माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.
पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या वय वर्षे ४७-४८ म्हणजे २-३ वर्षात रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपार्ट्यांत पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याने मला एवढेच सांगितले की त्याची शेयर आणि म्यूचूअल फंड मध्ये साधारण २५ लाख गुंतवणूक आहे आणि येत्या २-३ वर्षात शेअर मधील गुंतवणूक सोडून टोटल १ करोड होतील (राहत्या घराची किंमत सोडून....दुसरे घर नाही) त्यानंतर रिटायरमेंट चा प्लॅन आहे. त्याचे गणित असे की १ करोड वर येण्याऱ्या ६०-७०% व्याजावर घरखर्च चालवायचा आणि ३०-४०% सेव्ह करायचे आणि गुंतवायचे. शेयर आणि फंड मधील गुंतवणूक ही पुढील अनेक वर्षे तशीच ठेवायचा मानस आहे आणि अगदीच वेळ अली तर emergency म्हणून वापरायची.
त्याच्या म्हणण्यानुसार शेयर मधील गुंतवणूक आणि १ करोड रुपये उरलेले आयुष्य त्यांच्या जीवनशैलीनुसार जगण्यासाठी त्याला आणि पत्नीला पुरतील. पुढे काही वर्षांनी वडिलोपार्जित संपत्ती देखील मिळू शकते परंतु टी तो यामध्ये पकडत नाही. कदाचित आई वडील वयोवृद्ध असल्यामुळे पुढे ती संपत्ती त्यांच्या मेडिकल साठी लागू शकते असा विचार असावा. मला ते फारसे पटले नाही. वाढलेली life expectancy पाहता साधायची रक्कम अजून ४५ वर्षे (९०-९२ वर्षे जगेल असे धरून चालू) पुरणे अवघड वाटते. महागाई दर, कमी झालेल्या ठेवीवरील किमती, आणि प्रामुख्याने उतारवयात होणार मेडिकल चा खर्च पाहता पैसे पुरवणे सोप्पे नाही. परंतु त्याचे म्हणणे असे आहे की महागाई दार जरी वाढत असला तरी त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल त्यामुळे आयुष्याच्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी आणि जीवनशैलीसाठी ते पुरेसे आहेत. मेडिकल खर्चाचा माझा मुद्दा त्याला पटला परंतु व्याजातून मिळणाऱ्या पैशात होणारी बचत आणि शेयर आणि म्यूचूअल फंड मधील पैसा (जो लॉन्ग टर्म मध्ये वाढत जाईल) पाहता फार चिंता करायची गरज नाही. मी त्याला financial planner कडे जाण्याचा सल्ला दिला परंतु त्याला त्याची गरज वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते? १ कोटी आणि वरील काही असलेली रक्कम काय पुरेशी राहील? नसल्यास दोघांसाठी किती रक्कम लागेल?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे आणि जसेजसे पैसे साठत जातील तसा रिटायरमेंट चा विचार अधिकच प्रबळ होत जाईल एवढे नक्की. त्यामुळे चर्चा पॆसा पुरेल का आणि नसल्यास किती लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.
घेतली का निवृत्ती?
घेतली का निवृत्ती?
कोव्हिडचा निर्णय घेण्यात काही हात होता का?
हया प्रश्नाला उत्तर नाही .
हया प्रश्नाला उत्तर नाही .
आयुष्यात कोणत्या प्रसंगी काय घडेल हे सांगता येत नाही .माझ्या कडे दोन कोटी आहेत म्हणजे माझे आयुष्य सुखात जाईल असे पण ठाम म्हणता येणार नाही.आणि मला महिन्याला दहा हजार च मिळतील इतकीच माझी ताकत आहे म्हणजे माझे आयुष्य दुःखात जाईल असे पण नाही.
आर्थिक बाजू जशी प्रबळ असावी हे गरजेचे असतें त्या पेक्षा जास्त तुमचे आरोग्य किती चांगले आहे हे जास्त महत्वाचे आहे.
वयाच्या किती वर्षा पर्यंत तुम्ही निरोगी राहता हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे.
आरोग्य हीच संपत्ती हे वाक्य अतिशय योग्य आहे.
आरोग्य ठीक नसेल तर फक्त डॉक्टर चा खर्च वाढतो असे नाही.
तुम्ही शारीरिक हालचाली करू शकत नाही.तुम्ही कोणतेही अन्न खावू शकत नाही .तुम्ही रोज ची दैनंदिन काम करू शकत नाही.
तुमचे मन प्रसन्न राहू शकत नाही..
थोडक्यात उर्वरित आयुष्य जाईल ह्या विषयी आपण काहीच ठरवू शकतं नाही.
त्याच्या उलट आठ दहा हजार महिन्याला येत असतील आणि शरीर अतिशय उत्तम असेल तर त्यांचे जीवन सुखात जावू शकते.
असे पण माणसाच्या खऱ्या गरजा
असे पण माणसाच्या खऱ्या गरजा खूप कमी असतात.अन्न चांगल्या दर्जा चे .
ह्या मध्ये आइस क्रीम,पिझ्झा,नुडल्स,इत्यादी येत नाही .
हे दर्जेदार अन्न नाही
ज्वारी ची भाकरी,विविध कड धान्य, पाले भाज्या,दूध,अंडी आणि कधी तरी मांस,मासे .
ह्या अन्न साठी दीन माणसाला किती खर्च येईल.?
एक वाहन असावे गरजेचे आहे.
मग ते दोन चाकी असेल तरी चालेल .
राहायला घर असावे
पाणी,वीज,संडास,टीव्ही,एसी (नसेल तरी चालेल).
ह्याचा किती खरच येईल.
आणि मोबाईल ,इंटरनेट.
संपल्या गरजा .
माझ्या आई चे वय ८३ वर्ष आहे .
वार्षिक ५००० पण तिचा औषध ,डॉक्टर ह्या वर खर्च नाही.
सर्वात अनिश्चित बाब म्हणजे आरोग्य च्या समस्या.
उद्या चा फक्त विचार करून आज
उद्या चा फक्त विचार करून आज चा दिवस खराब करू नका
पूर्ण विराम एकदोन तासात पण जीवनाचा येवू शकतो.
उद्या कदाचित आपण अस्तित्वात च नसू.
उद्या चा फक्त विचार करून आज
उद्या चा फक्त विचार करून आज चा दिवस खराब करू नका
>>> मै कल की चिंता नही करता... उतनें पैसे है मेरे पास .. मेरी फटी पडी है परसो को लेकर ...
आपण आपल्या बरोबर प्रॉपर्टी पण
आपण आपल्या बरोबर प्रॉपर्टी पण माझी च राहिली पाहिजे .
Property म्हणजे जमीन,जागा,फ्लॅट.
हे जागेवर च असतात फक्त मालक बदलत असतात.
आपण ही प्रॉपर्टी मुलांना पण राहिली पाहिजे आपलीच राहिली पाहिजे असा विचार करत असतो.
त्या मुळे प्रश्न अवघड होतात..
पहिली मुल आई वडिलांची जबाबदारी घेत ,कुटुंब एकत्र होती.घरात तरुण माणसं असायची.
आता स्थिती बदलली आहे .
मुल आणि आई वडील वेगळे जीवन जगतात.
त्या मुळे आपण पण बदलायला हवं.
समजा २० लाख तुमच्या कडे आहेत.
आणि वय ५० वर्ष आहे.
योग्य गुंतवणूक केली तर ९% व्याज विविध प्रकार मध्ये गुंतवणूक करून मिळू शकतात.
20 लाखाचे व्याज येईल
15000 हजार व्याज महिन्याला मिळू शकते.
दोन माणसं सामान्य जीवन इतक्या पैशात जगू शकतील.
जो पर्यंत 15000 महिना पुरतील तो पर्यंत ह्या मध्ये दहा वर्ष निघून जातील .
वय होईल 60 वर्ष..नंतर वार्षिक 300000 खर्च करायचे वय झालेलं असणार बाकी खर्च वाढेल..
म्हणजे महिना 25000.
ह्या मध्ये जवळ जवळ सहा वर्ष जातील .
वय होईल 66.
जास्तीत जास्त 80 वर्ष वय आहे आता.
राहिले फक्त 14 वर्ष.
प्रत्येकाचे घर तर असतेच .
ते विकले तर 50 ते 70 लाख आरामात मिळतील.पुढील 14 वर्ष सहज जातील.
आहे काय आणि नाही काय.
80 chya पुढे जिंवत राहण्याची शक्यता .0.1 % पण नाही.उगाच आशा धरू नये.
घर विकून रहाणार कुठे ?
घर विकून रहाणार कुठे ?
15,000 रुपये महिन्याच्या
15,000 रुपये महिन्याच्या पेट्रोल ला पण पुरत नाहीत. आणि गरीब होऊन गरजा कमी करून जगण्यात स्वारस्य नाही.
80 chya पुढे जिंवत राहण्याची
80 chya पुढे जिंवत राहण्याची शक्यता .0.1 % पण नाही.उगाच आशा धरू नये>>>
कशावरुन? माझ्या ओळखीत एकजण नुकतेच गेले, ते १०६ वर्षांचे होते. माझी आजी गेल्या वर्षी गेली, ती ८९ वर्षांची होती. माझ्या सासुबाईही तेवढ्याच होऊन गेल्या. ही हल्लीची ऊदाहरणे.
वर ज्यांनी प्रतिसाद दिलेत ते ८० पर्यंत पोचायला ३० ते ५० वर्षे लागतिल. अजून ३०-५० वर्षांनी काय होणार हे आताच कसे सांगता येईल?
वार्षिक जास्त खर्च म्हणून 4
वार्षिक जास्त खर्च म्हणून 4 लाख खर्च झाले तरी राहिलेल्या 56 लाख वर वार्षिक 5 टक्के नी पण 23000 हजार महिन्याला व्याज येईल ..
कुठे ही दहा एक हजार भाड्या नी दोन माणसांना राहण्या लायक घर मिळेल.
पैसे फिरत राहतील संपणार नाहीत.
जे 106 वर्ष किंवा 89 वर्ष
जे 106 वर्ष किंवा 89 वर्ष जगले आहेत ते कुटुंब बा सोबत 100% राहतं असतील.
त्या शिवाय इतके वर्ष जगू शकतं नाहीत.
वृध्द काळात मानसिक स्वस्थ खूप गरजेचे असते,आधार खूप गरजे चा असतो.
काळजी घेणारी माणसं आजु बाजू ल असणे गरजेचे असते.
हे सर्व नसेल तर इतकी वर्ष जगणे अशक्य आहे.
शासनाचे वृद्ध निवारा आश्रम
शासनाचे वृद्ध निवारा आश्रम आवास विथ भोजन दवादारू नाही का?
शासन, असेल किंवा कोणती ही
शासन, असेल किंवा कोणती ही संस्था हे वृध्द लोकांसाठी सुविधा निर्माण करत असतील तरी तो एक धंदा म्हणून असेल.
शासन कारभार किंवा संस्थेचे कारभार म्हणजे भ्रष्ट व्यवस्था हे समीकरण तर असणार च .
हा भारत आहे.
धागा जुना झाला आहे. नवीन काढा
धागा जुना झाला आहे. नवीन काढा.
आर्थिक उलाढाल धागे दरवर्षी एक मेला ( मे महिन्यात ) नवीन काढावेत. पर्यटनाचे मार्च आणि सेप्टेंबरला.
Imagination, there is no
Imagination, there is no inflation
Come on middle ages let's opt VRS
ah ah ah yeah
जे 106 वर्ष किंवा 89 वर्ष
जे 106 वर्ष किंवा 89 वर्ष जगले आहेत ते कुटुंब बा सोबत 100% राहतं असतील.
त्या शिवाय इतके वर्ष जगू शकतं नाहीत.
वृध्द काळात मानसिक स्वस्थ खूप गरजेचे असते,आधार खूप गरजे चा असतो.>>>>>
सगळी गृहितके आहेत. गावात हल्लिच एक बाई वर गेली. ९० पर्यन्त सहज होती. तोन्डात एक दात नाही की डोक्यावर एक केस नाही. सुनेने घराबाहेर काढुन कित्येक वर्षे झाली होती, मुलाने नेहमीसारखे मौनम सर्वार्थसाधनम मन्त्र जपला होता. त्यान्ची दोन होटेले आहेत गावात आणि आई लोकानी घातलेल्या अन्नावर जगत होती कित्येक वर्षे.
ही बाई मिळेल ते काहीही काम करुन रोजची भाकरी मिळवायची. तान्दुळ निवडुन दे, मिरच्या साफ करुन दे, गोधड्याना टाके घालुन दे, लहान मुलाला घेउन बस दिवसभर... आधीची १५ वर्षान्पर्यन्त जड कामे करतानाही पाहिले होते पण आता झेपत नाही म्हणुन असली हलकी कामे करायची. कुठलेही काम वर्ज्य नव्हते, दिलेले काहीही खात होती. इतकी हालात दिवस काढते, हिला देव नेत का नाही असे इतर लोक तोन्डावर बोलायचे पण हिला मात्र मी कायम हसतमुख पाहिले. शेवटी देवालाच दया आली असावी.
दीर्घायुषी सगळेच चान्गल्या घरातील असतात असे नाही. रस्त्यावरही अगदी खन्गलेले म्हातारे दिसतात.
या धाग्यात म्हटलेय तसे योग्य वयात योग्य गुन्तवणुक करुन आर्थिक स्वातन्त्र्य मिळवायचे आणि नन्तरचे आयुष्य मजेत घालवुन शेवटी चान्गल्या वृद्धाश्रमात जाउन राहायचे. आपली काळजी केवळ आपल्या रक्ताचीच माणसे घेउ शकतात (त्यात मुलगा असला तर गन्गेत घोडे), ती त्यान्नीच घेतली तरच आपण सुखी व आनन्दी राहु शकतो हा भ्रम डोक्यातुन काढुन टाकता येणे जमवले पाहिजे. हट्टाने ह्या भ्रमात राहुन स्वतःची शेवटची वर्षे कल्पित दु:खात घालवणारे वृद्धही पाहिले आहेत.
साधना मॅडम .
साधना मॅडम .
माझे मत तुम्ही समजला नाही.
आपण जी संपत्ती निर्माण केली आहे ती आपण मरे पर्यंत आपल्या गरजा भागवू शकते
मुलगा असो किंवा मुलगी लग्न झाले की . त्याचे वर्तन बघायचे.
योग्य नसेल तर सरळ घरा बाहेर काढायचे.
आपण स्वतः कमवलेली संपत्ती आपलीच असते .
त्या वर कोणाचा हक्क नाही.
मुलांचा पण नाही.
भारतात खूप गरीब लोक आहेत ज्यांना दोन वेळ चे जेवण मिळत नाही.
आपण कमावलेली संपत्ती मुलांना बिलकुल द्यायची नाही.
तेव्हा आपण ६० वर्ष वयाच्या आत असतो.
नालायक मुल असतील तर तेव्हाच हा निर्णय घ्यायचा
आता ची पिढी आहे त्यांच्या कडे स्थावर मालमत्ता सह कॅश मध्ये दोन ते तीन कोटी सहज आहेत .
देशात अनेक गरीब आहेत त्यांना लालाच दिली तरी ते स्वतःच्या मुला पेक्षा जास्त काळजी घेतील.
ह्या स्वार्थ नी की वीस तीस वर्षात आपण करोड पती होवू.
काही गरज नाही वृध्द आश्रम ची.
पुत्र प्रेम,मुलगी प्रेम सोडून ध्या ५० ओलांडली की.
देशात अनेक गरीब आहेत त्यांना
देशात अनेक गरीब आहेत त्यांना लालाच दिली तरी ते स्वतःच्या मुला पेक्षा जास्त काळजी घेतील.>> हा गोड गैरसमज आहे. हे गरीब दोन मिनि टात तुमचा वध करून पैसे घेउन पळून जातील. तुम्ही त्यांच्या साठी फक्त एक रिसोर्स असता. निदान दूर ठेवतील पण पैसे भरतील. मुलांच्या पण लिमिटेशन्स समजून घेउन वागले पाहिजे ज्येना नी.
समय की धारा हमेशा आगे ही बहती है. आपला रोल संपला आता सर्व पुढे जाउ द्यावे.
मृत्यू हा शेवट असतो.त्या नंतर
मृत्यू हा शेवट असतो.त्या नंतर काही नाही .आपण निर्माण केलेली संपती च उपभोग आपण च घेतला पाहिजे .
वृद्ध आश्रम हा पर्याय असू शकतं नाही.
जास्त संपत्ती असेल तर अनेक सम वयस्क लोकांस एकत्र करून .आपल्याच घरात नोकर चाकर येवून आरामात जगत्ता येईल.
मुल नालायक निघाली की खूप कठोर व्हा एक रुपया पण त्यांना मिळत कामा नये.
सर्व वृध्द पणाचे प्रश्न आरामात मिटतील.
काही नी दोन कोटी ची संपत्ती जमा केली असेल काही ५०० ते १०००, कोटी चे पण मालक असतील.
जगातील सर्व सुख मरे पर्यंत पायाशी असतील.
फक्त काही काळानंतर संतती प्रेम सोडून ध्या.
आपली इस्टेट आपल्याच पोरांना
आपली इस्टेट आपल्याच पोरांना द्यावी
मरणासन्न बापाला सोडून 14 वर्षे वनवासात भटकले , 35 वर्षे आईला सोडून हिमालयात फिरले , तरी इस्टेटीचे मालक आपल्या मुलांनाच ठेवावे
मुलावर जास्त अवलंबून राहू नये
100 रु रिक्षाचे दिले की दवाखान्यात जाता येते तर जावे , उगाच पोरगा श्रावण बाळ नाही म्हणून त्याची रोजची कमाई बुडवून येण्याची अपेक्षा करू नये , हल्ली जॉबची शाश्वती नाही, त्यांना बिचार्याना काम करू द्यावे
शिवगामीने इस्टेट दुसर्याला दिली म्हणून भल्लाळदेवने राष्ट्रमाता शिवगामीच्या पाठीत बाण मारला
गांधीजींनी 55 कोटी पाकिस्तानला जाहीर केले असा संशय धरून ( प्रत्यक्ष कुणी दिलेही नाहीत) नथुराम गोडसेने राष्ट्रपिता गांधीजींच्या छातीत गोळ्या मारल्या.
तुम्ही तुमच्या आईबापाची सेवा नसेल केली कारण ते आजारीच पडले नसतील, तुम्ही आजारी पडले तर तुमचा दोष की पोरांचा दोष ?
अपने बच्चे के बारे मे सोचो शिवगामी
हा मुक्तीचा मूलमंत्र आहे , जे यातून भरकटतात ते अखेर सर्वांचे वाटोळे करतात
आपण कमावलेली संपत्ती फक्त आपण
आपण कमावलेली संपत्ती फक्त आपण च वापरावी.
मुलांना शिक्षण देवून त्यांच्या पायावर उभे केले की जबाबदारी संपली.
उद्या बिल गेट,अंबानी, आणि जगातील अनंत श्रीमंत लोक वयस्कर झाले आणि त्यांनी फक्त असे जाहीर केले .माझी सर्व संपत्ती माझी मरे पर्यंत जो सेवा करेल त्यालाच मिळेल.
सून आणि मुलगा पाहिले हजर असतील.
त्यांना गर्व असेल तर लाखो लोक तयार होतील.
हल्ली जॉबची शाश्वती नाही,
हल्ली जॉबची शाश्वती नाही, त्यांना बिचार्याना काम करू द्याव
ब्लॅक कॅट.
आई वडील ह्यांचा सांभाळ ही समस्या अती गरीब आणि अती श्रीमंत आर्थिक वर्गातील नाही.
आई वडिलांच्या संपत्ती वर च या उच्च शिक्षण घेवून महिना पाच दहा लाख कमावणाऱ्या नोकरदार वर्गाची ही समस्या आहे.
आणि मध्यम आर्थिक गटातील समाज हा स्वार्थी वृत्ती साठी प्रसिद्ध आहे.
त्या साठी मी सांगितला तोच मार्ग योग्य आहे.आपण कमावलेली संपत्तीचा पूर्ण उपभोग आपण च घेणे.
मुलांना बिलकुल न देणे
आरामात आयुष्य निघून जाईल.
कॅटरीना कैफने पण जाहीर केले
कॅटरीना कैफने पण जाहीर केले कि जो माझी सेवा करेल त्यालाच मी
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
माझ्या चित्रपटांचे फ्री पासेस देईन तर?
एक एप्रिल २०२२ नवा धागा काढा
एक एप्रिल २०२२ नवा धागा काढा.
।। म्हातारपणाची तजवीज
कुणावर किती विश्वास ठेवावा।।
१) एकदम पैसे दिसले की मुलांना धंध्याच्या योजना सुचतात. पैसे पीपीएफ'मध्ये ठेवावे. जेवढी मर्यादा आहे तेवढे भरत राहावेत. आवक बंद झाली की पाचशे रु भरून योजना चालू ठेवावी. दरवर्षीचे व्याज काढून खर्च करावे. मुद्दल तसेच. "मी गेल्यावर काय धंधा करायचा तो करा."
सेविंगची एक योजना सांगितली. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात.
Srd
Srd
बरोबर.
Pf,कमावलेली सर्व संपत्ती घर,saving, विविध गुंतवणूक ह्याला मालक पण आपण च आणि वारस पण आपणच.
मुलांना पण मदत करायला हवी.
मुलांना पण मदत करायला हवी. आपण जन्म दिला त्यांना उभं नको का करायला? त्यांनी आपल्याला बघावं म्हणून जन्म देत नाही आपण. पण त्यांना उभं करण्याची जबाबदारी आपली असायला हवी ना पालक म्हणून? नाहीतर मग आम्हाला जन्माला का घातलं असं मुलांनी विचारलं तर उत्तर काय?
पण त्यांना उभं करण्याची
पण त्यांना उभं करण्याची जबाबदारी आपली असायला हवी ना पालक म्हणून?
मनुष्यप्राणी बरीच वर्षे मुलांना शारीरिक आणि मानसिक बळ देतो. सोळा वर्षे . पण धंधा काढून देणे हे फार झालं.
आईवडिलांनी एका मर्यादेपर्यंत
आईवडिलांनी एका मर्यादेपर्यंत शिक्षण दिलं की पुढचं मुलांनी स्वतःच्या हिंमतीवर करावं. शैक्षणिक कर्ज काढावं. आईवडिलांकडून पैसे घेतले तर ते कर्ज समजून परत करावेत.
>>उभं नको का करायला? >> हो.
>>उभं नको का करायला? >> हो. उभं रहायला शिकवलंच पाहिजे. पांगळं मात्र करू नये.
एका मर्यादेपर्यंत शिक्षण दिलं की पुढचं मुलांनी स्वतःच्या हिंमतीवर करावं. >> +१
भारतीय पालक इतके डोळस व
भारतीय पालक इतके डोळस व समन्जस होईपर्यन्त पुढचे शतक उजाडेल असे वाटते.
Pages