आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी होस्टेल वर राहत असतांना चा
मी होस्टेल वर राहत असतांना चा हा प्रसंग......प्रसंग सांगण्या आधी थोड सविस्तर सांगणे गरजेचे आहे...त्यानुसार....एका इमारतीच्या चारही बाजूने मुलींना राहण्यासाठी खोल्या होत्या आणि मधल्या भागात काकी (owner) राहत असत ..प्रत्येक ब्लोक मध्ये एक छोटे किचन आणि एक खोली या पद्धतीने बनवलेले आणि प्रत्येक खोलीत दोघींच्या राहण्याची सोय....आमच्या बाजूने ६ खोल्या होत्यात.....पण आम्ही सर्व एवढे मिळून राहत असू कि कोणती खोली नेमकी कोणाची हे लक्षात राहत नसे आणि तसे लक्षात ठेवण्याची गरजही कधी भासली नव्हती....
काकींच्या घरी त्यांची तीन मुले, काका आणि एक आजारी आजी (काकांची आई) राहाय्चे....आजी गेल्या ६ वर्षांपासून आजारी होती आणि पलंगावरच होती..आजीचा तिच्या परिवाराकडून फार छळ होत असे, तिला नीट खायला प्यायला देखील दिले जात नव्हते. तिच्याशी कोणी एका शब्दानेही नीट बोलत नसत....एक तर आजाराने आणि आपल्याच लोकांच्या अशा वागण्याने आजी खूप दुखी असायची....तिचे हे हाल आमच्याने बघवत नसे, आजी आणि आमच्यात मात्र जिव्हाळ्याच नातं होतं......आजीशी चर्चा करायला आम्हाला खूप आवडायचे..आजी सुशिक्षित होती, तिच्याजवळ भरपूर knowledge होते...आणि होस्टेल च्या सर्वच मुलींशी चर्चा, गप्पा करत असल्याने तिचे knowledge up to date hote...कोणाला परीक्षेच्या शुभेच्छा देऊ दे, तर कोणाला किती मार्क्स मिळाले..पुढे काय करावे हे मार्गदर्शन आजीकडून सतत मुलींना मिळत राहायचे...आम्ही आपल्या डब्यातलं जेवण, गावावरून आणलेला खाऊ आजीला आवर्जून देत असू आणि आजीही ते आवडीने खात असे..
एकदा आठवड्याभरयाच्या सुट्टीनंतर मी घरून होस्टेल वर परतले तेव्हा आजी गेल्याची दुखद बातमी मिळाली...मन चरचरले शेवटची भेट झाली नाही म्हणून खूप वाईट वाटले...पण 'जाचातून सुटली एकदाची' असे बोलून आम्ही आमच्या रोजच्या कामाला लागलोत..तीन दिवस गेले असावेत बहुदा... अचानक थंडी भरून ताप आल्याने मी संध्याकाळी जरा लवकरच office मधून सुट्टी घेऊन घरी आले....आजीचा बारावा व्हायचाच होता म्हणून काकींकडे बरीच पाहुणे मंडळी होती...मी डॉक्टर कडे जाऊन आले...काहीतरी खाऊन, औषध घेऊन मी झोपी गेले तेव्हाच सर्व मुली जागेवरून उठल्या. मला disturbance नको म्हणून दुसऱ्या खोलीत अभ्यासाला जाऊन बसल्यात. बराच वेळ गेला असेल बहुदा... माझा बेड जोरात हलतोय असे वाटून मी दचकून उठले..बेड अजूनही हलत होता, माझा भास असेल असे समजून मी उठून बसले बेड आणखी जोरात हलायला लागला...हाताच्या लाम्बीवरच स्वीच होते मी लाईट लावलेत अगदी समोर असलेल्या घड्याळात बघितले बरोबर बारावर काटा होता. मी अतिशय घाबरले. कोणाला आवाज दयायला म्हणून दाराकडे जाणार तर मला आजीची सावली दिसली म्हणजे स्पश्ट नाहि पण ती आजीच आहे हे कळ्त होते.....मी अक्षरशः कोसळणार तेवढ्यात तोंडातून किंकाळी फुटली आणि सर्व धाऊन आल्यात.....मला काहीतरी दिसले, मला काहीतरी दिसले मी एवढंच बडबडत होते...मैत्रिणीनी मला शांत केले आणि थोडावेळात मी झोपी गेले....दुसऱ्या दिवशी तापामुळे झालेला हा भास असावा अशी ठाम समजूत मी स्वताची करवून एकदम नॉर्मल झाले होते..... पण....
त्या रात्री परत एकदा मला आला तसाच्या तसा तंतोतंत अनुभव आणखी दुसऱ्या मुलीला आला....वाचता वाचता पुस्तक पोटावरच ठेवून झोपी गेलेली ती अचानक बेड हलल्याने जागी झाली बेड वर उठून बसली तर समोर आजी दिसून गायब झाली....ती इतकी घाबरली कि कितीतरी वेळ तिच्या तोंडून आवाज निघेना...तिच्या किंचाळीने आम्ही तिथे पोहोचलो.... आणि हकीकत ऐकून माझी नजर मात्र प्रथम घड्याळीकडे वळली आणि त्यावेळी घड्याळात रात्रीचे १२.०३ झाले होते...... तिची स्थिती मीच समजू शकत होते कारण मी देखील तो अनुभव घेतला होता....इतर मुलींच्या घोळक्यात दोन्ही विचारांच्या मुली होत्या आणि हा निव्वळ भास आहे असे घोषित करून वातावरण नॉर्मल करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला कारण पुढेही तिथेच राहायचे होते...
तिसऱ्या दिवशी कोणी कोलेज तर कोणी नौकरीच्या निमित्त्याने बाहेर पडलेत होस्टेल वर त्यादिवशी फक्त एकंच 'रीना' नावाची मुलगी शिल्लक होती...आज तिला कुठेही जायचे नव्हते आणि बिंदास न घाबरणारी म्हणुन ओळखल्या जाणार्या हिला सोडून आम्ही सर्व आमच्या कामाने निघून गेलोत....दुपारी तीन वाजता अभ्यास करत बसलेल्या रीनाला कोणीतरि बाजुला उभे अस्ल्याचे जानवले, बेड हलण्याचा भास झाला तिने झटक्याने दाराकडे वळून पहिले आणि अक्षरशः आजी तिला तिच्या शेजारी दारात दिसली आणि नाहीशी झाली....त्या क्षणाला सर्व पुस्तके टेबल खुर्ची फेकून ती थेट बाहेर येऊन बसली आणि जोपर्यंत आम्ही सर्व आलो नाहीत ती तब्बल ४-५ तास मैनगेट वर रडत घाबरत बसून होती.....त्या दिवसा नंतर मात्र एक एक करून सर्वांनी होस्टेल सोडले.....आजीच्या बारव्याला आम्ही कोणीही तिथे नव्हतो...आजही विचार करतांना वाटतं काय होतं हे..तीन वर्षात कधीच असा अनुभव आला नवता...मग आता का?? आजीला काही सांगायचे होते का??कि ती शेवटची भेट घ्यायला म्हणून आली होती?? कि हे सर्व फक्त मनाचे खेळ होतेत....भास होते तर तब्बल तिघींना सारखेच भास कसे?? सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरीत...
कोणालाही विश्वास बसणार नाही असा हा अनुभव आहे.... पण १००% खरा आहे.......एक शब्दही कल्पनेतला नाही.......याच दिवसांपासून मी कमीत कमी अशी काही शक्ती, प्रकार नसतातच असा जिद्दीने वाद घालणे सोडून दिला आहे......
का माहित नाही पण तुझी पोस्ट
का माहित नाही पण तुझी पोस्ट वाचून असं वाटतं की त्या आज्जी तुम्हाला घाबरवायला नसतील आल्या तिथे.
मलापण वाटतं..की त्या
मलापण वाटतं..की त्या घाबरवायला नसतील आल्या, शेवटची भेट घ्यायची असेल.
नक्किच .... त्यान्ना शेवट्च
नक्किच .... त्यान्ना शेवट्च काहितरि सांगायच असेल असही वाटत आता ....... कधी कधी वाटत त्यान्चा म्रुत्यु नैसर्गीक नसेल झाला बहुदा म्हणुन ते सांगाय्ला त्या आल्या असाव्यात
हि घटना घडायच्या काही दिवसा
हि घटना घडायच्या काही दिवसा आधी देखील असेच काहीसे अमानवीय होस्टेलच्या मुलींबरोबर घडले होते पण एकतर माझी नौकरी शिक्षण आणि मुळात त्यावेळी असल्या गोष्टींवर विश्वास नसणे म्हणून मी जरा दूर च होते किंवा तेवढ्या गांभीर्याने ऐकले नाही …. झाले असे कि जवळच्याच एका दुसर्या हॉस्टेल वर राहणाऱ्या काही मुली आणि आमच्या सोबत राहणाऱ्या काही मुलींनी प्लान्चीट कि काय असा प्रकार चक्क अर्ध्या रात्री केलेला … तो फसलेला आणि या सर्व जाम घाबरलेल्या…कारण त्यातल्याच एका जाणत्या मुलीने सांगितले म्हणे बोलावतांना आलेली आत्मा आपण परत पाठवू शकलो नाही…. यात एक अपर्णा नावाची मुलगी होती ती जरा जास्तच घाबरलेली ….
झाले गेले सगळे सरले …. तिसरे दिवशी त्या होस्टेलच्या आणि आमच्या होस्टेलच्या या सर्व मुली कुण्या एका कॉलेज च्या मुलीच्या घरी गेल्या होत्या तिच्या घरचे वातावरण म्हणे जरा उदासवाणेच होते …. नुकताच तिचा आर्मीत असणारा भाऊ शहीद झाला होता…त्याची बायको आणि दोन छोटी मुल यांना पाहून सर्वच कळवळले अपर्णा जरा जास्तच दुखी झाली …. त्यात या भावाचे शव आणले गेले ते फोटो यांना दाखवण्यात आलेत त्यातल्या तिच्या भावाच्या एका फोटो कडे अपर्णा कितीतरी वेळ टक लावून बघत होती …. ती म्हणाली सुद्धा म्हणे किती छान होता हा दिसायला सुद्धा अस व्हायला नको होतं सर्व मुलींमध्ये हिचीच कळकळ फार जाणवली सर्वांना…शवाचा फोटो हि कितीतरी वेळ बघत बसली होती …. तिथून परत येतांना अपर्णा रस्त्यात घेरी येउन पडली …तिला कसतरी घरापर्यंत आणले …पण हि शुद्धीवर च नव्हती …. शुद्धीवर आली तेवापासून हीच वागणं खूप बदललं …कुणालाही ओळखत नव्हती आणि फार विचित्र वागत होती …. कधीही घेरी येउन पडत असे …. बोलणे वागणे सगळच बदलले …. . तिच्या आई बाबा आणि भावाला सुद्धा हि आपलीच अपर्णा आहे अस वाटत नव्हतं…… पुढल्या ४-५ दिवसात तिचे बाबा तिला तिच्या गावी परत घेऊन गेलेत …नंतर काय झाले आम्हाला कुणालाच माहिती नाही
या घटने नंतर लोकांनी बरेच काय काय तर्क लावलेत पण नेहेमी हसत खेळत राहणारी अपर्णा प्लान्चीट करण्यापासून ते फोटो पहिल्या नंतरच कसकाय बदलली …काय असेल या सर्वांमागे ?
बाप रे!
बाप रे!
कोडंच आहे
कोडंच आहे
मी एका विशिष्ट अवस्थेचे
मी एका विशिष्ट अवस्थेचे अमानवीय किंवा तर्कच लावता येणार नाही असे दोन जिवंत किस्से ऐकले आहे ……. किस्से म्हणजे फार पुरातन किंवा आजी पणजी च्या युगातले नाही … हल्ली हल्लीच घडलेले …. पण ते ज्यांच्यासोबत घडले आहे त्यांना आणि आम्हाला सुद्धा याचे उत्तर अजून कधीही सापडू शकले नाहीये ….
आमचे एक परिचित आहेत (त्यांना मी दादा म्हणते) दादाच्या वडलांना पक्षाघाताचा झटका आला आणि ते बेशुद्ध झाले त्यांना एका प्रायवेट हॉस्पिटल मध्ये भरती केले गेले…. ते बरेच दिवस कोमा मध्ये असतांनाच एका अगदी लहान मुलांची स्कूल बस अपघात झाल्याने त्यातील सर्व मुलांनाही त्याच हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते …. त्यापैकी बरेच मुलं दगावले सुद्धा होते त्यांच्या बॉडी सुद्धा शव विच्छेदनासाठी इथेच आणलेल्या होत्या …. हा अपघात घडल्याच्या अगदी दुसर्याच दिवशी काकांना शुध्द आली पण काका विक्षिप्त वागू लागले होते …. अशिक्षित असणारे शेतकरी काका इंग्रजीचा A सुद्धा माहिती नसणारे काका चक्क इंग्रजीच्या नर्सरी र्हाइम वगैरे गुणगुणत होते…बाबा ब्लँक शिप पासून ते जॉनी जॉनी लयीत गात होते …. ABCD म्हणत आणि खूप काय काय …त्यांची हि अवस्था २-३ दिवस होती म्हणे अगदी रात्रंदिवस …. घरच्यांना हे सर्व खूप आश्चर्य कारक होत …. मेन म्हणजे काका कोमातून बाहेर येतील एवढी सुद्धा आशा उरली नसतांना काका काही दिवसांनी ठणठनीत बरे झाले आणि पुढे तीनेक वर्ष मस्त जगले ……
दुसरी अशीच एक घटना घडली ती माझ्या एका चुलत बहिणीच्या मैत्रिणीच्या आई सोबत …… अगदी मागल्याच वर्षीची घटना …… त्या काकी एका इंग्रजी माध्यमिक शाळेच्या शिक्षिका … एक दिवस अचानक प्रचंड ताप आला आणि ताप डोकया पर्यंत जाउन शुध्द हरपून बसल्या …. त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती केले गेले दोनेक दिवसाच्या बेशुद्धी नंतर जेव्हा शुद्धीवर आल्यात बर्याच बदलल्या होत्या …. त्या खूप पुरातन काळातल्या… एकदम जुन्या कावियीत्रींच्या कविता चालीत आणि सुरात गुणगुणायला लागल्या होत्या त्यांच्या दोन जुळ्या मुली प्राध्यापिका आहेत…. त्या दोघींनीही त्यांच्या आईला एवढ्या वर्षात अस सुरात अन गोड आवाजात गातांना बघितले नव्हते त्यातल्या त्यात आईला कवितेची वगैरे आवड तर अजिबातच नव्हती अस त्या म्हणाल्या …. पण त्यांची आई गात असलेल्या कवितेचा संदर्भ जेव्हा त्यांनी इंटरनेट वरून वगैरे शोधला त्या अतिशय जुन्या कावियीत्रींच्या जुन्या कविता असल्याच त्यांच्या ध्यानात आलं ….आणि हे त्यांच्या परिवारासाठी शॉकिंग होत सगळं … आता त्यांची आई अगदी ठणठ्णीत आहे आणि त्या दिवसांमधील त्या कविता किंवा त्याचं गायन त्यांना काहीही आठवत नाही ……….
हे सर्व काय असाव ?? तर्क सापडू शकतील का काही ?
मी (वय १३) आणि माझी आतेबहीण
मी (वय १३) आणि माझी आतेबहीण (वय १५) एकदा घरात मागच्या दाराला भान्डी घासत होतो तेव्हा दुपारची वेळ होती ३ वाजले असतील बहुदा,मला अचानक आमच्या दोघीन्च्या मदुन कोणीतरी पुरुश गेल्याचा भास झाला नन्तर लगेच ती पण दचकली मी विचारले काय झाले तर म्हणाली की आता इथुन कोणीतरी आत गेले, तशी मी जागेवर उभीच रहीले आणि तिला माझा भास सान्गितला मग मात्र आम्ही दोघी जाम घाबरलो आत जाउन बघायाची हिम्मत्च होइना, घरात दुसर कोणिच नव्हत आणि दोघिनीही दारामागे कोणीतरी गेल्याचे पाहीले होते.शेवटी हिम्मत करुन दोघिनि जोरजोरात दरवाजा भिन्तीवर धड्कावून मागे कोणी नसल्याची खात्री करुन घेतली आणि नन्तर आत जाउन घरात सगलीकडे शोधल पण घरात कोणीच नाही. समोरच्या दाराला तर आई बाहेरुन कुलुप लावून गेली होती, मग ती व्यक्ती कोन होती आणि गेली कुठे हे कोड आम्हाला अजुन उलगडल नाही..........
मयी: जबरी किस्से! मला हा बाफ
मयी:
जबरी किस्से! मला हा बाफ जाम आवडतो.
संपले किस्से?
संपले किस्से?
हा किस्सा याआधी पोस्ट केला
हा किस्सा याआधी पोस्ट केला असेल तर सांगा. उडवेन.
माझे पप्पा कधीकधी मध्यरात्री घरी येत असत. आम्ही मुंबई-नाशिक हाय वे वर पडघे गावात रहायचो. त्या रस्त्यावर एक वडपा खिंड आहे, ती जागा शापित आहे असे म्हटले जाते. याची पपांना कल्पना होती. एके रात्री पप्पा ड्युटी संपवून बाईकवरून घरी येत होते. रात्री १चा सुमार असावा. एका बाईने त्या खिंडीत पप्पांना बाईक थांबवण्यासाठी हात केला. पप्पांनी गाडी आणखी वेगात पुढे नेली. तिथून ७-८ किमीच्या अंतरावर एक ओहोळ आहे, जिथे स्मशानभूमीही आहे. तिथे आल्यावर पप्पांना खांद्यावर कुणाचातरी हात जाणवला. सहज बाजूला वळून पाहिले तर ती बाई हासत हासत चालू बाईकवरून उतरून गेली व अदृष्य झाली.
ए, टोके!! काटा आला अगदी
ए, टोके!! काटा आला अगदी अंगावर!! कसले किस्से सांगतेस गं! बाप्रे!!
वॉव.... डेंजर किस्सा टोके..
वॉव.... डेंजर किस्सा टोके.. एखाद्याला भोवळ यायची अस काही पाहिल की...
मी चौथीला होती तेव्हाची
मी चौथीला होती तेव्हाची घट्ना

मी संध्याकाळी सुमारे ७-८ च्या दरम्यान माझ्या एका मैत्रीणीकडे जात होती तेही आई च्या नकळत
तिच्याकडे जाताना नेहमी एक गटार लागायच. मी तिच्याकडे जेव्हा नेहमी जायची तेव्हा मला कधीच काहीच वाटायच नाही पण त्यादिवशी अचानक खुप भिती वाटली आणि म्हणून मी पुढे गेलेच नाही नंतर घरी येउन अभ्यास केला, खेळली, जेवली पण जेवल्यावर थोड्या वेळाने मला साधी उल्टी झाली आणि नंतर रक्ताची त्या उल्ट्या तर थांबतच नव्हत्या तेव्हा घरात फक्त आई , छोटा काका तोही नुकताच गावावरुन आलेला तेव्हा बसं बाकी कोणी नव्हत माझ्या वडिलांची नाईट होती तेव्हा अंदाजे रात्रीचे ११ वाजले असतील दवाखाने बंद होते तेव्हा आमच्या बाजुला राहणार्या टॅक्सी वाल्याने आम्हाला एका डॉ. च्या घरी नेल तेव्हा तो डॉ. पण स्वतः बोलला की ही कुठे संध्याकाळी गेलेली का? त्याने नंतर सायन हॉस्पिटला अॅड्मिट करायला सांगितल सायन हॉस्पिटलातुन गोळ्या दिल्या तरीही उल्टी थांबता थांबत नव्हती मग घरी आल्यावर आईने माझ्या अंगावरुन पाव आणि सिगारेट काढली आणि देवाचा अंगारा लाउन झोपवल जी मी तेव्हा झोपली ती डायरेक्ट दुसर्या दिवशी संध्याकाळी उठली.
नंतर खुप डॉ. झाले तेव्हा रिपोट फक्त एकच की शरीरात पाणी नसल्याने रक्ताच्या उल्ट्या येत होत्या
माझी आई तेव्हा पासुन अजुनही संध्याकाळी जास्त कुठे पाठवत नाही
असा किस्सा माझ्या लहान
असा किस्सा माझ्या लहान भावाच्या बाबतीत झालेला आहे. आम्ही राहुरी कृषी विद्यापीठाच्या क्वार्टर्सला रहात होतो तेव्हा. भाऊ अग्दी दीड दोन वर्षाचा होता तेव्हा. मागे मोठी बाग होती. वॉल कंपाउंड, छोटसं गेट आणि त्यापलिकडे शेती डायरेक्ट नगर-मनमाड हायवे पर्यंत!
तर एका संध्याकाळी मी भावाला त्या गेटजवळ थोडं खेळवुन ७-७.३०च्या सुमारात घरात आणलं त्याबरोबर तो हॉलमधे जमिनीकडे विशिष्ट ठिकाणी बोट दाखवुन 'ते' 'ते' म्हणत रडायला लागला. अगदी थांबता थांबेना. त्या आधीच्या काळात आमच्या कॉलनीत ४ लहान मुलं काही ना काही कारणाने दगावली होती. आईला काही शंका आल्याने तिने आधी देवाजवळ दिवा लावुन, कुलदेवतेचा अंगारा भावाला लावला. नंतर तो जे झोपला ते एक रात्र आणि दुसरा दिवसभर. थेट दुसर्या दिवशी रात्रीच उठला.
बापरे.... आर्या तै काय डेण्जर
बापरे.... आर्या तै काय डेण्जर ना
मौ ,आर्या>> लहान मुल ,पक्षी,
मौ ,आर्या>> लहान मुल ,पक्षी, प्राणी हयांना अस काहीतरी लगेच जाणवत हे खर आहे म्हण्जे
आर्या, अंकु हे तर काहीच नाही
आर्या, अंकु हे तर काहीच नाही असे अनेक किस्से आहेत माझ्याकडे.
सांग ना मग टोके पटापट
सांग ना मग टोके पटापट
अंकु, >> लहान मुल ,पक्षी,
अंकु,
>> लहान मुल ,पक्षी, प्राणी हयांना अस काहीतरी लगेच जाणवत हे खर आहे म्हण्जे
लहान मुलांवरून आठवण झाली. मी लहान होतो दीडदोन वर्षांचा, तेव्हा ठाण्याला रहात असू. रात्री झोपलो की मला बारा वाजता एक प्रकारची जाग यायची. त्या अवस्थेत शरीर झोपलेलं असायचं, पण मन सक्रिय असायचं. मी शरीरातून निघून वरच्या छताच्या दिशेने तरंगत चाललो आहे अशी जाणीव व्हायची. रोज बरोबर बारा वाजता ही घटना घडत असे. बारा वाजल्याची आंतरिक जाणीव होत असे. अल्प वयामुळे प्रत्यक्ष घड्याळ कळण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. नाही म्हणायला सेंटजॉन चर्चचे ठोके ऐकू येत.
पुढे काही दिवसांनी हा प्रकार बंद झाला. लहान असल्यामुळे कुणाला सांगताही येत नव्हता. मात्र मला त्या वेळी यात काही वावगं वाटायचं नाही. हे सगळं सहज अन् नैसर्गिक वाटायचं. हे घडतांना आईबाबा दिसायचे, पण तेही असेच निघाले असणार असा विचार मनी येत असे.
आ.न.,
-गा.पै.
गामा, बापरे,एवढ्या लहान वयात
गामा,
बापरे,एवढ्या लहान वयात असे अनुभव? आणि ते ही अजुन लक्षात आहेत?
मलातर हे नक्कीच अमानवीय वाटतेय.
अरे आज शनी अमावस्या आहे आणि
अरे आज शनी अमावस्या आहे आणि तुम्ही सर्व लोक भुताचे किस्से सान्गताहात... बाप रे .... जय हनुमान ग्यान गुन सागर.. हनुमान चालिसा जपावि लागणार...
नामणदिवा |, १. >> एवढ्या लहान
नामणदिवा |,
१.
>> एवढ्या लहान वयात असे अनुभव? आणि ते ही अजुन लक्षात आहेत?
मला (आता मोठेपणी) वाटतं की सगळ्यांनाच असे अनुभव येत असावेत. पण कालांतराने आपण विसरून जातो. आपल्या आयुष्याची पहिली तीन वर्षे कुणालाच आठवत नाहीत.
माझं म्हणाल तर मलाही पहिली तीन वर्षे आठवत नाहीत. केवळ काही प्रसंग किंवा दृश्ये आठवतात. हा जो वरचा अनुभव आहे त्यातलं फक्त मी तरंगत चाललो आहे इतकंच प्रत्यक्षात आठवतं. आईबाबादेखील असेच निघाले असतील हा केवळ विचार (वा तर्क) मनी येई. हा प्रसंग वर्णन करून लिहितांना वाढवून सांगितला आहे.
२.
>> मलातर हे नक्कीच अमानवीय वाटतेय.
खरंय तुमचं!
मानवीय आणि अमानवीय यांतल्या सीमारेषा फार धूसर आहेत.
आ.न.,
-गा.पै.
इग्नोरास्त्रचालकांनी डोळे बंद
इग्नोरास्त्रचालकांनी डोळे बंद करून घ्यावेत. या धाग्यावरची ही माझी पहिली पोस्ट आहे.
सुप्यावरून पुढे गेल्यावर उंडवडी नावाचं गाव लागतं. तिथंच चोराची उंडवडी नावाचं गाव आहे. इथून आडरस्त्याला पुढे गेलं कि एक नाला आहे आणि तिथं चिंचेचं झाड आहे. तिथं कुणी येत जात नाही. पण तिथं दर अमावस्येला कोंबडी आणि लिंबू वाहीलेलं असायचं. तिथून दहा कोसावर असलेल्या मौजे खळबळवाडीच्या ग्रामस्थांनी ही काय भानगड आहे म्हणून छडा लावायचं ठरवलं. मग सापळा लावून काही ग्रामस्थ लपून बसले. बघतात तो काय , रात्री एक उडती तबकडी तिथं उतरली. त्यातून एक एलियन उतरला. त्याने एक कोंबडी (मारलेली) आणि लिंबू वाहीलं आणि तो निघणार इतक्यात ग्रामस्थांनी त्याला धरलं. सुरुवातीला अगम्य भाषेत बोलणारा तो एलियन दोन चार अस्सल शिव्या हासडून एक कानाखाली वाजवताच अस्सल मराठीत बोलू लागला. त्याचं अस झालं पंचक्रोशीत फेमस असलेल्या फुगीर नरशाच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेजवळ यांचं यान उतरलं होतं. तेव्हां फुगीर नरशाच्या भूताने त्यांना ताबडतोब झपाटलं. भूताला एलियन काय आणि स्थानिक काय , झपाटायला कुणीही चालतं. त्यातून ते भूत फुगीर नरशाचं. ते काही उतरायलाच तयार नव्हतं. मग या भूताच्या अंगात येण्याने जी भाषा कानी पडली त्यांना ती मराठी असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी मराठीतून भूताशी संपर्क साधल्यावर त्याने या झाडाखाली कोंबडं आणि लिंबू वाहण्याच्या अटीवर सोडतो असं वचन दिलं. तेव्हांपासून ते यान तिथं येत होतं.
मग ग्रामस्थांनी त्यांच्याकडून भली मोठी देणगी स्विकारून आता इथून पुढं आम्हीच कोंबडं वाहू असं आश्वासन दिलं. तिथं आता जत्रा भरते. बघायचीय का खरंच??? पत्ता सांगू का ?
आम्ही नाही जा !
हाहाहा.. एक नंबर पोस्ट
हाहाहा..
एक नंबर पोस्ट kiranyake..
मी पुढे गेलेच नाही नंतर घरी
मी पुढे गेलेच नाही नंतर घरी येउन अभ्यास केला, खेळली, जेवली पण जेवल्यावर थोड्या वेळाने मला साधी उल्टी झाली
..
देवाचा अंगारा लाउन झोपवल जी मी तेव्हा झोपली ती डायरेक्ट दुसर्या दिवशी संध्याकाळी उठली.
ए मउ, तू नासिकची कांय???? नासिकच्या फिमेल अशी भाषा बोलतात...
नाशिकच्या
नाशिकच्या फिमेल....??????????

हेम नाशिकच्या बायका म्हणायच्या का मुली म्हणायच्या यात गोंधळ झाला का तुझा....:)
गोंधळ अजिबात नाही. दोघीही
गोंधळ अजिबात नाही. दोघीही असंच म्हणतात, म्हणून हा शब्द वापरला..
नाय ती नासिकाची नाय... पण ती
नाय ती नासिकाची नाय... पण ती असचं बोलती
Pages