माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
वर्षा_म. पावटे(पांढऱ्या
वर्षा_म. पावटे(पांढऱ्या रंगाचे) गोडसर असतात आणि कडवे वाल जरा कडू असतात.
साल कठीण असल्याने पावटा कडसरच
साल कठीण असल्याने पावटा कडसरच असतो. त्यातल्या त्यात ओल्या पावट्याची चव चांगली असते. त्याला भरपूर गूळ आणि खोबरं घालावं लागतं. म्हणजे आम्हीतरी घालतो.
पावट्याची उसळ करताना मीपण
पावट्याची उसळ करताना मीपण गुळ, खोबरे, गोडा मसाला घालूनच करते, पण कडवे असतातना त्यांना पावट्यापेक्षा जास्त गुळ घालावा लागतो. माहिती नाही पण आमचे कोकणातले पावटे पूर्वी आमच्या घरी करायचे ते कडसर नसायचे, गोडसर होते. हल्ली बाजारातून आणते तेपण मला थोडे गोडूस वाटतात आणि कडवे कडू वाटतात.
पाणी बदललं नव्हतं. मी गुळ
पाणी बदललं नव्हतं. मी गुळ कुठल्याही भाजीत घालत नाही. पुढच्यावेळी गुळ, ओले खोबरे घालुन करेल
शुक्रवारी वाल भिजत घातले
शुक्रवारी वाल भिजत घातले होते. रविवारपर्यंत लक्षात होतं मग बाईने पाणी काढून टाकलं आणि झाकून ठेवले. काहींना मोठठे मोड आले काहींना नाही. काय चुकलं आणि आता काय करू?
शुक्रवारी भिजत घातलेले वाल
शुक्रवारी भिजत घातलेले वाल रविवारपर्यंत पाण्यातच होते? साधारण १२ तासांनी उपसायला हवेत. असो..
बाजारात खूप वेळा वाल असेच खराब मिळतात. बर्याच वालांना ढिम्म मोड येत नाहीत. पुढच्या वेळेस खात्रीच्या दुकानातून (साधारण पेण, अलिबाग वगैरेसारख्या कोकणातल्या भागातून आलेले वाल जिथे मिळत असतील तिथे) आण. मी पण हा अनुभव सलग ३ वर्षं घेतला होता.
मोड आलेले वाल हे मोड न
मोड आलेले वाल हे मोड न आलेल्या वालांपासून वेगळे करता (निवडता) येतील. मोड आलेल्या वालांचं बिरडं आणि मोड न आलेल्या वालांना परसबागेत कुंडीत पुरून त्यांना पानं फुटली तर दोन पानं आल्यावर त्यांची जागूच्या कृतीने पालेभाजी करता येईल.
मोठठे मोड आले काहींना नाही.>>
मोठठे मोड आले काहींना नाही.>> मोठ्या भांड्यात भरपुर पाणी घेउन वाल टाकायचे अन
खाली राहिलेले[ नेहमी न मोड आलेले खाली राहतात ] फेकुन द्यायचे
वरचे वर वर हल क्या हाताए काढुन घ्यायचे
अश्विनी के >> पाणी काढून
अश्विनी के >> पाणी काढून टाकले होते. कधी ते आठवत नाही. पण २४ तासानंतर काढले होते.
वाल महालक्ष्मी सरस मधून घेतले होते.
अकु. - तसे करून बघते.
केश्वे, तीन वर्षं वाल
केश्वे, तीन वर्षं वाल पाण्यातच होते?
सुग्रणींनो, मेरा क्या चुका
सुग्रणींनो, मेरा क्या चुका बतावो...
काल छोले केले होते. १ मो.कांदा - मध्यम १ टमाटो - हळद - २ च. एवरेस्ट छोले मसाला एवढचं होतं. तरी ते छोले जाणवण्याइतपत आंबटसर झालेत. काय कारण असावं?
धणा-जिरा पावडर नाही वापरली यावेळेस.
१ मो.कांदा - मध्यम १ टमाटो -
१ मो.कांदा - मध्यम १ टमाटो - हळद - २ च. एवरेस्ट छोले मसाला एवढचं होतं.>> त्यात छोले होते की नव्हते?
टोमॅटो गावठी जातीचा होता का? सध्या तेच मिळताहेत आणि सॉलिड आंबट असतात.
मीठ कमी पडलं का?
मी छोल्यात किंचीत साखर/गूळ घालते. आंबट चव बॅलन्स होते त्याने.
छोले मसाल्याच्या पाकिटावर वाच
छोले मसाल्याच्या पाकिटावर वाच जरा इन्ग्रेडीयन्स मधे आमचुर पावडर लिहीलेय का
योकु, छोले मसाला जास्त झाला
योकु, छोले मसाला जास्त झाला का?
हम्म... पहावं लागेल. बहुतेक
हम्म... पहावं लागेल. बहुतेक आमचूर पा. असतेच रेडिमेड मसाल्यात. अन मी तो मसाला + टो. असं होतं. सा/गुळाची चव नाही घातली. मंजूडी म्हणतेय तसं टोमॅटो पण अतीआंबट असू शकेल.
वाटीभर भिजवून शिजवलेल्या छोल्यांकरता २ टी स्पू मसाला मला नाही वाटत जास्त झाला असेल.
टॉमेटो खरच खूप आम्बट आहेत या
टॉमेटो खरच खूप आम्बट आहेत या वेळी.:अरेरे: काल टॉमेटो घालुन बटाट्याचा रस्सा केला, बाकी चव छान होती, पण बराच आम्बट झाला होता.
योगु मन्जूडीने लिहील्याप्रमाणे मी पण नेहेमी साखर घालते चवीला. एवरेस्ट छोले मसाला आणी चाट मसाल्यात आमचूर असतोच. पण त्यात टॉमेटोची भर पडल्याने झाले असेल तसे.
योकु, अशा वेळी बटाटा घालायचा
योकु, अशा वेळी बटाटा घालायचा त्यात... आंबटपणा कमी व्हायला मदत होते. टोमॅटो जास्त आंबट असेल तर छोल्यांची चवही आंबट होते ह्याबद्दल अनुमोदन.
आंबट चव कमी करण्यासाठी गोडी
आंबट चव कमी करण्यासाठी गोडी वाढवावी पदार्थाची. तिखटपण कमी करण्यासाठी आंबटपणा वाढवावा. असे माझ्या एका मैत्रिणीने सांगितले होते.
>>>आंबट चव कमी करण्यासाठी
>>>आंबट चव कमी करण्यासाठी गोडी वाढवावी पदार्थाची. तिखटपण कमी करण्यासाठी आंबटपणा वाढवावा.

आणि गोडपणा कमी करण्या करता तिखटपणा वाढवायचा का?
योकु , १.छोले पाण्यातुन काढुन
योकु ,
१.छोले पाण्यातुन काढुन ते पाणी न वापरण त्या मुळे आंबटपणा वाढतो.
२. थोडे छोले हाताने कुसकरुन ग्रेव्हित मिक्स कर, टेस्टच बदलुन छान लागेत हे सगळ्या कड्धान्याच्या उसळींसाठी करु शकतो
थोडे छोले हाताने कुसकरुन
थोडे छोले हाताने कुसकरुन ग्रेव्हित मिक्स कर, >>> +१
वेल, महालक्ष्मी सरस मध्ये पण असे वाल मिळाले? आणि आपण ते गावाहून आलेले म्हणजे चांगलेच असतील म्हणून घ्यायचे विकत
सिंडे
हायला घारूअण्णा!
हायला घारूअण्णा!
दुधी भोपळ्याचा कोफ्ता
दुधी भोपळ्याचा कोफ्ता करण्याचा प्रयत्न होता..
मी दुधी किसुन घेतला, मीठ घालुन पाणी सुटल्यावर त्यात डाळीचे पीठ आणि चकली भाजणी (आणि तिखट, ओवा वगैरे) घातलं. त्याचे कोफ्ते तळले तर आतून पिठाळ. मिश्रण थोडे पातळ केलं भजी सारखा तरी तसंच.
काय घोळ झाला कळलं नाही. काय चुकलं असेल?
माझ्या माहितीप्रमाणे दुधीचे
माझ्या माहितीप्रमाणे दुधीचे कोफ्ते आधी वाफवून घेतात .
म्हणजे मिश्रणाचे गोळे करुन
म्हणजे मिश्रणाचे गोळे करुन आधी कोथिंबीरीच्या वड्यांसारखे चाळणीत ठेवुन गरम पाण्यावर वाफवून घेउ का?
आता खरं तर भीती वाटतीये अजून एक प्रयोग करायला.
हो. नलिनीने इथे एक रेसिपी
हो. नलिनीने इथे एक रेसिपी लिहिली आहे कोबीच्या वड्यांची तीच कृती दुधीसाठी पण चालेल.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/47836
निशा मधुलिकाच्या कृतीनुसार
निशा मधुलिकाच्या कृतीनुसार अर्धा किलो दुधीला फक्त ५० ग्राम(अर्धा कप) बेसन लागते.
कोफ्ते नीट तळले गेले नाहीत
कोफ्ते नीट तळले गेले नाहीत का? तेल नीट तापलं होतं ना, आंच खूप जास्त अथवा खूप कमी नव्हती ना हे आठवून बघा. पर्फेक्ट तापलेलं तेल असलं तर काही प्रॉब्लेम यायला नको. वाफवून घेत नाही मी कधी. थेट तळते. जरा क्रिस्पी, ब्राऊन तळायचे. मस्त होतात. अनेकदा, करीत जायच्या आधीच गट्टमही होतात
प्रीतीसखी, दुधी किसल्यावर
प्रीतीसखी, दुधी किसल्यावर घट्ट पिळून घ्यायचा, पाणी जराही नको आणि मगच तिखट मीठ मसाला घालून कोफ्ते करायचे!
Pages