आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभ प्रभातः आज डब्या त बॉइल्ड एग बटाटी सँडविच, काकडी, द्राक्षे, ताक. हा इंतजाम करून एसी लाउन आता लिहायला बसले. कुत्रे एक लेग पीस घेउन शांतपणी झोपले आहे. सिंगल वुमन पॅराडाइज वेळ. पण देशमुखांच्या घरी मात्र अशांततेचा कहर गाठला आहे. खंग्री म्यान व भारतीय संगीत अ‍ॅरेंजर दोघास्नी भरपूरच काम आहे.

रात्रीची वेळ जेवणाला सर्व बसत आहेत. अनघा पहिले पोळ्या वाढते. अप्पा अन्या संजना का नाही आले विचारते. अप्पा इशाला त्यां ना बोलाव म्हनतो. पण त्या आधीच अंजना वादळी म्हणावी अशी बोलत बोलत एंट्री घेतात. संजना परत तेच मी घ. देणार नाही. मी तुम्हाला सर्वांना अडकवेन राडा करेन. अन्या समजावायचा प्रयत्न करतो. पण ती सर्वांना साक्षिदार आहात तुम्ही मी पुढे काय करीन त्याचे म्हण्ते व विस्मयजनक पद्धतीने स्वतःचेच डोके स्वतःच भिंतीवर आपटून घेते चार पाच वेळा. तिला मग पकडून मागेखेचले जाते. खंग्री ने धमाके दार संगीत दिले आहे.
प्रत्येक पात्र स्वतंट्र पणे विस्मय चकित होण्याचा अभिनय करत आहे. त्याचेच पैसे मिळतात ना. मग संजनाच्या कपाळावर फक्त एक रक्ताचा एक इंच ओघळ आहे. खरे तर आधी काळे निळे होते व तिथे टोकदार खिळा वगैरे काहीच नाही. रक्त यायला, साधी भिंत आहे. पण संजना असल्याने काही शक्य आहे. बिचारी अरुंधती आपलं भिंत.

संजना आता मी डोमेस्टिक वायलन्स केस कर्णार तुम्हाला जेल मध्ये टाकणार. करून भीती दाखवते. ते बोट कायम हातात सुदर्शन चक्र असल्या वाणी उगारलेलेच आहे. तुला मी सोडणार नाही. मी प्रेम केले आहे आत्ताही केले आहे एक संधी देत नाहीस तू कारण अरूच तुझ्या डोक्यात आहे अजून ( मेंटल है क्या!!) मी कधीच घर सोडून जाणार नाही असे आई अप्पांना सॉरी म्हणून अन्याला तु क देउन वर जाते.
काय डबे वाजवलेत खंग्र्याने. ह्याला आज डबल द्या हो.
अवि उभा राहिला आहे व काय भयंकर आहे. ( ह्याचे वजन वाढले आहे. पोटाचा रोल व मॅन बूब दिसत आहेत. टीशर्ट आडून)
आजी गौरी पण अशीच आहे का चेक कर म्हण ते. अनघा समजूत घालायचा प्रयत्न करते ज्युनिअर जरा शांतपणे विचार करू म्हणते. काल मँगो कलरचा ड्रेस होता आज पिस्ता कलरचा. उद्या बहुतेक स्ट्रॉबेरी!! अभी म्हणतो संजना सायकिक आहे. सायकोटिक हवे ना!! ह्याने नक्कीच पोस्टाने एम्डी केले असावे.

तर कट टू अरू आशू लव्ह नेस्ट. अरु जेवायच्या तयारीत आहे. तर दार ठोठावून मजबूर आशीक भिरभिरत आत येतो व चोर कुठे आहे विचारत घर भर फिरून घेतो. मैने कलीच बोलाथा इन्हे मेसेज लेनेकु खुद भाग के आएगा. मग कळते की फोन वरून मेसेज जाताना थिं ग च्या ऐवजी थीफ गेले आहे. म्हणून तो बाबल्ला व पळत आला. आता त्या चार बर्नर स्टव्ह वर नव्या कुकरची शिट्टी वाजते व चोर शोधक प्रेमी जेवायलाच थांबतो. मैत्रीणीच्या हातचा प्रेमाचा पिठले भात खायला. किती गोड. आंबेमोहोरचा भात लावला आहे.

अरु ला यंत्राची भीती आहे. फोन मूर्ख आहे म्हणे. मेसेज वाचून आशूचा जीव जायची वेळ आली होती म्हणे. हौ क्युट. हे अन्यासंजनाचा अपडेट घेत घेत गॉसिप करत आहेत. धिस इज नॉट डन. त्यांचे प्रश्न तिर्‍हाइतासोबत का डिस्कस करायचे!! त्यांचे कठिण आहे असे अरू म्हणते.

कट टू अन्या बेडरूम : खंग्री मॅन मागून बिझी बिझी बिझी आहे. सं बेड मध्ये बसली आहे टेपा लावुन व तू मला इग्नोअर करून नकोस व अन्या म्हणतो तू मला डिक्टे ट करू नकोस. सर्व तुझीच जबाबदारी आहे असे संजना म्हण्ते. मी काही खे ळ णे नाही किंवा अरू नाही. अन्या लगे च पोलिसांना फोन लावून्देतो. संजना कट करते. इससे तो जेल भली म्हणतो. तुला काय करायचे ते कर. तमाशे नाटकं खोटे पणा. आय अँम फेड अप. तू विक्रुत आहे. प्रेम सिद्ध करायचे आहे म्हणे. नोकरी सक्सेस वर तुझे प्रेम अवलंबून आहे. तू मला फोर्स करत आहे. मी तुझ्या पासून दूरच राही न म्हण्तो. अन्याव उशी सोलापुरी चादर घेउन सोफ्यावर खाली जाउन झोपतो.

कट टू नेक्स्ट डे: अनघ्या व अरू बोलत आहेत. अनघा काउन्सेलर अनुभव शेकर करत आहे. बायका सुद्ध्हा चुकीच्या वागतात. उसासे क्वीन उससत बोलत आहे. दर वेळी पुरुषांची चूक नसते. बाबा तिला खूप बोलतात. हे चुकीचे आहे मग ती इन्सेक्युअर होते. तिची तुझी तुलना सर्व करतत. बाबा बोलले की ति डिस्टर्ब होते. अरु बाई एक विश्लेष ण देत आहेत. चांगले लिहिले आहे.

संजना इन जनरल डिफिक ल्ट टू लिव्ह विथ. तिचे काउसेलैन्ग कर म्हण्ते अरू. संजना एकटी पडलेली आहे. तू बोल तिच्याशी प्रेमाने. अनघाला फ्युचर मध्ये जोडे मिळतील संजना कडून. मग अनघा नवा सेपरेशन बाँब टाकते. खंग्री लगेच संतूर वाली सस्पेन्स ट्युन वाजवतो. अभीउबगला आहे. पण अनघाला घरीच समृद्धीवर राहायचे आहे. अरु ने चूक केली तीच ही करत आहे. बायको चे केआर ए केरात. सुनेचे के आर ए डोक्यावर मग रिव्यु बोंबलेलच ना.

आता इशा छान सर्व कामे करते. अरु तिच्या बद्दल काळ जी वाटते. पण अनघा म्हण ते तुझ्या कडे लक्ष दे व इथे पण भांडी विसळते.
इकडे अप्पा अन्या झोपलेला बघून त्यावर चादर घालतात. तेव्हा एक किलर बासरीची धून इंडियन मॅन ने टाकली आहे. छान आहे. पण त्याने अन्या उठतोच. अवि चहा आणतो. अप्पा अवि अभ्या लवकर उठत आपले आपन चहा पाणी करत आहेत. चहा विचरला की अप्पा नाही म्हणतो.
एक माणू स मागे आलाप देत आहे व अन्या ला आपली चूक समजते. घरच्या लक्ष्मीचा अपमान मी केल्याने हे मला भोगावे लागत आहे अन्या म्हनतो. अप्पा मुलाकडे करूण पणे बघतात. तीन तीन मर्दुए एक औरत को नही संभाल सकते. तिथेच घरात गाडली तर कोण विचारणार आहे!!!

पण मग ती देसी क्राइम स्टोरी होईल!!

प्रोमो मध्ये आशू आरू एका कॅफेत बसले आहेत तिथेच अभी व मित्र बसले आहे त मित्र काहीतरी सुखाचे चां दणे वरून बोलतो तर अभी राडा घालत आहे. आमच्या पासू न लांब राहायचं म्हणतो आशूला. तो कोट हिसकाउन घेउन जाळायला हवा होता निमित्त करून!!

तरी त्या मानबाच्या मसालेवाल्या बाईपेक्षा जरा जास्त कष्ट दिलेत हिला. > हो हो. तिथे ती अचानक ओट्यावर लॅपटॉप ठेवून काम करताना दाखवली होती स्वयंपाक करता करता.

तिथे ती अचानक ओट्यावर लॅपटॉप ठेवून काम करताना दाखवली होती स्वयंपाक करता करता. >>>>> ते तरी ठिक खरतर नाहीच पण आपण उठून शेजाऱ्यांकडे रहायला जाण, भावानेही तिथेच तिथेच येऊन रहाणं हे अतीच झालं होतं. यात किमान अरुला लागलेल्या ठेचा दाखवल्या तरी आहेत. जस की आपल्या नावावर असलेल घर गहाण ठेवून दिराला पैसे देणं तेही इल लीगल मार्गाने, रेंटवर घर बघताना एकट्या बाईकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन वगैरे जरा बऱ्यापैकी realistic दाखवल्या आहेत.

येस..मलाही तेच म्हणायचे आहे, अजनबी...

Happy एपिसोड पाहिला आत्ता..
अनिरुद्ध चा हिरवा शर्ट आणि उशीचा अभ्रा सेम टू सेम...पोपटी कलर....!

तीन तीन मर्दुए एक औरत को नही संभाल सकते. तिथेच घरात गाडली तर कोण विचारणार आहे!!! ..>>>>> सॉरी, हे नाही आवडले . >>>>> सहमत.

सन्जना एक दिवस मेण्टल हॉस्पिटल मध्ये जाणारे हे नक्की. अन्या- अरुचा घटस्फोट झाल्यापासूनच ही वेडयासारखी वागतेय.

आजी गौरी पण अशीच आहे का चेक कर म्हण ते. >>>>>>>>>>>>> तेवढच आजीला निमित्त यशच लग्न मोडण्याच. नाहीतरी हिच्याकडून आपल्याला पतवण्ड मिळणार नाही मग कशाला हवी ही अवदसा आपल्या घरात असा विचार करत असेल कान्ची.

नोकरी सक्सेस वर तुझे प्रेम अवलंबून आहे. >>>>>>>> खुप लवकर कळल हे अन्याला! आम्हाला हे आधीच कळल होत.

हल्ली महाराश्ट्रात प्रति बालाजी,प्रति शिर्डी हे जागोजागी झालेत तस अनघाच आइ-आप्पाची काळजी बघुन वाटल ,.....प्रती अरु.
तरी बर २५ वर्श अखन्ड बोलणे खावुन सतत ह्याच ताटावरुन पाटावर करत असलेल्या आपल्या सासुला एका मिनिटात म्हातारिने बाहेरचा रस्ता धरायला भाग पडले होते हे अनघाने आपल्याच डोळ्याने बघितलले आहे.

तरी बर २५ वर्श अखन्ड बोलणे खावुन सतत ह्याच ताटावरुन पाटावर करत असलेल्या आपल्या सासुला एका मिनिटात म्हातारिने बाहेरचा रस्ता धरायला भाग पडले होते हे अनघाने आपल्याच डोळ्याने बघितलले आहे. >>>>>> ही नाही जाणार. धुळवडीच्या एपिसोडात नै का ऐकवलं होतं तिने. एखादं दिवस भांडी उशीरा घासली गेली, कपडे सावकाश धुतले तर काही बिघडणार नाही. पण मी धुळवड पार्टीला जाणारच अभिबरोबर.

इथे हुलूवर या सिरीजच्या एपिसोड्सची नावे इंग्रजीतून असतात. Aniruddha Deshmukh Returns वगैरे. वाचून एखाद्याला वाटेल की जॉन स्नो सारखा किंवा एखाद्या मोठ्या सिरीज मधे कामगिरीवर गेलेला कोणीतरी परत आला आहे सर्वांना आश्चर्य वगैरेचा धक्का द्यायला. हा बहुधा फक्त दिल्लीला कामाकरता गेलेला परत येतो.

बाय द वे त्या संजनाला व्हॅम्प दाखवून अन्याला अगदी बिचारा ई दाखवतात ते टोटली सिक आहे.

दोन सीन बघितले , मला कधी कधी शंतनु मोघेने ही भूमिका का स्वीकारली असा प्रश्न पडतो, तो कुठेतरी कोपऱ्यात किंवा डायनिंग टेबलवर बसून असतो, बाकी काही करत असेल तर मी नेमकं ते बघितलं नाहीये.

त्याला महत्त्व असलेला ट्रॅक येऊन गेला. त्याच्याचमुळे तर घर - ते विकणं - मालकी - अर्धी मालकी हे प्रश्न , वृत्तपत्रांच्या भाषेत , ऐरणीवर आले.

मालिकेची संजनाने घसरवलेली गाडी पुन्हा अरुंधती - आशुतोष ट्रॅकवर आलेली आहे.

संजना घरी काय ना काय खायला करत असते. आशुतोषपण स्वैपाकाचं एक काम स्वतःचं स्वतः करायचा. त्याला आवडतं. तरी हे लोक सारखे सारखे हॉटेलिंगला जातात. आणि तिथे नेमकं देशमुखांकडचं तिच्या विरुद्ध पार्टीतलं कोणीतरी असतं.

बाय द वे त्या संजनाला व्हॅम्प दाखवून अन्याला अगदी बिचारा ई दाखवतात ते टोटली सिक आहे. >>>>>> अन्याला बिचारा दाखवत नाहीत, तो स्वतःला बिचारा प्रेझेंट करत असतो. त्याला घरात मागेपुढे नाचायला अरूंधती हवी असते जे संजना कडून होणार नाही हे त्याला पक्कं माहीत आहे. बाहेर संजनाच कौतुक करुन, स्वतःच मन रिझवायचं असतं. आपल्या आणि संजनाच्या नात्याबद्दल समजल्यावर अरुंधती फार्फार तर रडेल, भेटेल वगैरे वगैरे असा विचार केला होता पण ती स्वतः पुढाकार घेऊन घटस्फोटा सारखा निर्णय घेईल याची त्याला कल्पना नव्हती. त्यामुळे आता घरच्यांची सिंपथी मिळवणं येवढच त्याच्या हातात राहील आहे.

वाचून एखाद्याला वाटेल की जॉन स्नो सारखा किंवा एखाद्या मोठ्या सिरीज मधे कामगिरीवर गेलेला कोणीतरी परत आला आहे सर्वांना आश्चर्य वगैरेचा धक्का द्यायला. हा बहुधा फक्त दिल्लीला कामाकरता गेलेला परत येतो.
फा .. Lol
अरुंधती ने आता किमान ड्रेस घालायला काय हरकत आहे ?
Happy अमा...चोर शोधक प्रेमी चा प्रसंग फारच भंपक होता..कैच्या कै!! ......इतकं कुणी घाबर्‍या घुबर्‍या येईल का...चोर शोधत...आणि तो चोर तोवर त्या टिचभर घरात तिथेच थांबून रहाणारे होय...? की कधी हा येईल आता मला शोधत .. असे.....!!
केवळ... "अरुंधती केव्हढा घाबरलो मी......तुला काही झाले तर.......!! "............ या डायलॉग साठी..काहीही प्रसंग खरडायचे...!!

असं काही म्हणून नका हं. पटकथा -संवाद लेखिकाताईंना राग येतो.

ते पिंट्या प्रकरण पण किती ओढून ताणून. डॉक्टर पण नमुना होता. डॉक्टरने शर्ट इन केलेला नव्हता. त्याच्याकडे असिस्टंट नाहीत. एकखांबी तंबू. पेशंटपण नसावेत. तयारी करतो म्हणाला.

अभिबाळाच्या हाताखाली तीनचार शिकाऊ भूल तज्ज्ञ येणार आहेत. आणि हा फक्त याच हॉस्पिटलला अ‍ॅटॅच राहणार आहे.

ते हॉस्पिटल कमी नर्सिंग होम जास्त होतं. मल्टिस्पेशलिटी वाटत नव्हतं. आता अचानक वडाला खूप पारंब्या फुटल्या?

लेखिकेच्या डोक्यात चार डब्बे आहेत. कौतूक +संस्कृती+निरागसता+ पावित्र्एक+ जुन्या परंपरा +एकत्र कुटुंब हा एक

इंग्रजी+करीअर्+ आर्थिक स्वावलंबन+ बाहेर काम करणे+ लफडेबाज + ड्रेस घालणे+ मेक अप करणे हा दुसरा

तरुण मुले+ प्रेम व्यक्त करणे+ रिलेशन शिप इशूज हा तिसरा

म्हातारे लोक त्यांच्या गरजा हा चौथा.

सर्व संवाद ह्या नाहीतर त्या डब्यातून चिंधी उचलून लिहिते ती.

अमा अगदी... Happy
भरत.. हो हो... Happy ते पिंट्या प्रकरण फारच ओढून ताणून....... अ ती च ... मला जराही हसायला येईना.....उलट त्या बावळट आशुतोष बद्दल अगदी तीळपापड होत होता..... काही.... इतके क्लोज डॉ आहेत तर माहिती नाही का ह्या घोड्याचे अजून लग्न नाही झालेले ते...? पिंट्या म्हणे.........!! :रागः

अमा, चार डबे भारी. दुसऱ्या डब्यात 'आधुनिक नाव' हेही घाला. म्हणजे संजना, मोनिका, शनाया इत्यादी आणि पहिल्या डब्यात जुनं/सोज्वळ नाव. अरुंधती, अनुराधा इत्यादी.

त्याला महत्त्व असलेला ट्रॅक येऊन गेला. त्याच्याचमुळे तर घर - ते विकणं - मालकी - अर्धी मालकी हे प्रश्न , वृत्तपत्रांच्या भाषेत , ऐरणीवर आले. >>> अच्छा. दुसऱ्या कुठल्या सिरियलमध्ये रोल करत असेल बाकीच्या लोकांसारखा आणि इथे असं असेल तर ठीक पण आता फार महत्वाचा रोल दिसत नाहीये इथे.

चोर शोधक प्रेमी चा प्रसंग फारच भंपक होता..कैच्या कै!! >>> हो टोटल विनोदी होता तो सीन.

यांचे लॉजिक म्हणजे शनाया, मायरा, संजना वगैरे नावे असलेल्या व मॉडर्न कपडे घालणार्‍या स्त्रिया वाईट असतात. लफडेबाज असतात. त्या एकदम इनोसंट वगैरे नवर्‍यावर डोरे वगैरे डालतात. या सगळ्या प्रोसेस मधे त्या नवर्‍याची इक्वल चूक आहे हे यांच्या कथेत ठळकपणे दिसत नाही.

मागे लिहीले होते तसे अशा मुलींबद्दलची आधीच्या जनरेशनची मते, सून किंवा कोणीतरी अशी मुलगी आपला मुलगा व घर हडप करेल असली कसली तरी भीती. मुलाचे किंवा चांगल्या मुलीचे करीयरमधले यश - यातली डीटेल माहिती नसलेले त्याबद्द्ल लोक अचाट कल्पना करतात तशाच व तितक्याच ढोबळ पध्दतीने सिरीज मधे दाखवत त्यांच्या स्टीरीओटाइप्स चे खुंटे आणखी बळकट करतात हे लोक.

मी गेले १५-२० भागच पाहिलेत आणि एकूण असे दिसते की अन्या संजानाच्या प्रेमात पडला व त्यामुळे त्याचा व अरूंधतीचा घटस्फोट झाला. पण चित्रीकरण असे की संजनाच काय ती चूक आहे. अन्या स्क्रीनवर आला की एकदम काय बिचारा त्रास सहन करतोय असे वातावरण असते व अप्पा वगैरेंचे चेहरेही तसेच दाखवतात. ते पांघरूण घालणे वगैरे प्रतीक होते की काय अशी मला शंका आली Happy

नाही. आधीच्या भागांत दोघांनाही सारखंच दोषी दाखवलंय. रादर अनिरुद्धला जास्त. अनिरुद्धला संजनासोबत अफेअर आणि अरुंधतीसोबत संसार दोन्ही एकावेळी चालू ठेवायचं असतं. त्याला अरुंधतीपासून घटस्फोट आणि संजनाशी लग्न दोन्ही नको असतं. आणि हे त्याने अनेक वेळा सांगितलं आहे. तिच्याशी लग्नाच्या वेळी तो येतच नाही. मग अरुंधतीच त्याला समजावते.
संजनाला आपली लफडेबाज अशी इमेज झालेली चालणार नाही, म्हणून तिला अनिरुद्धशी लग्न हवंच होतं.
त्यावेळी ती बिचारी वाटत असे. घटस्फोट मिळवण्यासाठी तिने स्वतःचं घर नवर्‍याला दिलं.

लग्नानंतर तिला कुटुंबातली अरुंधतीची जागाही हवी झाली , ती मिळेना. आणि काही काळाने अरुंधती कमवती झाली तर हिची नोकरी गेली. त्यामुळे अरुंधतीबद्दल आणखीनच मत्सर.

मागे एकदा अरु म्हणते ना तिला, काय करून घेतलं आहेस स्वत:चे, तरी ती सुधारली नाही अजून, फक्त अरुची जागा वगैरे घ्यायची आहे तिला.

अंजू, मोघेला घरी बसून राहण्यापेक्षा सेटवर येऊन बसलेले जास्त परवडेल, पैसे तरी मिळतील त्याचे. शिवाजीच्या भूमिकेनंतर तो मराठीत तरी कुठे दिसला नाही. हिंदी करत असेल तर माहित नाही.
डोळ्याचे डॉक्टर आधी मिसळ विकायचे शुभमंगल ऑनलाईन मध्ये. तिथेही हाच अवतार असायचा आणि एकहाती तंबू. मिसळ हॉटेल तर अगदीच कळकट होते त्यामानाने कालचे हॉस्पिटल तरी बरे होते. पिंट्याची आई त्याच डॉ कडे जाते तर पिंट्या आता मोठा झालाय आणि अरु त्याची बायको नाही हे माहिती असायला पाहिजे. किती मोठा तो प्रसंग. अभिचे मित्र असे अचकट विचकट बोलणारे असतात म्हणजे तो नक्की डॉच आहे ना. यश आणि अभि दोघे गुंड आहेत. अरुंधती जेव्हा जेव्हा हॉटेलात जाते तेव्हा तिला घरचे भेटतातच. एकदा ईशा, मग अन्या, आता अभि. हाय रे दैवा, एक सँडविच काही तिला सुखाने खाता येत नाही.

आधीच्या भागांत दोघांनाही सारखंच दोषी दाखवलंय. >>> ओके. ते भाग पाहिलेले नाहीत त्यामुळे मला माहीत नव्हते.

अंजू, मोघेला घरी बसून राहण्यापेक्षा सेटवर येऊन बसलेले जास्त परवडेल, पैसे तरी मिळतील त्याचे. >>> हम्म, खरं आहे. चांगला अॅक्टर आहे, भूमिका मिळायला हव्यात.

तो पिंट्याचा ट्रॅक 'सिंघम' मधे सचिन खेडकर ला चिडवतात तसाच आहे अगदी.

त्या अभिचा सीन फारच विनोदी होता. असे कोणी थेट एखाद्याच्या आईबद्दल समोर बोलत नाहीत. फार फार तर तो समोर नसताना बोलतील. तरी हे डॉक्टर मित्र ना? तोपर्यंत भाजपचे समर्थक गप्पा मारत आहेत असे वाटणारा ग्रूप, पण या संवादानंतर तो अभि एकदम शिवसेनेचा कार्यकर्ता होतो Happy भरपूर मीम्स होतील त्या सीनवर Happy

पण त्या अभिला निदान एक सीन मिळाला. एरव्ही प्रतिक्रियांशिवाय काही हाती लागत नसेल. गरजेपेक्षा खूप पात्रे भरली आहेत स्क्रिप्ट मधे. एखाद्या फोफावलेल्या कॉर्पोरेट कंपनी सारखी.

मिलिंद गवळी त्याच्या वडिलांना सेटवर घेऊन गेला होता. बरोबर अरविंद वैद्य होते (अनुपमाचे वडील). दोघेही ८०+ आहेत. गूगल फिडवर वाचले.

Pages