशिका आहे तो पुढे जाऊन या क्षेत्रात नाव काढणार याबद्दल दुमत नाही. Happy Happy

>>मग घरी आल्यावर आईने माझ्या अंगावरुन पाव आणि सिगारेट काढली आणि देवाचा अंगारा लाउन झोपवल जी मी तेव्हा झोपली ती डायरेक्ट दुसर्‍या दिवशी संध्याकाळी उठली.

मोहरी ओवाळून टाकतात ना? हे पाव आणि सिगारेट प्रथमच ऐकतेय.

किस्से मात्र सही आहेत एकेक.

..

मी हिन्जेवाडीला असताना मी तिथले काही किस्से एकले होते.

१] तिथे फेज १ मधे इन्फोसिस च्या शेजारी एक मोकळी ईमारत आहे. ती आधी विप्रोने भाड्याने घेतली होती. पण त्यात काम करणार्‍या लोकाबरोबर काहीतरी विचित्र घडायला लागल. आज कोड लिहला की उद्या तो डिलिट झालेला असायचा . आणि बर्‍याच जणाबरोबर अस व्हायला लागल.शेवटी कन्पनीने ती जागा सोडली. मी होतेतोवर तरी ती ईमारत मोकळीच होती. आता कोणी वापरायला घेतली असेल तर काही माहीत नाही.

२] आणि माझ्या कन्पनीने नवीन ईमारत बान्धली आहे. त्याच्या नवीन लिफ्ट चा काहीतरी प्रोब्लेम होता. ती मधेच वर , कधी खाली बन्द व्हायची. बरेच लोक पायी ५ मजले चढून जायचे. तर तेव्हा अशी अफवा होती की त्या ईमारत च्या शेजार्‍याच्या जागेत पूर्वी स्मषानभूमी होती. आणि त्याचा थोडा परीणाम होता. ख्र्र खोटे देवजाणे. आणि त्याजागेवर पण एक ईमारत बान्धली आहे. ती पण मोकळीच असते.

<<आणि माझ्या कन्पनीने नवीन ईमारत बान्धली आहे. त्याच्या नवीन लिफ्ट चा काहीतरी प्रोब्लेम हो>>

ही नवी इमारत पण हिंजवडी मधेच आहे का ?

Pages