अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनामिका पंतप्रधानाला पप्पू बोलत आहे. लाज बाळगा जरा..व्यक्ती भले सन्मानाच्या पात्रतेचा नसेल पण पदाचा तरी सन्मान ठेवा.

राहुल गा ला पाठिंबा देणारे फक्त मायबोलीवरच दिसतात. अमेरीकेतून बहुतेक.
इकडे कोण विचारत नाही हो रागा ला. २०१९ ला डिपॉसीट जप्त होऊन राहील त्याचे. फक्त आणि फक्त मोदीच देशाला तारू शकतात.

देशाला ताळा ठेकू शकतात असे म्हणायचे असेल Wink

बाकी धागा आप वर आहे. फेकू मोदी वर नाही हे लक्षात घ्या Wink 60 वर्ष तुघलकाने तारलेला का? काहीही
फेकायची पण काही लिमीट.. सकाळी सकाळी हास्याचे फव्वारे उडाले

२०१९ ला डिपॉसीट जप्त होऊन राहील त्याचे. फक्त आणि फक्त मोदीच देशाला तारू शकतात. >>>>>>>>>>>>>>> २०१४ च्या टेप्स परत परत. बास करा आता. बरी होती त्या अर्थव्यवस्थेचे आधीच वाटोळे केले आहे. अजुन काय वाटोळे करायचे! मोदीचे तारणे म्हणजे खर्या अर्थाने वाट लावने आहे.

तारे जमीन पर आहे नुसता.>>>>>>>>>>>> आमचा पप्पु तर विमानात असतो. ना जमिनीवर ना आकाशात. एका मागुन एक देश. निवडणुका आल्या की मग भाष्णे! उअरलेल्या वेळेत पकोडे लावणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आज तोडफोडीची घटना घडली. मुख्यमंत्री कार्यालयाचे म्हणने आहे की, केजरीवाल यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन करणाऱ्या भाजपा नेत्यांनीच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच, तोडफोड करणाऱ्या महिला भाजपाच्या नेत्या होत्या हे भाजपाने देखील मान्य केलं असल्याचंही आम आदमी पार्टीने म्हटलं आहे. याशिवाय, चौकीदारांना कॅमेऱ्यांची कसली भीती? असा टोला देखील ‘आप’ ने भाजपाला लगावला आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-vandalism-outside-chief-...

त्या महिलेला कडक शिक्षा झाली पाहिजे , मित्र पक्षाच्या घरी आंदोलन करते म्हणजे काय ?
दुश्मन का दुश्मन अखिर दोस्त होता है !
केजरीवाल ने काँग्रेस ला दिल्ली मध्ये औषधाला ही शिल्लक ठेवली नाही !
Happy

https://twitter.com/netaji_bond/status/1339924606459674626?s=19
Zee news वर रुबिका ने आप चा आणि संजय सिंग चा चेहरा उघडा पाडला !
केजरीवाल ने पूर्वी कृषी कायद्याला समर्थन दिले असताना काल दिल्ली विधानसभेत कायद्याच्या प्रती फाडून अचानक यू टर्न घेण्याचे कारण काय ? विचारले असता संजय सिंग ने रूबिका वर आरडाओरड चालू केली !!!!!

जर केंद्र सरकारने किसान आंदोलन नीट हाताळले नाही तर मध्यावधी निवडणूक होईल. केजरीवाल पाएम होऊ शकतात. भाजपला 10/12 जागा मिळाल्या तरी पुष्कळ.

1500 mobile tower पाडणारे किसान किंवा जे कोणी असतील त्यांचं आंदोलन नाही तर blackmail चालू आहे.
3 सरदार गवंडी घरात काम करताहेत, त्यांना सगळा कायदा माहित आहे, काही प्रॉब्लेम नाही हे पण माहित आहे पण they are not allowed to agree with it...socially एकटं पडण्याची त्यांना भीती आहे त्यांच्या समाजात.
त्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्या celebrities ची हिच अवस्था आहे ...त्यामुळे खेळाडू, गायक इ. लोकांना काहीतरी सपोर्ट मधे ट्विट/ फेबु/ गाणी म्हणणं भाग आहे.

हे फक्त गहू / तांदूळ पिकवणा-या पंजाबी किसानांचं आंदोलन आहे

https://www.livemint.com/news/india/farmers-from-maharashtra-reach-delhi...
On Monday, thousands of farmers from Maharashtra had left for Delhi from Nashik in vehicles to join the ongoing agitation seeking the repeal of the legislations.

https://www.ndtv.com/india-news/farmers-protest-thousands-of-farmers-mar...
Thousands of farmers tried to march towards the governor's house Raj Bhavan in Patna on Tuesday, calling for the central government's new agricultural laws to be scrapped, that set up a confrontation with the police in line with massive demonstrations in several parts of the country.

गुजरातच्या शेतकर्‍यांनी आंदोलक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ गरबा केला

केरळहून दिल्लीत शेतकर्‍यांसाठी १६ टन अननस आले.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधले शेतकरी गाझीपूरच्या दिशेने निघाले

भरत हा किरकोळ सपोर्ट आहे. अजून हे आंदोलन पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उ प्र मधले गबर शेतकरी आणि दलाल ह्यांच्या पुरतंच आहे.

शाहीन बाग वाले किती तरी दिवस बसले होते !
त्यांचे तरी आंदोलन कुठं मोडून काढले ?
आज सरकार ने त्यांच्या दोन मागण्या मान्य केल्या त्यात विजपंप ची लाईट पूर्वी प्रमाणेच फुकट वापरता येईल असे सांगितले !

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फुकट लाईट असते का ?
ही एकच बाब ते आणि येथील शेतकऱ्या मधील फरक दाखवण्यास पुरेशी आहे !
पंजाब मध्ये कोरडवाहू जमीन आहे का ?
पंजाब मधील शेतकरी अवर्षण मुळे कर्जबाजारी होवून आत्महत्या करतात का ?
येथील बरेच जण फक्त भाजप विरोध मुळे आपल्या येथील शेतकऱ्यांच्या हलाखी कडे दुर्लक्ष करून श्रीमंत पंजाबी शेतकऱ्यांच्या आंदोलन ला समर्थन देत आहेत !
या साठी गांधी मीडिया प्रमाणे चार पैसे भेटत असतील तर एक वेळेस पोटाची खळगी भरण्यासाठी या अवस्थेला उतरल्याचे एक वेळेस मान्य केले गेले असते .
पण सुखवस्तू असतील तर लष्कराच्या भाकरी भाजताना देखील इतका आंधळेपणा कसा असू शकतो ?

बरं ते शेतकरी वीजपंप साठी या पूर्वी फुकट लाईट वापरत होते आणि इथून पुढे ही त्यांना फुकटच पाहिजे हे आज समजले !
म्हणजे या आंदोलन द्वारे ब्लॅकमेल करून फक्त पंजाब हरयाणा तील शेतकऱ्यांचे फायदे होत आहेत हे बाच्ची कडू , खोत , शेट्टी हे आपल्या शेतकरी नेत्यांना माहीत आहेत तरी भांगडा वर नाचत आहेत !

Pages