सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

#आपला_तो_बाळ्या.....

ज्या पक्षाचा जवळपास तिसऱ्या क्रमांकाचा नेता एकेकाळी भाजपाचा पंतप्रधानपदाचा चेहरा होता, त्याचे चिरंजीव ड्रग्स च्या पार्टी मधे ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मरतामरता वाचले आहेत, आणि त्याचे PA यांचा त्यामुळे मृत्यू झालाय !!

आणि त्यावर प्रतिक्रिया देतांना BJPचे तेव्हाचे पंतप्रधान म्हणतात
'बच्चा है भुल हो गयी "
म्हणुन त्याला clean chit देतात

अशा 'सोज्वळ' पक्षाचे नेते आज कथित drug प्रकरणात देशात तमाशा करतात तेव्हा खरंच गंमत वाटते !
भारतीय गंजाडी पार्टी

SAVE_20200916_200011.jpeg

व्हॅटसप चावडी ग्रुपवरून साभार

बच्चा है भुल हो गयी " >>>>>>>
कांचा सेठ , कांच के घर में रहने वाले दूसरों पे पत्थर नहीं फेका करते !!!
त्या राहुल च्या गुणा मूळेच भाजप ने त्याला अक्टिव ठेवलेला नाही आणि भाजप चे कार्यकर्ते सुद्धा त्याला कडीची हि किंमत देत नाहीत .
पण
या राहुल ला मात्र बँकोकं मध्ये सत्तर दिवस घालवून सुद्धा काँग्रेसी गुलाम पुन्हा डोक्यावर घेवून नाचतात आणि त्यात भावी पंतप्रधान चे गुण शोधत बसतात !
Happy

कंगनाने उर्मिलाला soft porn star म्हटलं.
"उर्मिला काही तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही."

कंगना स्वतःच charsi आहे तिला काय महत्व द्यायचे.
इतक्या दिवस बॉलिवूड मध्ये आहे.
सर्व करून झाले असेल आता कोण विचारात नाही म्हणून स्वतः ला सभ्य दाखवत आहे.

तो अर्णव .
Bjp सरकार च्या जीवा वर मूर्खपणा करत आहे उद्या विरोधी सरकार आले आणि त्या अर्णव ची वाट लावली तर द्वेषाचे राजकारण म्हणून इथे प्रतिसाद देवू नका.

कंगनाला सगळ्यात जास्त भाव नॉन बीजेपी वालेच देतायत.... तिकडे ते संपादक आणि इकडे हे so called तटस्थ Wink
दर एका पोस्टआड आहेच यांचे कंगना कंगना Proud

विकृत कार्टून >>>> तुम्ही बाळासाहेब ठाकरेन्ची कार्टून पाहिलेली दिसत नाही

बेंकोंक ला गेले तर काय होते ?>>>> भारतीयांना काही होत नाही, पण युवराजांना काहीतरी होत असेल. Proud

बेंकोंक ला गेले तर काय होते ?>>> पण बँकॉकचा का? युरोप, चायना, अंटार्टिका, अमेरीका, ब्राझील, अफ्रिका, रशियाला का नाही ? प्रत्येक वेळेस थायलंडच का?

कांचा सेठ , कांच के घर में रहने वाले दूसरों पे पत्थर नहीं फेका करते !!!
त्या राहुल च्या गुणा मूळेच भाजप ने त्याला अक्टिव ठेवलेला नाही आणि भाजप चे कार्यकर्ते सुद्धा त्याला कडीची हि किंमत देत नाहीत .
पण
या राहुल ला मात्र बँकोकं मध्ये सत्तर दिवस घालवून सुद्धा काँग्रेसी गुलाम पुन्हा डोक्यावर घेवून नाचतात आणि त्यात भावी पंतप्रधान चे गुण शोधत बसतात !>>>> ज्जे बात !

त्याची मर्जी
कुठेही जाईल

आणि भाजपा कार्यकर्ते इतरांना कशाला एकटिव्ह ठेवतील ?

त्यांना स्वतःलाच खायला नाही
बेरोजगार दिन शुभेच्छा

त्यांना स्वतःलाच खायला नाही>>>> हो , कारण ते स्वतःच्याच घरातले डाळ - तांदुळ खातात, दुसर्‍याच्या नाही. Biggrin

modibirthday.png

मग ह्या बाॅलीवूड ड्रग आड्याला काही दिवसापूर्वी स्वतः पंतप्रधानानी का बोलवल होत भेटायला व सोबत फोटो पण काढले होते ....राहूल गांधी जवाब दो पूछता है भारत..!

खरा पुणेकर, मी कधी तटस्थ असल्याचा दावा केलाय? माझा राजकीय कल मी मायबोलीवर आल्यापासून स्पष्ट आहे.
उगाच काहीतरी स्मार्ट कमेंट केल्याचा आव आणून खुष होता असाल तर व्हा बापडे.

आज पर्यंत कोणत्याच बॉलिवूड कलाकार नी एनसीबी ची कारवाई थांबवावी आणि बॉलिवूड मध्ये असलेल्या ड्रग racket ची चोकशी करू नये असे मत व्यक्त केले नाही .
कंगना आणि तिचे समर्थक चुकीच्या बातम्या
पसरवत आहेत.
ड्रग वर कारवाई करू नये असे कोणालाच वाटतं नाही आणि कोणाचेच ते मत नाही .
फक्त कंगना तिचे आका,आणि रिपब्लिक चा अर्णव लोकात भ्रम पसरवत आहेत की ते ड्रग वर कारवाई होवू नये म्हणून कंगना ला विरोध करत आहेत. .
जया जी सुद्धा कारवाई करू नये असे बोलल्या नाहीत ना महाराष्ट्र सरकार नी कारवाई होवू नये म्हणून अडथळे आणले आहेत.
उलट मुंबई पोलिस सहकार्य करत आहेत म्हणुच ncb ला कारवाई करणे सोपे जात आहे.
हे सर्व सत्य लपवून फक्त गोंगाट निर्माण करून बॉलिवूड आणि महाराष्ट्र सरकार ला
टार्गेट केल्या मुळेच
कंगना चा विरोध होत आहे.
अर्णव तर स्वतःच charsi वाटतो तो तर चॅनल चालवण्याच्या लयकीचाच नाही.
पत्रकारिता चे सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांनी फक्त अफवा पसर्वण्या चे काम केले आहे.
न्यूज साठी असलेल्या नियम आणि अटी चे पूर्ण उलघन केल्या मुळे केंद्र सरकार नी लगेच रिपब्लिक चॅनल बंद करून अर्णव आणि त्याची तमाशा पार्टी गजा आड करायला हवी तेव्हा च केंद्र सरकार ला कायद्या चे राज्य हवे आहे असे म्हणता येईल.

पुरातन काळापासून ड्रग चा फोकस मध्य भारत , हिमाचल , काश्मीर , पाक व अफगाण आहे , शेती करणे ते आजूबाजूच्या देशात व चिन मध्ये विकणे हे सगळे ह्याच भागातून होत होते

https://idsa.in/taxonomy/term/926

आज जे दानशूर पारशी टाटा वगैरे दिसताहेत , त्यांचे खापर पणजोबे ह्यांचाच व्यापार करून मोठे झालेत

पण तेंव्हा ड्रगग कायदेशीर होते

फक्त मुंबई महाराष्ट्र मध्येच ड्रग चा व्यापार होतो जा.
उडता पंजाब विसरले काय.
दिल्ली मध्ये मुंबई पेक्षा जास्त ड्रग चा वापर होत असेल.
भारतातील अनेक राज्य ड्रग व्यापारात मुंबई च्या पुढे आहेत.
त्या विषयी चक्कर शब्द कंगना आणि पार्टी काढत नाही .
न्यूज चॅनेल चे रिपोर्टर सर्व फुकटच्या पार्टी मध्ये हजर असतात ते ड्रग च्या आहारी गेलेले नाहीत असे होवूच शकत नाहीत.
उगाच च स्वतः ला सभ्य दाखवायचा नाटक करत आहेत.
खोलवर चोकशी केली तर असे किती तरी पत्रकार गोत्यात येतील .
अशी खोलवर चोकशी होवू नये म्हणून काही न्यूज चॅनेल खोट्या बातम्या जोरात देत आहेत.

मग स्वता एखाद्या पक्षाची तळी उचलत असाल तर समोरच्याला डायरेक्टली/इंडायरेक्टली भक्त संबोधू नये.... इतकेच माझे म्हणणे आहे.

स्मार्ट कमेंट करुन स्वतावर खुश होण्याइतका अल्पसंतुष्ट नाहिये मी. मी पण तुमच्यासारखेच बरेच उन्हाळे पावसाळे पाहिलेत सोशल मिडियावर.

खरोखरीचे तटस्थ असे राजकीय वाद घालत फिरत नाहीत. ते फक्त मतपेटीतूनच व्यक्त होतात आणि भाकरी फिरवत राहतात.... इतकी राजकीय समज आहे मला.

आणि म्हणूनच इथे तटस्थ म्हणवून घेत जे पिंका टाकतात त्यांची जरा खेचत असतो Wink

इथे भाजपावाले आणि आमच्यासारखे काँग्रेसवाले स्पष्टपणे आपली बाजू मांडतात

काही ततस्थही असतील

तिघेही आपापल्या ठिकाणी योग्य आहेत

लोकशाही म्हणजे भिन्न पक्ष व विचार येणारच

देशातील अनेक गंभीर प्रश्न सोडून
जसे.
Corona चा हाहाकार
रुग्ण ना मिळत नसलेले उपचार.
प्रचंड बेरोजगारी
अर्थ व्यवस्था पूर्ण गाळात गेली आहे त्याचे गांभीर्य नसणे.
किती तरी लोकांच्या नोकऱ्या गेल्या,उद्योग बुडाले.
हे प्रश्न bjp ल महत्वाचे वाटत नसतील.
आणि फक्त ड्रग चे राजकारण करण्यात इंटरेस्ट असेल तर bjp ला लोकांनी का निवडून दिले ह्या विषयी नक्की पश्चातताप होत असेल.
असल्या उथळ विचाराच्या पक्षाला देशाची सत्ता देवून मोठी चूक केली असा विचार नक्की येईल.
किती तरी bjp समर्थक लोकांना आपली चूक लक्षात आली आहे.
मी पण पहिला bjp समर्थक च होतो पण आता चुकून पण हा पक्ष सत्तेत नको असे वाटायला लागले आहे.

सातवी ड, कुणाला पश्चाताप झाला की नाही हे कळेल की पुढच्या निवडणुकीत.... अवकाश आहे त्याला अजुन.... तुम्ही आत्तापासून कशाला इतके घाईवर येताय?

मागच्या निवडणुकीच्या आधीही सोशल मिडियावर बरेच जण असेच बरळत होते..... त्यामुळे कुणाला व्यक्तिगत काय वाटते याला फारसे महत्व नाही.
उपलब्ध पर्याय, तात्कालिक परिस्थिती, कॅंपेनिंग, पक्षाचा चेहरा अश्या बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात.

भाजपाच्या चुका अवश्य काढा पण मग पर्याय पण सुचवा... तो पर्याय भाजपापेक्षा कसा उजवा वाटतो याचे विश्लेषण करा. फक्त गांधी-नेहरुंची कर्तबगारी नका ऐकवू, सध्या त्यांच्या पक्षाचे काय मुद्दे आहेत, कोण चेहरा आहे, काय योजना आहेत वगैरे सांगा की .... ऐकायला आवडेल.
निदान तुमच्यासारखे अजुन काही जणांचे मतपरिवर्तन होईल.... काय म्हणता?

काँग्रेस सरकार लांबून गाजर दाखवायचे, तर आता
भाजप सरकार निवडणूक आली की गाजर हातात देते आणि निवडणूक संपली की काढून घेते.

असेच म्हटले तर मग मागची 60 वर्षे काँग्रेसला लोक निवडून देतच होते
मग 60 साल काँग्रेसने क्या किया म्हणून मोदी का ओरडतात ?

खरा पुणेकर
पाहिले तर लेबल लावणे सोडा मीच अती हुशार आहे हा गैर समज पहिला काढून टाका.
तुमचे नेते पण तुमच्या सारखेच अडाणी हुशार आहेत कळत काहीच नाही फक्त आव असे आणतात ह्यांना सर्व काही कळत.
त्या मुळे अनेक हुशार लोकांचे सल्ले डावलून निर्णय घेत सुटले आणि सर्व निर्णय फसले.
7d he लेबल लावणे पण सोडा .
मुस्लिम देश द्रोही आहेत, हे तुमचीच लेबल आहेत.
मुस्लिम लोकांनी सुद्धा देश साठी कुर्बानी दिली आहे आणि देत आहेत.
आता निवडणुका आल्या की एक तर पाकिस्तान आपल्या सैनिकांवर हल्ला करेल किंवा चीन करेल.
नाही तर राम मंदिर च एकदा मजला बांधून होईल ह्या पलीकडे बाकी कोणताच विषय नसणार आहे निवडणुकीचा .
आणि आता लोकांना ह्या सर्व चाली माहीत झाल्या आहेत कोणी ते सीरियस घेणार नाही.

Pages