नर्मदार्पणमस्तु

Submitted by Narmade Har on 7 December, 2023 - 22:44

नर्मदार्पणमस्तु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सध्या कुणा एकाची भ्रमण गाथा सुरू केलेय. ते झालं की हा ब्लॉग वाचायला सुरू करणार असा प्लॅन आहे.. बघुयात
शिवाय या धाग्यावर इकडे कळत राहते..

हा धागा हे लिहायला योग्य वाटला म्हणून हे इथे टाक्त्ये.

वर काही जणांनी उल्लेख केलाय. की बरेच लोक कसं अवडीच खायला मिळालं, किंवा अचानक खायला मिळालं किंवा तसं खाण्याच्या चमत्कारां विषयी लिहितात.

मी सुरवातीला you tube video वर असाच काही त्यांना तिळगुळ मिळाला, कधी भाकरी मिळाली त्या अप्रूप वाटून सांगताना बघितलं, तेव्हा मलाही थोड विचित्र वाटलं.

एक मावशी जाऊन आली. तिच्या बोलण्यातही, आमच्याकडे काही नव्हतं, उपाशी झोपायची वेळ येते असा वाटलं पण मग अचानक कसं कुठूनतरी प्राप्त झ वगैरे वगैरे ऐकलं तेव्हा अजूनच गंमत वाटली.
ही एका रेस्टॉरंट चेनची मालकीण आहे, त्यांच्या दुकानांत रोज शेकडो माणसे जेवून जातात तिच्याकडून हे ऐकताना विचित्र वाटलं.

थोडा खोलवर जावून विचार केला तर वाटलं,
की ती सर्व जिवंत माणसंच, एरव्ही साधारण लोकांसारखे आयुष्य जगणारी, वाटलं तर स्वतः बनवून किंवा विकत आणून स्वतच्या चवी भागविणारी.. किंवा चोचले पुरवणारी.

एका ध्यासापोटी, महिनोन्महिने अस साधू सारखं उद्याच्या जेवणाची चिंता न करता, जेवणासारखया मूलभूत गरजेची अनिश्चितता, अपुरेपण(?) यातून ते जात असतात. रोज कित्येक किलोमीटर चालल्यावर कधीतरी एखादा पदार्थ चाखवासा वाटण किती साहजिक आहे किंवा जगण्यासाठी पोटाची खळगी भरत्ये का नाही ही चिंता वाटण किती नैसर्गिक आहे कारण शिधा, अग्नी सगळ्यांसाठी त्या काळात ते बर्या पैकी परावलंबी असतात.

नर्मदे हर तुम्ही यातून गेलाय तर ह्यावर तुमचं काय मत आहे?

> >नर्मदे हर तुम्ही यातून गेलाय तर ह्यावर तुमचं काय मत आहे? > > माझे याविषयीचे अनुभव लेखांतून आणि त्यामागचे मला उलगडलेले कोडे येथील प्रतिक्रियांमधून व्यक्त केलेलेच आहे . काहींना ते पटले काहींना नाही . मुळात आपली भारतीय संस्कृती अशी आहे की कुठलाही जीव उपाशी राहता कामा नये . त्याला सुसंगतच हे सर्व आहे . गरीबातला गरीबही परिक्रमा वासीला ४ घास खाऊ घालतो मगच जेवतो . त्यांची अशी श्रद्धा आणि अनुभव आहे की मैया च्या नावाने एक दिले की चार परतून मिळते . मी देखील हे अनुभवले पुढे लेखमालेत येईलच . मैया कोणालाही उपाशी झोपू देत नाही हे सत्य आहे .

ज्यावेळी भुकेला अन्न मिळतं आणि त्याबद्दल अतिशय कृतज्ञता वाटून मनुष्य (परिक्रमा करणारा/केलेला) त्या अन्नाबद्दल लिहितो याबद्दल इथे वाचकांना विचित्र/ वेगळं का वाटतं हेच मला कळलं नाही , याच नाही आधीच्या ही कुठलयातरी धाग्यात ही उल्लेख आहे. साधी गोष्ट आहे असं मला वैयक्तिक वाटत. जेव्हा तुम्ही 15-20 किमी पाठीवर किमान चार-पाच किलो सामान घेऊन तंगडतोड करता थनडीत/वाऱ्यात/उन्हात, खिशात दमडा नसतो किंवा असला तरी जागोजागी खाद्यपदार्थ ठेले नसतात. बरोबर काहीही नसतं. अशा परिस्थितीत जेव्हा भुकेल्या माणसाला अन्न मिळतं तेव्हा ती त्याची मूलभूत गरज भागली गेली जीची अत्यन्त निकड असते तेव्हा त्याबद्दल आनंदमिश्रीत भावना किंवा मी तर म्हणेन अवर्णनीय सुख मिळालेलं असतं.
ट्रेक ला सुद्धा तंगडतोड असतेच पण कुठं काय मिळणार , निदान पोटाला काहीतरी गरम मिळणार याची शाश्वती असते. झोपयला टेंट तरी असणार, काही फाटलं, तुटल तर सहकारी / आयोजक मदतीला असणार हे कुठेतरी माहीत असत. इथं सगळंच अनिश्चित आणि त्यात गरजेला अन्न, पादत्राणे , शाल, पेन्सिल मिळाली तर का नाही अप्रूप वाटणार?
भरल्या पोटी संध्याकाळी स्नॅक्स आणि रात्रीच्या जेवणाचा मेनू माहीत असताना अन्न मिळालं, अन्न मिळालं काय लिहितात /सांगतात हे लोक असं कदाचित वाटू शकतं असेल.

नाही तस नाही मला म्हणायचंय की तिकडे,

अगदी श्रीमंत किंवा गरीब सगळेच एका रेषेत येतात आणि जिवंत व्यक्ती म्हणून मूलभूत गरजा , अन्न,वस्त्र निवारा यांची जाणिव होते.

किंवा त्यांना काही खांवस वाटतं आणि ते मिळालं की लक्षात राहत/ अप्रूप वाटत..

किंवा त्यांना काही खांवस वाटतं आणि ते मिळालं की लक्षात राहत/ अप्रूप वाटत..>> फ्रिक्वेन्सी म्याच होतात ना.

नोबिता१, तुमचा गैरसमज झालाय थोडा.

भुकेल्या लोकां खायला जे असेल ते अन्न मिळते असे नसुन परिक्रमा करताना त्यांना अचानक एखादा पदार्थ आठवतो, भुक असो वा नसो. तो रोजचा डाळभात नसतो तर तिळाचे लाडु, जिलेबी, बेसनचे लाडु, पुरणपोळी असा पदार्थ असतो जो कदाचित त्या प्रांतात घरोघरी बनत नाही किंवा तिथले दारिद्र बघितले असल्यामुळे गरिबाच्या घरात तो मिळणार नाही असे परिक्रमावाशियाला वाटते. पण मनात विचार आल्यावर थोडावेळात तो पदार्थ समोर येतो. हे असे घडल्याचे मी इतक्या वेळा वाचलेय की नर्मदा मैया खायलाच घालायचे काम करते की काय असे मला वाटायला लागले, शेवटी मी वाचणेच बंद केले. हे असे का होते याबद्दलचे स्वतःचे मत लेखकाने वर मांडले आहे.

चितळे बाईंनी तिळाच्या लाडवांचा उल्लेख केलाय. आज १४ जानेवारी आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना संक्रांतीच्या लाडवांची आठवण येते. पण तिकडे परिक्रमेत कुठुन मिळणार म्हणुन गप बसुन त्या चालत राहतात. जिथे विसाव्यासाठी थांबतात त्या देवळात कोणीतरी दुसरा प्रवासी ते लाडु घेऊन येतो व सगळ्यांना वाटतो. चितळे बाईंही नर्मदा मैय्याचे आभार मानुन लाडु खातात.

मी असे ऐकलेले आहे की पूर्वजन्मीची पाप-पुण्य या परिक्रमेत समोर उभी ठाकतात. म्हणजे पूर्वसुकृताचे , संचिताचे फळ नर्मदा माता आपल्याला देउन, त्या त्या पाशातून मुक्त करत नेते.
ही एक सुंदर अध्यात्मिक संकल्पना मी ऐकून आहे.
लेखन चालू ठेवावे. रोचक आहे. वाचते आहे.

>>>>>>चितळे बाईंनी तिळाच्या लाडवांचा उल्लेख केलाय.
होय आणि सुरुवातीलाच बाफले का कोणत्या पदार्थाचा उल्लेख आहे. एकदा चहाचाही उल्लेख आहे. त्यांच्या की अन्य कोणाच्या परिक्रमेत ते आठवत नाही.

नुसते तिळाचे लाडू काय घेऊन बसलात, चितळे बाईंना Thanksgiving ला टर्की खावीशी वाटली असती, तर ती पण मिळाली असती नर्मदा मैयाकडून. नर्मदा मैया सगळ्यांना सगळे देते, न मागताही, कुणालाही उपाशी ठेवत नाही.

The Kindness Diaries हा कार्यक्रम बहुदा नर्मदा परिक्रमेपासून प्रेरणा घेऊनच सुरू केलेला आहे. जय हो मैया की.

नवीन Submitted by साधना on 15 December, 2023 - 19:16 >>> सहमत आहे.

यु ट्यूब ,चितळे बाई अजून पाहिलं नाही.

@नर्मदे हर ... ब्लॉगवरचे लेख वाचत आहे, आवडत आहेत. पूर्ण करावेत ही विनंती.

भरल्या पोटी संध्याकाळी स्नॅक्स आणि रात्रीच्या जेवणाचा मेनू माहीत असताना अन्न मिळालं, अन्न मिळालं काय लिहितात /सांगतात हे लोक असं कदाचित वाटू शकतं असेल.

Submitted by नोबिता1 on 15 December, 2023 - 02:22>>>> +१

Narmade Har
सगळे प्रतिसाद शांतपणे हाताळताहात यातच बरेचकाही आले. ही अलिप्तता परिक्रमेची देणगी वाटते.
विज्ञान मला इथल्या जाणकारां एवढं कळत नाही. पण विज्ञानाच्या पलिकडे काही असावं. तसं नसतं तर कठीण शस्त्रक्रियेच्या वेळी परम आराधना करणारे शल्यज्ञ नसते.
लोकहो व्यक्त व्हा पण संयमाने.

संयम आणि मायबोली प्रतिसाद ह्या वेगवेगळ्या नाण्याच्या २ बाजू आहेत. >>

वेगवेगळ्या नाण्याच्या २ बाजू >>>> Lol

हो मग काय Wink इकडे कोणी संयमाने घेत असेल तर ते फक्त एडमिन आणि वेमाच. बाकी सगळं तर आपण पाहतोच इतकी वर्षे काय कसे प्रतिसाद असतात ते.

> >सर्व लेख आणि अभिप्राय वाचून ही परिक्रमा उर्वरित जीवनात नक्की करुन पाहण्याचं मनात जोरदार वारं सुरु आहे. > > असे आपण करू शकलात तर ते या लेखन प्रपंचाचे सार्थकत्व ठरेल

> > चितळे बाईंना Thanksgiving ला टर्की खावीशी वाटली असती, तर ती पण मिळाली असती नर्मदा मैयाकडून. नर्मदा मैया सगळ्यांना सगळे देते, न मागताही, कुणालाही उपाशी ठेवत नाही. > >
परिक्रमेमध्ये या चितळे मैयांच्या आश्रमामध्ये मी राहून आलो .
दुपारी जेवण करून पुढे निघालो होतो परंतु त्यांनी आग्रहाने ठेवून घेतले . दोघे पती-पत्नी सर्व संपत्ती चे यथायोग्य वाटप करून नर्मदे काठी आश्रम बांधून राहिले आहेत . यांचे युट्युब वरील व्हिडिओ बघून बरेच लोक परिक्रमेला येत आहेत . कुंटे यांचे नर्मदे हर हर हे पुस्तक आणि चितळे मैया यांचे व्हिडिओ यामुळे परिक्रमेतील मराठी टक्का निर्विवादपणे वाढलेला आहे . .

परत एकदा विचारतो की मुळात या नर्मदा परिक्रमेमागे नक्की बिझनेस मॉडेल काय आहे? अन्न, वस्त्रे, पादत्राणे, झोळी, आसन, कमंडलू, पूजा साहित्य वगैरे फुकटात कोण वाटते? का वाटले जाते? परिक्रमा करणाऱ्यांना फुकटात अन्न वाटणारे लोक, स्वत:चे पोट कुणाच्या जिवावर भरतात? हे सर्व दाते कुबेराचे वंशज आहेत की त्यांच्या दारात कल्पवृक्ष आहे जो मनात आलेल्या सर्व गोष्टी आपोआप, फुकटात देतो. हे परिक्रमा मॉडेल, बेसिक इकॉनॉमिक्सच्या There is no free lunch याच्याशी सुसंगत नाही.

उपाशी बोका, you are right about the concept but it does extend beyond money. निसर्ग पैसा ही currency वापरीत नाही. नदीकडून पाणी घेताना आपण तिला काय देतो? झाडावरची फळे तोडतो तेव्हा झाडाला पैसे देतो का? तेव्हा पैसा ही संकल्पना अत्यंत यशस्वी असली तरी तिच्याशिवाय चालणारे एक भले मोठे जग आहे. हे जग circular closed loop मध्ये चालते. What goes around comes around. When we pollute nature we are externalizing the cost of pollution to the nature. But it will come around soon!

परिक्रमावासींना मदत करणे हे पैसा या संकल्पनेशी निगडित नाही and it works. ज्या कृतीमागे केवळ पैसा हाच driving factor नसतो त्या ठिकाणी free lunch ही कल्पना देखील वेगळ्या स्वरूपात असते. मी अन्नदान केले असता नर्मदामैया माझ्या चरितार्थाची काळजी घेते हा एका वेगळ्या पद्धतीचा व्यवहारच आहे! A fiction works if everyone believes in it. So, I think नर्मदेच्या परिसरात सर्वच जण यावर विश्वास ठेवतात आणि म्हणून ही व्यवस्था without apparent monetary benefits यशस्वी होते. I think it's beautiful!

सुंदर प्रतिसाद, जिज्ञासा. मूळ लेख आणि पुढचे भाग वाचतो आहे. कृपया दोन भागांमध्ये पोस्ट करण्याकरिता साधारण एक आठवडा घालवलात तर ते वाचकांना खूप आवडेल. त्यापेक्षा जास्त अवधी गेला की आधीचे संदर्भ विस्मृतीत जातात आणि कमी अवधी गेला तर एकदम भारंभार धागे दिसतात आणि वाचले जात नाहीत. आपण छान लिहीत आहात, त्यामुळे त्यात खंड पडू नये ही वाचक म्हणून विनंतीवजा इच्छा आहे.

जिज्ञासा, प्रतिक्रिया आवडली.
मालिका वाचते आहे. नर्मदा परिक्रमेची ओढ वाटते. पण शारीरिक, कौटुंबिक आणि भावनिक मर्यादा आहेत. माझा स्वभाव सावध आहे. म्हणजे काही करायचं तर विचार करून, ठरवून करायचं. प्रवास करायचा तर नीट रिझर्व्हेशन, हॉटेल बुकिंग करणे वगैरे. त्याच्या अगदी विपरीत अशी ही यात्रा आहे. ओढ/ आकर्षण वाटण्यामागे हे एक कारण आहे. असं पूर्णपणे सोपवून देणं माहितीच नाही. २०११ मधे कैलास यात्रा केली, ती अवघड असली तरी स्ट्रक्चर्ड होती. वेळापत्रक विस्कळीत होऊ शकेल, ह्याची कल्पना होती, पण वेळापत्रक होतं.
मैय्याची इच्छा असेल तर येईल बोलावणं.
नर्मदे हर.

जिज्ञासा खूप छान उत्तर.

. मी अन्नदान केले असता नर्मदामैया माझ्या चरितार्थाची काळजी घेते हा एका वेगळ्या पद्धतीचा व्यवहारच आहे! A fiction works if everyone believes in it. So, I think नर्मदेच्या परिसरात सर्वच जण यावर विश्वास ठेवतात आणि म्हणून ही व्यवस्था without apparent monetary benefits यशस्वी होते. I think it's beautiful!>>>> असेच ऐकून आहे.

Pages