अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मोदींच्या बाबतितही खुप जणांना असेच वाटते.
असेल, मग ??? वाटू दे, मला काही प्रॉब्लेम नाहीये.

आणि हो, अ.के.च्या धाग्यावर येऊन, काहीही विषय चालू नसताना एकदम मोदींबाबत कमेन्ट ???
मान गये, आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनोंको Wink

महेशजी,
विषय कोणताही असुदे त्यांना जळी, स्थळी, पाषाणी फक्त आणि फक्त मोदीच दिसतात.
ज्याप्रमाणे औरंगजेब आणि त्याच्या सैनिकांना आणि त्यांच्या घोड्याना नदिच्या पाण्यात देखिल धनाजी-संताजी दिसायचे तशी हालत झाली आहे आता अनेकांची

<<विषय कोणताही असुदे त्यांना जळी, स्थळी, पाषाणी फक्त आणि फक्त मोदीच दिसतात.>>
----- ते कुठे नाही आहेत ?

फेसबुकात आहेत, ट्विटरवर आहेत, सेल्फी मधे... सर्व प्रकारच्या दैनन्दिन बातम्यात, निवडणुक प्रचारात आहेत. मग कधी कुणाची तरी जयन्ती पुण्यतिथी असेल तर... त्या कार्यक्रमात पण प्रधानसेवकान्चा फोटू झळकतो... २०१५ मधे अनेक ठिकाणी एकच (अ के नाही) व्यक्ती नाही उपस्थित राहू शकत हे समजतो... यावर उपाय ? तर २०१० मधे शास्त्रीजीन्ना हात जोडत नमस्कार केलेला फोटू पुनःप्रकाशीत करुन वाचकान्ची सोय साधणे.
हे सर्व कमी म्हणुन मन की बात...

मोदी नेतृत्व देशाचा घडवत असलेला विकास बघुन मला "विकास नको पण मोदी आवर.... " असे म्हणायचे धाडस होते आहे.

अके खोटे, लबाड, महा लबाड आहेत असे वर वाचले..... पण राजकारणात लबाड नसणारी एक व्यक्ती सान्गा? अके खुप वेगळे आहेत असे ते म्हणतात, ते तसे नाही आहेत (इतर राजकारण्यान्सारखेच आहेत) हे जरी मान्य केले तरी त्याने काय फरक पडतो ? ते काम करत आहेत, आणि "तुलनेने" अत्यन्त पारदर्षक, अत्यन्त स्वच्छ कारभार करत आहेत...

प्रत्येक राजकाण्याची मतदारान्ना आकर्षित करायची एक कल्पना असते.... काहीन्ना भाषा, धर्म, मन्दिर, गो-मान्स, तर काहीन्ना भ्रष्टाचार महत्वाचा वाटतो. आपण काय भुमिका घेतली तर लोक आपल्या पक्षाच्या मागे येतिल हे कॅल्क्युलेट करुनच तशी भुमिका घेतली जाते... भुमिका लोकान्च्या गळी उतरवण्यासाठी 'वातावरण निर्मीती' घडवावी लागते...

असो तुर्तास अकेन्ना स्वच्छ प्रशासनासाठी आणि सुराज्यासाठी शुभेच्छा...

<<विषय कोणताही असुदे त्यांना जळी, स्थळी, पाषाणी फक्त आणि फक्त मोदीच दिसतात.>>
----- ते कुठे नाही आहेत ?>>>>>

संसद भवनात नाही असतात.

अके खुप वेगळे आहेत असे ते म्हणतात, ते तसे नाही आहेत (इतर राजकारण्यान्सारखेच आहेत) हे जरी मान्य केले तरी त्याने काय फरक पडतो ? ते काम करत आहेत, आणि "तुलनेने" अत्यन्त पारदर्षक, अत्यन्त स्वच्छ कारभार करत आहेत...

<<

Lol उठसुठ दिल्लीच्या नायब राज्यपाल व केंद्रातील सरकारवर बिनबुडाची टिका करणे, यालाच जर काम करणे म्हणत असतील तर दिल्लीच्या जनतेचे देवच भले करु शकतो.

उठल्या, बसल्या, खाता, पिता, निजता, फिरता(विशेषतः परदेशात) मागल्या सरकारवर टीका केलेली बरोबर असते. तशी टीका करताना त्याच सरकारची महत्त्वाची धोरणे राबवणेही बरोबरच असते.

बहुतेक चार वर्षे वेगवेगळ्या निवडणुका लढवण्यात आणि जिंकण्यातच जाणार. उरलेल्या एका वर्षात सगळी कामे फटाफट करणार.

<<उरलेल्या एका वर्षात सगळी कामे फटाफट करणार.>>
------ शेवटच्या वर्षात (म्हणजे २०१९ मधे) गेल्या ६५ वर्षात देशाबाहेर गेलेला काळा पैसा (१५,००,००० रुपये X १३०,००,००,०००) आणायच्या हालचालीन्ना प्रचन्ड वेग येणार... किमान तसे वातावरण निर्माण केले जाणार. Happy

उठल्या, बसल्या, खाता, पिता, निजता, फिरता(विशेषतः परदेशात) मागल्या सरकारवर टीका केलेली बरोबर असते. तशी
<<
कॉंग्रेजने केलेल्या भ्रष्टाचार आणि महाघोटाळ्यांनी सर्वसामन्य करदात्यांच्या पैशाची अक्षरशः लुट केली आता त्यांनी केलेल्या पापांची आठवण करुन देण्याला टिका म्हणत नाहीत तर डोळे उघडणे म्हणतात. पण चुकातुन धडा घेतील तर ते कॉंग्रेजी कसले.

टीका करताना त्याच सरकारची महत्त्वाची धोरणे राबवणेही बरोबरच असते.
<<

आताचे सरकार, मागच्या सरकारची धोरणे राबवतेय ही बातमी लोकसत्ता वर्तमान पत्रात तुम्ही वाचली काय? Lol

आणि मागच्या सरकारचे (कॉंग्रेज) धोरण एकच होते. ते म्हणजे घोटाळ्यावर घोटाळे, भ्रष्टाचार करुन सर्वसामन्य करदात्या भारतीय जनतेला लुटणे आणि स्वत:च्या तुंबड्या भरणे. हे सरकार असले फालतु कॉंग्रेजी धोरण कुठेही राबवताना सध्यातरी दिसत नाही.

बहुतेक चार वर्षे वेगवेगळ्या निवडणुका लढवण्यात आणि जिंकण्यातच जाणार. उरलेल्या एका वर्षात सगळी कामे फटाफट करणार.
<<

कॉंग्रेज मुक्त भारत होणार म्हणुन तुमच्या पायाखालची वाळु सरकलेय, हे प्रतिसादातुन दिसतेच आहे.

प्रसाद आणि महेश,
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून suo moto कारवाई करत स्वतःच आपल्या मंत्र्याला पदावरून बरखास्त करून, चौकशी सीबीआयकडे सोपवण्याच्या भारतातील दुर्मिळ घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे?

<<हे सरकार असले फालतु कॉंग्रेजी धोरण कुठेही राबवताना सध्यातरी दिसत नाही.>>

अगदी अगदी. ह्या सरकारची धोरणे फार्फार उदात्त आहेत. उदा.- बीफबॅन. मग त्यावरून माणसं मारली गेली तरी बेहत्तर.

प्रसाद, तुमच्या लिंकामधली दुसरी लिंक ज्यातनं घेतली आहे तो 'आप की अदालत' चा एपिसोड पाहिलाय मागेच. तो पाहून झाल्यावर मनात एकच विचार आला होता -"बाप्रे, काय सहनशक्ती आहे केजरीवालची. मी असते तर ह्या चमच्याच्या कानाखाली सणसणीत वाजवण्यापासून स्वतःला थांबवायला अतिशय अवघड गेलं असतं"

कुठलंही मत/पूर्वग्रह नसलेल्या व्यक्तीने रजत शर्माचे हे तीन एपिसोडस जरूर पहावेत.
१. केजरीवाल -- अण्णा आंदोलनाच्या वेळची मुलाखत
२. केजरीवाल -- जेव्हा भाजपाच्याही भ्रष्टाचाराविरूद्ध बोलायला सुरूवात केली तेव्हाची मुलाखत
३. मोदी -- लोकसभा निवडणूकीच्या आधीची मुलाखत (ह्यात रजत शर्मा आता कुठल्याही क्षणी लाळ टपकवत शेपूट हलवायला सुरूवात करेल असा फील सतत येत राहतो :हाहा:)

बायदवे, तनू शर्माची केस दाबली का ह्या पद्मश्री पत्रकाराने? का बरं? एक एपिसोड तो बनता था उस मामले पे.

<<या निर्णयामधे मला तरी divide and rule या व्यतिरिक्त काही दिसत नाही.>>

एक्झॅक्टली उदय.
सुशील मोदी म्हणत आहेत बिहारमध्ये निवडून आलो तर बीफबॅन करू. पण बिहारमध्ये बीफबॅन तर १९५५ पासून अस्तित्वात आहे म्हणे.

आणि संगीत सोमचं काय झालं कळलं का शेवटी? त्यांची मीट फॅक्टरी अल-दुआ फक्त म्हशीचं मांस विकते की गाईचं पण? ही भारी मज्जा आहे. एकीकडे मांसबंदी म्हणून घोषणा द्यायच्या, दंगे पेटवायचे आणि दुसरीकडे स्वतःच फॅक्टरी चालवायची.

<<बीफबॅन>>
----- या निर्णयामधे मला तरी divide and rule या व्यतिरिक्त काही दिसत नाही.

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून suo moto कारवाई करत स्वतःच आपल्या मंत्र्याला पदावरून बरखास्त करून, चौकशी सीबीआयकडे सोपवण्याच्या भारतातील दुर्मिळ घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे?
<<

त्या मंत्री असिम अहमद खान यांने कोणताही भ्रष्टाचार केलाय, ही बातमी नक्की खरी आहे ना? कारण तो असिम "मुझे फंसाया जा रहा है" असे वेगळच काहीतरी म्हणतोय!

तसेही तुम्ही आपटार्ड आणि तुमचे नेते अरविंद केजरिवाल प्रसिध्दीसाठी कोणत्या थराला जातात ते त्या गजेंद्र सिंग केसमध्ये सर्व देशाने पाहीलेय. आणि कायद्याची एवढी चाड होती तर आधी तोमर व मग सोमनाथ भारती यांच्या बद्दल का मुग गिळुन गप्प होते केजरिवाल.

"बाप्रे, काय सहनशक्ती आहे केजरीवालची. मी असते तर ह्या चमच्याच्या कानाखाली सणसणीत वाजवण्यापासून स्वतःला थांबवायला अतिशय अवघड गेलं असतं"
<<

तुम्हा आपटार्डच्या विरुध्द कोणीही काहीही बोलले की लगेच ती लोक एकतर कुणाचे तरी चमचे असतात किंव्हा कुणाचे तरी एजंट असतात. फक्त केजरिवालच काय ते ब्रम्हदेवाच्या बेंबीतुन प्रकट झालेत. वरिल व्हिडीओत रजत शर्मां यांनी सहप्रमाण सिध्द केलेय की अरंविद केजरिवाल हा खोटारडा आणि दुतोंडी माणुस आहे. तर लगेच रजत शर्मा चमचा झाला!

सुशील मोदी म्हणत आहेत बिहारमध्ये निवडून आलो तर बीफबॅन करू. पण बिहारमध्ये बीफबॅन तर १९५५ पासून अस्तित्वात आहे म्हणे.

<<
आणि तुम्हा आपटार्डची माहीतीही अर्धवट ज्ञानावर असते. बिहारमध्ये १९५५ पासून बंदि आहे ती गोहत्येवर. नाकी वळु, बैल, यांच्या हत्येवर.

<<वरिल व्हिडीओत रजत शर्मां यांनी सहप्रमाण सिध्द केलेय की अरंविद केजरिवाल हा खोटारडा आणि दुतोंडी माणुस आहे.>>

हो??? मग त्या देसराज राघववर काय कारवाई झाली? टाकलं का तुरुंगात? किमानपक्षी एखादी एफआयआर ?

<<त्या मंत्री असिम अहमद खान यांने कोणताही भ्रष्टाचार केलाय, ही बातमी नक्की खरी आहे ना?>>

मंत्रीपदावरून हटवलं, सीबीआयकडे तपास सोपवला तर 'पण त्यांनी खरंच भ्रष्टाचार केला आहे ना' अशी तुम्हाला शंका येते आहे. तोमरची कागदपत्रे खरी वाटली म्हणून अके त्याच्या बाजूने उभे राहिले तेव्हा तुम्हाला खात्री होती की तोमरची डिग्री खोट्टीच्च आहे. भले.

रच्याकने, शेवटी कळलं का डिग्री खरी आहे का खोटी ते? एवढ्या दिवसात दिल्ली पोलिसांनी काय तो सोक्षमोक्ष लावयला पाहिजे होता. महिने लोटले.

मोदी सरकार कॉग्रेसचीच अनेक धोरणे राबवीत आहे हे अनेकदा पुराव्याने शाबीत केले आहे.जिथे स्वत:ची अकक्ल वापरून काही करायला गेले तिथे घुमजाव केले आहे.भ्रषटाचार केला तर कायदेशीर कारवाई करायला हात बांधले आहेत का? की जोवर स्वतःला हवे तसे न्यायाधीश नेमता येत नाहीत तोवर वाट बघणार?

<<आणि तुम्हा आपटार्डची माहीतीही अर्धवट ज्ञानावर असते.>>
----- चर्चा करताना आपटार्ड हा शब्दप्रयोग वापरणे मला तरी अयोग्य वाटते. अर्थ लावाल तसा लावता येतो पण वैयक्तिक शाब्दिक हल्ला करुन चर्चा होत नाही तसेच चर्चेची पातळी नकळत खालावते.... अर्थात उद्देश चर्चा करणे हाच आहे हे गृहित धरतो.

<<भ्रषटाचार केला तर कायदेशीर कारवाई करायला हात बांधले आहेत का? >>
----- कारवाई होणार आहे थोडा धिर धरा.... सहा दशकान्चा भ्रष्टाचार निपटायला किमान २५-३० वर्षे तर लागतीलच. सर्व प्रश्न पाच वर्षात सुटणार नाहीत, अमित शहा यान्नी २५-३० वर्षे एकहाती सत्ता हवी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

भ्रषटाचार केला तर कायदेशीर कारवाई करायला हात बांधले आहेत का? की जोवर स्वतःला हवे तसे न्यायाधीश नेमता येत नाहीत तोवर वाट बघणार?
<<

तुमचे बरोबर आहे, कॉंग्रेजने गेल्या साठ वर्षात केलेले भ्रष्टाचार, घोटाळे आणि सर्वसामन्य जनतेला लुटुन खाल्लेली माती, मोदी सरकारने एक-दिड वर्षात साफ करायला हवी ही तुमची अपेक्षा एकदम रास्त आहे. लगे रहो. Lol

<<कारवाई होणार आहे थोडा धिर धरा..>>

"खामोश रहता हूं, क्योंकि......
अभी दुनिया को समझ रहा हूं !
समय जरूर लूंगा,
पर जिस दिन दाव खेलुंगा उस दिन.....खिलाडी भी मेरे होंगे और खेल भी मेरा !"

अशा ओळी आणि कडक स्टार्चच्या कपड्यातील आ वं पंप्रंचा फोटो असलेलं व्हॉटसॅप रत्न 'वंदे मातरम, शाखा परिवार' कडून/त्यांच्या नावाने आलं नाही का अजून?
माझ्याकडे तिसर्‍यांदा आलं, मी तिसर्‍यांदा केराच्या टोपलीत टाकलं. Wink

<<तुमचे बरोबर आहे, कॉंग्रेजने गेल्या साठ वर्षात केलेले भ्रष्टाचार, घोटाळे आणि सर्वसामन्य जनतेला लुटुन खाल्लेली माती, मोदी सरकारने एक-दिड वर्षात साफ करायला हवी ही तुमची अपेक्षा एकदम रास्त आहे. लगे रहो.>>
------ आश्वासन देताना १०० दिवसात प्रत्येकाच्या खात्यात १५,००,००० रुपये जमा होतील असे होते... १०० दिवस गेले, १ वर्षे सरले... १५ लाख काय १५ रुपये पण जमा झालेले नाहीत.
सर्वोच्च न्यायालयात (देशाबाहेर साठवलेल्या) काळ्या पैसेवाल्या लोकान्ची केवळ यादी देताना पण सरकारची त्रेधातिरपिट उडालेली होती. सुरवातीला केवळ ३ लोकान्ची नावे पुढे आली, मग सर्वोच्च न्यायालयाने डोळे वटारल्यावर २४ तासात अजुन काही (सम्पुर्ण नाही !) लोकान्ची नावे बाहेर आणली. पण यातुन मोदी सरकार भ्रष्टाचारा विरुद्ध किती प्रामाणिक आहे हे दिसते.

केजरीवालान्च्या धाग्यावर केजरीवाल आणि आप हा विषय केन्द्रित हवा.... विषयान्तराबद्दल क्षमस्व. शुभरात्री.

तिकीट देताना सदस्य अस्वच्छ होते हे केजरीवालान्ना त्यावेळी माहित नव्हते... अशी शक्यता पण आहे. तशी थोडी पण शक्यता आहे असे वाटले म्हणुन तत्काळ कारवाई केली.


भारत की 6 सबसे बड़ी गोश्त सप्लाई करने
वाली कम्पनियों में से 4 के मालिक ब्राम्हण हैं।
दुनिया का सबसे बड़ा "Beef meet exporter
country"ब्राज़ील है, उसके बाद India,Australia
,USA और UK.
का न० आता है।
4 बड़ी भारतीय कम्पनियां और उनका पता-
1-Al-kabeer Exports Pvt Ltd.
(Owner- Shree Shatish &
Atul Sabharwal) 92, jolly
makers/ chembur Mumbai
400021
2- Arabian Exports pvt Ltd.
(owner- Shree Sunil Kapoor)
Russion mentions, Overlies,
Mumbai 400001

3-M.K.R frozen food Exports pvt Ltd (Owner-
Shree Madan Abot)MG Road, Janpath
NEW DELHI 110001
4-P.M.L Industries pvt.Ltd
(Owner- shree A.S bindra)
S.C.O. 62-63Sector 3
4-A Chandigarh 160022
मुसलमान तो ऐसे ही बदनाम किये जाते हैं
मुस्लिम नामों से मीट कम्पनियां चलाने वाले
हमारे भारतीय ब्राम्हण भाई लोगों का,
मांसाहार का विरोध करने वाले लोग, विरोध
क्यों नही करते ?? ( हम मुसलमान लोग मांस का
व्यापार करने वाले ब्राम्हण व्यापारी के
व्विरोधी नहीं है)
अभी पिछले दिनों बकरीद पे फेसबुक पे तरह तरह
की फोटो डाल के मुसलमानों के खिलाफ
माहोल बनाया गया।
जबकि विश्व प्रसिद्ध "पशुपति नाथ" के मंदिर,
हिमाचल प्रदेश के कई मंदिरों में बलि की प्रथा
आज भी प्रचलित है।
अभी नेपाल के विश्व प्रसिद्ध "गढ़ीमाई मंदिर
" बेरियापुर में 28-29 नवम्बर को 5 लाख पशुओं
की बलि दी जानी है।

<<आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्य प्रशांत भुषण यांची भविष्यवाणी. हाहा
अभी कई और "आप" विधायक पकडे जाएंगे : प्रशांत भुषण>>

चांगलं आहे की मग. हसताय कशाला?
कोणीही असो--पकडा, चौकशी करा आणि सरळ तुरुंगात टाका. 'मानवतेच्या आधारावर मदत केली' वगैरे टिनपाट स्पष्टीकरणं देत बसू नका. हेच अपेक्षित आहे.
पंप्रंनी सुद्धा हे केलं असतं तर आमच्या मनातली त्यांची प्रतिमा उजळली असती. पण ते तर अजून 'दुनिया को समझ रहा हुं' मोडमध्ये आहेत म्हणे.
नशिब अकेने आधीच 'दुनिया समजून' घेतली आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसने १५ वर्षात दिल्लीत केलेले घोटाळे निस्तरायला २५-३० वर्षे मागावे लागत नाहीयेत.

------ आश्वासन देताना १०० दिवसात प्रत्येकाच्या खात्यात १५,००,००० रुपये जमा होतील असे होते... १०० दिवस गेले, १ वर्षे सरले... १५ लाख काय १५ रुपये पण जमा झालेले नाहीत.
<<

अरेरे, तुम्हाला अजुन मिळालेच नाहीत का पंधरा लाख? Lol उगी. उगी आपण मोदीकाकांच घर उन्हात बांधु हा.

हा व्हिडीओ बघा आणि मोदिंनी काय आश्वासन दिले होते ते एकदा नीट कान उघडुन ऐका. अर्धवट माहीतीवर पंधरा लाख, पंधरा लाख करु नका सारखे

Pages