दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहमदाबाद विमान दुर्घटनेत बळी गेलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

DGCA आणि Gujarat ATS यांनी हा घातपात होता का? या दृष्टीने तपास करणे आवश्यक आहे.

फार विचित्र डिप्रेसिंग वाटतेय कालपासून ही बातमी ऐकल्यावर. एअर इंडियाने किती वेळा प्रवास घडलाय आत्तापर्यंत! त्यांच्या कित्येक न चालणार्‍या गोष्टींना कितीही नावं ठेवली तर दरवेळी एअर इंडीयानेच प्रवास... कारण सोयीचं डायरेक्ट फ्लाईट !

ओव्हरॉल किती वाईट घटना घडत आहेत गेल्या महिन्याभरात. काय चालू आहे जगात Sad

दुःखद घटना .
अहमदाबाद विमान दुर्घटनेत बळी गेलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!
personally पुढच्या वेळी विमानात बसताना कदाचित हे आठवून थोडे टेन्शन येईल का अशी भीती वाटतेय .

अतिशय दुःखद घटना..
जीवन किती क्षणभंगुर आहे .. क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जाते. बातम्या वाचून मनाला सुन्न वाटतेय.

कुंडमळा ( पुणे- मुंबई रस्ता, बेगडेवाडी स्टेशनपासून दोन किमी) इंद्रायणी नदीवरचा पूल दुपारी कोसळला. बरेच पर्यटक वाहून गेले. दुचाकी गेल्याने पूल पडला असं बातम्यांत सांगत आहेत परंतू त्या पुलावर दर पाच मिनिटाला दुचाकी जात असतात. ( पर्यटकांच्या दुचाकी नव्हे.) तसेच मागे बांधावरून पाणी वाहते आहे त्यावरून कार्सही जातात बिनधास्त.

बिचारे लोक, त्यांना कल्पना पण नसेल....

तो पूल फारच विचित्र होता, safety आजिबात नव्हती, पादचारी सहजपणे पुलावरून खाली पडेल असे gaps होते साईड च्या लोखंडी रेलिंग मधे.
हल्ली खूप पर्यटक जातात तिथे, पण लोकांसाठी काही सोय करणे, सुरक्षा वाढवणे हे सरकारी तत्वात बसत नाही ना. नंतर समिती बसवणे आणि भेटी घेऊन मिडियामधे चमकणे हे बसते.

मृतांना श्रद्धांजली

तो पूल धोकादायक आहे असं लिहिलेली पाटी दाखवत आहेत न्यूजमध्ये आता. खरंच तसं असेल तर हे अंगाशी आलेलं धाडस नाही का?

काय चालू आहे जगात>>> होना. जे वॉर पासून सुरु झाले ते रक्त चक्र AI क्रॅश, इन्द्रायणी पूल, ट्रेन मधून पडून लोक मेले, आयपीएल गर्दीत लोक चिरडून मेले.. हनीमून ला नवर्याला सुपारी देऊन मारले..काय काय सुरुये Sad

केदारनाथ व आजुबाजुच्या भागात हल्ली ७-८ चॉपर क्रॅश तरी झाले असावेत. जुनी झालेली, सर्विसिंग नीट न केलेली वाहने वापरात असावी. सरकारी कंट्रोल ढिला Sad

मारुती चितमपल्ली >> श्रध्दांजली /\
मी त्यांची भाषणे प्रत्यक्ष ऐकली आहेत. मस्तच होती. आपल्याला त्या दुनियेत घेऊन जायचे.

कावळा, चिमणी नी पावसाळ्यात बेडूक यापलीकडली जीवसृष्टी न पाहिलेल्या आम्हा शहरी मुलांसाठी त्यांनी अलीबाबाची गुहाच उघडून दिली. त्यांचं लिखाण आमच्यासाठी काळ्या शाईत लिहिलेलं नॅशनल जिओग्राफिक होतं. नवीन वर्षांचं मराठीचं पुस्तक आलं की त्यात मारुती चितमपल्ली यांचा धडा आहे का हे शोधलं जायचं. मध्यंतरी त्यांचं चकवाचांदण हे आत्मचरीत्रात्मक पुस्तक वाचलं त्यावेळी त्यांच्या सहज शैलीमागे असलेले परीश्रम समजले.

चितमपल्ली यांना श्रद्धांजली.

फार रसाळ लिहीत होते. ओघवती भाषा अन लेखनात कुठलाही मी पणा नाही.
जिथे राहिले त्या नवेगाव वरचे अपरंपार प्रेम आणी तिथल्या साध्यासुध्या माणसांबरोबर जडलेले आपुलकीचे संबंध सुधा लिखाणात वारंवार जाणवतात.
माझ्या गावचे होते त्यामुळे प्रत्यक्ष भेट नसली तरी ऊगीच एक अभिमान वाटायचा. भावपूर्ण श्रध्दांजली

मारुती चितमपल्ली >> श्रध्दांजली .
___________________________
सिद्धगडावरून पडून एकाचा मृत्यू.

मारुती चितमपल्ली यांना श्रध्दांजली ..
खरोखर ऋषी तुल्य व्यक्तिमत्व.
जंगलाला काल पोरके झाल्यासारखे वाटले असेल.

Pages