माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडून आज दुध भांड्यामध्ये लागलं (जळाल)त्या दुधाला जळका वास लागला आहे. वास घालविण्यासाठी काय करु? प्लीज मद्त करा.....

का ही ही करता येत नाही. अल्टिमेट वास असतो तो. Sad
दही लावा, अन मग भरपूर हिंग घालून कढी करा. कदाचित वास दबेल..

http://www.maayboli.com/node/48616 हि रेसीपी करायला घेतली लगेच वाचून पण थोड्या वेळाने पाहते तं काय, कायच्या काय झालय. आता काय करु?

लवकर मदत करा. लाईट आलेत आताच, परत जाण्याच्या आधी सांगा.

Biggrin

नारळाच्या वड्या केल्या पण वड्या न होता भागराळ झाल्या. वड्या थापल्याच गेल्या नाहीत..
माकाचु?
२ वाट्या खवलेले नारळ त्यात तेव्हाढीच साखर आणि एक वाटी दूध या प्रमाणाने केल्या.

काल मी ग्वाकोमोल बनवलं घरी नि त्यात थोडासा लिंबुरस घातला.. फ्रिजमधे ठेवुन पण आज सकाळी त्याच्यावर काळपट थर आला होता .. थराखाली सगळं चांगल दिसत होतं .. माकाचु?
लिंबु नाही घालायचा का? माबोवर चट्णी विभागात पण रेसिपी नाहीयं

ग्वाकामोले खरं तर ताजाच करायचा पदार्थ आहे. आधी करुन ठेवाय॑ची वेळ आल्यास डब्यात काढल्यावर वरतून परत लिंबूरस पसरुन त्यावर क्लिंग रॅप लावून ठेवल्यास काळं पडणं कमी होईल.
डब्यात काढल्यावर वरुन अलगद पाणी ओतून साधारण अर्धा इंच थर राहिल असे ठेवल्यास पण ऑक्सिडायझेशन थांबू शकते असे वाचले आहे . सर्व्ह करताना पाणी ओतून टाकायचे. मी कधि करुन पाहिले नाही.

ओक्के मेधा.. वीकडेज मधे विसरुन जाते म्हणुन काल करुन ठेवलं Sad
मेक्सिकन डिशेस सोडुन अजुन कशात वापरता येईल?

वत्सला अजून एक वाटी दूध घालून परत शिजवायला ठेव व घट्ट होत आलं की गॅस बंद करून कढईत ढवळत रहा दूध पावडर घातली तर अजूनच बेश Happy

ग्वाकामोले काळेच पडते. पण आता एक युक्ती कळलीये मला ज्यामुळे म्हणे ते काळे पडत नाही.
ग्वाकमोले केली की त्यात त्याचे ते मोठे 'बी' असते ना ते पुन्हा त्या तयार केलेल्या ग्वाकोमोलेत बुडवुन ठेवायचे. त्यामुळे मग काळे पडत नाही. मैत्रिण म्हणाली हा उपाय हमखास लागु पडतो. मी ४ तसांनी तरी हिरवेच राहिलेले पाहिले आहे पण दुसर्‍यादिवशीचे रुप नाही पाहिले.

सुनिधी, छान युक्ती सांगितलीस.
मी वरुन वाईट विनेगर घालते अर्धा सेमी थर येइल इतपत आणि व्रॅप लावते. मीठ अगदी आयत्यावेळी घालते.

तेजस्विनी १९ , दूध जळलं तर काहीही करू शकत नाही फेकून देण्याशिवाय. पण दूध न जळण्यासाठी दुध तापविणार असशील ते पातेलं अगदी कॉपर बॉटम असले, तरी पाण्यानी धूवून घे दूध त्यात ओतण्यापूर्वी आणि पातेल्यात दुध ओतण्यापूर्वी अगदि थोडं पाणी पातेल्यात घाल. रोज ही सवय लावून घे. असं केल तर दूध कधीही खालून लागत नाही.

मी डोसा करयचा म्हणुन ताण्दुळ आणि उडिद भिजत घातले. इकडच्या स्विस थन्डीत अंबणार नाही म्हणुन ओव्हन मध्ये ठेवले. तिन दिवस झाले तरी दोन्ही तसेच्या तसेच. जरा पण आंबलं नाही. काय करावे ?

आणि मी उप्पीट करतो तेव्ह ते मोकळे होत नाहे, नेहमी लगदाच होतो. कमी पाणी घातले कि रवा कच्चा लागतो. नेमके कसे करायचे उप्पीट?

कुलु, तिथे ड्राय यीस्ट मिळेल, ती वापरून बघ. डाळ तांदूळ मिळून तीन कप असेल तर १ टिस्पुन ड्राय यीस्ट घाल.
तरीही तपमान उबदार लागेलच. अगदीच पिठ वर आले नसेल तर बराच कांदा, मिरची कापून घाल आणि थोड्या वेळाने डोसे कर. थोडेसे बेसन दूधात मिसळून त्यात घातलेस किंवा एखादा बटाटाही किसून घातलास तरी चालेल.

उप्पीट करताना रवा बराच ( खमंग वास येईपर्यंत ) भाजावा लागेल. तेलात किंवा तूपात भाज. आणि मग मोजून ( मध्यम आकाराच्या रव्याला सव्वा पट ) गरम पाणी टाक. त्याच पाण्यात थोडे ताक किंवा लिंबाचा रस टाक.
रवा अगदी बारीक असेल तर तेवढेच आणि जरा जाड असेल तर दिडपट पाणी लागेल.

kulu, oven आधी गरम केले होते का?
१५ मिनीट अवन तापवून बंद करा आणि त्यात पिठाचे भांडे ठेवा. आतला दिवा सुरु राहु दया.

दिनेश तु सांगितलेला प्रयोग करुन पाहतो, आता. उप्पीट पण तु म्हटल्याप्रमाणे करतो.

वत्सला, हो गरम केला होता अवन. पन दिवा सुरु नव्हता ठेवला. ते करतो आता.

आणि डोसा करण्यास अगदी नलायक असे न आंबलेल्या पण भिजलेल्या त्या तंदुळ आणि डाळीचे काही करता येइल का? मागच्या वेळी टाकुन द्यावे लागले Sad

डोशासाठी पीठ खूप आंबले नाही तरी चालते की. मी बरेचदा पीठ केल्यावर तासाभरातच दोसे केले आहेत. चांगले होतात.

डोशासाठी पीठ खूप आंबले नाही तरी चालते की. मी बरेचदा पीठ केल्यावर तासाभरातच दोसे केले आहेत. चांगले होतात. + १.
यीस्ट घातल्याने चव बदलते. अव्हनला पायलट फ्लेम नसेल तर साध्या पातेल्यात एक दोन कप पाणी उ़कळून ते गरम पातेले पाण्यासकट पीठाच्या भांड्याच्या बाजूला ठेवावे. दोनेक तासांनी परत पाणी गरम करून ठेवावे.

मी डोसा करयचा म्हणुन ताण्दुळ आणि उडिद भिजत घातले. इकडच्या स्विस थन्डीत अंबणार नाही म्हणुन ओव्हन मध्ये ठेवले. तिन दिवस झाले तरी दोन्ही तसेच्या तसेच. जरा पण आंबलं नाही. काय करावे ? >> ग्राईंड करुन अंबवायला ठेवलत ना? की नुसतं भिजवुन?

Pages