चित्रपटातील अप्रतिम पण खटकलेली गाणी

Submitted by कांदापोहे on 4 November, 2009 - 00:09

रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. Happy

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.

मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)

बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.

याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.

आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.

असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..

प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्‍या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)

खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.

(फोटोचा प्रताधिकार माझाच )

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.

पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!

ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.

प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..

प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.

cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत

प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<

उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )

तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे

प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.

प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,

>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या 'प्रीत ये कैसी' या गाण्यावरून आठवण झाली. मराठीत आशाचे 'प्रिया तुज काय दिसे स्वप्नात' हे गाणं नक्की आनंदी आहे, दु:खी आहे का अजून काही आहे याचा मला आजवर पत्ता लागला नाही. अनेक वेळा हे गाणं ऐकल आहे, पण बोल आणि चालीवरून नक्की कुठला भाव व्यक्त करायचा आहे हे बिलकूल कळत नाही, निदान मला तरी! हे कुठल्या सिनेमात आहे का? असल्यास चित्रीकरणावरून पत्ता लागेल!

गूँज ऊठी शहनाई मधल्या... तेरे सूर और मेरे गीत मधल्या... दुनिया के मेले मे लाखो मिले, मगर तू ही तू दिल को भाया हुआ... ही ओळ पण मला खटकते.

प्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात ?
आनंदाचे पाझर थटले मिटलेल्या नयनांत

मनासारखी मिळे सहचरी, फुलुन दरवळे सुख संसारी
नकळे केव्हा येतीजाती दिवस आणखी रात

तुला न उरली तुझी आठवण, मी तर झाले तुला समर्पण
दुजेपणाचे नाव न उरले दोघांच्या जगतात

मोहरलेल्या या ऐक्यावर, एक होतसे नवखी थरथर
दिसल्यावाचून जाणवते मज नवल आतल्या आत

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - आशा भोसले
चित्रपट - जिव्हाळा

गाणे तसे आनंदीच आहे, पण चित्रपटात पुढे नायिकेवर दु:खद प्रसंग येतात. या चिमण्यांनो परत फिरा रे पण यातलेच.

प्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात>> कसल भारी गाणं आहे आहे. Happy

यही, यहाँ कोई आता जाता अब नही अशी ओळ आहे.>>
यातील अब नाहीच आहे पण गाताना आता जाता म्हणताना ता व जोर दिल्यामुळे ते जाताब ऐकु येते.

काही गाण्यात चूकिच्या ठिकाणी पॉज घेतला जातो :

१. अजनबी ( अक्षय-करीना-बॉबी-बिपाशा)

"मै सिर्फ तेरा मेहबूब तु मेरी मेहबूबा "
यातला सिर्फ हा तेरा साठी आहे पण गाणं ऐकताना तो नेहमी मेहबूब साठी वाटतो .

२. यंगिस्तान (जॅकी-एलिना??)
सुनो ना संगेमरमर की ये दिवारे

हे खरतर "सुनो ना , संगेमरमर की ये दिवारे" पण ते गायल आहे "सुनो ना संगेमरमर ,की ये दिवारे "

अवांतर :
काजोल आणि अजय देवगण चा एक मुव्ही होता - नाव नाही आठवत - अजय देवगण ने प्रॉद्युस केला होता .
मैने तो मांगा था सहेली जैसा सैंया
मिला मुझे पहेली जैसा सैंया

मैने तो मांगा था सहेली जैसा सैंया -- आम्ही काढलेला अर्थ - सहेली जैसा सैंया - मैत्रिणीसारखा नवरा .
आपण म्हणताना म्हणतो ना माझ्याकडे मैत्रिणीसारखा फोन आहे (??? Wink )

एक अतिशय जुना चित्रपट आठवला मला... Gateway of India (१९५७-५८ असेल) नावाचा. ह्या चित्रपटातले एक गाणे मला प्रचंड आवडते..दो घडी वो जो पास आ बैठे....
रफी साहेबांचा तरल, मुलायम, स्वर्गीय आवाज आणि दिदिंचा पण तेवढाच कोवळा आवाज्..अप्रतिम कॉम्बो..पडद्यावर मुर्तीमंत अप्सरा मधुबाला आणि खटकणारी गोष्ट म्हणजे ......भारतभुषण !! शेवटचे कडवे दिदिंच्या आवाजात सुरु होते आणि पडद्यावर मधुबाल केवळ डोळे, नजरा आणि भुवया ह्यातुन इतके seductive हावभाव करते की उफ्फ उफ्फ उफ्फ्..आणि भा.भु. साहेब तद्दन स्त्री सुलभ हालचाली करत नजर खाली काय वळवतात, कावरे बावरे काय होतात... अशक्य होते ते बघणे...
ही लिंक बघाच : www.youtube.com/watch?v=b2Q8B2jLvVM

काजोल आणि अजय देवगण चा एक मुव्ही होता - नाव नाही आठवत - अजय देवगण ने प्रॉद्युस केला होता .
मैने तो मांगा था सहेली जैसा सैंया
मिला मुझे पहेली जैसा सैंया >>> फिल्मचे नाव आहे यु, मी और हम

प्रसन्न हरणखेडकर...मला पण खुप आवडतं ते गाणं.. पण भाभु म्हणजे दिव्य आहे... ती मधुबाला जेवढी गोड दिसते तितकाच सुरेख अभिनय करते.. आणि हा ठोकळा...

अंजली.. राजकुमारचा अजुन एक भयानक नाच(?) असलेले गाणे बघ.. हसुन हसुन मुरकुंडी वळेल तुझी.. यु ट्युबवर शोधच.. गाण आहे.. मिलो ना तुम तो.. जी घबराये.... चित्रपट.. हीर रांझा.

प्रसन्न.. भारत भुषण्(उर्फ सदैव एरंडेल घेतल्यासारखा कडवट ,रडवेला व लाचार चेहरा असलेला नट(?) )ची सगळीच गाणी खटकतात बघताना .. कारण बहुतेक वेळेला मोहमद रफीसाहेब त्याच्यासाठी उत्तमातली उत्तम गाणी गायले आहेत व ऐकताना ती मस्त वाटतात पण तीच गाणी बघताना मात्र भारत भुषणच्या त्या गाण्यामधल्या अभिनयामुळे(अभिनय?) प्रचंड भ्रमनिरास होतो. त्या एरंडेली चेहर्‍याच्या भारत भुषणमुळे सगळ्यात वाया गेलेले एक अतिशय सुंदर गाणे.. अ‍ॅक्च्युअली.. कव्वाली.. ये इश्क इश्क है इश्क इश्क.. चित्रपट.. बरसात की एक रात्(जुना).. तिकडे गाण्यात मोहमद रफीचा आवाज शिगेला पोहोचतो तरी या भारत भुषणच्या चेहर्‍यावरची माशी सुद्धा उडत नाही! Sad

भारत भुषणने अशीच वाट लावलेले अतिशय सुंदर गाणे (खर म्हणजे ऐकायला माझ्या टॉप १० फेव्हरेट मधले ते एक गाणे आहे) म्हणजे.. तुम बिन.. जाउ कहा.. के दुनियामे आके.. कुछ ना फिर.. चाहा कभी.. तुम को.. चाहके..(मोहमद रफी व्हर्जन) चित्रपट.. प्यार का मौसम.:(

हा हा हा !! मुकुंद...खरयं तुम्ही म्हणता ते.
बरसात की एक रात मधलं च जिंदगी भर नही भुलेगी वो बरसात की रात्....तीच खट्याळ मधुबाला, तिचे ते डोळे मोट्ठे करुन पापण्या फडफड करित रेडीओ ऐकणे, थंड सुस्कारे सोडणे, स्वतः चे कौतुक ऐकुन गिरकी घेणे..आणि सगळ्यात कहर म्हणजे रफी साहेबांचा आवाज...काय गायलयं त्यांनी !!!
मला वाटतं लहान गोंडस बाळांना कसे नजर लागु नये म्हणुन काळी तीट लावतात की नाही, तसे वरिल सगळ्या ए१ कॉम्बो ला नजर लागु नये म्हणुन पडद्यावर भा.भु. साहेब, प्रदिप कुमार साहेब अश्या दिग्गजांना घेत असतील. Lol

जिंदगी भर नही भुलेगी ची लिंक : www.youtube.com/watch?v=drU9yX50g00

मुकुंद जाऊदे झालं. ही गाणी फक्त ऐकावी. Happy

मला वाटतं लहान गोंडस बाळांना कसे नजर लागु नये म्हणुन काळी तीट लावतात की नाही, तसे वरिल सगळ्या ए१ कॉम्बो ला नजर लागु नये म्हणुन पडद्यावर भा.भु. साहेब, प्रदिप कुमार साहेब अश्या दिग्गजांना घेत असतील>> Rofl

प्रसन्न.. Happy

कांदापोहे.. हो रे.. खर आहे तुझ.. पण इतकी चांगली गाणी ऐकल्यावर.. बघायचा मोह होतोच ना!

बाय द वे.. टण्या आला होता आमच्या घरी राहायला.. गेल्या विकेंडला.. तुझा उल्लेख झाला त्याच्याकडुन.. खुप मजेत गेला विकेंड. त्याला माहीत असलेल्या विषयांची व्याप्ती जबरी आहे.

दिनेश, पूर्ण गाणं दिल्याबद्दल धन्यवाद!

गाणं आनंदी असेलही पण माझ्या मते चाल आणि आशाने ते ज्याप्रकारे गायले आहे त्यावरून ते जास्त करून खिन्न, विरहगीत असेच वाटते.

मनोज कुमार चा उपकार , गाणं मेरे देश की धरती , मस्त टीपीकल भारतीय संगीत पण मधेच वेस्टर्न संगीत येत ( प्रेम चोप्रा च्या एन्ट्री ला ) , अगदी रंगाचा बेरंग होतो .

नटरंग ( मराठी ) खेळ मांडीला , एवढ भाउक गाण आणि शेवटी शेवटी ती सोनाली कुलकर्णी नाचायला लागते ते संगीत . परत रंगाचा बेरंग .

आज सकाळी येताना विविधभारतीवर "अभिनेत्री"मधले लताचे "ओ घटा सावरी" ऐकले. हिरोईनच्या तोंडी पावसाचे गाणे आहे म्हणजे ती सचैल भिजणार हे ओघाने येतेच. पण ह्या चित्रपटात हेमा आहे त्यामुळे हे गाणे जर तिच्यावर असेल तर मग हिरोईन अजिबात भिजणार नाही याची खात्री होती मला.

आत्ता युट्युबवर गाणे पाहिले. सुरवातीलाच तिने नेसलेली शिफॉनची झिरझिरीत साडी पाहिल्यावर ही बया पाण्यात बोटही बुडवणार नाही याची मला खात्री पटली. तरीपण गाणे फक्त ऐकताना डोळ्यासमोर जे चित्र उभे राहते त्याला तिने कितपत न्याय दिलाय हे पाहायची उत्सुकता होती.

हे राम.. ह्या पावसाच्या गाण्याच्या तालावर तिने चक्क व्यायाम केलाय. आणि तिला मदत व्हावी म्हणुन गाण्यातली कडवी पण गाळून टाकलीत. आता एवढा बदल केल्यावर मग लताने गाण्यात जे भाव ओतलेत आणि गाताना फक्त आवाजातुन जे काही दाखवलेय त्यातले बरेचसे हेमाने गाळून टाकले असा आरोप करण्यात काहीच अर्थ नाही.

https://www.youtube.com/watch?v=himwydt4IIY

गाणे खुप गोड आहे, हेमा दिसलीय पण गोड. पण गाण्याचा मुड आणि पडद्यावर जे आहे त्याचा मुड यांचा काहीही संबंध नाही.

मनोज कुमार चा उपकार , गाणं मेरे देश की धरती , मस्त टीपीकल भारतीय संगीत पण मधेच वेस्टर्न संगीत येत ( प्रेम चोप्रा च्या एन्ट्री ला ) , अगदी रंगाचा बेरंग होतो .

नटरंग ( मराठी ) खेळ मांडीला , एवढ भाउक गाण आणि शेवटी शेवटी ती सोनाली कुलकर्णी नाचायला लागते ते संगीत . परत रंगाचा बेरंग

ह्या दोन्ही गोष्टी चित्रपटातल्या त्या वेळच्या प्रसंगाची गरज म्हणुन आल्यात ना. मेरे देश की धरती मध्ये शेतक-याचा भाऊ शहरात काय करतोय ते दाखवलेय तर नटरंग मध्ये खेळ मांडीला संपतासंपता दुसरे संगीत चालु होते कारण तो एक दुसरा कार्यक्रम चालु असतो जिथे सोनाली नाचत असते.

रच्याकने ते दुसरे संगीत म्हणुन जे काय वाजवलेय ते संगीत एक पारंपारीक लेहरा आहे जो पेटीवादक तबल्याला साथ वगैरे करताना वाजवतात. मी माझ्या वडलांना तो वाजवताना लहानपणापासुन ऐकलेय आणि चित्रपट पाहताना तो कानावर पडल्यावर मला अचानक काहीतरी हरवलेले हाती लागल्याचा आनंद झालेला. Happy त्या चित्रपटातली गाणी मी पाहण्याआधी ऐकली नव्हती.

मस्त धागा आहे हा. माझ्या पोतडीत पण बरीच गाणी आहेत अशी जी इतकी सुंदर बनवलेली आहेत गायक व संगीतकारांनी आणि ती मी ऐकताना काय कल्पना केली होती पण प्रत्यक्षात किती भ्रमनिरास करणारे चित्रण दिसायचे पडद्यावर. पूर्वी मोबाईल यू-ट्यूब वगैरे नसल्याने ऐकायला मिळणाऱ्या गाण्यांवर कल्पना करण्यातच धन्यता मानवी लागायची. प्रत्यक्ष ते गाणे कुठेतरी पाहायला मिळेपर्यंत या कल्पनाविलासात तरंगणे हेच सुख असायचे, त्यात अनेकदा त्या कल्पनाविलासाला असा बहार यायचा कि पुढे कित्येक वर्षांनी कधीतरी जेंव्हा प्रत्यक्ष ते गाणे पडद्यावर चित्रित केलेले पाहायला मिळायचे तेंव्हा... ओ माय गुडनेस! कल्पनेचा फुगा साफ फुटायचा Biggrin

आता मला पट्कन आठवणारे गाणे म्हणजे "तुमसे मिलकर ना जा ने क्यू...." हे मिथुनदा च्या "प्यार झुकता नही" मधले. कसले अफाट गाणे आहे. असे वाटते कि भव्य दिव्य काहीतरी शुटींग केले असेल. प्रत्यक्षात मिथुनदाने पद्मिनीला घेऊन अतिशय सुमार असा हनिमून डान्स केला आहे. त्यातली काही दृश्ये तर फारच स्वस्तातली वाटतात.

मनोजकुमारने तर गाण्यांच्या शुटींग बाबत भ्रमनिरास करण्यात कधीच अपेक्षाभंग केलेला नाही. "मै ना भूलुंगा" काय मस्त गाणे आहे. केवळ आणि केवळ अप्रतिम. कायमचे मनात रेंगाळत राहील असे संगीत. त्यातून लतादीदी आणि मुकेशजी या दिग्गज गायकांचे आवाज. पण पडद्यावर? बापरे. चकमक काय. वरून सोडलेल्या लाईटच्या माळा काय. कॅमेऱ्याचे झटके आणि गोल गोल ट्रिक्स काय. काचेत आणि गाडीच्या चाकाच्या पत्र्यात दिसणारे प्रतिबिंबे काय. अगदीच कुणालातरी कॅमेरा देऊन "काय वाटेल ते कर आणि हे गाणे पट्कन शुटींग करून आण" असे सांगितले असावे असे वाटते. इथून ते इथपर्यंत नुसते कारभोवती गोल गोल फिरून नक्की काय दाखवलेय? देवा रे देवा.. निरर्थकपणाची हद्द केली आहे Biggrin Lol

रिमीक्स म्हणून चित्रपटात दाखवण्यात येणारी किंवा रिमीक्स म्हणून अल्बम मध्ये येणारी सगळीच गाणी खटकली आहेत.
पण कोण इथे मनावर घेणार...रिमिक्स वाले खोर्‍याने पैसा ओढतात दुसर्‍याच्या आणि आधीच वापरल्या गेलेल्या लिरीक्स वरती.
सोनु निगम एवढा मोठा गायक असुनही करियर च्या सुरवातीस त्याने सुद्धा रिमीक्स गाण्यांचा हात धरला होता Sad

"मै ना भूलुंगा" बद्दल पूर्ण अनुमोदन.

तसंच ते इक प्यार का नगमा है. बाकी तसं सुंदर आहे गाण्याचं शूटिंग. ते मिरर इमेज वगैरे ठीक पण त्याचाही किती अतिरेक. गाणं किती आर्त आहे आणि शांत हवं शुटिंग यासाठी. त्यातली स्लो मोशन मात्र अतिशय झक्कास. आणि ... आणि सगळ्यात डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे तो मिनी मनोजकुमार! त्या पोराला पाहून इतका वैताग येतो. एक मनोजकुमार कमी की काय म्हणून अजून एक लहान व्हर्जन. असले गॉगल आणि कॅप लावून कोण लहान पोरगं वावरतं?

>> तसंच ते इक प्यार का नगमा है. बाकी तसं सुंदर आहे गाण्याचं शूटिंग. ते मिरर इमेज वगैरे ठीक पण त्याचाही किती अतिरेक. गाणं किती आर्त आहे आणि शांत हवं शुटिंग यासाठी.
>> Submitted by मामी on 16 July, 2020 - 12:03

अगदी तंतोतंत सहमत. समुद्र किनारी शुटींग केलेय हि त्यातल्या त्यात बरी गोष्ट. मला हे गाणे ऐकताना समोर अथांग समुद्र, किनाऱ्यावर उबदार वाळूत आपण बसलोय आणि वाऱ्याच्या सुखद लाटा अंगावर येत आहेत असाच फील येतो. इतके अप्रतिम गाणे. जब्बार पटेल, बासुदा यासारख्या दिग्दर्शकानी सोने केले असते या गाण्याचे.

सोनु निगम एवढा मोठा गायक असुनही करियर च्या सुरवातीस त्याने सुद्धा रिमीक्स गाण्यांचा हात धरला होता >>

तो कव्हर्स गात होता. रिमिक्स नाही. मूळ गाणे जसेच्या तसे गात होता/ प्रयत्न करत होता. त्यात स्वतःचे जास्तीचे काहीही घालत नव्हता. कव्हर्स करणे ही टी सिरीजची गरज होती व सोनूसारखे नवे गायक ती पुरवत होते. आज टी सिरीज इतकी मोठी झालीय ती त्या धंद्यावर.

रिमिक्स म्हणजे मूळ गाण्याला हिडीस रूप देणे.

इक प्यार का नगमा है बद्दल सहमत. मिरर इमेज सुरवातीला छान वाटतात मग नंतर अतिरेक होतो.

दुसरं एक गाणं रहमानचं 'किस्सा हम लिखेंगे दिले बेकरारका'. अप्रतीम गाणं आहे ऐकायला. डोली सजाके रखना मधलं. अक्षय खन्ना आणि ज्योतिका पडद्यावर आहेत. तेही सुसह्य आहेत. पण गाण्यात दर ५ सेकंदानी उडत्या पक्ष्यांचा थवा दाखवून रसभंग केला आहे! सेम शॉट सबंध गाण्यात दिसत राहतो!

सत्यम शिवम सुंदरम बद्दल बराच उहापोह झाला आहे त्यात अजून भर घालत नाही Happy
पण त्यातलं 'सुनी जो उनके आनेकी आहट' हे गाणं आणि चित्रीकरण आवडले. समूहगीतात साधारण सगळ्यांचे सारखे पोशाख असतात त्यामुळे त्या बायकांच्या सारख्या रंगाच्या आणि प्रकाराच्या साड्या आवडल्या. झीनतने अंगभर कपडे घालण्याचे ह्या चित्रपटातले हे एकमेव उदाहरण असेल Happy

ते एक जुनं गाणं होतं पंख होते तो उड आती रे(या चालीवर लोकलमध्ये भजनी मंडळं एक साईबाबांचं भजन म्हणतात).मला ते खूप आर्त दृश्य वालं, हिरो हिरॉइन पासून वेगळा होतोय, ती रडतेय असं असेल वाटलं होतं, ते ती बाई नुसतीच एकटी नाटकाच्या प्रयोगासारखी नाचतेय असं निघालं.(इथे असामी असामी मधलं 'नाटक कुठेय?तो बाबाजी नुसताच चहा पितोय' आठवून घ्यावं ☺️)☺️

mi_anu +१
मी याच गाण्याबद्दल लिहिणार होतो. ऐकायला खूप छान आहे.
नटी कुठल्याशा बागेत विरहात हे गाणे म्हणत असेल असे वाटले होते.
पण जेव्हा टीव्हीवर एकदा बघितलं तर काय, बया वेळ जात नसतो म्हणुन मैत्रिणी सोबत नाक फेंदारत, चित्र विचित्र नृत्य कौशल्य दाखवण्यास हे गाणे म्हणते, हे पाहून केवढा विरस झाला.

>> पंख होते तो उड आती रे

काही गाणी अत्यंत कर्णपरिचित आहेत पण त्यांचे चित्रण आजवर बघितलेले नाही. हे गाणे सुद्धा त्यातलेच एक. अजूनही माझी सुद्धा अशीच काहीशी कल्पना आहे. पण आता हे वाचल्यावर पाहणार नाही. मनातलेच चित्रण छान आहे Biggrin

उठे सबके कदम, देखो रम पम पम.. या गाण्याविषयी सुद्धा माझी अशीच अफाट कल्पना होती. मोठ्या हॉलमध्ये/पार्टीत गायले असेल. त्या तालावर अनेक जण थिरकत असतील, त्यात पुढे बाह्यचित्रण सुद्धा असेल वगैरे वगैरे. पण कसचे काय. घराच्या बाहेरच्या खोलीत आहे सगळे. पहिल्यांदा बघितले तेंव्हा मला वाटले कुणीतरी आपल्या घरातले शुटींग करून गाणे बॅकग्राउंडला टाकले असेल. तर मित्राने सांगितले हेच मूळ चित्रण आहे गाण्याचे.

Pages