छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड

Submitted by केदार on 2 September, 2015 - 09:08

तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की

औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.

मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.

अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते. Wink

अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.

shivaji_tweet.JPG

आता शोएबच्या लेखाचे खंडन.

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.

शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.

पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश हिणकसपणावर बोलतात हाच विनोद आहे. सेनापती यांना चूक लक्षात आली असेलच. ईच्छा रिकाम्टेकड्या किळसवाणे लिखाण करणार्ञांकडूनअपे़क्षा नाहीत. शहाणपणाची तर त्याहून नाही.

>>महेश हिणकसपणावर बोलतात हाच विनोद आहे. सेनापती यांना चूक लक्षात आली असेलच. ईच्छा रिकाम्टेकड्या किळसवाणे लिखाण करणार्ञांकडूनअपे़क्षा नाहीत. शहाणपणाची तर त्याहून नाही.

निर्लज्जपणाचा कळस आहे रे बाबा ! Sad

ॐ मोबाइल वरून टीका करणे कठीण आहे. वेड घेउन फडकावला जाणार्यांची खबरबात आयडी राहिला तर घेउन.
सेनापट्तींनी संदर्भ का मागितले या खुलासा केलेला नाही. माझी अख्खी पोस्ट इथे कॉपी करा. त्यांच्या प्रश्नांचा संबंध काय हे कळू द्या. आधी नीट मराठी शिकत मग पुढच पुढे...

महेश,

हिंदीत एक वचन आहे - नंगेसे खुदा भी डरता है,
समोरच्याने कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलं म्हणून आपणही त्या पातळीवर यावं का हा विचार प्रत्येकाने करावा.
बाकी जिथे प्रत्यक्ष अडल्या नारायणाने गाढवाचे पाय धरले, आपण दुर्लक्ष करु शकतो ते करावं.

संदर्भासह स्पष्टीकरण द्या ह्याला मार्क जास्त असतात. त्यामुळे संदर्भ दिला तर नीट चर्चा होउ शकते. नुसती विधान करायला काय 'कोणीपण' करेल.

तेंव्हा चुक तुम्हीच ध्यानात घ्या.

कॉपरमाईन यांच्याशी सहमत.
सेनापती, तुम्ही प्रतिवाद करताय चांगलं आहे. पण उपयोग शून्य.

जो मायनस यांना कुठले वस्त्र कुठे गुंडाळाव याची जाण आल्याचे पाहून बरेच वाटले.
सेनापती, तुमच्यावर इतका वेळ घालवला याचे वाईट वाटत आहे.

सकुरा तुम्ही डॉक्टर आहात का? नेहमीच्या आवडीने विरुद्ध की लिहिताय।ह्या आवडीने एक आणि......
<<

त्या आयडीच्या लिहीण्यात होणार्‍या चुका पाहील्यास त्यांना बहुतेक असे म्हणायचे असेल की
"सकुरा तुम्ही डॉक्टर आहात का? नेहमीच्या आयडीने विरुद्ध लिहिताय आणि ह्या आयडीने एक आणि......"

>>पुढच्या जन्मात बघु डॉ.होता आले तर...

ते नाही झाल तरी, या सुनियाद आयडी मागच बेण पुढच्या जन्मी ब्राम्हण म्हणुन जन्माला येईल आणि हा ब्राम्हण द्वेष जो पसरवला त्याची स्वतःच शिकार होईल. जे पेराल तेच उगवेल.

या अशा प्रकारचा जातीय द्वेष पसरवणार्यांपेक्षा मायबोली . कॉम चे प्रशासन यावर कंट्रोल न ठेवल्याने जास्त जबाबदार राहील. अशा प्रकार्च्या समाज कंटकांना वेळीच आवरण्या साठी कायदा आणि सुव्यवस्थेची (प्रशासना कडून) गरज आहे.

धागा पुर्नजन्म कडे वळायला लागला वाटत.
या जन्मातले ब्राम्हण मागच्या जन्मात कोण असतिल?.
मी या जन्मी क्षत्राणी आहे मागच्या जन्मी पण क्षत्राणीच होते व पुढील जन्मपण तोच असणार आहे.

केवळ मायबोलीवर या स्थळावर सभासदाचा आय डी मेला तर पुर्नजन्म मिळतो, मिळण्याची शक्यता असते.

मानवाचे जिवन पुर्ण झाल्यावर (मृत स्थिती येते), त्यानन्तर पुर्नजन्म शक्य नाही. जे काही करायचे आहे ते याच जिवनात करा. पुर्नजन्म केवळ कल्पना आहे.

पुढच्या जन्मी मला ब्राह्मणाचा जन्म मिळाला तर बरेच होईल. सगळ्यांचा द्वेष करून ब्राह्मणद्वेष म्हणून गला काढण्याची कला प्राप्त होईल. सर्व मीडीया माझ्या बाजूने असेल. माझ्या जमातीत एकाही व्यक्तीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती म्हणून मला गळे काढता येतील.

माझं राज्य अबाधित असावं म्हणून लोकांच्यात भांडणं लावण्याचे उद्योग मला मिडीयाला हाताशी धरून करता येतील. त्यासाठी दंगली घडवून आनता येतील मुझफ्फरपूर, पुण्यातल्या एका मुस्लीम सॉफ्टवेयर इंजिनियरच्या हत्येमधे त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवणा-याबद्दल पाकिस्तानात जा अशी दमबाजी करता येईल. एक गुप्त संघटना काढून विचारांना नाही तर विचारवंततरनाच नाहीसे करता येईल. त्यांच्या हत्येवर विनोद पसरवता येतील.

इतिहास म्हणून मुस्लिमद्वेष पसरवता येईल. त्याचा ओव्हरडोस झाला की ख्रिश्चन असा क्रम लावण्यात येईल. कधी शीखांविरुद्ध गरळ ओकता येईल. हे सर्व करून मला नामानिराळे राहता येईल आणि कुणी माझ्याकडे बोट दाखवले रे दाखवले की लगेच देशद्रोही, ब्राह्मणद्वेष अशा शिव्या देता येतील. सोशल मीडीयावर तर आईबहीणीवरून शिव्या देता येतात याचे प्रात्यक्षिकच गेल्या वर्षा दीड वर्षात घडलेले आहे.

गिरे तो भी टांग उप्पर हा माझा बाणा राहील.

हे उत्तर ज्या आयडीने हिणकस कमेण्ट लिहीलेली आहे त्याला उद्देशून आहे. इतरांनी त्यात उडी घेण्याचे कारण नाही.
इतके दिवस या संस्थळावर होत असलेले मुस्लिमद्वेषाचे लिखाण हे कारवाईस पात्र असून ही कुणी तसं केलेले नाही. तसंच त्यात काय विशेष अशी सवय सर्वांना लागलेली आहे. पण आपल्यावर बोट दाखवले गेले की लागलेच गळे काढण्याचा ब्राह्मणद्वेष नावाचा जो प्रकार आहे तो सर्वांच्याच ध्यानात आलेला आहे.

हा हा हा, मी काय लिहील म्हणे हिणकस? अहो, तुम्ही काय कराव काय नाही हे मी कोण सांगणार.
एवढच म्हणालो जे पेराल ते उगवेल.

>>इतके दिवस या संस्थळावर होत असलेले मुस्लिमद्वेषाचे लिखाण हे कारवाईस पात्र असून ही कुणी तसं केलेले नाही. तसंच त्यात काय विशेष अशी सवय सर्वांना लागलेली आहे.

मग त्यांच पण तेच होईल. ते मुस्लिम म्हणुन जन्म घेतील. काळजी नसावी. सतत प्रक्षोभक लिखाण वाचून कंटाळा आला. कोणाच्याही बाजूने का असेना.

मायबोली प्रशासनाने लक्ष घालावे. काहीतरी फिल्टर पाहीजे. म्हणुन तसे लिहीले. तुम्हाला उद्देशून काही लिहीणे म्हणजे गाढवा पुढे वाचली गीता....

(गाढवा पुढे ... ही म्हण आहे. तरी कोणी स्वतःस गाढव म्हणत असेल तर तो त्यांच्या बुद्धीचा दोष समजावा किंवा खरच मनुष्य रुपी गाढव समजावे. हा हा हा)

सुनियाद, हे जे सारे लिहिले आहेत ना त्याच्या उलट चालू होते अनेक वर्षे, म्हणुन तुम्ही जे लिहिले आहे ते व्हावे असे नाही. ते तसे होणे दुर्दैवी आहेच. पण का होत आहे ते नाही लिहिलेत.

आमच्या महान राजाविरुद्ध खोटे लिहिणा-या केदार यांचा निषेध.
हा घ्या पुरावा
http://indiafacts.co.in/aurangzeb-a-life-of-tolerance/

हा काय पुरावा आहे म्हणुन ओरडणा-न्या "रायसिंग इन्टोलरंट ईंडियात" राहणा-यांनी आधी,
त्यादिवशी आपल्या त्या ह्या कशा "पिअर रिव्युवड" ब्लॉग्ल च्या लिंका देउन सावरकरांबद्दल अतिशय आदराने सभ्य भाषेत लिहुन जनजागृती करत होत्या? त्यांना हा जाब विचारावा.
त्या आणि त्यांची गँग तुम्हाला "योग्य सभ्य भाषेत" उत्तर देतील".

शुक्रीया.

काहीही हा पंत.
मी एवढ पुरावा दिला असतनाही तुम्ही काहीही लिहीता...
थांबा आता वकिलांकडे तक्रारच करतो तुमची...

बाळाजीपंत, भारतीयांनी दिडशे वर्षांची गुलामी सोसली नाही तर १००० वर्षांची गुलामी सोसलीय हे माझे मत आहे. एका अतिशय हिन, हिंस्त्र आणि रानटी जमातीने, शांत आयुष्य जगणा-या एका साध्या लोकांच्या समुहावर आक्रमण करुन त्यांच्या समुहाचे वाटोळे केले. दुर्दैवाने इथल्या समुहात जातपातीच्या, उच्चानिचतेच्या चुकीच्या कल्पनांमुळॅ कधीच एकी नव्हती. या समजुतींमुळॅच इथल्या लोकांनी आपल्याच लोकांविरुद्ध बाहेरच्या जमातीला मदत करुन त्यांना इथल्या फुटीची कल्पना करुन दिली आणि त्याचा पुरेपुर फायदा त्या जमातीने घेतला.
\

ह्या होलोकॉस्टची माहीती बाहेरच्या जगाला मिळणारच नाही कारण ही १००० वर्षांची गुलामगिरी तेव्हाही कोणी मानली नव्हती आणि आजही कोणी मानणार नाही. स्वतःच्या इतिहासाकडे तटस्थपणे पाहण्याची दृष्टी आजही या देशात कोणाला नाही. या १००० वर्षांच्या गुलामीची मुळॅ समाजात इतकी खोलवर रुजली आहेत की आज त्या होलोकॉस्टबद्दल बोलुन नुकसानच होणार आहे. होलोकॉस्टपासुन काही धडा घेण्याइतका प्रगल्भ हा समाज आजही झालेला नाही.

कधीकधी वाटते इंग्रज जर इथे आले नसते तर आज पुर्ण भारत दार अल इस्लाम झालेला असता. अर्थात तो तसा करायचे प्रयत्न आजही चालु आहेत.

व्हॉटसप्पवर एक छान फॉरवर्ड वाचला या संदर्भात..

औरंगजेब रोडचे नाव अब्दुल कलाम मार्ग झाल्यावर तिथली वर्दळ कमी झाली, कारण कलामांच्या मार्गावर चालणे सोपे नाही...... Happy

Pages