Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कंगना आली त्या फ्लाईटमध्ये
कंगना आली त्या फ्लाईटमध्ये रिपोर्टर्सनी घातलेला गोंधळ पाहून DGCA ने एअरलाईन्सनाच तंबी दिली आहे.
LIC किंवा सरकारी संस्था खाजगी
LIC किंवा सरकारी संस्था खाजगी करण करणे योग्य नाही. मग east india company सारखे परत इंग्रज यायचे.पण 49% वर शेअर विकणे शक्यच नाही कुठल्याच सरकारला. नक्की कारण काय हे कळू शकेन का.सरकार खरंच अडचणीत आहे.हे नक्की.त्यात चीन ने आतून बाहेरून बेजार केलंय.
सरकार अडचणीत आहे हे कोणी
सरकार अडचणीत आहे हे कोणी सांगितले ?
जोपर्यंत खाजगिकरणाला विरोध
जोपर्यंत खाजगिकरणाला विरोध असणाऱ्या लोकांना सर्व खाजगी सेवा वापरायला बंदी येत नाही तोपर्यन्त काही अर्थ नाही. तुम्ही करोना झाला की खाजगी हॉस्पिटल मध्ये जाणार , रोज जिओ वापरणार, फेसबुक मायबोली अशा खाजगी वेबसाईटवर येणार , अमेझॉन प्राईम वापरणार- मग खाजगिकरणाला विरोध पण करणार. विनोदच आहे.
नक्की काय म्हणायचे आहे.?
नक्की काय म्हणायचे आहे.?
व्हॉट्स अप वरचे सुमार ज्ञान इकडे का ढकलत आहात
आमचा करोना सरकारी दवाखान्यात
आमचा करोना सरकारी दवाखान्यात 40 रु त बरा झाला
सरकारी सेवा ,संस्था ठरवून
सरकारी सेवा ,संस्था ठरवून अडचणीत आणणारे आणि त्या बंद पाडणारी मंडळी आहेत म्हणूनच उद्योग पती ना त्या पण पसंतीच्या .
लूट करायला मोकळे रान दिले जात आहे.
खेड्यापाड्यात st पोचलो खासगी बस वाले तिकडे जाणार नाहीत.
सरकारी दवाखान्यात फुकट किंवा अत्यंत कमी पैशात उपचार होतात,
खासगी मध्ये साधा खोकला आला तरी 10 हजार बिल करतात.
खासगी न्यूज चॅनल कसे गुण उधळत आहेत ते दिसतच आहे.
रेल्वे जी गरिबांसाठी आणि माल वाहतूक करण्यासाठी योग्य दरात सेवा देत आहे तिचे खासगी कारण केले की अडवणूक आणि मनमानी भाडेवाढ होणारच.
खासगी बँका लोकांचे पैसे जमा करून बँकेला ताळे लागलेली प्रकरण अनेक आहेत.
सरकारी बँकेतच लोक पैसे ठेवतात.
खासगी उद्योगात कामगारांचे शोषण केले जाते नाम मात्र पगारावर राबवून घेवून भरमसाठ काम करून घेतले जाते.
डॉक्टर होण्यासाठी खासगी कॉलेज मध्ये 1 करोड जातात तेच सरकारी कॉलेज मध्ये काही लाखात होते.
एकवेळ 1800 रु वाल्या बाईला
एकवेळ 1800 रु वाल्या बाईला समजावून सांगता येईल,
पण भक्ताडांना हे सांगूनही कधीही समजणार नाही
खाजगिकरणाला विरोध असेल तर
खाजगिकरणाला विरोध असेल तर मायबोलीवर का लिहिता? ती सरकारी साईट तर नाही ना!
अवांतर१:-
अवांतर१:-
खाजगीकरण करण्याला विरोध नाही पण ते ज्या पद्धतीने केले जात आहे ते चुकीचे आहे.
जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून सरकारला जास्त हिस्सा जे देतील त्यांनाच लिलावात प्राधान्य दिले जाते.
मग या कंपन्या लगेच तयार होतात,पण हे अधिकचे उत्पन्न ते लोकांवर अधिक खर्चाचा भार पाडून गोळा करतात.
(उदा. विमानतळाचे खाजगीकरण केल्यानंतर जास्त उत्पन्न मिळवून देण्याच्या नावाखाली सर्व सेवांचा खर्च वाढवून ग्राहकांची लूट केली जात आहे)
असे न करता जे मर्यादित खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देतील त्यांना लिलावात प्राधान्य देण्यात यावे.
धग त्यांच्या पर्यंत पोचलो की
धग त्यांच्या पर्यंत पोचलो की ते पण खाडकन जागे होतील थोडा वेळ लागेल.
आताच बरेच हिंदुत्व प्रेमी,राष्ट्रप्रेमी,असलेले आणि नोकऱ्या गेलेले,उद्योग बुडालेले झोपेतून जागे झाले आहेत .
आणि त्यांना चूक लक्षात आली आहे.
हेच सरकार राहिले तर राम मंदिर समोर बसून भिक मागावी लागेल ह्याची जाणीव त्यांना झाली आहे.(तिथे पण आवडीचाच भिकारी बसवतील)
अवांतर२:-
अवांतर२:-
जोपर्यंत खाजगिकरणाला विरोध असणाऱ्या लोकांना सर्व खाजगी सेवा वापरायला बंदी येत नाही तोपर्यन्त काही अर्थ नाही.
>>>
म्हणजे हुकुमशाहीच की.
[[[तुम्ही करोना झाला की खाजगी हॉस्पिटल मध्ये जाणार , रोज जिओ वापरणार, फेसबुक मायबोली अशा खाजगी वेबसाईटवर येणार , अमेझॉन प्राईम वापरणार- मग खाजगिकरणाला विरोध पण करणार]]]
>>>
सरसकटीकरण.
सरकारी सेवा वापरणारे खाजगीकरणाला विरोध करू शकत नाहीत का?
इथे खाजगी वगैरे लिहिणारे
इथे खाजगी वगैरे लिहिणारे लहानपणी सरकारी शाळेत शिकलेत की खाजगी , जरा डोके खाजवून बघतील तर आठवेल
जर खासगी शाळाच असत्या तर दोन एकर शेती , आईच्या पातळ्या बिल्वर काय काय घरातून वजा झाले असते जरा गणित घालून बघा
खाजगीकरण करण्याला विरोध नाही
खाजगीकरण करण्याला विरोध नाही पण ते ज्या पद्धतीने केले जात आहे ते चुकीचे आहे.
ओके, याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. प्रोसेसबद्दल मतभिन्नता असू शकते, totally respect that.
हिंदू हिंदू करून लोकांना
हिंदू हिंदू करून लोकांना मूर्ख बनवायचे दिवस संपले .
हिंदू च्या भल्याचा विचार करणारा पक्ष म्हणून सत्तेवर आले आणि हिंदू नाच देशोधडीला लावले.
रोजगार गेले,नोकऱ्या गेल्या,बँका बुडवून त्याची खिरापत आपसात वाटून घेतली.
देशातील सामाजिक वातावरण बिघडवले.
फक्त खोटे बोलणे हेच काम केले.
आता त्याचे फळ मिळण्याचे दिवस सुरू होतील.
२७५ पी एस यू पैकी ७१ पी एस यू
२७५ पी एस यू पैकी ७१ पी एस यू स्थापने पासून आजारीच आहेत , त्यांच्या कडून कोणत्याही सरकार ला पाच पैशाचा फायदा झालेला नाही .
त्यातील एक उदाहरण -
हिंदुस्तान fertilizer मध्ये गेल्या १२ वर्षात एक ग्राम ही उत्पादन झालेले नाही .
मात्र १३०० कर्मचारी ना प्रत्येक महिन्यात वेळेवर पगार दिला जातो .
एअर इंडिया , बी एस एन एल , एम टी एन एल् , गेली कित्तेक दशके लॉस मध्येच आहे , मग असल्या कंपन्या पासून काय फायदा !
यांचा financial year चा तोटा १ लाख कोटी पर्यंत जाऊन पोहचला आहे ( गुगलून बघा ).
देश प्रगतीपथावर असताना असल्या ऐतखाऊ लोकांना पोसणे परवडणार नाही ! यांना पोसण्या पेक्षा तोच पैसा गरीब गरजू लोकांच्या अरोग्या साठी वापरता येवू शकतो !
देशाची वाट लागू दे मला काही घेणं देणं नाही , माझी नोकरी शाबूत राहिली पाहिजे अशी वृत्ती ठेवणारे लोकच सोशल मीडियावर पी एस यू खासगीकरण किंवा विक्री ला विरोध करत आहेत हे नक्की !!!!
कंगनाला 2018 ला नोटीस दिली
कंगनाला 2018 ला नोटीस दिली होती. मग फडणवीसने का नाही पाडली ?>>>>> अनधिक्रुत बान्ध्कामे पाडेण्याचे काम हे महापालिकेचे काम आहे. मुम्बई महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात होती व आहे.
खरे आहे का ??
खरे आहे का ??
संपादक अजुन ही बडबड करत आहेत
संपादक अजुन ही बडबड करत आहेत !
तो नेव्ही ऑफिसर नव्हता , तर मर्चंट नेव्ही मध्ये सर्व्हिस करत होता अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत .
मर्चंट नेव्ही त आहे म्हणून मारले असा यातून अर्थ निघतो अशी साधी समज त्यांना नाही का ?
जितकी तोंडाची वायफळ बडबड चालू राहील तेव्हढी मते कमी होणार हे लक्षात घ्या रे कोणी तरी .
आता जरी सैनिकांच्या साथी ने कॉंगी गुलाम सोशल मीडिया वर साथ देत असतील तरी ते उद्या फक्त काँग्रेस ला च मत देणारे आहेत .
शिवाय ते कट्टर काँग्रेसी आहेत हे सेनेने विसरून चालणार नाही .
राष्ट्रवादी पक्ष निवडणूक जवळ आली की तिकीट वाटप मध्ये दादागिरी करून काँग्रेस ला
फाट्यावर मारतो हा इतिहास आहे .....
मिसळपाव चे नेव्ही एक्सपर्ट
मिसळपाव चे नेव्ही एक्सपर्ट बोलले की तो इंडियन नेव्हीतच होता
संजय राउताना खरंच आवरले
संजय राउताना खरंच आवरले पाहिजे. किती बडबड करतो हा माणूस !
रिया ने तिच्या चौकशीत
रिया ने तिच्या चौकशीत कुठल्याही सेलिब्रिटिच नाव घेतल नाही व 25 नावाची अशी कुठलीही लिस्ट नाही अस NCB ने सांगितले पण मीडीया फेक न्युज चालवत आहे गांजा मारून
https://twitter.com/CNNnews18/status/1305088834678398977?s=19
अशा लोकांना गिधाडांची उपमा
अशा लोकांना गिधाडांची उपमा देऊन बिचार्या गिधाडांचा अपमान करू नये प्लीजच.
अर्णवच्या आक्रस्ताळी कंठाळी
अर्णवच्या आक्रस्ताळी कंठाळी पत्रकारितेच्या तुलनेत पद्मभूषण रजत शर्मांचं हे शांत, संयमी वृत्तनिवेदन खूपच भावलं.
https://twitter.com
https://twitter.com/KanganaTeam/status/1305499513746907136
या सगळ्यांच्या आयक्यूचा गुणाकार केला तर तो सुशांतसिंगच्या आयक्यूच्या वर्गमुळापेक्षा कमी असेल की जास्त?
हिंदू संस्कृती मध्ये दगडाला
हिंदू संस्कृती मध्ये दगडाला शेंदूर फासून त्याची पूजा करण्याची एक अंधश्रद्धा आहे .
शांतपणे विचार केला तर तो अडाणी लोकांच्या भक्तीचा, श्रद्धेचा परमोच्च आविष्कार आहे !
बॉलीवूड मधील असाच शेंदूर फासलेला दगड म्हणजे अमिताभ !!!!
आजू बाजू ला गटार आहे....मायानगरीत आशा घेऊन येणारे नवनवे जीव या गटारात पद्धतशीररित्या ढकलले जातात....तरी आपला देव निर्विकार.त्याला स्वतःची आरती होणे महत्वाचे.
जया बच्चन मात्र खाल्ल्या मीठाला जागून कंगणाविरुद्ध उभी राहिली आहे .
अमिताभ ला घाणीत दगड मारायचा
अमिताभ ला घाणीत दगड मारायचा नसेल.
फॉर बोला अथवा अगेंस्ट.. लोक चढतातच....
काही दिवसांपूर्वी महानायक
काही दिवसांपूर्वी महानायक नहीं महानालायक अशी ट्विटर ट्रेंड चालवली गेली होती. काल कंगनाने जया बच्चनना "तुमचा अभिषेक फासाला लटकलेला मिळाला असता तर?" असा प्रश्न विचारलाय.
मी टीनेजर असताना मला बळजबरीने ड्र्ग्ज दिले जायचे असे ही सांगतेय. याआधीही तिने त्या काळाबद्दल बरंच काही सांगितलंय. हे सगळ ती कशासाठी सहन करत होती.
बाकी कर्नाटकमध्ये भाजपचा प्रचार करणारी अभिनेत्री ड्रगच्या जाळ्यात अडकल्याची आणि भाजप कार्यकर्त्याकडेच किलो किलो नशीले पदार्थ मिळाल्याची बातमी आल्यापासून काही लोक गायब झालेत.
रिपब्लिक आणि सो कॉल्ड सुशांत वॉरियर्सना मधून मधून रियाची आठवण येते .
कँग्नावर अत्याचार झालेत तर
कँग्नावर अत्याचार झालेत तर तिने पोलीस केस करायला हवी , त्याशिवाय तिला न्याय कोण देणार?
टिन एजर ला ड्रग देत होते , ती घरात होती की बॉलिव्हड मध्ये होती ?
जो सत्तेत नाही , उदा राहुल गांधी , ज्या बचचन ह्यांना प्रश्न विचारून कांगावा करणे हा टिपिकल भाजपा अजेंडा आहे
सुशांत केस हरेंन पांड्याच्या दिशेने जात आहे , खुद्द भाजपाच्या मुख्यमंत्र्याचा खुनी सापडू शकला नाही
त्यावर पोलिसांनी टिप्पणी केली आहे
A wants to murder Z and instructs B to execute the order. B tells C who does not know that A is the instigator. Instructions are passed in this manner from C to D and then to E and it goes down all the way. The final contract killer does not know where the order originated from. If investigations turns nasty, then all A has to do is to make any of the people in the chain a cut-out—take him out by beginning another chain.
https://en.m.wikipedia.org/wiki/Haren_Pandya
कंगना ने तुमचा अभिषेक लटकला असता तर , असा प्रश्न ज्या बच्चंला विचारला आहे , अगदी घृणास्पद आहे. तिचा आणि अभिषेकचा काय दोष आहे ?
त्या रवी किशनने लोकसभेत फक्त
त्या रवी किशनने लोकसभेत फक्त एवढेच म्हटले की "मुंबई फिल्म इंडस्ट्रीत जे कोणी ड्रगमाफिया असतील त्यांना पकडून, त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी".
या एवढ्या वाक्यावरुन त्या जया बच्चनचे पित्त खवळण्याचे कारण काय ? 'जिस थाली मै खाते है उसी मे छेद करते है' असे फिल्मी डायलॉग लोकसभेत मारुन, तीला बॉलिवूडमधील कोणत्या चरशी व गंजेडींना वाचवायचे आहे ? सुशांत केसच्या निमिताने बॉलिवूड मधील नशेचा कारभार उघडकिस येत असेल, तर यात जया बच्चनाला काय टोचतेय, की हिच्याच जवळच्यांचे ड्रग माफियांशी संबध आहेत ? लगे हात एन.सी.बी. ने या जया बच्चनची देखील चौकशी करायला हवी.
Pages