>>मुळात या नर्मदा परिक्रमेमागे नक्की बिझनेस मॉडेल काय आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मनात आलेल्या सर्व गोष्टी आपोआप, फुकटात आपल्या पदरात पडतात हे बेसिक इकॉनॉमिक्सच्या There is no free lunch याच्या अगदी विरुद्ध आहे.<<
उबोंच्या या प्रश्नाचं थेट उत्तर अजुनहि न आल्याने मी प्रयत्न करतो -
या सगळ्या धार्मिक अॅक्टिविटिज श्रद्धा आणि आस्था या भांडवलावर उभ्या असतात. शिवाय इथे नॉन झिरो सम गेम थियरीनुसार एव्हरीबडि विन्स. परिक्रमा करणारा फक्त अंगावरच्या कपड्यांवर वारी संपवता आल्याने खुश असतो आणि त्याला मदत करणार्यांना आत्मिक समाधान लाभतं. विन-विन सिचुएशन. पुढे याचं मार्केटिंग आपोआप होतं. परिक्रमा करणारा भारावुन सोशल मिडिया माध्यमातुन तर इतर स्टेकहोल्डर्स माउथ पब्लिसिटि द्वारे प्रसिद्धि मिळवतात. भारतात श्रद्धाळु लोकांची कमतरता नसल्याने दोन्हिकडचा कच्चा माल (परिक्रमा करणारे + मदत करणारे) सप्लायचेन च्या नियमांनुसार येतंच रहातो. पुढे यदाकदाचित या दोहोंपैकि एका कच्च्या मालात घट झाली तर हि साखळी भंगु शकते..
तर मंडळी, उबोंचा "नो फ्री लंच" हा दावा बरोबर आहे. वनवे ऑर द अदर समबडि इज पिकिंग अप द टॅब. निसर्ग देतो, सगळं आपोआप होतं हा भाबडा दैववाद आहे. चिकित्सक बुद्धीने खोल विचार केलांत तर हि समीकरणं सुटतात; नॉट ए रॉकेट सायंस...
प्रश्न कोणीही उपस्थित करु शकतं, त्याकरता फारशी मेहनतीची गरज नसते ना ... असो! उत्तर द्यायला विचार करावा लागतो. जिज्ञासा आणि राज यांनी छान उत्तरे दिलेली आहेत.
धागालेखक परत यावेत हीच सदिच्छा.
<परिक्रमावासींना मदत करणे हे पैसा या संकल्पनेशी निगडित नाही and it works. ज्या कृतीमागे केवळ पैसा हाच driving factor नसतो त्या ठिकाणी free lunch ही कल्पना देखील वेगळ्या स्वरूपात असते. मी अन्नदान केले असता नर्मदामैया माझ्या चरितार्थाची काळजी घेते हा एका वेगळ्या पद्धतीचा व्यवहारच आहे! A fiction works if everyone believes in it. So, I think नर्मदेच्या परिसरात सर्वच जण यावर विश्वास ठेवतात आणि म्हणून ही व्यवस्था without apparent monetary benefits यशस्वी होते. I think it's beautiful!>
जिज्ञासा यां नी ज्या व्यवस्थेबद्दल लिहिलं तिच्यामागचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न करतो. बघा कसं वाटतंय / पटतंय. हे विशेषतः ज्यांचं हातावर पोट आहे, ज्यांना त्यांच्या पुढल्या जेवणाची शाश्वती नाही, ज्यांना स्वतःलाच कधी अर्धपोटी राहावं लागतंय त्यांच्याबद्दल लिहितोय. खाऊन पिऊन सुखी लोक काही करोत. त्याबद्दल काही म्हणणं नाही.
आपल्याकडे पाप पुण्य या संकल्पनांचा पगडा फार मोठा आहे. त्याचे ठोकताळे ठरलेले आहेत. तसंच कर्म या संकल्पनेचंही आहे.
नर्मदा परिक्रमा करणारे काही पुण्याचं काम करताहेत आणि त्यांना मदत केली की त्या पुण्याचा काही अंश आपल्याही नावे होतो. कदाचित ईश्वराने या भागात आपल्याला आणून हे पुण्य कर्म करायची संधी / जबाबदारी आपल्याला दिली. पुढे जाऊन ते आपले विहीत कर्तव्य आहे, असं त्या लोकांचं कंडिशनिंग झालं नसेल का? धर्माधारित कंडिशनिंग आणि त्यातून येणारे हक्क कर्तव्य वा आपल्या स्थितीबद्दलची भावना यासाठी स्त्रीपुरुष असणं वा कोणत्या जातीत जन्म होणे ही आणखी ठळक उदाहरणं आहेत.
नर्मदा परिक्रमा करणार्यांना अन्नदान करणारे सरसकट दिसेल त्या भुकेल्या माणसाला अन्नदान करीत असतील का? ते नुसतं मानवतेवर आधारित समाधान असतं तर असं प्रत्येक भुकेल्यालाच अन्न मिळालं असतं.
आपल्यासारख्या खाऊन पिऊन तुडुंब सुखी लोकांना कोणा गरजूला मदत करायच्या भरपूर संधी उपलब्ध असतात. आपण त्या उचलतो का? ते आत्मिक समाधान किती जण मिळवतात? आपल्यातले जे कोणी जेव्हा केव्हा अशी मदत करतात, तेव्हा त्यातल्या किती जणांच्या मनात पाप पुण्याच्या कल्पना असतात?
----
बाकी सुखवस्तू लोक जर काही विशिष्ट अनुभव घेण्यासाठी वा मैयाने बुलाया है म्हणून पैसे इत्यादि न बाळागता परिक्रमा करीत असतील, ती करताना त्यांना मदत मिळत गेली असेल, तर त्यातल्या किती जणांना पुढच्या परिक्रमकांना अशी मदत मिळावी यासाठी ते हातभार लावतात? प्रतिसादांत तसे उल्लेख आहेत आणि त्या उलटही आहेत.
सामो, प्रश्न पडायलाही विचार करावा लागतो. झापड बांधलं की प्रश्न पडत नाहीत. उलट काही प्रश्नांच्या उत्तरांत डोळ्यांवर झापड बांधायचा प्रयत्न दिसतो. धर्म प्रश्नांचं स्वागत करतात का?
+१
आपण आपल्या दारात उभं राहिलेल्या प्रत्येकाला पुण्य समजून आपल्या पोराबाळांच्या पोटाला चिमटा घेऊन, त्याचं शिक्षण सोडवून 'जय हो मैय्या की' म्हणत आयुष्य कंठू शकू का ? त्यांनी मात्र ते करायचं आणि अशी सिस्टिम अव्याहतपणे चालू राहावी यासाठी परंपरा, अतिथि देवो भव वगैरे संस्कृती म्हणत त्याचे गोडवे गायचे. माझी फार चिडचिड होते हे असं अध्यात्म वाचून. त्यांनी का म्हणून दानधर्माच्या भरोशावर रहायचं , आपण वर्षभर सुद्धा तसं अनिश्चित जगू शकणार नाहीत. मुलांना सांगा तुझ्या परिक्षेची फीस कुणीतरी दान केल्यावर भरू, घरातल्या वृद्ध व आजारी लोकांना सांगा कुणीतरी दान दिल्यावर खूपखूप दूरवर असलेल्या डॉक्टरकडे नेऊ ,तोपर्यंत मरू नकोस. तोपर्यंत तू आम्हाला इतरांना देत रहाणारं नदी किॆवा झाड समज...! जे आपण करू शकणार नाहीत त्यांनी मात्र अंधश्रद्धेपायी केलं तर असा गैरफायदा घेऊ नये. किमान आपल्या सारख्यानी कानाडोळा करत रहाणं हे अतिशय अनैतिक आहे. त्यांनी दणदणीत मोबदला घ्यावा व मानाने रहावं, आपण जसं रहातो तसं. मला परिक्रमेशी काहीच प्रॉब्लेम नाही पण या सेटअपशी आहे, ह्याला पुण्य समजण्याशी आहे. ते अंधश्रद्धेपायी धृतराष्ट्र आहेतच, आपणही डोळ्यावर पट्टी बांधून गांधारी का व्हायचं..?
Submitted by अस्मिता. on 25 December, 2023 - 10:43
माझं अजूनही मत आहे कि लेखकाने खूप लवकर अग्निकुंड पेटवलं आणि त्यात उडी घेऊन स्वतःची आहुती दिली. जर ब्लॉगवर पूर्ण असलेली लेखमाला इथे देण्याकडे लक्ष पुरवलं असत आणि लेखमाला पूर्ण झाल्यानंतर अध्यात्म , श्रद्धा, धर्म या नेहमीच वादविवादाच्या असलेल्या गोष्टीत रमले असते तर काहीही बिघडलं नसतं. सुरूवातीलाच हे सगळं झाल्याने लेखमालिका राहिली बाजूला.
मायबोलीला या विषयावरच्या चर्चांचं ना अप्रूप, ना त्याचं वावगं वाटतं काही. लेखक नवीन होते. हळू हळू मतमतांतरे समजली असती. कदाचित उत्तरं देतानाही फरक पडला असता. असो.
Submitted by रघू आचार्य on 25 December, 2023 - 10:43
मला भरत अस्मिता दोघांचे मुद्दे पटतात.पण हे अयोग्य, गैरसोयीचं असेल तर त्याविरुद्ध ऍक्शन ही स्वतः त्या पोटाला चिमटा काढून अतिथीला चांगलं भोजन आणि निवारा देणाऱ्या लोकांनी घ्यायला हवी.ते घेत नाहीयेत याचा अर्थ त्यांना चालतंय, मान्य आहे.
मी नास्तिक नाही.पण तरीही हे नर्मदा मॉडेल (स्वतः अनुभव घ्यायला पटत नाहीये, अर्थातच दुसरे करत असतील त्यांच्या श्रमाचं, अनुभवांचं कौतुक आणि आदर आहे) पटत नाहीये.मागच्या कोणाच्या तरी लेखात 'कुटूंब आम्हाला निवारा द्यायला अजिबात उत्सुक नव्हतं, त्यांनी दाद दिली नाही मग स्वामीजींनी हाक मारून आग्रह करून त्याच जागी व्यवस्था करून दिली' असेही उल्लेख आहेत.
.ते घेत नाहीयेत याचा अर्थ त्यांना चालतंय, मान्य आहे. >>कंडिशनिंग असा शब्द भरत यांनी वापरला आहे. सोप्या शब्दात धार्मिक पगडा असल्याने मानसिक गुलामगिरी. हे लोक इतर वेळी भुकेलेल्याला खाऊ घालतील का हा प्रश्न आहे. वारकरी, अमरनाथ यात्रा किंवा अशा धार्मिक कार्यातच मदत केली जाते का ? भिकारी देवळातच का बसतात ? अशा अनेक प्रश्नांचे एकच उत्तर आहे.
मी अनु,धन्यवाद.
आता लेखक गेले आहेत, तर चर्चेला हरकत नसावी.
Submitted by रघू आचार्य on 25 December, 2023 - 10:49
पण गुलामगिरी, झापड जे काही असेल ते त्यांनी बदलायचं ठरवल्यावर बदलणार आहे.
>>>>>
त्यांना नाही कळत म्हणून तर ही झापडं दाखवणं , किमान त्याचा उदोउदो न करणं ही मुख्य प्रवाहात + सुखवस्तू+ सुशिक्षित असणाऱ्यांची नैतिक जबाबदारी ठरते. हे त्या कंडिशनिंगच्या अधीन नसणाऱ्यांच्याच लक्षात येणार नं..!
Submitted by अस्मिता. on 25 December, 2023 - 11:09
त्यांना मदत करायची असेल तर त्यांना करू द्याकी, इतर वेळच्या भुकेल्याना तुम्ही मदत करा. ते लोक धार्मिक गुलामगिरीत राहत असतील हा निष्कर्ष कशावरून? मुळात ते लोकं महिन्यातले किती दिवस परिक्रमा वासियांना मदत करतात याची काही माहिती आहे का? का उठ सुठ रोज आपल्या बायका पोरांना उपाशी ठेऊन मदत केली जाते? त्या लोकांना एवढाही मूर्ख नका समजू.
Submitted by रात्रीचे चांदणे on 25 December, 2023 - 11:08
विशेषतः ज्यांचं हातावर पोट आहे, ज्यांना त्यांच्या पुढल्या जेवणाची शाश्वती नाही, ज्यांना स्वतःलाच कधी अर्धपोटी राहावं लागतंय त्यांच्याबद्दल
अस्मिता आणि भरत - दोघांनीही उपस्थित केलेले मुद्दे अगदीच नाकारण्याजोगे / रद्दबातल करण्याजोगे नाहीयेत.
तरीपण त्याबाबत माझे निरिक्षण किंवा कार्यकारणभाव शोधायचा माझाही एक प्रयत्न
मला वाटते ते असे आहे की
जसजसा माणूस पैशाने श्रीमंत होत जातो किंवा कमी पैसे असले तरी हमखास उत्पन्नाची हमी असलेला व्यवसाय करणारा / नोकरीपेशा होतो) तसतसे भूक लागलेली असताना खायला न मिळाल्यावर कसे वाटते हेच त्याला विसरायला होते. त्याचा भुकेशी असलेला संबंधच सुटून जातो. टोटल डिसकनेक्ट.
ज्यांना अर्धपोटी राहिल्यामुळे भूक म्हणजे काय चीज असते हे माहीत असते त्यांना भुकेल्या माणसाबाबत / प्राणीमात्रांबाबत कळवळा जास्त वाटतो.
शहरातले उदा. रस्त्यावर राहणारी होमलेस माणसे आपल्याला मिळालेले अन्न भटक्या बेवारस कुत्र्या सोबतही वाटून घेतात.
अभावग्रस्ततेत राहणारी किंवा फक्त पैसे जिथे कामाला येऊ शकणार नाहीत अशी आडवाटेला / डोंगरात, जिथे रिसोर्सेस सहजासहजी / चटकन उपलब्ध नसतात त्या ठिकाणी माणसे एकमेकांना जास्त चांगल्या प्रकारे धरून राहतात. त्यांच्यात एकमेकांना मदत करण्याची वृती जास्त दिसते.
Irrespective of financial status, religion, etc.
विकु म्हणालेत तसे अन्नदान अथवा दुसर्याला मदत करावी ही भावना फक्त हिंदू धर्मात नाहीये. माणसाने माणसाशी माणसासम वागणे आहे आणि जिज्ञासा म्हणाली तसे हे सगळे मला खूप सुंदर वाटते.
अवांतर - सर्वच धर्मांमधे असलेल्या उपास करावा ह्या शिकवणुकीमागे माणसाला भुकेले राहण्याची सवय व्हावी, ज्यायोगे अन्नाची किंमत कळेल आणि कृतज्ञता भाव जागृत होईल असाच विचार असावा.
मला असं वाटतं की आर्थिक परिस्थिती चांगली नाही आणि तरीही परिक्रमेत अनेक वर्षे अन्न आणि निवारा दान करतायत अश्या 1-2 लोकांना इथे लिहिण्यास प्रवृत्त करावे(जस्ट अ थॉट.कारण इथे आपण सगळेच सुस्थितीत भरल्या पोटी त्यांना दान करून मिळणाऱ्या समाधानाबद्दल बोलतोय.खरे रिप्रेझेंटेशन हवे त्या लोकांचे.)
परिक्रमेला जाणारे जातात आणि तिथे रहाणारे ज्यांना त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायची इच्छा आहे (कारण काहीही असेल) ते करतात. इथे आपण रिकामटेकडी चर्चा करुन काय साध्य होणार आहे? ज्यांना शक्य असेल त्यांनी परिक्रमा करावी आणि तिथल्या लोकांना समजवावं हवं तर.
कितीही स्वातंत्र्य मिळाले तरी काही काही विचार सरणी कायम पारतंत्र्यात राहण्यात धन्य मानतात. त्यांना ते करण्यात आवडत असेल ते त्यांचे व्यक्ति स्वातंत्र्य त्यातून काही कोणास नुक्सान लाभ भोगावे लागले तर त्याचे त्याचे कर्म स्वातंत्र्य आपण उगीच इकडे लिखाण स्वातंत्र्याच्या आड कित्येक mb उधळत राहणार आणि तिकडे नदीकाठी कोणी चार घास कोणावर खर्च केले की पुन्हा व्यक्ति स्वातंत्र्य - कर्म स्वातंत्र्य - लिखाण स्वातंत्र्य फेरा सुरूच राहणार. हीच सर्वांची विविध पातळीवर अथक परिक्रमा समजावी का !!
- हे शंकरजी, मेरी आत्मा आप हैं। मेरी बुद्धि आपकी शक्ति पार्वतीजी हैं। मेरे प्राण आपके गण हैं। मेरा यह पंच भौतिक शरीर आपका मंदिर है। संपूर्ण विषय भोग की रचना आपकी पूजा ही है। मैं जो सोता हूं, वह आपकी ध्यान समाधि है। मेरा चलना-फिरना आपकी परिक्रमा है। मेरी वाणी से निकला प्रत्येक उच्चारण आपके स्तोत्र व मंत्र हैं। इस प्रकार मैं आपका भक्त जिन-जिन कर्मों को करता हूं, वह आपकी आराधना ही है।
सुट्टीचा सदुपयोग करत प्रस्तुत लेखक यांचे ब्लॉग वरचे 41 भाग एकदम ड्रग चं व्यसन लागल्या सारखे वाचले.अतिशय सुंदर,प्रांजळ आणि थरारक वर्णने.श्रद्धा, नर्मदा परिक्रमा मधलं ट्रॅव्हल डायनॅमिक, आर्थिक गणितं याबद्दल शंका सर्व बाजूला ठेवून एक कादंबरी म्हणून वाचावी अशी आहे.यावर एखादी मिनी सिरीज बनू शकते.
शिवाय भाग वाचताना हेही जाणवतं की लेखक ज्या नम्रपणे 'मी एक साधा सामान्य माणूस' असं स्वतःबद्दल म्हणतात तसं नाहीये.ते मुळात एक धाडसी, चांगलं गाणं येणारे, बऱ्याच विषयात ज्ञान असणारे, काही कलात पारंगत असे गृहस्थ आहेत.(थंड पाण्यात उडी मारलेला भाग एकदम थरारक आहे.माझे बसून वाचता वाचताच श्वास अडकले.)
साध्या 2 तासाच्या आणि 1 रात्रीच्या मुक्कामाला हजारो बुकिंग करणे, वेगवेगळ्या साईट वर रिव्ह्यू वाचणे,त्यात पण पन्नास जणांना शंभर शंका विचारणे अश्या अतिशय सामान्य आणि 0 रिस्क टेकिंग माझ्यासारखीचा हा कप ऑफ टी नाही हेही जाणवलं.
पण परिक्रमा करू इच्छित लोकांना या 41 भागातून बरंच काही मिळेल.
लेखक इथे हे भाग टाकू शकले तर उत्तम.बाकी वादविवाद, मतभेद,चर्चा हे चालू राहतंच.कोणीही आपली मतं शक्यतो बदलत नाही.पण याचा इतकी सुंदर लेखमाला इथे न येणे हा परिणाम होऊ नये असं वाटलं.
ही चांगली मालिका मायबोलीवर असणार नाही याचे वाईट वाटले. नर्मदे हर यांनी थोडी घाई केली. जसे मायबोलीचे नुकसान झाले आहे तसेच त्यांचे देखील नुकसानच झाले आहे. त्यांनी त्यांच्या निर्णयाचा जरूर फेरविचार करावा असे सुचवेन.
Submitted by जिज्ञासा on 30 December, 2023 - 10:06
((साध्या 2 तासाच्या आणि 1 रात्रीच्या मुक्कामाला हजारो बुकिंग करणे, वेगवेगळ्या साईट वर रिव्ह्यू वाचणे,त्यात पण पन्नास जणांना शंभर शंका विचारणे अश्या अतिशय सामान्य आणि 0 रिस्क टेकिंग माझ्यासारखीचा हा कप ऑफ टी नाही हेही जाणवलं. पण परिक्रमा करू इच्छित लोकांना या 41 भागातून बरंच काही मिळेल.))
मी अनु +111
ह्या विकांताला या लेखकांचा ब्लॉग binge read करून वाचून संपवला. सध्या 40 भाग उपलब्ध आहेत. आणि खरंच हे अनुभव थरारक आणि विलक्षण वाटले. लेखक बहुव्यासंगी, बहुआयामी आहेत हे वेळोवेळी जाणवत होतं. विशेषतः अनुमान आणि अनुभव यातील फरक जाणवून देणारी त्यांची ही परिक्रमा वाचकालाही खिळवून ठेवणारी आहे.
नर्मदानदी केंद्रस्थानी मानून जगणारी ही एक समांतर इकोसिस्टीम असावी. त्या सिस्टीम च्या बाहेरून पाहताना एक सामान्य माणूस म्हणून आपणाला जरी हे अनुभव एखाद्या शास्त्राच्या कसोटीवर आश्चर्यकारक आणि प्रश्न उपस्थित करणारे वाटले तरी विश्वास, कुतूहल, श्रद्धा घेऊन अविरत चालणाऱ्या व्यक्तीसाठी हा प्रवास एक नदी ते एक माता..दाता.. विधाता असा घडत असावा आणि त्यामुळेच स्वतःला निर्धास्तपणे ते नर्मदेचरणी अर्पित करत असावेत.
6 महिने विविध धोके पत्करून केलेली ही परिक्रमा , लेखक ह्या लेखनालेखमालेच्या माध्यमातून पुन्हा करत आहेत.. तो दैवी अनुभव ते पुन्हा जगत आहेत आणि म्हणूनच लेख लिहून हातावेगळे करण्याची घाई न करता, आवश्यक तेथे चित्रे , फोटो, ध्वनिफिती , चित्रफिती , गुगल नकाशे यांचा संदर्भ देऊन, आपल्या अभ्यासपूर्ण लेखनातून भावी परिक्रमावासीं साठी एक आवश्यक दस्ताऐवजीकरण करण्याचे कामही करत आहेत.
परिक्रमेतील वैयक्तिक व्यक्तिगत अनुभवांबरोबर नर्मदा नदी व परिसरामधील भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकजीवनविषयक दाखले अतिशय ओघवत्या आणि रसाळ लेखन शैलीमध्ये दिलेले आहेत त्यामुळे ही लेखमाला अधिक वाचनीय होते आहे.
ही लेखमाला मायबोलीवर असावी असे मनापासून वाटते..
Submitted by स्वान्तसुखाय on 31 December, 2023 - 09:00
बॉसची नजर चुकवून मी
.
धन्यवाद मामी _/\_
धन्यवाद मामी _/\_
>>मुळात या नर्मदा
>>मुळात या नर्मदा परिक्रमेमागे नक्की बिझनेस मॉडेल काय आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मनात आलेल्या सर्व गोष्टी आपोआप, फुकटात आपल्या पदरात पडतात हे बेसिक इकॉनॉमिक्सच्या There is no free lunch याच्या अगदी विरुद्ध आहे.<<
उबोंच्या या प्रश्नाचं थेट उत्तर अजुनहि न आल्याने मी प्रयत्न करतो -
या सगळ्या धार्मिक अॅक्टिविटिज श्रद्धा आणि आस्था या भांडवलावर उभ्या असतात. शिवाय इथे नॉन झिरो सम गेम थियरीनुसार एव्हरीबडि विन्स. परिक्रमा करणारा फक्त अंगावरच्या कपड्यांवर वारी संपवता आल्याने खुश असतो आणि त्याला मदत करणार्यांना आत्मिक समाधान लाभतं. विन-विन सिचुएशन. पुढे याचं मार्केटिंग आपोआप होतं. परिक्रमा करणारा भारावुन सोशल मिडिया माध्यमातुन तर इतर स्टेकहोल्डर्स माउथ पब्लिसिटि द्वारे प्रसिद्धि मिळवतात. भारतात श्रद्धाळु लोकांची कमतरता नसल्याने दोन्हिकडचा कच्चा माल (परिक्रमा करणारे + मदत करणारे) सप्लायचेन च्या नियमांनुसार येतंच रहातो. पुढे यदाकदाचित या दोहोंपैकि एका कच्च्या मालात घट झाली तर हि साखळी भंगु शकते..
तर मंडळी, उबोंचा "नो फ्री लंच" हा दावा बरोबर आहे. वनवे ऑर द अदर समबडि इज पिकिंग अप द टॅब. निसर्ग देतो, सगळं आपोआप होतं हा भाबडा दैववाद आहे. चिकित्सक बुद्धीने खोल विचार केलांत तर हि समीकरणं सुटतात; नॉट ए रॉकेट सायंस...
प्रश्न कोणीही उपस्थित करु
प्रश्न कोणीही उपस्थित करु शकतं, त्याकरता फारशी मेहनतीची गरज नसते ना ... असो! उत्तर द्यायला विचार करावा लागतो. जिज्ञासा आणि राज यांनी छान उत्तरे दिलेली आहेत.
धागालेखक परत यावेत हीच सदिच्छा.
<परिक्रमावासींना मदत करणे हे
<परिक्रमावासींना मदत करणे हे पैसा या संकल्पनेशी निगडित नाही and it works. ज्या कृतीमागे केवळ पैसा हाच driving factor नसतो त्या ठिकाणी free lunch ही कल्पना देखील वेगळ्या स्वरूपात असते. मी अन्नदान केले असता नर्मदामैया माझ्या चरितार्थाची काळजी घेते हा एका वेगळ्या पद्धतीचा व्यवहारच आहे! A fiction works if everyone believes in it. So, I think नर्मदेच्या परिसरात सर्वच जण यावर विश्वास ठेवतात आणि म्हणून ही व्यवस्था without apparent monetary benefits यशस्वी होते. I think it's beautiful!>
जिज्ञासा यां नी ज्या व्यवस्थेबद्दल लिहिलं तिच्यामागचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न करतो. बघा कसं वाटतंय / पटतंय. हे विशेषतः ज्यांचं हातावर पोट आहे, ज्यांना त्यांच्या पुढल्या जेवणाची शाश्वती नाही, ज्यांना स्वतःलाच कधी अर्धपोटी राहावं लागतंय त्यांच्याबद्दल लिहितोय. खाऊन पिऊन सुखी लोक काही करोत. त्याबद्दल काही म्हणणं नाही.
आपल्याकडे पाप पुण्य या संकल्पनांचा पगडा फार मोठा आहे. त्याचे ठोकताळे ठरलेले आहेत. तसंच कर्म या संकल्पनेचंही आहे.
नर्मदा परिक्रमा करणारे काही पुण्याचं काम करताहेत आणि त्यांना मदत केली की त्या पुण्याचा काही अंश आपल्याही नावे होतो. कदाचित ईश्वराने या भागात आपल्याला आणून हे पुण्य कर्म करायची संधी / जबाबदारी आपल्याला दिली. पुढे जाऊन ते आपले विहीत कर्तव्य आहे, असं त्या लोकांचं कंडिशनिंग झालं नसेल का? धर्माधारित कंडिशनिंग आणि त्यातून येणारे हक्क कर्तव्य वा आपल्या स्थितीबद्दलची भावना यासाठी स्त्रीपुरुष असणं वा कोणत्या जातीत जन्म होणे ही आणखी ठळक उदाहरणं आहेत.
नर्मदा परिक्रमा करणार्यांना अन्नदान करणारे सरसकट दिसेल त्या भुकेल्या माणसाला अन्नदान करीत असतील का? ते नुसतं मानवतेवर आधारित समाधान असतं तर असं प्रत्येक भुकेल्यालाच अन्न मिळालं असतं.
आपल्यासारख्या खाऊन पिऊन तुडुंब सुखी लोकांना कोणा गरजूला मदत करायच्या भरपूर संधी उपलब्ध असतात. आपण त्या उचलतो का? ते आत्मिक समाधान किती जण मिळवतात? आपल्यातले जे कोणी जेव्हा केव्हा अशी मदत करतात, तेव्हा त्यातल्या किती जणांच्या मनात पाप पुण्याच्या कल्पना असतात?
----
बाकी सुखवस्तू लोक जर काही विशिष्ट अनुभव घेण्यासाठी वा मैयाने बुलाया है म्हणून पैसे इत्यादि न बाळागता परिक्रमा करीत असतील, ती करताना त्यांना मदत मिळत गेली असेल, तर त्यातल्या किती जणांना पुढच्या परिक्रमकांना अशी मदत मिळावी यासाठी ते हातभार लावतात? प्रतिसादांत तसे उल्लेख आहेत आणि त्या उलटही आहेत.
सामो, प्रश्न पडायलाही विचार
सामो, प्रश्न पडायलाही विचार करावा लागतो. झापड बांधलं की प्रश्न पडत नाहीत. उलट काही प्रश्नांच्या उत्तरांत डोळ्यांवर झापड बांधायचा प्रयत्न दिसतो. धर्म प्रश्नांचं स्वागत करतात का?
+१
+१
आपण आपल्या दारात उभं राहिलेल्या प्रत्येकाला पुण्य समजून आपल्या पोराबाळांच्या पोटाला चिमटा घेऊन, त्याचं शिक्षण सोडवून 'जय हो मैय्या की' म्हणत आयुष्य कंठू शकू का ? त्यांनी मात्र ते करायचं आणि अशी सिस्टिम अव्याहतपणे चालू राहावी यासाठी परंपरा, अतिथि देवो भव वगैरे संस्कृती म्हणत त्याचे गोडवे गायचे. माझी फार चिडचिड होते हे असं अध्यात्म वाचून. त्यांनी का म्हणून दानधर्माच्या भरोशावर रहायचं , आपण वर्षभर सुद्धा तसं अनिश्चित जगू शकणार नाहीत. मुलांना सांगा तुझ्या परिक्षेची फीस कुणीतरी दान केल्यावर भरू, घरातल्या वृद्ध व आजारी लोकांना सांगा कुणीतरी दान दिल्यावर खूपखूप दूरवर असलेल्या डॉक्टरकडे नेऊ ,तोपर्यंत मरू नकोस. तोपर्यंत तू आम्हाला इतरांना देत रहाणारं नदी किॆवा झाड समज...! जे आपण करू शकणार नाहीत त्यांनी मात्र अंधश्रद्धेपायी केलं तर असा गैरफायदा घेऊ नये. किमान आपल्या सारख्यानी कानाडोळा करत रहाणं हे अतिशय अनैतिक आहे. त्यांनी दणदणीत मोबदला घ्यावा व मानाने रहावं, आपण जसं रहातो तसं. मला परिक्रमेशी काहीच प्रॉब्लेम नाही पण या सेटअपशी आहे, ह्याला पुण्य समजण्याशी आहे. ते अंधश्रद्धेपायी धृतराष्ट्र आहेतच, आपणही डोळ्यावर पट्टी बांधून गांधारी का व्हायचं..?
अस्मिता +१
अस्मिता +१
भरत, खूप छान विश्लेषण केलं
भरत, खूप छान विश्लेषण केलं आहे.
अस्मिता +१
माझं अजूनही मत आहे कि लेखकाने खूप लवकर अग्निकुंड पेटवलं आणि त्यात उडी घेऊन स्वतःची आहुती दिली. जर ब्लॉगवर पूर्ण असलेली लेखमाला इथे देण्याकडे लक्ष पुरवलं असत आणि लेखमाला पूर्ण झाल्यानंतर अध्यात्म , श्रद्धा, धर्म या नेहमीच वादविवादाच्या असलेल्या गोष्टीत रमले असते तर काहीही बिघडलं नसतं. सुरूवातीलाच हे सगळं झाल्याने लेखमालिका राहिली बाजूला.
मायबोलीला या विषयावरच्या चर्चांचं ना अप्रूप, ना त्याचं वावगं वाटतं काही. लेखक नवीन होते. हळू हळू मतमतांतरे समजली असती. कदाचित उत्तरं देतानाही फरक पडला असता. असो.
मला भरत अस्मिता दोघांचे
मला भरत अस्मिता दोघांचे मुद्दे पटतात.पण हे अयोग्य, गैरसोयीचं असेल तर त्याविरुद्ध ऍक्शन ही स्वतः त्या पोटाला चिमटा काढून अतिथीला चांगलं भोजन आणि निवारा देणाऱ्या लोकांनी घ्यायला हवी.ते घेत नाहीयेत याचा अर्थ त्यांना चालतंय, मान्य आहे.
मी नास्तिक नाही.पण तरीही हे नर्मदा मॉडेल (स्वतः अनुभव घ्यायला पटत नाहीये, अर्थातच दुसरे करत असतील त्यांच्या श्रमाचं, अनुभवांचं कौतुक आणि आदर आहे) पटत नाहीये.मागच्या कोणाच्या तरी लेखात 'कुटूंब आम्हाला निवारा द्यायला अजिबात उत्सुक नव्हतं, त्यांनी दाद दिली नाही मग स्वामीजींनी हाक मारून आग्रह करून त्याच जागी व्यवस्था करून दिली' असेही उल्लेख आहेत.
रघू, पूर्ण सहमत.
.ते घेत नाहीयेत याचा अर्थ
.ते घेत नाहीयेत याचा अर्थ त्यांना चालतंय, मान्य आहे. >>कंडिशनिंग असा शब्द भरत यांनी वापरला आहे. सोप्या शब्दात धार्मिक पगडा असल्याने मानसिक गुलामगिरी. हे लोक इतर वेळी भुकेलेल्याला खाऊ घालतील का हा प्रश्न आहे. वारकरी, अमरनाथ यात्रा किंवा अशा धार्मिक कार्यातच मदत केली जाते का ? भिकारी देवळातच का बसतात ? अशा अनेक प्रश्नांचे एकच उत्तर आहे.
मी अनु,धन्यवाद.
आता लेखक गेले आहेत, तर चर्चेला हरकत नसावी.
पण गुलामगिरी, झापड जे काही
पण गुलामगिरी, झापड जे काही असेल ते त्यांनी बदलायचं ठरवल्यावर बदलणार आहे.
धार्मिक गुलामगिरी हा स्वतंत्र
धार्मिक गुलामगिरी हा स्वतंत्र विषय आहे. यावर खूप साहित्य उपलब्ध आहे. आपला देश का इतकी वर्षे मागास राहिला याची कारणेही त्यात आहेत.
त्यांना नाही कळत म्हणून तर ही
पण गुलामगिरी, झापड जे काही असेल ते त्यांनी बदलायचं ठरवल्यावर बदलणार आहे.
>>>>>
त्यांना नाही कळत म्हणून तर ही झापडं दाखवणं , किमान त्याचा उदोउदो न करणं ही मुख्य प्रवाहात + सुखवस्तू+ सुशिक्षित असणाऱ्यांची नैतिक जबाबदारी ठरते. हे त्या कंडिशनिंगच्या अधीन नसणाऱ्यांच्याच लक्षात येणार नं..!
त्यांना मदत करायची असेल तर
त्यांना मदत करायची असेल तर त्यांना करू द्याकी, इतर वेळच्या भुकेल्याना तुम्ही मदत करा. ते लोक धार्मिक गुलामगिरीत राहत असतील हा निष्कर्ष कशावरून? मुळात ते लोकं महिन्यातले किती दिवस परिक्रमा वासियांना मदत करतात याची काही माहिती आहे का? का उठ सुठ रोज आपल्या बायका पोरांना उपाशी ठेऊन मदत केली जाते? त्या लोकांना एवढाही मूर्ख नका समजू.
त्यांना नाही कळत म्हणून तर ही
त्यांना नाही कळत म्हणून तर ही झापडं दाखवणं
आपल्या परीघा बाहेरही जग आहे हे समजून घ्या. त्यांना समजत नाही असा निषकर्ष काढून मोकळे नका होऊ.
भारतात शेवटची ज्ञात सती झाली
भारतात शेवटची ज्ञात सती झाली त्याला चाळीस वर्षेही उलटलेली नाहीत.
The only thing worse than being blind is having sight but no vision
– Helen Keller
विशेषतः ज्यांचं हातावर पोट
विशेषतः ज्यांचं हातावर पोट आहे, ज्यांना त्यांच्या पुढल्या जेवणाची शाश्वती नाही, ज्यांना स्वतःलाच कधी अर्धपोटी राहावं लागतंय त्यांच्याबद्दल
अस्मिता आणि भरत - दोघांनीही उपस्थित केलेले मुद्दे अगदीच नाकारण्याजोगे / रद्दबातल करण्याजोगे नाहीयेत.
तरीपण त्याबाबत माझे निरिक्षण किंवा कार्यकारणभाव शोधायचा माझाही एक प्रयत्न
मला वाटते ते असे आहे की
जसजसा माणूस पैशाने श्रीमंत होत जातो किंवा कमी पैसे असले तरी हमखास उत्पन्नाची हमी असलेला व्यवसाय करणारा / नोकरीपेशा होतो) तसतसे भूक लागलेली असताना खायला न मिळाल्यावर कसे वाटते हेच त्याला विसरायला होते. त्याचा भुकेशी असलेला संबंधच सुटून जातो. टोटल डिसकनेक्ट.
ज्यांना अर्धपोटी राहिल्यामुळे भूक म्हणजे काय चीज असते हे माहीत असते त्यांना भुकेल्या माणसाबाबत / प्राणीमात्रांबाबत कळवळा जास्त वाटतो.
शहरातले उदा. रस्त्यावर राहणारी होमलेस माणसे आपल्याला मिळालेले अन्न भटक्या बेवारस कुत्र्या सोबतही वाटून घेतात.
अभावग्रस्ततेत राहणारी किंवा फक्त पैसे जिथे कामाला येऊ शकणार नाहीत अशी आडवाटेला / डोंगरात, जिथे रिसोर्सेस सहजासहजी / चटकन उपलब्ध नसतात त्या ठिकाणी माणसे एकमेकांना जास्त चांगल्या प्रकारे धरून राहतात. त्यांच्यात एकमेकांना मदत करण्याची वृती जास्त दिसते.
Irrespective of financial status, religion, etc.
विकु म्हणालेत तसे अन्नदान अथवा दुसर्याला मदत करावी ही भावना फक्त हिंदू धर्मात नाहीये. माणसाने माणसाशी माणसासम वागणे आहे आणि जिज्ञासा म्हणाली तसे हे सगळे मला खूप सुंदर वाटते.
अवांतर - सर्वच धर्मांमधे असलेल्या उपास करावा ह्या शिकवणुकीमागे माणसाला भुकेले राहण्याची सवय व्हावी, ज्यायोगे अन्नाची किंमत कळेल आणि कृतज्ञता भाव जागृत होईल असाच विचार असावा.
मला असं वाटतं की आर्थिक
मला असं वाटतं की आर्थिक परिस्थिती चांगली नाही आणि तरीही परिक्रमेत अनेक वर्षे अन्न आणि निवारा दान करतायत अश्या 1-2 लोकांना इथे लिहिण्यास प्रवृत्त करावे(जस्ट अ थॉट.कारण इथे आपण सगळेच सुस्थितीत भरल्या पोटी त्यांना दान करून मिळणाऱ्या समाधानाबद्दल बोलतोय.खरे रिप्रेझेंटेशन हवे त्या लोकांचे.)
परिक्रमेला जाणारे जातात आणि
परिक्रमेला जाणारे जातात आणि तिथे रहाणारे ज्यांना त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायची इच्छा आहे (कारण काहीही असेल) ते करतात. इथे आपण रिकामटेकडी चर्चा करुन काय साध्य होणार आहे? ज्यांना शक्य असेल त्यांनी परिक्रमा करावी आणि तिथल्या लोकांना समजवावं हवं तर.
कितीही स्वातंत्र्य मिळाले तरी
कितीही स्वातंत्र्य मिळाले तरी काही काही विचार सरणी कायम पारतंत्र्यात राहण्यात धन्य मानतात. त्यांना ते करण्यात आवडत असेल ते त्यांचे व्यक्ति स्वातंत्र्य त्यातून काही कोणास नुक्सान लाभ भोगावे लागले तर त्याचे त्याचे कर्म स्वातंत्र्य आपण उगीच इकडे लिखाण स्वातंत्र्याच्या आड कित्येक mb उधळत राहणार आणि तिकडे नदीकाठी कोणी चार घास कोणावर खर्च केले की पुन्हा व्यक्ति स्वातंत्र्य - कर्म स्वातंत्र्य - लिखाण स्वातंत्र्य फेरा सुरूच राहणार. हीच सर्वांची विविध पातळीवर अथक परिक्रमा समजावी का !!
परिक्रमा विषयावरुन हा आदि
परिक्रमा विषयावरुन हा आदि शंकराचार्यांचा श्लोक आठवला. -
आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं।
पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः॥
संचारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो।
यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्॥4 ॥
- हे शंकरजी, मेरी आत्मा आप हैं। मेरी बुद्धि आपकी शक्ति पार्वतीजी हैं। मेरे प्राण आपके गण हैं। मेरा यह पंच भौतिक शरीर आपका मंदिर है। संपूर्ण विषय भोग की रचना आपकी पूजा ही है। मैं जो सोता हूं, वह आपकी ध्यान समाधि है। मेरा चलना-फिरना आपकी परिक्रमा है। मेरी वाणी से निकला प्रत्येक उच्चारण आपके स्तोत्र व मंत्र हैं। इस प्रकार मैं आपका भक्त जिन-जिन कर्मों को करता हूं, वह आपकी आराधना ही है।
नंतर एकदम वाचूया म्हणून ठेवून
नंतर एकदम वाचूया म्हणून ठेवून दिले होते.
यांचे लेख कुठे मिळतील? वाचायचं आहे.
रानभुली त्यांच्या प्रोफाईल
रानभुली त्यांच्या प्रोफाईल मध्ये त्यांनी , त्यांच्या ब्लॉगस्पॉटचे नाव दिलेले आहे. तिथे हे लेख आहेत.
Http://mazinarmadaparikrama.blogspot.com
सुट्टीचा सदुपयोग करत प्रस्तुत
सुट्टीचा सदुपयोग करत प्रस्तुत लेखक यांचे ब्लॉग वरचे 41 भाग एकदम ड्रग चं व्यसन लागल्या सारखे वाचले.अतिशय सुंदर,प्रांजळ आणि थरारक वर्णने.श्रद्धा, नर्मदा परिक्रमा मधलं ट्रॅव्हल डायनॅमिक, आर्थिक गणितं याबद्दल शंका सर्व बाजूला ठेवून एक कादंबरी म्हणून वाचावी अशी आहे.यावर एखादी मिनी सिरीज बनू शकते.
शिवाय भाग वाचताना हेही जाणवतं की लेखक ज्या नम्रपणे 'मी एक साधा सामान्य माणूस' असं स्वतःबद्दल म्हणतात तसं नाहीये.ते मुळात एक धाडसी, चांगलं गाणं येणारे, बऱ्याच विषयात ज्ञान असणारे, काही कलात पारंगत असे गृहस्थ आहेत.(थंड पाण्यात उडी मारलेला भाग एकदम थरारक आहे.माझे बसून वाचता वाचताच श्वास अडकले.)
साध्या 2 तासाच्या आणि 1 रात्रीच्या मुक्कामाला हजारो बुकिंग करणे, वेगवेगळ्या साईट वर रिव्ह्यू वाचणे,त्यात पण पन्नास जणांना शंभर शंका विचारणे अश्या अतिशय सामान्य आणि 0 रिस्क टेकिंग माझ्यासारखीचा हा कप ऑफ टी नाही हेही जाणवलं.
पण परिक्रमा करू इच्छित लोकांना या 41 भागातून बरंच काही मिळेल.
लेखक इथे हे भाग टाकू शकले तर उत्तम.बाकी वादविवाद, मतभेद,चर्चा हे चालू राहतंच.कोणीही आपली मतं शक्यतो बदलत नाही.पण याचा इतकी सुंदर लेखमाला इथे न येणे हा परिणाम होऊ नये असं वाटलं.
मी पण एक कादंबरी म्हणून
मी पण एक कादंबरी म्हणून वाचतेय. ... आता ते कसं आयुष्य जगताहेत ह्याचं प्रचंड कुतूहल आहे.
ही चांगली मालिका मायबोलीवर
ही चांगली मालिका मायबोलीवर असणार नाही याचे वाईट वाटले. नर्मदे हर यांनी थोडी घाई केली. जसे मायबोलीचे नुकसान झाले आहे तसेच त्यांचे देखील नुकसानच झाले आहे. त्यांनी त्यांच्या निर्णयाचा जरूर फेरविचार करावा असे सुचवेन.
जिज्ञासा+१
जिज्ञासा+१
मी ब्लाॅगवर जाऊन ३८ भाग वाचले. आवडले. नाट्यमय, अद्भुतरसपूर्ण प्रवास वर्णन.
अनु प्रतिसाद आवडला.
अनु प्रतिसाद आवडला.
((साध्या 2 तासाच्या आणि 1
((साध्या 2 तासाच्या आणि 1 रात्रीच्या मुक्कामाला हजारो बुकिंग करणे, वेगवेगळ्या साईट वर रिव्ह्यू वाचणे,त्यात पण पन्नास जणांना शंभर शंका विचारणे अश्या अतिशय सामान्य आणि 0 रिस्क टेकिंग माझ्यासारखीचा हा कप ऑफ टी नाही हेही जाणवलं. पण परिक्रमा करू इच्छित लोकांना या 41 भागातून बरंच काही मिळेल.))
मी अनु +111
ह्या विकांताला या लेखकांचा ब्लॉग binge read करून वाचून संपवला. सध्या 40 भाग उपलब्ध आहेत. आणि खरंच हे अनुभव थरारक आणि विलक्षण वाटले. लेखक बहुव्यासंगी, बहुआयामी आहेत हे वेळोवेळी जाणवत होतं. विशेषतः अनुमान आणि अनुभव यातील फरक जाणवून देणारी त्यांची ही परिक्रमा वाचकालाही खिळवून ठेवणारी आहे.
नर्मदानदी केंद्रस्थानी मानून जगणारी ही एक समांतर इकोसिस्टीम असावी. त्या सिस्टीम च्या बाहेरून पाहताना एक सामान्य माणूस म्हणून आपणाला जरी हे अनुभव एखाद्या शास्त्राच्या कसोटीवर आश्चर्यकारक आणि प्रश्न उपस्थित करणारे वाटले तरी विश्वास, कुतूहल, श्रद्धा घेऊन अविरत चालणाऱ्या व्यक्तीसाठी हा प्रवास एक नदी ते एक माता..दाता.. विधाता असा घडत असावा आणि त्यामुळेच स्वतःला निर्धास्तपणे ते नर्मदेचरणी अर्पित करत असावेत.
6 महिने विविध धोके पत्करून केलेली ही परिक्रमा , लेखक ह्या लेखनालेखमालेच्या माध्यमातून पुन्हा करत आहेत.. तो दैवी अनुभव ते पुन्हा जगत आहेत आणि म्हणूनच लेख लिहून हातावेगळे करण्याची घाई न करता, आवश्यक तेथे चित्रे , फोटो, ध्वनिफिती , चित्रफिती , गुगल नकाशे यांचा संदर्भ देऊन, आपल्या अभ्यासपूर्ण लेखनातून भावी परिक्रमावासीं साठी एक आवश्यक दस्ताऐवजीकरण करण्याचे कामही करत आहेत.
परिक्रमेतील वैयक्तिक व्यक्तिगत अनुभवांबरोबर नर्मदा नदी व परिसरामधील भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकजीवनविषयक दाखले अतिशय ओघवत्या आणि रसाळ लेखन शैलीमध्ये दिलेले आहेत त्यामुळे ही लेखमाला अधिक वाचनीय होते आहे.
ही लेखमाला मायबोलीवर असावी असे मनापासून वाटते..
Pages