क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विंडीज ऑस्ट्रेलिया सामन्यावर सुद्धा एक नजर राहील आज.
काल विंडीजने नेहमीसारखी 64-5 अशी सुरुवात केली. पण अचानक कुठून कशी आली कल्पना नाही. 149 धावांची पार्टनरशिप झाली. दिवस अखेरीस 266-8.. जर 300 गाठले तर ऑस्ट्रेलिया फलंदाजी सुद्धा टेस्ट होईल. पहिल्या इनिंग अखेरीस दोन्ही संघ बरोबरीत राहण्याची शक्यता आहे. भले विंडीज दुसऱ्या डावात कोसळेना का.. पुढचे पुढे.. आज तरी ऑस्ट्रेलियाच्या विकेट पडल्या तर आज सुट्टीच्या दिवशी दिवसा दुसरा काही प्लान नसताना दोन सामन्यांची मजा लुटता येईल Happy

जयस्वाल बाद झाला. आता राहुल आणि गिल जसे खेळत आहेत ते बघून मॅच बघायची इच्छा होत नाहीये.
कोहली आला की गिल बाहेर पडणार की राहुल हे डोक्यात ठेवून दोघे सध्या खेळत असतील..

हा राहुल जर किपींग करत नसेल तर भारतात खेळताना कसोटी संघात त्याची जागा बनते का प्रश्न पडतो. रजत पाटीदार किंवा सरफराज खान कोणालातरी बघायला आवडले असते.

माझ्या मते कोहली आल्यावर अय्यरची जागा धोक्यात आहे. गिल भारताची लाँग टर्म गुंतवणूक आहे आणि राहूल नुकताच अफ्रिकेत सेंच्युरी मारून आलाय.

गिल लाँग टर्म गुंतवणूक आहे त्यामुळे त्याला प्राधान्य दिले जाते हे मी पण मागे म्हटलेले.
(कारण ते लक्षात येतेच. पण हे असे लक्षात येणे वाईट आहे खरे तर. त्यातही लाँग टर्म विचार करत आहेत म्हणून तिन्ही फॉरमॅट मध्ये त्याला सेटल करायला बघणे)

त्याचमुळे 20-20 वर्ल्डकप स्क्वाडमध्ये सुद्धा तो दिसू शकतो. पण जयस्वाल अकरात दिसावा अशी इच्छा.

राहुल बाबत मुद्दाम मी भारतात असे म्हटले. बाहेर खेळताना तो इतर अनुनभवी फलंदाजपेक्षा उजवा ठरतो. पण भारतात तसे काही नाही. कधी त्याचा दबदबा जाणवावा असा प्लेअर तो कसोटीत वाटत नाही. अधेमध्ये जागा फिक्स करणारी एक इनिंग येते त्याची.. आता ही पोस्ट लिहिताना एवरेज चेक केला त्याचा. 50 वी कसोटी आणि 34 ची सरासरी हे काही चांगले आकडे नाहीत. राहणी आणि पुजारा त्यांच्या खराब फॉर्ममध्ये सुद्धा हे आकडे देऊ शकतात. मग ते का बाहेर आहेत असा प्रश्न पडावा..

बाकी अय्यर सुद्धा येस.. त्याचीही जागा फिक्स नाही. तो सुद्धा बाहेर जाऊ शकतो.
किंबहुना तिघांनीही आपली जागा फिक्स समजू नये.
पण अय्यर स्पिनरना मस्त मारतो. पूर्वीचे फलंदाज जसे डॉमिनेट करून खेळायचे तसा वाटतो.

AUS v WI, 2nd Test
AUS 13-2
WI 311
Usman Khawaja*: 2 (3)
Cameron Green: 2 (4)
Kemar Roach 1.4-0-7-1
Day 2: 1st Session - Australia trail by 298 runs

ऑस्ट्रेलिया 24-4
मजा आ गया...
आज सकाळीच वाटतच होते काही धमाल होणार आज.. पण ही जास्तच झाली Happy

ती तर आपलीही रड आहेच असामी की भारतीय फलंदाजांना पहिल्यासारखे स्पिन खेळता येत नाही वगैरे Happy 20-20 हिट झाल्यापासून क्रिकेटच बदलले आहे. तरीही तुलनेत जो तो आपल्या होम कंडीशनला सरावलेला असतोच. >> गिल ला बघितलास का खेळताना स्पिन ? Happy

गिल लिमिटेड मध्ये खेळतो स्पिनर चांगला.. पण कसोटीत मुळात तो अजून स्थिरावला नाहीये. तिथे तंत्र हवेच पण सोबत टेंपरामेंट सुद्धा हवे. अजून ते त्याचे दिसले नाही. म्हणून त्याच्या क्लासला त्याचे आकडे मिसमॅच आहेत कसोटीत.

अर्थात कोहलीसारख्यावर सुद्धा अगदी सुरुवातीच्या काळात हा प्रश्न चिन्ह उठलेला.

आपली आज स्लो स्टार्ट बघून विंडीज सामना लावला...
तो मेकेंझी म्हणून कोणीतरी आहे.. वेगळाच खेळतोय.. पण मजा येतेय बघायला..स्पेशली स्ट्रेट ड्राईव्ह

गिल लिमिटेड मध्ये खेळतो स्पिनर चांगला.. >> स्ट्राईक रोटेट करता येत नाही त्याला स्पिन विरुद्ध - चांगला खेळलो काय ? फक्त पुढे येऊन बाऊंडरी मारणे नाहि रे.

असामी, तुला आठवतं का, गिल ने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ओपनर म्हणून खेळायला सुरूवात केली होती, तेव्हा आपलं डिस्कशन झालं होतं कि तो इनसाईड द लाईन खेळतो.

जनरली असं खेळताना जेव्हा बॉल मूव्ह होतो (स्विंग, स्पिन) तेव्हा बॅट्समन अडचणीत येऊ शकतो. हँड-आय को-ऑर्डिनेशन एका मर्यादेपर्यंत साथ देऊ शकतं.

अहो असामी.
मी तेच तर आधी म्हटले आहे की स्पिन खेळायचे तंत्र आपलेही पहिल्यासारखे राहिले नाही तरीही आपले फलंदाज बाहेरपेक्षा घरात चांगले खेळतात. कारण कसेही असेना इथेच क्रिकेट खेळून लहानाचे मोठे झाले असतात.
तेच Bazball ला लागू. स्विंग आणि बाऊन्स कंडीशन मध्ये Bazball खेळायला ते जास्त कंफर्टेबल आणि सक्सेसफुल असणार. भले तंत्रात उन्नीस बीस का असेना..

बाकी 20-20 वाढत्या प्रभावामुळे डिफेन्स आणि स्ट्राईक रोटेट यापेक्षा जास्त महत्त्व मोठ्या फटाक्यांना आले आहे. म्हणूनच 20-20 वर्ल्डकप संघात विराट कोहलीची जागा बनते का इथवर लोकं विचार करतात. या अफगाण मालिकेत पाहिले ना कोहली सुधा एप्रोच बदलून पहिल्या बॉल पासून मारायला सुरुवात करत होता. एक गोल्डन डक आला त्या नादात. क्रिकेट बदलत आहे तर त्यानुसार नवीन पिढी तशीच तयार होणार. कारण 20-20 हे आता क्रिकेटचे भविष्य आहे.

कोणी विंडीज ऑस्ट्रेलिया बघतेय का?
काय तुफान स्पेलं चालू आहे शामार जोसेफचा..
एवढी भेदक विंडीज गोलंदाजी बघून एक जमाना झाला..

गिल हजेरी लावून गेला..
शर्माने दोन रिव्हर्स स्वीप चौके मारले तेव्हाच मनात शंकेची पाल चूकचुकलेली..
अक्षर पटेल पुढे पाठवला हा मात्र चांगला निर्णय.. एक डावखुरा आला आणि तो सुद्धा स्पिन चांगला खेळणारा..
लेफ्ट आर्म स्पिनर त्रास देतात आपल्याला.. मागे एक जण 10 विकेट काढून गेलाय

आपलं डिस्कशन झालं होतं कि तो इनसाईड द लाईन खेळतो. >> हो रे . फक्त त्याचा गेम पुढे डेव्हलप झाला असेल असे वाटलेले Sad

कारण 20-20 हे आता क्रिकेटचे भविष्य आहे. >> जयस्वाल कडे बघ. स्ट्राईक रोटेट करणे म्हणाजे मोठे फटके मारू नयेत वगैरे असे नाही.

हे हरणे फारच जिव्हारी लागले राव Sad पुढच्या मॅच मधे जाडेजा नि राहुल पण बाहेर त्यामूळे अजूनच कठीण होणार. पतिदार ची वर्णी लागेल बहुधा.

“ हे हरणे फारच जिव्हारी लागले राव” - हो ना रे. कालपासून मॅचविषयी बोलावसंच वाटत नाहीये. बॅटिंग इतकी अननुभवी असताना मला शर्माकडून दोन्ही इनिंग्जमधे जास्त जवाबदारीच्या आणि एका तरी मोठ्या इनिंगची अपेक्षा होती.

“ जाडेजा नि राहुल पण बाहेर त्यामूळे अजूनच कठीण होणार. पतिदार ची वर्णी लागेल बहुधा.” - पटिदार आणि कुलदीप खेळतील बहुदा. कुलदीप खेळणं हे ब्लेसिंग इन डिसगाईज असू शकतं.

पटिदार आणि कुलदीप खेळतील बहुदा. कुलदीप खेळणं हे ब्लेसिंग इन डिसगाईज असू शकतं. >> हो स्विच हिट पुढे अगदीच नाईलाज झाल्यासारखे खेळलोत आपण . कुठे प्लॅन बी नव्हता असे वाटले. बुमरा कडे बॉल द्या नि काही होते का बघा.

बाझबॉलच्यामागे लागून पहिल्या विकेट मधे विनाकारण विकेट्स फेकल्या बहुतेकांनी नि दुसर्‍या इनिंग मधे एकदम शेल मधे जाऊन खेळले. शर्मा बद्दल काही बोलत नाही उगाच वाद वाढेल Happy

पहिल्या इनिंगला सगळेच चोके छक्के मारण्यात बाद झाले आहेत.. शर्मा ने जरा जास्तच आगाऊ फटका मारलेला..
पण दुसऱ्या डावात तोच एक शेलमध्ये नव्हता.. तरीही त्याने जे बॅक टू बॅक रिव्हर्स स्वीप चे दोन फोर मारलेले ते सुद्धा पटले नव्हते.. आपल्या प्रमुख फलंदाजाला असे फटके मारावे लागणे हे चांगले लक्षण नाही असे मी म्हटले आणि थोड्याच वेळात तो बाद झाला..

जेस्वालचे नैसर्गिक खेळ न करणे आश्चर्यकारक होते.
गिलकडून अपेक्षाच नव्हती. तो मारेल ते मी बोनस पकडले होते.
शेवटी सात विकेट गेल्यावर जसे खेळले ते पाहता जडेजा रन आऊट झाला नसता तरी मॅच काढली असती असे वाटले.
तळाच्या फलंदाजांना नावे ठेवू नये म्हटले तरी सिराज बुमाराहची भागीदारी होत असताना लास्ट ओवराला सिराज असा का खेळत होता आणि पुढे येऊन मारायला का गेला हे अनाकलनीय.. जणू त्याला सामना पाचव्या दिवसाला न्यायाचा कंटाळा आलेला. शर्माने यावर कॉमेंट केलीय. पण त्यामुळे तो ट्रोल होतोय.. तळाच्या फलंदाज कडून अपेक्षा ठेवायची का वगैरे.. पण सेंसिबल क्रिकेट म्हणजे काय हे समजायला फलंदाजी यावीच लागते असे नाही. मलाही लास्ट विकेट जाईपर्यंत आशा होती आणि त्याने ती ओवर काढून सामना पाचव्या दिवशी न्यायाला हवे होते असे वाटले.

पहिल्या इनिंगला एकाचेही शतक नाही.. तिथेच शंभर धावा जास्त असत्या आणि 300 लीड असता तर इंग्लंडने सामना तिथेच सोडला असता.. ही चूक सुद्धा सुधारायला हवी.. कोहली असता तर त्याने शतक सोडले नसते.

हे हरणे फारच जिव्हारी लागले राव
>>
अगदीच

आपण बॅटर लोकांना बोलिंग मधून टोटल सवलत देतो, अन् बॉलर निवडताना त्याच्या बॅटिंग स्किल वर प्रेफरन्स देतो
या थॉट प्रोसेस मधे गोची आहे असं कुणाला वाटत नाही का?

कारण आपले फलंदाज करावी तशी कामगिरी करत नाहीत नि मग दोष कुणाला द्यायचा?
त्यांना? छे,छे.
आपण व्यक्तिपूजक. शर्मा गिल आपले देव.
त्यांच्यावर जबाबदारी नाही. दुसर्‍या कुणावर.

When you come to bat in the 4th innings, you need a plan to score runs.
Rohit Sharma was the only batsman, who seemed to come with a plan to score runs.

- Anil Kumble

भारत हरल्याने त्या मॅच कडे जास्त लक्ष दिले नाही Happy एकतर घरच्या पिचेस वर स्पिनर्सच्या मदतीने जिंकण्यातही काही फार मजा येत नाही. पूर्वी असेच जिंकत. अर्थात तेव्हा "फक्त" असेच जिंकत त्यामुळे कौतुक होते Happy

पण ऑस्ट्रेलिया-विंडीज मॅच मधे शमार जोसेफ ची बोलिंग, त्याच्या विकेट्स आणि नंतरचे त्याचे व इतरांचे सेलिब्रेशन हे फार फार मस्त आहे. Pure beauty of Test Cricket in Australia!

भारी बोलर दिसतोय. मागच्याही टेस्ट मधे पाच विकेट्स काढल्या होत्या. पहिली सिरीज. कसोटी करीयरच्या पहिल्याच बॉलला विकेट - ती ही स्टीव्ह स्मिथ ची!

विंडीज ऑस्ट्रेलियात बरीच वर्षे जिंकले नव्हते हे माहीत होते. पण १९९७ नंतर नाही इतके माहीत नव्हते. १९९५ मधे स्टीव वॉ आणि कंपनीने विंडीज मधे सिरीज जिंकून त्यांचे त्या आधी जवळजवळ वीस वर्षे असलेले कसोटी क्रिकेटवरचे राज्य संपवले/काबीज केले. पण त्यानंतर १९९७ च्या पुढे विंडीज ऑस्ट्रेलियात जिंकलेच नव्हते हे माहीत नव्हते. विंडीज मधे १९९९ ची सिरीज मस्त झाली होती.

अन् बॉलर निवडताना त्याच्या बॅटिंग स्किल वर प्रेफरन्स देतो
या थॉट प्रोसेस मधे गोची आहे असं कुणाला वाटत नाही का? >> आपण ह्यावर चिक्कार वेळा बोललो आहोत ना ? मूळात बॉलर्स ना बॅटींग येत नाही ह्याकडे धोनी च्या वेळेपासून बोट दाखवली आहेत. पण मूळ प्रश्न पहिले सहा दिवे लावू शकत नसतील तर इतरांकडे बोट दाखवण्यात काय हशील आहे. बुमरा ने बॅटींग नाहि केली तरी निव्वळ त्याच्या बॉलिंग च्या जोरावर तो कधीही आत येईल. तीच गोष्ट अश्विन ची आहे (किमान भारतात तरी). त्यांना पर्याय नाही. बॅटस्मन बाबत तसे म्हणतात येईल असे किती जण आहेत ? रोहित नि कोहली. (टेस्ट पुरते म्हणतोय)

Rohit Sharma was the only batsman, who seemed to come with a plan to score runs. >> Since he is Captain I would expect him to communicate the same to team too. He should not get free pass here really. It will be good to know if this was communicated to the team or not. Clearly he was playing accordingly.

शमार जोसेफ ची बोलिंग >> एकंदर अशा बॉलर्स चे विंडीजमधले प्रोग्रेशन पाहता त्याचीही लवकरच वाट लावतील :(. तोअर एंजॉय करूया.

असं कुणाला वाटत नाही का? >> आपण ह्यावर चिक्कार वेळा बोललो आहोत ना ?
>>
अरे, इथे कुणाला असं वाटंत नाही का असं नव्हतं म्हणायचं
टीम मॅनेजमेंट मधल्या कुणाला वाटंत नाही का असं म्हणायचं होतं...

“ He should not get free pass here really.” - +१ if anything, he has more responsibility as a leader of the team.

I would expect him to communicate the same to team too.
>>>>>

मग नुसता शर्माचं नाही तर द्रविड सुद्धा जबाबदार आहे ना यासाठी..
कारण हे डिसिजन किंवा ही प्लॅनिंग चालू सामन्यादरम्यान ऑन फील्ड नाही होत..
द्रविडला सुद्धा मग क्लीन चीट देऊ नये.

आणि हो, काहीतरी चर्चा झालीच असेल. प्लान ठरला असेल. पण फलंदाज मैदानावरच तसे खेळण्यात कमी पडले असतील तर काय करणार.. शेवटी एकदा तुम्ही फलंदाजीला उतरले की आपले डिसिजन आपणच घ्यावे लागतात. आपले प्रेशर आपणच हॅण्डल करावे लागते.

असो,
बाकी त्या आयपीएल मध्ये जो शर्मा पांड्या सीन झाला आहे त्याचा परीणाम भारतीय संघाच्या एकजूटीवर, आणि जे खेळाडू तळ्यात मळ्यात आहेत त्यांच्या माईंडसेट वर काय झाला आहे याबाबत मी अजून साशंक आहे. आपला कर्णधार कुठवर कायम राहणार किंवा बदलणार याबद्दल अश्या खेळाडूंना शंका असेल तर कर्णधाराच्या प्लॅनिंग ऐवजी आपल्या जागेचा विचार करून खेळण्याची शक्यता वाढते...
जरा खोल विचार आहे. कोणाला चटकन पटणार नाही. तशी माझी अपेक्षा सुद्धा नाही.

आपल्या जागेचा विचार करून खेळण्याची शक्यता वाढते...
>>
या न्यायानी कुणाचा तरी स्वार्थी का होईना पण परफॉर्मन्स दिसला असता
चौथ्या डावात एक शर्मा सोडला तर कुणी आपल्या जागेचा सोडा, कसलाच विचार करून खेळलं नाही असच वाटलं

नाही ना.. या खेळपट्टीवर विकेट जपत खेळणेच महागात पडले.
पहिल्या इनिंगला खेळपट्टी चांगली होती वगैरे ठिक. तरीही मारत होते तर एक रूट वगळता त्यांच्या स्पिनरची लाईन लेथ किती भरकटलेली वाटत होती. दुसऱ्या इनिंगला मदत जास्त होती ते ठिक. पण जास्त डोक्यावर चढवून ठेवले त्यात गेले.

लेफ्ट आर्म आपल्याला त्रास देतात तेच पुन्हा झाले. चुम्माची आठवण झाली प्रकर्षाने..

Pages