Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर पकड्या
पुणे ५२ बघितला . बराचसा कळला
पुणे ५२ बघितला .
बराचसा कळला . जितका कळला नाही त्याबद्दल फार वाईट वाटले नाही .
प्रायव्हेट डिटेक्टिव ईतका उदास , सुस्त , गोन्धळलेला कसा काय??
आणि कामाच्या बाबतित ईतका वेंधळा कसा काय ?
करमचंद आनि व्योमकेश बक्शी ( वरिजनल) बघितलेली पीढी आहे आमची
दोन दिवसांपूर्वी सिंड्रेला
दोन दिवसांपूर्वी सिंड्रेला बघितला. अतिशय सुंदर आहे सिनेमा. जाहिरात नाहीये. त्यामुळे जास्त टिकणार नाही थियेटर मध्ये. परतू चे रिपोर्ट्स पण चांगले आहेत . एक दोन बघून आलेत . परतू रियल स्टोरी वर आधारित आहे आणि अतिशय छान आहे असा रिपोर्ट
परतू सत्यकथेवर आधारित आहे आणि
परतू सत्यकथेवर आधारित आहे आणि किशोर कदम यांचा अपेक्षित उत्तम अभिनय एवढीच त्याची जमेची बाजू आहे. तद्दन फिल्मी, क्लिशे संवाद, प्रसंगबांधणी आहे. तो राधा ही बावरी वाला हिरो कथेत येतो आणि तेव्हापासून तर अगदीच बालिश वाटतो!! उगीच २ तास खेचले आहेत. सगळ्यात बेस्ट शेवटी खर्या आयुष्यातल्या परतू आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मुलाखती दाखवल्यात तेवढ्याच!
आत्ता परतु आणि सिंड्रेलाची
आत्ता परतु आणि सिंड्रेलाची टीम आलिय, चला हवा येऊद्या मधे. पण चित्रपटांवर चर्चा नाहीच जास्त. ह्यांची फालतु स्कीटस चालु.
कालचा बरा तरी होता. स्कीटस
कालचा बरा तरी होता. स्कीटस जरा चांगली होती आणि संघर्षच्या टीमबरोबर जरा जास्त गप्पा होत्या.
हल्लीच डीडी वर मंडी सिनेमा
हल्लीच डीडी वर मंडी सिनेमा पाहिला. नंतर नंतर खूप बोर झाले. काय म्हणून ह्या सिनेमाचे क्लासिक सिनेमा म्हणून कौतुक होते?
स्मिता पाटील ला भडक साड्या, मेकअप मध्ये बघवत नाहीय.
अॅक्टिंगही काहीच्या काहीच वाटली.
शबाना आझमी खास आहे.
बापरे आणि कसले नावाजलेले कलाकार आहेत सिनेमाभर. पण सिनेमा नक्की काय प्रभावासाठी शेवटपर्यंत पहायचा असे झाले.
स्मिता पाटीलवर लाईन मारणारा तो बावळा नट कोण आहे? कुठेतरी पाहिल्या सारखे वाटते.
रत्ना पाठक चा चेहरा तरुणपणा पासूनचा तस्साच राहिलाय असे वाटते. सिनेमात अगदी कुठल्याही क्षणी ती 'इंद्रवदन ...." अशी हाक मारेल असे वाटते.
बाजीराव पाहिला.. रणवीर इतका
बाजीराव पाहिला..

रणवीर इतका फास्ट बोलतो कि कुठ कुठ मी त्याचे सगळे शब्द कॅचच नै करू शकली
लोकांना तो आवडला..हि हॅज गट्स पण तो नेहमी असा जोरात धाडकन का बसताना दाखवलाय हमेशा कळेना मला
दिपिका आणि प्रियंका कधी नव्हे त्या आवडल्यात..
वाट लावली गाणं मला पन जीवावर आलं दिनेशदा.. खर तर ते अख्ख गाणचं..शब्द, नाच कैच नै आवडलं.. असो..
शेवटी जिवाला हुरहुर लागते सिनेमा संपल्यावर..
सबसे बडा रोग..क्या कहेंगे लोग हे शब्दशः खरय मात्र.. त्या दोघांचाही अंत असा व्हायला नको होता अस हमेशा वाटतं..
दिलवाले बघणार नै..शाहरुख्चा कुठलाच नै या जन्मी म्हणुन..
यातला एकही अभिनेता, अभिनेत्री विशेष आवडती नाही आणि भन्साळी तर अज्जिब्बात्तच नै तरी बघायला गेली फक्त इतिहासाबद्दल असलेल्या आकर्षणापायी.. बरा होता.. बराच बरा होता..
नाही सापडलं तर शेवटी टेसीने न
नाही सापडलं तर शेवटी टेसीने न भितीने एकलीच जाऊन आली पिच्चरला..
कोण जाणो उद्या शुक्रवार तर असले नसले शो पण हाती नै यायचे...
खतरनाक आहे.. कट्यार काळजात घुसली.. व्वाह व्वा बस एवढच निघतं.. शब्द थिटे पडलेत..
मला स्वतःला फिल्म बघण्यापूर्वी गाणी फारशी भावत नाही अपवाद हा ठरला.. कुठल गाणं नेमक कुणी कधी गायलं असेल याचा अंदाज शेवटी बरोबर निघाला..
चित्रपट पाहण्यापूर्वी सर्वात जास्त आवडलेल गाणं म्हणजे 'अरुणी किरणी' आणि त्याखालोखाल कव्वाली 'यार इलाही' .. बघताना तर काटा येतो.. डोळ्यांच नै माहिती पण कान मात्र तृप्त झालेत..
मला तरी 'शिव भोलाभंडारी' हे गाण इतक नै भावलं.. सतत कुठतरी आधी ऐकल्यासारखी धुन वाटते त्याची..
सचिन माझ्यासाठी सरप्राईझ पॅकेज होतं.. नच बलिए सरल्यावर तो आवडेनासा झाला होता.. सतत काय तो सचिनच दिसे.. तो निभावत असलेल कॅरेक्टर दिसणचं बंद झालं होत आणि का तर हमेशा मी मी मी चा स्वर दिसतो त्याच्या बोलण्यात.. पण यात डीट्टो खान साहेब च दिसलाय आणि दाखवला सुद्धा आहे..
शंकर महादेवन ने काही खुप अभिनय क्षमता दाखवली असं नै वाटल पण आहे ते काम छान निभावलय.. सगळ्यात जास्त तो खान साहेब सोबत हरतो त्यावेळी तिथे आवाज गेल्यामुळे जो दर्द आणि प्रतारनेचा अधिक त्याची गायकी कायमची सुटल्याचा जो भाव हवा होता तो नै जमला.. तिथं कळून येत तो गायक आहे अभिनेता नाही..
असो.. तरी ओव्हरऑल मी अजुनही त्याच नादात अडकलीए.. सुरेख...
माझ्या दोन्ही आवडत्या गाण्यात मला सचिनचा अभिनय खुप खुप आवडलाय..हातवारे..डोळे..गाण्याचे लिप्सिंग .. सगळ काही चपखलं..
सुबोध भावे सुद्धा छान.. हा रोल खुप साधा होता त्याच्या गट्स ला बघाव म्हटलं तर.. तो तर लंबी रेस का घोडा आहे..
अरे हां..
चित्रपट सुरु होण्यापूर्वी नटसम्राट चा प्रोमो बघीतला... १ जानेवारी २०१६ .. हा तर बघणारच मोठ्या पडद्यावर असं तेव्हाच ठरवलं मी
हेट स्टोरी-३ बघितला. झरीन खान
हेट स्टोरी-३ बघितला.


झरीन खान , खरोखर मैद्याच पोतं आहे. तीच्या लिपस्टीक चे कलर्स ही भयानक आहेत .
डेझीबेनचे फोर्मल्स मस्त. पण एक दोन सीन्स वगळता बाकी सगळा आनंद
करण सिन्ग पहिल्यापासूनच डोक्यात जातो , त्यामुळे नो कमेंट्स .
शर्मन बिचारा ऑड मॅन आउट . त्याला उद्योगपतीचा रूबाब पण धड धाखवता आला नाही आहे. झरीन खान सोबत " मी बाई माझ्या अंगावर पडली वगैरे , तर वाट ..." असा सावध वावरतो
कथानक चांगले होते पण मातेरं केल आहे. पोरखेळ बनवला आहे.
"इसक मेरा " गाणं मलातरी फार कॅची वाटलं.
मच अवेटेड 'वजीर' पाहिला.
मच अवेटेड 'वजीर' पाहिला. खिळवून ठेवणारा सिनेमा. अप्रतिम संवाद. पर्फेक्ट लांबी. व्हेरी इन्टेन्स मूव्ही.
बुद्धिबळाचा वापर कसा केला जाऊ शकतो याची ही बुद्धीमान गोष्ट.
अमिताभला साष्टांग प्रणिपात. फरहान 'छा' जाता है. फरहान फॅन्सना ट्रीट आहे. अदिती गोड दिसते. सर्व सहायक कलाकारांची अचूक निवड केली आहे. गाणी पार्श्वभूमीला आहेत आणि छान आहेत. पण सिनेमाचा हीरो आहे 'डायलॉग्ज'. अभिजित देशपांडेंनी फारच भारी काम केलं आहे.
पहिला हाफ अक्षरशः सुन्न करतो. दुसर्या हाफमध्ये जराशी पकड सैल होते. पण शेवट परत होल्ड करतो.
रिव्ह्यूज मिक्स्ड आहेत. पण माझा रिव्ह्यू नि:संदिग्ध आहे- वजीर पहाच!
महत्त्वाची सूचना: बारा वर्षांखालील मुलांना नेऊ नका.
अलीकडेच प्रेमम् नावाचा
अलीकडेच प्रेमम् नावाचा मल्याल्म सिनेमा पाहिला...George नावाच्या तरुनाच्या आयुश्यात आलेल्या ३ मुली..
दिग्दर्शन , अभिनय, म्युसिक सर्वच बाबतित छान....
भिवनी भवाई हा केतन मेह्ताचा
भिवनी भवाई हा केतन मेह्ताचा पहिला सिनेमा पाहिला. गुजरातीतला हा एकमेव सिनेमा आहे जो पूर्णपणे पाहीला. या सिनेमाबद्दल विद्यार्थी चटर्जींनी असं म्हटलंय की " केतन मेहताने जर या सिनेमानंतर निवृत्ती घेतली असती तरी त्याचं नाव भारतीय सिनेसृष्टीतला मैलाचा दगड म्हणून घ्यावं लागलं असतं" .
विद्यार्थी पुढे म्हणतात की हा सिनेमा हसवतो देखील आणि शेवटी नि:शब्द करून टाकतो. सुन्न करून टाकणारा अनुभव देतो. केतन मेहता हा काय ताकदीचा दिग्दर्शक आहे याची ओळख जगाला या सिनेम्याने करून दिलीय. त्याला मिळालेले पुरस्कार पाहता हा सिनेमा गुजरातीत व्हावा हे केतन मेहताचं प्रादेशिक सिनेमाला दिलेलं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं योगदान आहे.
नसीरुद्दीन शहा, ओम पुरी, स्मिता पाटील, मोहन गोखले, बेंजामिन गिलानी (बाम मधला छत्रसाल राजा), सुहासिनी मुळ्ये अशी जबरदस्त मंडळी अभिनयाचं डिपार्टमेंट सांभाळण्यासाठी आहेत. सर्वांचाच अभिनय जबरदस्त आहे. नसीर,ओम, स्मिता यांची मातृभाषा गुजराती नाही हे जाणवत नाही.
ही गोष्ट अस्पृश्य (भंगी) समाजाचा एक काफिला गावाकडून शहराकडे निघालेला असताना एका रात्रीचा त्यांचा मुक्काम पडतो, तेव्हां त्यातील एक जण सूत्रधार म्हणून सिनेमाची गोष्ट सांगतो. ही गोष्ट चक्रसेन नावाच्या सणकी राजाची आहे. नसीरुद्दीनने या पात्रामधे जे रंभ भरलेत त्याला तोड नाही. मुळात पात्र अत्यंत ताकदीने उभे केलेलं आहे.
या राजाला मूलबाळ नसतं. मोठ्या राणीला बाळ झालेलं असतं, पण प्रधान आणि राजज्योतिषी कपट कारस्थान करून "त्याचं तोंड पाहील्यास राजाला तत्काळ मृत्यू येईल" असं भविष्य सांगतात. राजा त्या बाळाला मारण्याचे आदेश देतो, पण सैनिक त्याला नदीत सोडून देतात. ते बाळ भंगी समाजाच्या एका प्रमुखाला सापडतं. ही भूमिका ओम पुरीने केली आहे. ओम पुरी अशा भूमिकांसाठीच जन्माला आले असावेत. बारीक सारीक तपशील आणि अत्यंत नैसर्गिक अभिनया वि. नसीर ने मुद्दामून निवडलेला थिएट्रीकल अभिनय हे द्वंद्व पाहण्यासारखे आहे.
तो त्याच्या पच्याला (दीना पाठच्यालाआपण या मुलाचा सांभाळ करूयात असे सुचवतो. हा मुलगा (मोहन गोखले) अस्पृश्य म्हणून मोठा होतो.
इकडे राजाला पुत्र हवा असेल तर राजवाड्यात वाव (बावडी - सगळीकडून पाय-या असलेली विहीर) बांधली तर पुत्र लागेल असे सुचवण्यात येते. त्याप्रमाणे चक्रसेन राजा वाव बांधायला घेतो. तिला अनेक वर्षे लागतात. इकडे त्याचा खरा मुलगा मोठा होऊन स्मिता पाटीलशी लग्न करायची स्वप्नं पाहत असतो.
वाव बांधल्यावर दुसरी समस्या उभी राहते. ती म्हणजे काही केल्या पाणीच लागत नाही. ३२ लक्षणांनी युक्त पुरूषाचा बळी दिला तर पाणी लागेल असे सांगण्यात येते. अशा पुरूषाचा शोध सुरू होतो. तो मोहन गोखले शी येऊन थांबतो.
स्वतःला मूल व्हावे म्हणून एक बाप आपल्याच मुलाचा तो अस्पृश्य आहे या गैरसमजातून बळी देतो. अशी या सिनेमाची लाक्षणिक कथा आहे,
मात्र सिनेमा खरंच सुन्न करतो. अनेक ठिकाणी भाष्य करत राहतो. अनेक गोष्टींवर बोट ठेवतो. तो कुठेही आसूड ओढण्याचे काम करत नाही. नासीरच्या भूमिकेमुळे काही अंशी ब्लॅक ह्युमरच्या अंगाने सिनेमा जातो. जातीव्यवस्थेवरचं मूक भाष्य मेंदू पोखरून काढत राहतं.
आवर्जून पहावा असा हा सिनेमा आहे.
डी डे पाहिला. मजा
डी डे पाहिला.
मजा आली.
इरफानखान सारखे कलाकार आहेत ईंडस्ट्रीमध्ये म्हणून अश्या चित्रपटांमध्ये मजा आहे. अन्यथा फॅन्टम होण्याची शक्यता असते.
एकदा तर नक्कीच बघायला हवा.
मी काल जुना गुमनाम
मी काल जुना गुमनाम बघीतला..
गुमनाम है कोई गाण असणारा.. अडीच तासाच्या चित्रपटाने माझ्या सहनशक्तीचा अंत केला..
सहसा होत नै माझ्यासोबत अस पण खुप बोर झाली मी..आणि क्लायमॅक्स म्हणजे कळस आहे..जुने चित्रपट आवर्जुन पाहते मी पण हा कंटाळा येईस्तोवर ताणतो .. मला वाटल मेहमुद चा काही सॉल्लीड्ड रोल असणार पण नै.. मनोज कुमार इन्स्पेक्टर असल्याचा आधीपासुन शक होता.. बर शेवटी खुन नेमके कसे केले तेपन नै दाखवलं
सहसा होत नै माझ्यासोबत अस पण
सहसा होत नै माझ्यासोबत अस पण खुप बोर झाली मी
>>
ही कुठली मराठी आहे? भोजपूरमधली का?
टीना, कापली होती का फिल्म ?
टीना, कापली होती का फिल्म ? खून कसे केले ते नाही, पण कुणी केले ते दाखवतात न शेवटी ? आणि तो पण अगाथा ख्रिस्ती च्या कथेवर आधारीत होता.
जूने सस्पेन्स चित्रपट पण चांगले होते ( ज्यूवेल थीफ, इत्तेफाक वगैरे ) आता त्या काळचे तंत्र वगैरे जूनाट वाटते, आणि प्रिंटही खुपदा खराब असते.
नाही दा, फिल्म कापली नव्हती
नाही दा,
फिल्म कापली नव्हती पण ते हरेक खुनाच्या आधी नंदा आणि मनोज कुमारच गाण.. परत परत तेच संवाद बोर झाले.. मी म्हटल कि खुन कसे केले ते नै दाखवले अन डायरेक्ट शर्माजी अधिक मदनलाल उगवला.. तो शेवटी म्हणतो कि किटी आणि आणखी कुणाला तरी त्याच्यावर शक आला होता तेपन लिंक नै दिली कारण मरेपर्यंत तरी तसल काही दाखवलेलं नै त्यात..
पादुकानन्द >>
सहसा प्रमाण भाषा मी पेपर मधेच लिहायला वापरते इथं विचार व्यक्त करताना नाही म्हणून जशी बोलते तशीच लिहिते सुद्धा.. इथं कुठ तोंडी/लेखी परिक्षा द्यायची आहे मला..
.. हा जर अर्थ कळत नसेल तर मान्य ..
वजीर पहिला . फरहानचा अप्रतिम
वजीर पहिला . फरहानचा अप्रतिम अभिनय , अमिताभ बच्चंन बरोबरची त्याची जुगलबंदी , घट्ट पटकथा , सर्व पात्रांचा अचूक अभिनय यांची मस्त भट्टी जमलीय. बुद्धीबळ खेळाचा छान उपयोग केलाय. सस्पेंस थ्रिलर असल्याने जास्त लिहित नाही. अभिजित देशपांडेचें संवाद मस्त जमलेत. या चित्रपटाच्या निमित्ताने बर्याच दिवसांनी सुरेल संगीत ऐकायला मिळालंय. सुरुवातीचं तेरे बिन तर अप्रतिम !!! फरहान एकदम सही दिसलाय . कुठेही चित्रपट अतार्किक वाटत नाही. मस्ट watch कॅटेगरी !!!
बाकी चित्रपट सुरु असताना फोन सायलेंट मोड वर ठेवावा , अर्जंट कॉल असल्यास बाहेर जाऊन बोलावे हे भान भारतीय प्रेक्षकांना कधी येणार
जाई. इंडीयन एक्स्प्रेस मधे
जाई. इंडीयन एक्स्प्रेस मधे वजीर बद्दल एक शंका वाचकाने लिहिलीय. समीक्षकाने काही फ्लॉज आहेत असे लिहिलेय, पण काय ते लिहिले नाहीत. ते संपादीत केले असावे अशी शंका पण त्याच वाचकाने दिलेली आहे.
टीना,
मी तो दुसर्या रीलीजच्या वेळी पाहिला, तर पहिल्या रीलीजच्या वेळी बघितलेल्या माझ्या बहिणीने सांगितले की काही सीन्स कापलेत, म्हणून शंका आली
सिंड्रेला आमच्याकडे चॅनेलवर दाखवला. साध्याश्या परीकथेला दिलेले दृष्यरुप अप्रतिम आहे. उदा, चेटकिणीने भोपळ्याचा रथ केला आणि उंदराचे घोडे, या वाक्याचे चित्रीकरण सुंदर आहे. पण... मुद्दलात सिंड्रेला आणि राजकुमार झालेले कलाकार तितके देखणे वाटले नाहीत मला.
वजीर मी पण पाहिला काल. छान
वजीर मी पण पाहिला काल. छान होता पण थोडासा प्रेडीक्टेबल होता (काय प्रेडीक्टेबल वाटले ते नाही सांगत इथे).
इक्स, ज्वेल थीफ हजार वेळा
इक्स, ज्वेल थीफ हजार वेळा पाहून पोसलेल्या लोकांना असले फुसके सस्पेंस ५ मिनीटात प्रेडिक्टेबल होतात बरं
पण तरी अमिताभ-फरहान- जॉन-नील अशा कास्ट साठी जरूर बघावा.
टिना, गुमनाम बद्दल माझेही हेच
टिना, गुमनाम बद्दल माझेही हेच झाले होते.
रहस्ञ पट म्हणून हिंदीत इत्र कुठला ज्वेल थीफ च्या आसपासही पोचू शकणार नाही.
ज्वेल थीफ ला तोड नाही.
ज्वेल थीफ ला तोड नाही.<>>>> +
ज्वेल थीफ ला तोड नाही.<>>>> + तिसरी मंझिल! विजय आनंदला तोड नाही. त्यानं रहस्य पट करतानाच असले भन्नाट केलेत.
वजीर पाहिला. अमिताभला दंडवत.
वजीर पाहिला. अमिताभला दंडवत. सोबत काम करून किती पिढ्यांना तो अनुभवसमृद्ध करणार आहे कोणास ठाऊक! देव त्याला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो!
वजीरची कथा चांगली आहे, पण सिनेमा अजून चित्तथरारक करता आला असता. लांबी वाढली असती तरी चाललं असतं. अजून सशक्त कारणं पुरवता आली असती. अजून करामती दाखवता आल्या असत्या. कथेत बरेच कच्चे धागे राहिले आहेत. त्यामुळे शेवटाकडे चित्रपट येतो त्यावेळी 'अरेच्या! आपलाच पोपट झाला' असं वाटू लागतं. पण पुन्हा एका चालीमुळे सगळे धागे जुळवले जातात. पण ते 'जुळवले' जातात, जुळून आले असते तर आणखीन मजा आली असती.
टीना + १०००००. गुमनाम , ज्या
टीना + १०००००.
गुमनाम , ज्या प्रमाणे रहस्य , उत्कंठा वाढवतो , तितकाच त्याचा रहस्य्भेद पुचाट आहे .
पाषाण नावाची एक कादंबरी - याच कथेसारखी वाचलेली आठवते.
ती जास्त खिळवून ठेवणारी होती.
ज्वेल थीफ , तिसरी मंझिल ला अनुमोदन . एकदी रहस्यपट नाही पण नेहमी आवडलेला - अमिताभ बच्चन चा मजबूर .
<पाषाण नावाची एक कादंबरी -
<पाषाण नावाची एक कादंबरी - याच कथेसारखी वाचलेली आठवते>
तो अॅगथा क्रिस्तीच्या 'अॅण्ड देन देअर वेअर नन' ऊर्फ 'टेन लिट्ल निगर्स' या कादंबरीचा अनुवाद होता. ती स्वतंत्र कादंबरी नव्हती. 'गुमनाम' अर्थातच अॅगथाआजींच्या कादंबरीवर आधारलेला आहे.
अँड देन देअर वेअर नन आणि
अँड देन देअर वेअर नन आणि मर्डर ऑफ रॉजर अक्रॉइड हे त्या काळातले क्रांतीकारी ट्रेंड होते.
आणि मर्डर ऑन ओरियंट एक्सप्रेस पण. गुमनाम मध्ये त्याचे काय केलेय माहिती नाही पण पाषाण कादंबरी मात्र जबरदस्त रुपांतर होते.
ओक्के . फार पूर्वी शाळेत
ओक्के . फार पूर्वी शाळेत असताना वाचली होती . माहितीबद्दल धन्यवाद
तिसरी मंझिल पण एकदम डेंजर
तिसरी मंझिल पण एकदम डेंजर होता. शम्मी कपूर कोट घालून आरश्यात बघतो त्या सीनला आता सस्पेंस माहिती अस्ला तरी "ओ एम जी""!! होतं ....
Pages