क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

10 विकेट ने जिंकलो...क्रेडिट गोज टू शर्मा.. गुड डिसिजन ओपनिंग न येण्याचा... नाहीतर 9 विकेट ने जिंकलो असतो...

10 विकेट ने जिंकलो...क्रेडिट गोज टू शर्मा.. गुड डिसिजन ओपनिंग न येण्याचा... नाहीतर 9 विकेट ने जिंकलो असतो...

ओह .. सरकास्टिक कमेंट Happy येस येस शर्मा मूळे मॅच जिंकलो... सिराज ऐवजी भुवनेश्वर असता तरी शर्मा ने बरोबर ठिकाणी फिल्डर्स लावून आउट केले असते... Wink
बांग्लादेश मॅच वेळी मात्र त्याला दोष देऊ नका... पन्नास मधेच ऑल आउट केला असता पण फिल्डर्स त्याचे ऐकतच नव्हते... Happy

From the 50 overs game, it has turned into a 50 runs game.

#Rohit_Sharma

लोकसत्ता:
सिराजने २१ धावांत सहा विकेट घेत श्रीलंकेविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम केला. सिराजने या प्रकरणात पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वकार युनूसला मागे सोडले. Happy Happy

इंडियन टीम ‘peaking at the right time’ म्हणता येईल का? तसं असेल तर वर्ल्डकपसाठी शुभसंकेत आहेत.

येस, फक्त आता शेवटच्या वेळी श्रेयस आणि अक्षर च्या इंज्युरी खोडा घालू नयेत.

जर हे दोघं फिट नाही झाले तर तुमचे रिप्लेसमेंट खेळाडू कोण असतील ? माझे मत सुंदर आणि संजू ला आहे.

सुंदरपेक्षा कधीही आश्विनच चांगला.
सुंदरने या फॉर्मेटला आजवर फलंदाजीत काहीही मोठे तीर मारले नाहीयेत.

परत अश्विन ला घेऊ नये, सुंदर ला घ्यावे, मागील t20 विश्वचषकात , भूवी, कार्तिक, अश्विन, चहल सारख्या खेळाडूंमुळे पराभव झाला होता, आता तरी शहाणे व्हावे,

भूवी, कार्तिक, अश्विन, चहल सारख्या खेळाडूंमुळे पराभव झाला होता, आता तरी शहाणे व्हावे, >> मला आठवतेय त्याप्रमाणे अ‍ॅश नि भुवी सगळे सामने चांगले खेळले होते शेवटचा सोडून. त्यामूळे फक्त त्यांच्यावर पिन करणे चुकीचे ठरेल. इंग्लंड समोर सगळीच बॉलिंग गंडली होती. बॅटींङ सुद्धा फार दमदार झाली अशा तला भाग नव्हता.

सुंदर दहा ओव्हर्स कंसिस्टांटली चांगल्या टाकेल कि नाही ह्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे त्यामूळे अ‍ॅश चांगला पर्याय वाटतो.

सुंदर पॉवर प्ले मध्ये पण गोलंदाजी करू शकतो, फलंदाजी फ्लोटर म्हणून कुठेही करू शकतो, आश्विन, कुलदीप, बुमराह आणि सिराज इतकी लॉंग tail परवडणार नाही

ऑस्ट्रेलियाविरूद्ध अश्विन आणि सुंदर, दोघांना निवडलंय. त्यात टीम मॅनेजमेंटचा कल कुठे आहे ह्याविषयी बर्यापैकी इंडिकेशन मिळेल. पहिल्या दोन मॅचेसमधे बरेचसे फर्स्ट चॉईस प्लेयर्सना रेस्ट केलंय.

सुंदर पॉवर प्ले मध्ये पण गोलंदाजी करू शकतो, फलंदाजी फ्लोटर म्हणून कुठेही करू शकतो, आश्विन, कुलदीप, बुमराह आणि सिराज इतकी लॉंग tail परवडणार नाही >> मान्य पण आता हाच बॉलिंग अ‍ॅटॅक सुंदर, जाडेजा, कुलदीप, बुड्या, सिराज, आणि पांड्या असा विचार करून बघा. पांड्या प्रत्येक मॅच मधे १० ओव्हर्स च्या बॉलर म्हणून धरावा लागेल.

पंड्या ला 10 ओव्हर्स टाकायची गरज नाही, बुमराह, सिराज आणि कुलदीप।10 टाकतील, आणि पंड्या , जडेजा आणि सुंदर तिघे मिळून 20 ओव्हर्स टाकू शकतात.

सुंदर वन डे साठी सरप्राइज ठरू शकतो, चांगल्या अन् वाईट दोन्ही प्रकारे. वर्ल्डकप साठी ही ५०% रिस्क नको.
आश्विन बऱ्यापैकी सेफ बेट आहे.

आपली वर्ल्डकप ची टीम अगोदरच निवडलेली आहे ना? तर मग सुंदर विरुद्ध आश्विन ही चर्च कशासाठी? कोण जखमी झलेल्याची बातमीही नाही ऐकली.

पंड्या ला 10 ओव्हर्स टाकायची गरज नाही, बुमराह, सिराज आणि कुलदीप।10 टाकतील, आणि पंड्या , जडेजा आणि सुंदर तिघे मिळून 20 ओव्हर्स टाकू शकतात. >> व्न डे चा सध्याचा फॉर्‍मॅट बघता ( २५ ओव्हर्स नंतर नवा बॉल, शेवटचे पॉवर प्ले) पाच पेक्षा अधिक बॉलर्स असणे जरुरी आहे. सरासरी ने प्रत्येक दिवशी एक तरी वाईट स्पेक टाकेल असे धरले तर एक बॅक अप हवाच. " पंड्या , जडेजा आणि सुंदर तिघे मिळून 20 ओव्हर्स " धरले तर असा बॅकप जातो. अक्षर सारखा रेग्युलर वन डे बॉलर पण मार खातोय बघितल्यावर सुंदर सारख्या स्टॉप गॅप प्रकाराची अधिकच धास्ती वाटते. अश्विन बॉलिंङ फॉर्‍म मधे असेल तर माझा प्रीफरन्स त्याला असेल. तो भारतीय पिचेस वर जास्त चांगला स्पिनर आहे.

आज आयसीसीने विश्वचषकासाठी पीच क्युरेटरना दिलेल्या सूचना भारतासाठी खास महत्त्वाच्या ठरू शकतात, विशेषत: विकेट्सवर गवत ठेवण्यासंबधीच्या. आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांत पीच फलंदाजीला अनुकूल, अगदीं ' पाटा ' म्हणण्याइतपत, असावं हा अलिखित नियमच होता. आपल्या अंतिम संघ निवडीवर, विशेषत: गोलंदाज निवडताना, याचा परिणाम होऊ शकतो.

तो भारतीय पिचेस वर जास्त चांगला स्पिनर आहे. >> अरे स्ट्राईक आउट करायची गरज नाही. तो चांगला स्पिनर आहे हा मुद्दा नव्हता तर स्पर्धा जिथे आहे त्या भारतीय पिचेस वर तो सुंदर पेक्षा चांगला स्पिनर आहे हा होता. Happy

आज आयसीसीने विश्वचषकासाठी पीच क्युरेटरना दिलेल्या सूचना भारतासाठी खास महत्त्वाच्या ठरू शकतात >> गवताची सूचना फक्त पिचेस पाटा होउ नये इथपर्यंतच असावी असे वाटले. वर्ल्ड कप हा बॅटस्मन नी डॉमिनेट केलेला नसला तर त्याची पॉप्युलॅरिटी कमी होईल ह्या पेक्षा आयसीसी फार बाहेर जाणार नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर ज्या क्षणी एका इनिंगमधे दोन बॉल वापरण्याचा निर्णय घेतला त्याक्षणी आयसीसीने स्पिनर बाहेर ढकलले त्यामूळे गवत राखणे किंवा न राखणे ह्या बाबत स्टान्स घेणे फक्त 'बैल गेला नि झोपा केला' प्रकार आहे.

Pages