महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाईट घटना आहे ती. अन दिल्ली स्त्रीयांसाठी सुरक्षीत नाही असे माझे जुनेच मत (पूर्वग्रह म्हणा हवे तर) ..

.. पुरुष हे असे कसे वागू शकतात हेच न उमजलेला अत्यंत व्यथित.. "मी"

ह्म्म्म दुर्दैवाने खरे आहे. उत्तरेकडे बरेच भाग सुरक्षित नाहीयेत हे माझे पण मत आहे.
त्या मानाने दक्षिणेकडची राज्ये फारच सुसंस्कृत, सुरक्षित वाटतात.

माझेही ठाम मत आहे, दिल्ली हि कधीच सुरक्षित नाही व न्हवती.

सध्या तरी अनोळखी व ओळखीच्या भागात सुद्धा ज्यास्त उशीरा पर्यंत फिरु नये हाच दिसतोय....
एकटी स्त्री चार-पाच लोकांना कितीसा प्रतिकार करु शकते हाच मुद्दा आहे.
कराटे शिकून सुद्धा त्याचा वापर इथे(चार्-पाच पुरुषांसमोर) अपुरा पडू शकतो. विपन्स किंवा पेपर स्प्रे सुद्धा खास उपयोगी नाही ठरत....

.

मूळात सुरक्षित रहायचे असेल तर स्त्री ने जन्मूच नये. जन्मलेच तर एखाद्या स्त्री नातेवाईकाच्या पदराला धरून दिवसरात्र स्वतःला घरात कोंडून घ्यावे. आजोबा टाईप शेजार्यांकडेही खेळायला जाऊ नये. शाळेत कॉलेजात शिकू नये. अंगभर कपडे घालावे नि त्यावर एक पूर्ण बुरखा ओढून घ्यावा. एवढे करूनही
१. ़़़जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही घरात सुरक्षित आहात तर ते चूक
२. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तरूण नाही म्हणून सुरक्षित आहात तर ते चूक. अगदी महाराष्ट्रातही ४ महिन्याच्या बालिकेवर आणि साठ वर्षांच्या आज्जीबाईंवर बलात्कार होतात.
३. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कराटे वैगेरे येतात म्हणून तुम्ही सुरक्षित आहात तरिही ते चूक. मारामारी करण्यात एक्सपर्ट गुंडांचा घोळका आला तर तुम्ही कुठवर पुराल.

मूळात भारतात स्त्री म्हणून जन्मायची मोठ्ठी घोडचूक केलीत तर आता तुम्हाला देव, अल्ला, गॉड , वाहे गुरू इ. कोणीच सुरक्षित ठेऊ शकत नाही याची खात्री बाळगा.

'बालिकांवर बलात्कार करून त्यांना ठार मारणार्‍यां नराधमांवर दया दाखविणार्‍या राष्ट्रपतींचा आणि त्यावेळी मूग गिळून गप्प बसलेल्या सर्व असंवेदनशील लोकांचा जयजयकार असो! अशी एखादी घटना घडली की तोंडदेखली राणाभीमदेवी भाषणे संसदेत आणि बाहेर झोडणार्‍या नेत्यांचाही जयजयकार असो. याबाबतीत मी लिहिलेल्या लेखावरील प्रतिसादात राष्ट्रपतींची वकिली करणार्‍यांचाही जयजयकार असो.''

मूळात भारतात स्त्री म्हणून जन्मायची मोठ्ठी घोडचूक केलीत तर आता तुम्हाला देव, अल्ला, गॉड , वाहे गुरू इ. कोणीच सुरक्षित ठेऊ शकत नाही याची खात्री बाळगा. <<<
अगदी...
अतिप्रचंड महान भारतीय संस्कृतीचा विजय असो! Angry

वाचुन चिड आली... Angry पण उपाय सांगता येत नाही किंवा सुचत नाही.

कायद्याची भिती किंवा धाक किंवा आदर वाटावी अशी परिस्थिती नाही.

दिल्ली डीसीपी छाया शर्मा यानी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीवरून असे म्हणता येईल की, दिल्लीसारख्या सुरक्षिततेच्या पार बोर्‍या वाजलेल्या शहरात मुलींनी/स्त्रियांनी रात्रीच्या सिनेमाचा सोस टाळावा. ती दुर्दैवी मेडिकल स्टुडंट आपल्या मित्रासोबत रात्रीच्या सिनेमाला जाऊन नित्याची दिल्ली कार्पोरेशनची बस न पकडता खाजगी कॉन्ट्रॅक्टर्सद्वारा चालविल्या जाणार्‍या बस सर्व्हिस मध्ये चढली होती. त्या बसमध्ये असलेल्या सहासात पुरुष प्रवाशांसोबत जागेवरून सुरुवातीला भांडण झाल्याचे त्या मित्राने पुढे पोलिस जबाबात सांगितले आहे.

जे संशयीत आरोपी पकडले गेले आहेत ते अशा स्कूल बसेसमधील कर्मचारी आहेत ही आणखीन् एक धक्कादायक बातमी. म्हणजे दिल्लीतीलच नव्हे तर देशात ज्या ज्या ठिकाणी खाजगी कंत्राटदारांच्या स्कूल बसमधून मुलेमुली शाळाकॉलेजला येजा करतात त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो.

ज्या शाळेत आपली मुलगी जाते अन् तिथे जाण्यासाठी तिला स्कूल बसचा उपयोग करावा लागत असेल तर जागरूक पालक या नात्याने स्कूल मॅनेजमेन्टकडे बससाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्टाफची इत्थंभूत माहिती सर्व पालकांकडे गेली पाहिजे असा आग्रह धरणे.....[कोल्हापूरात आम्ही काही पालकांनी अशी मागणी एका शाळेच्या व्यवस्थापनाकडे केली होती, जी तत्परतेने पुरविली गेली.]

असो... खबरदारीचे उपाय वेळोवेळी पोलिस आणि सामाजिक संस्थाकडून प्रसृत केले जातात, तरीही माणसाचे जनावरात रुपांतर करणारी 'बलात्कार' ही या समाजाला लागलेली अशी काही एक कीड आहे की त्याविरूद्ध हमखास रामबाण उपाय निघून ती समूळ नष्ट कशी आणि केव्हा होईल हा नित्याचा प्रश्न बनला आहे.

अशोक पाटील

दक्षिणेतील राज्ये सुसंस्क्रुत वगैरे काही नाही. केरळ मध्ये स्वतःच्याच मुलींवर रिपीटेड बलात्कार करणार्‍या वडील, भाऊ आणि काका अश्या त्रयींना अटक केल्याच्या तीन चार बातम्या एव्ढ्यातच वाचल्या आहेत. न सोसून मोठ्या मुलींनी जीवही दिले आहेत. असह्य आहे हे सर्व.

बलात्कारी पुरुषाचा तो भागच कायमस्वरुपी निष्क्रिय करुन टाकावा...हीच योग्य शिक्षा होईल....आणि त्याच्या कपाळावर गोंदवा "मी आरोपी" म्हणुन.......किमान अश्या गुन्ह्यात तरी तालिबानी शिक्षाच योग्य आहे.... नको त्या गोष्टींवर तालिबानी फतवा काढण्यापेक्षा अश्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात नक्कीच तालिबानी धोरण स्विकारावे

उदयन....

"अश्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात नक्कीच तालिबानी धोरण स्विकारावे..."

देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाची या संदर्भात हीच भावना असेल....पण दुर्दैवाने आपल्याकडील कायद्यातील कलमांची अशी काही कुतरओढ केली जाते की शेवटी चित्र असेच समोर येते की आरोपी राहिले बाजूलाच अन् त्या पिडीत महिलेच्याच उरल्यासुरल्या अब्रुचे धिंडवडे कोर्टात निघतात.

तालिबानी धोरण स्वीकारले जाण्याचीही शक्यता फार धूसर आहे या खंडप्राय लोकशाही प्रणालीच्या देशात.

खरचं आहे.. असं जनावरासारखं कसं वागतात अचानक काही लोक कळत नाही. Sad
स्त्रीयांचा सिक्थ सेन्स चांगला असतो असे म्हणतात. असं काही इन्ट्युशन झालं तर ते सिरियसली घ्यायला पाहिजे. बाकी मला तरी वाटतं आपल्या सुरक्षिततेबद्दल स्त्रीया नेहेमीच जागरुक असतात. तरीही अशा घटना घडतातचं.
आम्हाला शाळेत असताना 'नैतिक शिक्षण' म्हणुन एक तास असायचा. पण त्याबद्दल कधी कोणी (विद्यार्थी/शिक्षक) सिरियसली विचार केल्याचं मला आठवत नाही. असा विचार करण्याची खरचं गरज आहे.

एकिकडे वैयक्तिक शस्त्र बाळगण्यावर कंट्रोल आणण्याचे वारे जगात वहात असताना मला भारतात वेळी अवेळी एकट्या दुकट्या फिरणार्‍या स्त्रीला शस्त्र बाळगण्याचा अधिकार असावा असे मनापासून वाटते आहे.
दिल्लीच्या घटनेतल्या मुलीने सगळ्या रेपीस्टसना तिथल्या तिथे मारले असते/ इजा केली असती तर समाजाचे काय वाकडे होणार होते? गँग रेप करणारी गलिच्छ कीड मारली गेली असती थोड्या प्रमाणात.

(आता लगेच ते पुरूष पण कुणाची तरी मुले, भाऊ आहेत असले खोटे मानवतावादी गळे काढू नयेत. ज्यांची ती मुले आहेत त्यांनी स्त्रियांचा आदर करायला शिकवले नाही तेव्हा त्यांच्याबद्दल कणभर सहानुभूती नाही)

(आता लगेच ते पुरूष पण कुणाची तरी मुले, भाऊ आहेत असले खोटे मानवतावादी गळे काढू नयेत. ज्यांची ती मुले आहेत त्यांनी स्त्रियांचा आदर करायला शिकवले नाही तेव्हा त्यांच्याबद्दल कणभर सहानुभूती नाही)
> +१०००००००००००००००००००००००००००००००००००००० वेळा सहमत

नक्कीच नीधप...... अश्या गंभीर परिस्थितीत मारले गेले तरी तो माफ असावा महिलेलेला... (अर्थात ह्या परिस्थितीची शहानिशा होणे आवश्यक आहे).... निदान शस्त्र परवाना महिलेंना मोफत वाटावा....

अत्यंत वाईट घटना..

त्या मुलीचे जे हाल नराधमांनी केले ते ऐकून सुन्न व्हायला झाले. घटना केवळ अत्याचारापरेंत सीमीत नाहिये. त्यानंतर त्या मुलीच्या शरीरावर रॉडने वार केलेत, ईतके की तिची आतडी Irreparably damage झाली.. का तर तिने प्रतिकार केला म्हणून तीला "धडा शिकवायचा" होता. ही मानसिकता अत्यंत लाजिरवाणी आहे.

भारतात खरेच स्त्रीयांना अत्यंत दुय्य्म वागणूक दिली जाते. कायदा बदलून हे सारे बदलेल असे वाटत नाही. आणि जेवढी कडक शिक्षेची तरतूद होईल तेवढा कन्व्हीक्शन रेट अजून कमी होईल. रस्त्यावर ठराविक वेळेनंतर फिरणारी स्त्री ही "मादी" नाही तर कोणाची तरी आई, बहिण, मुलगी आहे असा विचार जोवर रुजणार नाही तोवर असे गुन्हे घडतच राहणार.

स्त्रियांनी शास्त्र्योक्त मारामारीचे प्रशिक्षण घेणे, जवळ शस्त्र बाळगणे, प्रसंगावधान राखणे, सोबतीला कोणालातरी ठेवणे, शक्यतोवर असुरक्षित वेळी व असुरक्षित ठिकाणी एकटे न असणे याशिवाय शासनाने योग्य ते कायदे करणे, त्यांची अंमलबजावणी वेळच्यावेळी करून जरब बसवणे हे सर्व उपाय हतप्रभ ठरलेले आहेत. नराधम, राक्षस, जनावर अशी जाहीर विशेषणे मिळालेले पुरुष प्रदीर्घ कोर्टखटल्यामधून शेवटी सहीसलामत सुटलेले किंवा फार तर तीन ते सात वर्षे कैदेत गेलेले दिसत आहेत. संघटना, शासनदरबार व जनता यांना विस्मृतीचा शाप असून नवीन काही झाल्यावर मागचे प्रकरण 'चालायचेच, एवढा मोठा देश' या सदरात मोडत आहे. सामान्य माणसाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावे असे मनात येऊनही 'माझ्याच्याने काय होणार आहे' हा विचार त्यावर हावी होत आहे.

दिल्लीचा इतिहास सांगतो की लुटल्याशिवाय काहीही मिळत नाही. मागून मिळत नाही, हक्क म्हणून मिळत नाही. लुटावेच लागते. येथे इज्जतही लुटलीच जाते.

ज्या देशाची राजधानीच अशी तेथे इतर भूप्रदेशांचे काय बोलणार? तसेही, या विकृतीला संस्कृती, प्रादेशिकता, इतिहास यांच्या मर्यादा नसतातच. त्यामुळे निव्वळ दिल्लीच नाही तर संपूर्ण देशात हा राक्षस थैमान घालत आहे. त्याच्या त्या थैमानाचे कितीतरी प्रमाणातील स्वरूप समाजासमोर येतही नसेल.

डॉ. साती म्हणतात त्याप्रमाणे येथे स्त्रीने जन्मच घेऊ नये असे म्हणावेसे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. रोहन यांनी आज सुरू केलेला 'बदअमलाला कडक शासन' हा धागा व त्यातील माहिती या धाग्यावर प्रतिसाद देताना प्रकर्षाने आठवते.

मला वाटते तपासयंत्रणा, न्याययंत्रणा, शासन या सर्वांकडून कार्यक्षमरीत्या नजीकच्या भविष्यात काही फार ठोस होईल असे चित्र दिसत नाही. सामान्य माणसातील नपुंसक अलिप्तता रस्त्यावर उतरण्यास अपेक्षेप्रमाणे घाबरेलच.

बलात्कार सिद्ध झाल्याच्या आठ दिवसांच्या आत गुन्हेगाराला सर्वांसमक्ष कठोरातील कठोर शासन देण्याची किमान सलग दहा उदाहरणे शासनाने प्रत्यक्षात आणून दाखवावीत. 'जरब बसणे' हा एकच उपाय गुन्हा कमी करण्यासाठी जालिम आहे.

पण दुर्दैवी बाब अशी की एवढी सगळी चर्चा केल्यानंतरही अपेक्षा ठेवाव्या लागतात त्या याच निद्रिस्त यंत्रणांकडून! समांतर व सामर्थ्यवान अशी यंत्रणा अस्तित्वातच नाही.

-'बेफिकीर'!

दिल्ली किंवा उत्तर भारतातच नाही तर महाराष्ट्रात पण परीस्थिती वेगळी नाहीये. कोठेवाडी प्रकरण येव्हड्यात विसरण्यासारख नाहीये.

माझी माननिय भारत सरकारला विनंती आहे की दिल्लीचे "राजधानी पद" काढुन घ्यावे..ज्या राज्यात महिलांवरचे अत्याचार प्रचंड वाढत आहे...तिथले गुन्हे कमी करण्यात पोलिस आणि सरकार हतबल ठरत आहे... अश्या राज्याला "देशाची राजधानी" म्हणायला जनतेला लाज वाटायला लागली आहे....

अत्यंत संतापजनक घटना.

दिल्ली हि कधीच सुरक्षित नाही
स्त्री म्हणून जन्मायची मोठ्ठी घोडचूक केलीत तर आता तुम्हाला देव, अल्ला, गॉड , वाहे गुरू इ. कोणीच सुरक्षित ठेऊ शकत नाही याची खात्री बाळगा. <<<+१

काय बोलावं कळत नाही. ती मुलगी असुरक्षित ठिकाणी नव्हती आणि एकटीही नव्हती. सव्वा नऊ वाजता भरपूर राबता असलेल्या भागातून /बाजारातून बसमध्ये चढले होते ते दोघं. (जर चुकच शोधायची तर सरकारी बसमध्ये न चढता गर्दी नसलेल्या खाजगी बसमध्ये चढले एवढाच काय तो निष्काळजी पणा झाला. दिल्लीमध्ये वावरायच्या डुज अँड डोंट्स मध्ये हे एक सांगितलेलं असतं की एकट्याने प्रवास करत असलात तर खाजगी बसमध्ये, कमी गर्दीच्या बसमध्ये चढू नका. पण राजधानीच्या शहरात असे काही डूज अँड डोंट्स असणं हीच शरमेची बाब आहे)

दिल्ली असुरक्षित शहर आहेच. पण सव्वा नऊ म्हणजे काही उशिरा होत नाही. मी एकटी अनेकदा दिल्लीत बाजारात गेले तर मला परतायला साडेनऊ तरी वाजतातच. आणि मी चालत किंवा पब्लिक ट्रांसपोर्ट्नीच प्रवास करते बहूतांशी वेळा. (कुठेही गेलं तरी गाडी पार्क करणं ही डोकेदुखी असते, त्यापेक्षा चालत /मेट्रोने, ऑटोने, सायकल रिक्षाने जाणं सोप्पं असंच वाटतं. )....:(

सगळे संताप आणि हतबलता व्यक्त करतायत ते ठिकच आहे.
प्रत्येकाने एक क्षणभर थांबून विचार करावा की बलात्कारीत स्त्रीला समाज काय वागणूक देतो?
तिने अमुक कपडे घातले होते म्हणून, ती अशी वागली म्हणून, स्त्रियांना संस्कृतीची चाड नाही म्हणून घडलेली घटना क्षम्य असे विविध ठिकाणी किती जणांनी इथे मायबोलीवरच म्हणून घेतलेय...
त्याचे काय?

<<तिने अमुक कपडे घातले होते म्हणून, ती अशी वागली म्हणून, स्त्रियांना संस्कृतीची चाड नाही म्हणून घडलेली घटना क्षम्य असे विविध ठिकाणी किती जणांनी इथे मायबोलीवरच म्हणून घेतलेय...
त्याचे काय<<>>

विनाकारण बाफ पेटऊ नका. स्त्रीच्या वागणूकीवर टीका केलेली असली मंडळींनी तरीही घडलेली घटना क्षम्य असे कुणीही कोठेही म्हणालेले नाही. एवढे मूर्ख कुणिच नाही इथे......

बाफ पेटवण्यासाठी म्हणले नाहीये मी फक्त मानसिकता अधोरेखित करतेय. तुमची डबल ढोलकी चालू द्या.

बलात्कार सिद्ध झाल्याच्या आठ दिवसांच्या आत गुन्हेगाराला सर्वांसमक्ष कठोरातील कठोर शासन देण्याची किमान सलग दहा उदाहरणे शासनाने प्रत्यक्षात आणून दाखवावीत. 'जरब बसणे' हा एकच उपाय गुन्हा कमी करण्यासाठी जालिम आहे.>>>>>>>>+++++++++++++११११११११११११११११

नीधप+१
वरती बेफिकीर मारे भाषण ठोकून गेलेत पण त्यांचे स्वतःचे खरे विचार त्यांनी "स्त्रियांचा ड्रेसकोड" का अशाच नावच्या धाग्यावर मांडले आहेत. अशा दुटप्पी लोकांचे काय करावे हाही एक मोठाच प्रश्नच आहे.
स्त्रियांनी शस्त्रे बाळगावीत, स्वसंरक्षणासाठी कराटे शिकावे वगैरे ठीक आहे पण समाजाची स्त्रियांना दुय्यम लेखणारी मान"सिक"ता कशी बदलणार? हा खरा प्रश्न आहे. हा सुटला तर बाकी अनेक आपोआप सुटतील.

अत्यंत संतापजनक घटना.त्या मुलीच्या पुढील आयुष्यातला प्रत्येक क्षण दुखदायी रहाणार असेल.तेंव्हा त्या नराधमानाही अशीच शिक्षा हवी कि त्यांनाही त्यांनी केलेल्या कृत्याचा प्रत्येक क्षणी पश्चाताप होईल.

प्रत्येक आईने आपल्या मुलाला लहानपणापासून प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिकवले तर अशी वेळच येणार नाही. पण आज आईला संस्कार करायला वेळ कुठे आहे? Sad

प्रत्येक आईने आपल्या मुलाला लहानपणापासून प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिकवले तर अशी वेळच येणार नाही. पण आज आईला संस्कार करायला वेळ कुठे आहे? >>>>> सॉरी टू से पण पुर्वीच्या आयांनी त्यांच्या मुलांवर संस्कार न केल्याने हल्ली घटना घडतायेत असं म्हणायचंय का तुम्हाला?

(उगीच हल्ली आई (बायका) नोकरी /व्यवसाय करते, छंद वैगरे जोपासते म्हणून तिला ,मुलांवर संस्कार करायला वेळ मिळत नाही असे मुद्दे काढू नका)

अजूनही पुरूषांची वर्चस्वाची भावना कमी झालेली नाही, स्त्री ही त्यांच्या मालकीची वस्तू आहे, तिला नकाराच हक्क नाही असले विचार ७०-८०% पुरुषांचे असतात म्हणून या घटना घडतात. :रागः

पण आज आईला संस्कार करायला वेळ कुठे आहे? >> बरोबर, आई स्वत:ची इज्जत वाचवत फिरतेय सध्या या भारतमातेच्या देशामधे!!!! मुलांवरती ती काय डोंबल संस्कार करणार जर तिचा नवराच इतर बायकांच्या मागून फिरत असणार??

जन्म आईने द्यायचा, संस्कार आईने करायचे. नाव बापाचं लावायचं. मुलाने चांगले काही केले की बाप मिरवणार माझं पोरगं म्हणून. पोराने वाईट केलं की आईची चूक.
इतकी दुटप्पी आणि दांभिक संस्कृती आपली...

सामोपचार यांचा स्त्रियांवरच खापर फोडण्याचा हेतु सरळ दिसतोच आहे. तरी...
संस्कार फक्त आईच करते, बाप नाही? शिक्षक, कुटुंब, समाज यांची काहीही जबाबदारी नाही? कमावणार आई, शिकवणार आई, संस्कार करणार आई, मग घरात बाप हवा कशाला? ऐदीपणाचे संस्कार करायला? त्यापेक्षा नसलेला परवडला.. भारतीय पुरुष बदलले नाही तर हळूहळु ती वेळ येणारच आहे म्हणा.

<<<सामोपचार यांचा स्त्रियांवरच खापर फोडण्याचा हेतु सरळ दिसतोच आहे. तरी...>>>

निषेध!

बाप संस्कार करत नाही असे मी कुठेही म्हणालेलो नाही. म्हणजे इतकेच आहे की संस्कार करण्यात आईचा वाटा अत्यंत महत्वाचा आणि मोठा असतो.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणार्‍यांची कीव येते. आईचे महत्व तुम्हाला समजलेच नसावे Sad

<<<सामोपचार तुमचा प्रतिसाद माघे घ्या. माफि मागुन घ्यायला पाहीजे पण तस तुम्ही करणार नाही तरी ....>>>

मी कुणाचाही अपमान केलेला नाही. सबब मी प्रतिसाद मागे घेण्याचा संबंधच नाही.

ह्या सगळ्यांना कुणावर तरी घसरायची संधी हवी आहे. ती मिळाली........ मूळ मुद्दा राहीला बाजूला आता सामोपचार आणि बेफिकीर यांना झोडपत बसतील.

<<मुलींनो, जाऊ दे ते वाक्य फक्त काडी टाकण्यासाठी लिहीलेल आहे. पेटवून मजा बघत बसायची.>>

स्वातीजी......बाफ पेटवण्याचे काम एका स्त्रीनेच वर केले आहे ते तुम्हास दिसले नसेलच. Wink

रत्येक आईने आपल्या मुलाला लहानपणापासून प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिकवले तर <<<
जिथे बापाला येता जाता आईचा अपमान केला जाताना, अंगावर हात उचलताना, बाहेर लफडी करताना मूल बघेल तिथे भले आई कितीही आदर करायला शिकवेल... उपयोग काय?

सगळ्या जबाबदार्‍या आणि चुकांचं माप बायकांच्या पदरात घालायची आपली महान भारतीय संस्कृती...

मुलांना टिनऐजमधे स्त्रीचा आदर करायला शिकवाव लागेल. त्या वयात मुलगा बापाच्या जास्त क्लोज असतो. त्यामुळ हे शिकवण्याची जबाबदारी वडीलांची जास्तच. आणि ह्या वयात लेक्चरबाजीने उपयोग होत नाही तर वडीलांच्या आचरणातुन होतो.

स्वाती +१
पण तरी चीड येते. प्रत्येक वेळी अशी घटना घडल्यावर त्याचं खापर कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्त्रीवरच फोडायचा प्रयत्न केला जातो हे बघून. कधी योग्य कपडे नाही घातले म्हणून, कधी योग्य मित्र बरोबर नव्हते म्हणून, कधी चुकीच्या वेळी बाहेर पडली म्हणून, कधी सिनेमा बघायला गेली /पबमध्ये गेली म्हणून आणि आता आईनी मुलांवर संस्कार केले नाहीत असं म्हणून.

मुंबईत रहात असताना अनुभवाने शिकले-
१. चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही.
२. जास्तच पुढे काही झालं तर खच्चून ओरडा.मुंबईत तरी कुणी ना कुणी मदतीला येईलच.
३. मुंबईत तरी पोलिस मदत करणारेच भेट्लेत.

बरोबर आहे सुशांतराव. आई आणि बाप दोघांचीही ती जबाबदारी आहेच. मी फक्त आईचा वाटा मोठा कारण तिचे महत्व मोठे हे म्हटले इतकेच. बापाची जबाबदारी आहेच जसे तुम्ही म्हटले आहे. पूर्ण अनुमोदन.

शिवाय शाळेतही एका विशिष्ठ इयत्तेपासून वेगळे धडे असावेत अभ्यासक्रमात आणि त्यासंबंधी गूणही दिले जावेत. त्या जोडीला नियमित समुपदेशनाचे सेशन्सही व्हावेत. हेच कॉलेजातही व्हायला हवे शक्य झाल्यास....पण शाळेत कंपल्सरी करावे.

एखादा पुरूष एखाद्या स्त्रीशी वाईट वागला कारण....
१ त्याच्या/तिच्या (फक्त आईला दोष देण्याशी कारण कुणाची का असेना. मात्र तिच्याकडे आई म्हणुन नेहमीच नाही बघायचं.)आईनी संस्कार नीट केले नाहीत.
२ स्त्री चुकीचं वागली. (यात तिनं जन्म घेण्यापासुन सगळं काही येतं)
३ तिनं चुकीचे कपडे घातले.
४ ती चुकीच्या जागी चुकीच्या वेळी होती.
५ तिनं स्वतःच्या बरोबर पुरूष असतांना स्वतःला सुरक्षित समजण्याची चुक केली.
६ ती नेहमी चुकच असते.
७ ती सगळ्या पुरूषांकडे माणूस म्हणुन बघते.
८ ती स्वतःला स्वतःच्या घरात सुरक्षित समजते.
९ तिच्यामुळे पुरूषाच्या मनात वासना जागली.
१० ती स्वतःला माणूस समजते! चक्क!

Pages