महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्रीयांमध्ये माथेफिरू नसतात का? >> मी तर म्हणते असू देत माथेफिरू.. वर्षानूवर्ष पुरूषांनी केलेली मनमानी आणि त्यात बळी गेलेल्या असंख्य निरपराध स्त्रियांच्या आत्म्याला शांतता तरी मिळेल.

<<<स्त्रियांनी हत्यार बाळगावे म्हणले तर स्त्रिया माथेफिरू असतात. >>>

मराठी वाचता येत असेल तर नीट वाचा परत. स्त्रीया माथेफिरू असतात असे म्हटलेले नाही. स्त्रीयाही माथेफिरू असू शकतात असे म्हटले आहे. नीट वाचा जरा. मीच बरोबर, माझेच बरोबर, नाही ऐकलेत तर तुम्ही मूर्ख असा सूर थांबवा जरा. अर्थात पालथे घडे स्त्रीयांतही असतात हे तुमची पोस्ट बघून पटले म्हणा Wink

ही माझी पोस्ट तुम्हाला नीट दिसावे (समजावे ही अपेक्षा नाहीच) म्हणून आवश्यक भाग बोल्ड केला आहे:

चला कल्पना करु मिळालं गन लायसन्स. स्त्रीयांमध्ये माथेफिरू नसतात का? मग अशा एखाद्या स्त्रीने गुन्हेगाराला मारुन झाल्यावर रागाच्या भरात त्याच गनने इतर पाच पन्नास लोकांचे मुडदे पाडले तर मग ते कोलॅटरल डॅमेज म्हणून सोडून द्यायचं का? विषय काय बोलताय काय?

----->> अशा रितीने निरपराध लोकांचे बळी गेले तर त्याला कोण जबाबदार?

@उदय
आरोपीतर्फे उभा असलेला वकील जितका कुशल तितका स्टेटचा असेलच याची खात्री नसते.
------ जर अशी वास्तुस्थिती असेल.... तर मग ज्या घटना सिद्ध झालेल्या आहेत, सर्वोच्च न्यायालया पर्यंत गेलेल्या आहेत, तेथे फाशीची शिक्शा जाहिर होते... आणि माननीय राष्ट्रपती तब्बल ३५ गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षा रद्द करतात. आणि जाहिर झालेली शिक्षाच होत नसेल तर धाक रहाणार कसा ?

मानवी हक्क समजू शकतो... पण अशा अपघातांत सापडलेल्यांचा दोष काय, त्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कुणाची आहे ? हे राष्ट्रपतींना सल्ला सुचवणारे विचारांत घेत नाहीत का?
<<

चला. निदान एक जण तरी या मुद्द्याचे महत्व जाणणारा आहे तर! तुम्ही लाख कायदे करा. कायद्यानुसार एखादी केस त्याच्या शेवटापर्यंत चिकाटीने नेणार्‍यांच्या प्रयत्नांना जर राष्ट्रपतींचा हा अधिकार एका झटक्यात सुरुंग लावू शकत असेल तर तपास यंत्रणा तरी नेटाने प्रयत्न करतील?

मिस्टर सामोपचार.. उगिच काहीही बोलून कव्हर करू नका..
तुम्ही म्हणालात ना? "स्त्रिया माथेफिरू नसतात का?"
माझ्या पोस्टीत कुठेही उल्लेख नाही की तुम्ही त्यांना माथेफिरू म्हणालात असं. मी म्हणलं असू शकतात, आणि असल्या तरिही हरकत नाही.

दक्षिणा मी तुमच्या पोस्टला उद्देशून बोललो नव्हतो. नीधप यांनी जो प्रकार चालवला आहे त्याला बोललो होतो.

>> मी तर म्हणते असू देत माथेफिरू.. वर्षानूवर्ष पुरूषांनी केलेली मनमानी आणि त्यात बळी गेलेल्या असंख्य निरपराध स्त्रियांच्या आत्म्याला शांतता तरी मिळेल.
पूर्णपणे सहमत दक्षिणा.
उपाय सांगितला तर काल्पनिक धोके दिसायला लागले यान्ना. आणि जे घडतंय ते चालू द्यावे. किती भिती वाटते ना ऐकून? बायकान्ना रोज गर्दितून चालताना, पुरुषांबरोबर असताना, एकटे असताना, लहानपणी, तरूण्पणी, म्हातारपणि खरेतर जन्मल्यापासून मरेपर्यन्त जिवापेक्षा जास्त नकोशा स्पर्शाची भिती वाटत असते. तुम्हाला गनची वाटतेय ना त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आणि किळसवाणी. आणि ती काल्पनिक नसते. अनुभवांवर आधारित असते.

इथे वरती कुणीतरी (महेश?) मनातून भीती काढून टाकायचा सल्ला दिलाय.. कोणतीही गोष्ट आयती मिळत नाही वगैरे लिहिलंय..

मला एकच विचारायचंय - की स्त्रीला भीतिमुक्त जीवन आयतं मिळणार नाही अशी अप्राप्य गोष्ट म्हणायची का? की ज्याच्यासाठी 'तिला' झगडायला लागणार? काय कल्पवृक्षाचं फळ-बिळ मागतायत का बायका? आणि ती मिळत नसेल तर मिळवणं फक्त बायकांचंच काम आहे का? बाकीच्या कुठल्याही समाजघटकाचा काहीही संबंध नाही त्या झगड्यात?

आणि भीती काढायचा, धाडस दाखवायचा सल्ला दिलाय -
शारिरिक-मानसिक हिंसेची, बलात्काराची, छेडछाडीची, कुणीतरी आपल्याला सावज बनवू इच्छित आहे आणि आपल्याला स्वतःचा (बहुतेक वेळा त्या व्यक्तीपेक्षा कमी ताकदीचा) देह एवढंच प्रतिकाराचं साधन आहे. आसपासहून कुठलीही मदत मिळणार नाहीये या भावनेतून निर्माण झालेली निखळ भीती/ टेरर काय असते हे किती पुरुषांना कळण्यासारखं आहे? सल्ला देणं (अगदी कितीही प्रामाणिक भावनेतूनही) सोपंय हो. पण जिचं जळतं तिलाच कळणार!!

असो.

<<<उपाय सांगितला तर काल्पनिक धोके दिसायला लागले यान्ना. >>>

काल्पनिक धोके Rofl कुठल्या जगात राहता आपण? Rofl अशक्य आहात.
अमेरिकेतल्या शाळेत नुकतेच जे झाले ते इथे गल्ल्या गल्ल्यात घडायला हवे आहे का?

@दक्षिणा
स्त्रीयांमध्ये माथेफिरू नसतात का? >>
मी तर म्हणते असू देत माथेफिरू.. वर्षानूवर्ष पुरूषांनी केलेली मनमानी आणि त्यात बळी गेलेल्या १
असंख्य निरपराध स्त्रियांच्या आत्म्याला शांतता तरी मिळेल.
<<

हा त्वेष आणी सात्विक संताप कुठे गेला होता जेव्हां ३५ नराधमांना आपल्या राष्ट्रपतींनी [ त्यांना सल्ला देणारेही अभिप्रेत आहेत] माफी दिली तेव्हां? कोठे होत्या त्या महिला आयोगाच्या खुर्च्या अडविणार्‍या त्यावेळी? कोठे होती ती महिला मंडळे त्यावेळी? आताचा आक्रोश त्यावेळीच दिसायला हवा होता. कणभर तरी उपयोग झाला असता.
उगाच स्त्री विरुद्ध पुरुष असे फाटे फोडू नका.
सरकारला आहेत ते कायदे तरी नीट पाळायला आधी भाग पाडा. त्याशिवाय नव्या कायद्यांना काही अर्थ नाही.

मी वर एका पोष्टीत सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींना पत्र पाठवा असे आवाहन केले होते - ते सुद्धा "आधी केले मग सांगितले" ही उक्ती प्रत्यक्षात अंमलात आणून. त्यावर एकीनेही तयारी दर्शवली नाही (प्रत्यक्षात करणे लांबच).

पत्र पाठवणे वगैरे कष्टप्रद कामांपेक्षा त्यापेक्षा इथे भारंभार पोष्टी टाकून इतरांना टार्गेट करणे सोपे आहे नाही का? Wink

पारिजाता, हि भिती आधी सोडली पाहिजे. अगदी क्षुद्र किटक सुद्धा प्रतिकार करतो, मग आपण का नाही करायचा ?

राष्ट्रपतींच्या अधिकाराबद्दल चर्चा झाली आहे.

१. पूर्वीच्या काळी स्त्रियांना चॅस्टिटी बेल्ट्स म्हणजे जनन-अवयवांभोवती साखळी-कुलूप लावून वावरावे लागे म्हणे! आताच्या जमान्यात पुरुषांनाच असे चॅस्टिटी बेल्ट्स लावले तर त्यामुळे शारीरिक जबरदस्तीसारखे गुन्हे कमी होतील का यावर विचार करते आहे.
२. अशा गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा. जन्मठेपेचा कालावधी किमान ३० ते ४० वर्षांचा करणे.
३. गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी पीडित स्त्रीची नसून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची व गुन्हा घडलेला नाही हे सिद्ध करायची जबाबदारी आरोपी पुरुषाची करणे.
४ पेपर स्प्रे सारखे पुरुषांना सेक्शुअली इनॅक्टिव्ह करता येऊ शकणारे स्प्रे???
५. गर्दीच्या ठिकाणी पुरुषांना गैरवर्तन करता येऊ नये यासाठी त्यांच्या मेंदूकडून जननेंद्रियांकडे जाणार्‍या संदेशयंत्रणा गोठवण्याचे उपाय? (वायू/ स्प्रे / केमिकल्स / हिप्नॉसिस??)
६. स्टन-गन्स सारख्या शस्त्रांना बाळगण्याचा स्त्रियांना परवाना व त्या गन्सची उपलब्धता.
७. ज्या स्त्रियांना इतके सर्व उपाय करूनही सुरक्षित वाटत नाही त्यांना चिलखतासमान हिजाब / बुरखा / गोणी / पोती इत्यादी नखशिखान्त झाकणारी वस्त्रे घालून सर्वत्र आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या, सार्वजनिक, खासगी, धार्मिक, अधार्मिक, राजकीय स्थळी वावरण्याची मोकळीक. त्यातून जर गुन्हेगारीला खतपाणी मिळाले तर ती नैतिक जबाबदारी अर्थातच सरकार व प्रचलित गुन्हेनियंत्रण व्यवस्थेची राहील.
८. पोटेन्शियल बलात्कार करू शकणार्‍या व्यक्तींना हुडकण्यासाठी तज्ञ श्वानपथक, ज्या द्वारे पोटेन्शियल बलात्कार करू शकणार्‍या व्यक्ती टार्गेट मध्ये येतील व त्यांच्यावर वॉच ठेवता येईल.
९. सार्वजनिक वाहतूक, स्टेशन्स, सार्वजनिक स्थळे, पब्स, बार्स, हॉटेल्स, पार्किंग लॉट्स इत्यादी ठिकाणी सीसीटीव्ही द्वारे चित्रण कंपल्सरी करणे व तसे न केल्यास परवाना रद्द करणे. एकदा रद्द केलेला परवाना तिप्पट दंड भरल्यावर व सीसीटीव्ही बसवून तो चालू असल्याची तपासणी झाल्यावरच मंजूर करणे.
१०. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी ट्रेनिंग??? किंवा या कुत्र्यांचा त्यासाठी वापर करता येईल का?
११. स्त्रियांकडे ''इमर्जन्सी पॅनिक बटन'' सारखी यंत्रणा, जी मोबाईल/ स्मार्टफोन इत्यादींवरून अ‍ॅक्टिवेट होऊ शकते व जिचा रिपोर्ट थेट पोलिस कंट्रोल रूमला जातो. त्यानुसार त्या व्यक्तीचे लोकेशन डिटेक्ट करून त्या भागातील पॅट्रोल कार / पोलिस पथक / पोलिसांना या कामी मदत करणारे स्वयंसेवी पथक मदतीसाठी जाऊ शकते. सध्याच्या डिजिटल अत्याधुनिक युगात असे अ‍ॅप बनविणे सहज शक्य आहे.
१२. गुन्हेगार व्यक्तीचे फोटोग्राफ्स सर्वत्र एम एम एस, सोशल मीडिया नेटवर्क, प्रसारमाध्यमे इ. द्वारे प्रसृत करणे व त्या व्यक्तीला लवकरात लवकर गजांआड करण्यास चालना देणे.

<< २. अशा गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा. जन्मठेपेचा कालावधी किमान ३० ते ४० वर्षांचा करणे >>

अरुंधतीजी
नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत तुरुंगवास. Happy

अशा गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा. जन्मठेपेचा कालावधी किमान ३० ते ४० वर्षांचा करणे. >>>>>>> सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहे........जन्मठेप म्हणजे मरे पर्यंत तुरुंगात राहणे

>>अमेरिकेतल्या शाळेत नुकतेच जे झाले ते इथे गल्ल्या गल्ल्यात घडायला हवे आहे का?
अमेरिकेतल्या शाळेत झले ते इथे घडू नये म्हणून बायकान्नी घाबरत रहावे. तुम्ही सान्गा उपाय सामोपचार. काय करावे आम्हि अशा परिस्थितीत? कायद्याची वाट बघत बसावे?
मी-भास्कर, मान्य. पण त्या वेळची शिक्षा म्हणुन आता प्रुथ्विच्या अन्तापर्यन्त बायकान्नी तोन्ड उघडू नये असा स्टॅन्ड असेल तर होणारच की बाई वि. पुरुष असा फाटा. त्यावेळीही प्रयत्न झालेच असतिल. आणि अजुनही व्हावेत. मुळात आपल्या सेक्स्च्युअलि फ्रस्ट्रेटेड देशात बायकान्ना सुरक्षिततेचि आणि बाईपुरुष दोघान्ना लैन्गिक शिक्षणाचि गरज आहे.
>> आसपासहून कुठलीही मदत मिळणार नाहीये या भावनेतून निर्माण झालेली निखळ भीती/ टेरर काय असते हे किती पुरुषांना कळण्यासारखं आहे? सल्ला देणं (अगदी कितीही प्रामाणिक भावनेतूनही) सोपंय हो.
किति खरे आहे हे. Sad

@अरुंधती कुलकर्णी | 19 December, 2012 - 13:56

आतापर्यंतच्या चर्चेत विषयाला धरून आणि सर्वात उत्तम म्हणता येईल असा तुमचा विचारपूर्वक लिहिलेला प्रतिसाद म्हणावा लागेल.
मी असे ऐकले आहे कि स्व-संरक्षणार्थ प्रतिकार करतांना जर आक्रमक व्यक्तीचा जीव गेला तर तो खून मानला जाऊ नये अशी कायद्यात तरतूद आहे म्हणे. पण तसे सिद्ध करणे हे बहुधा कठीण असावे. या कायद्याच्या अंतर्गत सुधारणा करून स्त्रीला अशा प्रसंगी ही तरतूद बिनधास्तपणे वापरता येईल आणि ते सिद्ध करण्याची जबाबदारी तिचेवर असणार नाही असे कांही करता येऊ शकेल का याचा विचार व्हावा.

अरुंधती कुलकर्णी, धन्यवाद खूपच चांगले उपाय सांगितले आहे.
मी टमटम (६ सीटर) ने प्रवास करते.पण त्यात ८ जन बसतात. एक दिवस माझ्या समोर, गरीब माणूस बसला होता. थोड्यावेळाने माझ्या पायाला काहीतरी स्पर्श होत आहे अस वाटलं म्हणून मी पाय जरा मागे घेतले.परत स्पर्श झाला,मी अजून त्यातल्या त्यात पाय मागे घेतले... परत तेच
नंतर अशी काय लाथ मारली ना त्या नालायाकाला कि बस्स... चुपचाप बसला होता तो ******(* जागा भरा).
मला तरी अस वाटत आपण प्रतिकार केल्याशिवाय काही होणार नाही...

अमेरिकेतल्या शाळेत नुकतेच जे झाले ते इथे गल्ल्या गल्ल्यात घडायला हवे आहे का?
>>घडू देत. मरूदेत शंभरेक पुरूष. लोकसंख्य्याच कमी होईल की त्यामिनित्ताने. कोलॅटरल डॅमेज म्हणू. पण आधी हातात गन तर येऊ दे.

सामोपचार, आपण राष्ट्रपतींना जे काही निवेदन सादर केलंय त्याची एक प्रत इथे टाकू शकाल का? शक्यतो इमेज टाका प्लीज.

पूर्वीच्या काळी स्त्रियांना चॅस्टिटी बेल्ट्स म्हणजे जनन-अवयवांभोवती साखळी-कुलूप लावून वावरावे लागे म्हणे! आताच्या जमान्यात पुरुषांनाच असे चॅस्टिटी बेल्ट्स लावले तर त्यामुळे शारीरिक जबरदस्तीसारखे गुन्हे कमी होतील का यावर विचार करते आहे.
>> हा उपाय चांगला आहे.

अरुन्धति अगदि मुद्देसुद पोस्ट.
दिनेशदा बरोबर आहे तुम्हि म्हणताय ते पण किती वेळ सतत यात वाया घालवायचा सान्गा. जी एनर्जी नव्या चॅलेन्जेस साठि वापरायचि त्यातलि २५-३०% रोज या मुर्खपणावर खर्च करायचि?
तुम्हि सान्गा जर एखाद्या पुरुषाचा बॉस कटकट्या असेल तर त्या पुरुषाच्या एफिशन्सिवर, मानसिक स्थितिवर, वैयक्तिक आयुष्यावर किति परिणाम होतो? मग बायकान्ना हि अशी टान्गति तलवार डोक्यावर घेउन किती त्रास होत असेल? आणि एक नाहि अनेक ठिकाणाहुन धोका. ओळखिचे, अनोळखि, जवळचे, दुरचे, अगदि नवरा, लवर, मित्र सुद्धा. नुसता मानसिक धोका, शारिरिक धोका नाहि तर अपेक्षाभन्ग.
आणि वर हे असे कट्ट्यावर, नाक्यावर बसुन सारखे खो खो हसणारे लोक..

@नीधप | 19 December, 2012 - 13:58नवीन
मी भास्कर यांच्या बाफला इनफ टि आर पी न मिळाल्याने ते उगाच फाटे फोडतायत.
>>
एखाद्या विषयावर जेव्हां पोटतिडिकेने लिहावेसे वाटते तेव्हा त्या अस्वस्थतेला वाट करून देण्यासाठी मी लिहीत असतो. भले एक देखील प्रतिसाद आला नाही तरी आपण आपले म्हणणे निदान मांडले हे समाधान मला अगदी पुरेसे असते.
आपल्यासारख्यांना असे कोणी असू शकते हे पटणार नाही आणि तुम्हाला ते पटावे अशी तर मुळीच अपेक्षाही नाही.

पारिजाता, हि भिती तूम्हाला कमकुवत बनवते. हसण्याकडे / शेर्‍यांकडे कशाला लक्ष देता ? उलट त्याने घाबरुन तूम्हीच त्या प्रवृत्तीला महत्व देता आहात. पण त्यापुढे कुणी जात असेल, तर तिथल्या तिथे प्रतिकार केलाच पाहिजे.

आणि त्यानंतर त्या घटनेबद्दल अजिबात विचार न करता आपले काम करत राहिले पाहिजे.

हि भिती तूम्हाला कमकुवत बनवते. हसण्याकडे / शेर्‍यांकडे कशाला लक्ष देता ? उलट त्याने घाबरुन तूम्हीच त्या प्रवृत्तीला महत्व देता आहात. पण त्यापुढे कुणी जात असेल, तर तिथल्या तिथे प्रतिकार केलाच पाहिजे.>> कधीतरी बाईच्या जन्माला या. आणि मग हे असले लेक्चर झोडा.

@नंदिनी इतके दिवस आपण सहन करत म्हणून आता पुरुषांनी सहन करायचं हा काय युक्तीवाद आहे... त्या पेक्षा पुरुषाच्या मानसिकतेत काही फरक पडेल अस काहीतरी करायला पाहिजे

>>घडू देत. मरूदेत शंभरेक पुरूष. लोकसंख्य्याच कमी होईल की त्यामिनित्ताने. कोलॅटरल डॅमेज म्हणू. पण आधी हातात गन तर येऊ दे. >>

बेकायदेशीर कृत्य करायला प्रोत्साहन Sad

<<सामोपचार, आपण राष्ट्रपतींना जे काही निवेदन सादर केलंय त्याची एक प्रत इथे टाकू शकाल का? शक्यतो इमेज टाका प्लीज.>>

माफ करा. त्याची प्रत माझ्याजवळ नाही. एक स्मरणपत्र आणि सहा महिने वाट पाहून देखील त्यांची साधी पोच आली नाही तेव्हा मीच ती बंबात घातली. आपण पत्रकार आहात. तेव्हा आपण मायबोलीतर्फे एक पत्र तयार करावे आणि गटग वगैरे असतील तेव्हा अधिकाधिक लोकांच्या सह्य्या घ्याव्यात. किंवा इथल्या पोस्टबहाद्दर महिलांनी प्रत्येकी तशी पत्रे टाकावीत.

नंदिनी, स्त्रीचा जन्म वेगळा मानता यातच सगळे आले. आधी स्वतःला माणूस म्हणून उल्लेखा.

असो, लेक्चर यापेक्षा मोठे असते, आणि तूम्हाला उद्देशून तर अजिबातच नव्हते. तो पारिजाता यांच्या प्रतिसादावर माझा प्रतिसाद होता.

नंदिनी इतके दिवस आपण सहन करत म्हणून आता पुरुषांनी सहन करायचं हा काय युक्तीवाद आहे... त्या पेक्षा पुरुषाच्या मानसिकतेत काही फरक पडेल अस काहीतरी करायला पाहिजे. >> छोटी तुला अनुमोदन, पण ही फारच आयडियल सिच्यूएशन झाली. फ्रस्ट्रेशन एक्स्ट्रिम झालं की असे विचार येणारच डोक्यात.

...

माफ करा. त्याची प्रत माझ्याजवळ नाही. एक स्मरणपत्र आणि सहा महिने वाट पाहून देखील त्यांची साधी पोच आली नाही तेव्हा मीच ती बंबात घातली.<< वाटलंच होतं... Happy आपण पुन्हा ते निवेदन तयार करा. राष्ट्रपतींपर्यंत पोचवण्याची जबाबदारी माझी... टाका इथे ते निवेदन. आपण ज्या नावाने निवेदन पाठवले होते त्याबद्दल इथे लिहा. पोस्टाने पाठवले होते का कुरीअरने? पोस्टाने पाठवले असेल तर उत्तम... मग मी ते ट्रेस करू शकेन. कुरीअरने पाठवले असेल तर तुमच्याकडे त्याची पोचपावती (नसेलच ना?)

आपण पत्रकार आहात. तेव्हा आपण मायबोलीतर्फे एक पत्र तयार करावे आणि गटग वगैरे असतील तेव्हा अधिकाधिक लोकांच्या सह्य्या घ्याव्यात. किंवा इथल्या पोस्टबहाद्दर महिलांनी प्रत्येकी तशी पत्रे टाकावीत.>>> आधी आपण तुम्ही लिहिलेले निवेदन इथे टाका. मग बघू? कसे???

अरबी व तालिबानी सजेची अमलबजावणी केली पाहिजे. उदयन + नीधप्+साती+अल्पना+ शी सहमत१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००%

नंदिनी, स्त्रीचा जन्म वेगळा मानता यातच सगळे आले. आधी स्वतःला माणूस म्हणून उल्लेखा.>>> मी मानून न मानून काय उपयोग? समाज मानतो, कायदा मानतो... माणूस तर मी आहेच.

ही असली फिल्मी डायलॉग लिहायची असतील तर पाचपन्नास लिहेन. पण त्यामुळे वस्तुस्थिती (रीडः पुरूषी मानसिकता) बदलत नाही. ती बदलायची कशी आनि कधी यावर बोलण्यासारखे काही असेल तर लिहा. बायकांनी काय करायला हवे हे ऐकून कान किटले आता माझे. म्हणे रस्त्यावरचे शेर्‍याकडे दुर्लक्ष करा. यांना रस्त्यावर बघून जेव्हा यांच्या शरीरअवयवांची मोजमापे काढायला लागतील तेव्हा हा उपाय करून बघा.

अरबी व तालिबानी सजेची अमलबजावणी केली पाहिजे. उदयन + नीधप्+साती+अल्पना+ शी सहमत१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००%

दिनेशदा - <<एकदाच प्रतिकार करायचा. पुढे कुणाची हिम्मत होणार नाही, असा प्रतिकार करायचा.>> एका मुलीवर चार पुरुष तुटून पडले तर काय प्रतिकार करणार? आणि हिम्मत होणार नाही असा म्हणजे नक्की काय? प्रॅक्टिकली शक्य आहे का तरी? तुम्ही आज कानाखाली वाजवली म्हणून उद्या आणखी चार जणांना घेऊन येणार आणि उचलून घेऊन जाणार अशी मानसिकता दिल्ली-उत्तर भारतात सर्रास आहे. कसला प्रतिकार घेऊन बसलात? मी राहिली आहे दिल्लीत ४ वर्षं एकटी. अनेक बरेवाईट प्रसंग अनुभवलेत. इथल्या दिल्लीनिवासी इतर स्त्रियांना विचारा प्रतिकार करणं किती शक्य आहे अशी वेळ आलीच तर..

छोटी, एकदाच प्रतिकार करायचा. पुढे कुणाची हिम्मत होणार नाही, असा प्रतिकार करायचा.
>> दिनेश आज स्वारगेटला मी प्रतिकार केला, तर तो स्टेशनपर्यंत पोहोचेल? तिथे नव्याने संघर्ष करावा लागणार. Sad

>>तेव्हा आपण मायबोलीतर्फे एक पत्र तयार करावे आणि गटग वगैरे असतील तेव्हा अधिकाधिक लोकांच्या सह्य्या घ्याव्यात. किंवा इथल्या पोस्टबहाद्दर महिलांनी प्रत्येकी तशी पत्रे टाकावीत.

म्हन्जे पत्रे लिहिणे हा एकमेव उपाय दिस्तोय अपल्याकडे. (आणि दात दाखवणे हि एकमेव प्रतिक्रिया) आणि शिवाय आपण लिहिलेल्या पत्राचि काय अवस्था झालि हे माहित असुन तेच करायला सान्गताय.

>>माफ करा. त्याची प्रत माझ्याजवळ नाही. एक स्मरणपत्र आणि सहा महिने वाट पाहून देखील त्यांची साधी पोच आली नाही तेव्हा मीच ती बंबात घातली. आपण पत्रकार आहात. तेव्हा आपण मायबोलीतर्फे एक पत्र तयार करावे आणि गटग वगैरे असतील तेव्हा अधिकाधिक लोकांच्या सह्य्या घ्याव्यात. किंवा इथल्या पोस्टबहाद्दर महिलांनी प्रत्येकी तशी पत्रे टाकावीत.

Lol . Lol . Lol . Lol . Lol

नन्दिनि, दक्षिणा, नीधप, वरदा जाउ दे ना. या माणसाला फक्त मजाच बघायची दिस्तेय. दुर्लक्ष करा. सेव एनर्जी टु हँडल द वेपन्स.

पारिजाता ह्या माणसाची गत 'ज्ञान सांगे लोका, आणि शेंबूड माझ्याच नाका' तली आहे.
सो तुमने बताया और हमने छोडदिया.

नुसता प्रतिकार करून काहीही फायदा नाही. एका ठिकाणी कराल पण दर वेळी हे शक्यच नाहीये. मुळातच समानतेची शिकवण दिली पाहिजेल आणि मुख्य म्हणजे कायदा कठोरतेने राबविताला पाहिजेल. एकाला फाशी देवून काहीही फरक पडणार नाही. मुळात जेंव्हा केंव्हा असला घृणास्पद प्रकार होएईल तेंव्हा तेंव्हा लगेच शिक्षा झाली तरच जरब बसेल..१० वर्षे कोर्टात केस पडून आहे हे असे जोपर्यंत होते आहे तो पर्यंत हे असेच होत राहणार. मुळात आपल्याला काही होऊ शकेल ह्याची भीतीच नाहीये म्हणून असा निर्ढावले पणा येतो. पण सगळीकडेच अनागोंदी आहे. बहुदा आपल्याला आशिया खंडात हा प्रकार जास्त आहे. ते पाकडे आणि अफगाणी काही वेगळे नाहीये. आपल्या सगळ्या खंडातच हा प्रकार आहे.

वरदा +१
आणि असा एकेकदा प्रतिकारही किती ठिकाणी करायचा? (याचा अर्थ असा नाही की मी किंवा इथल्या इतर सदस्या कधी प्रतिकारच करत नाहीत किंवा सहन करतात. करतो हो आम्ही प्रतिकार, जमेल तेंव्हा, जमेल तितका. )

तरीही आता बाजारात एकटीने जायचे असल्यास संध्याकाळची वेळ टाळायचाच प्रयत्न करेन मी. आणि मग वाटतं किती दिवस असं भीत रहायचं? ही परिस्थिती नेहेमीसाठी अशीच रहाणार का? घरापासून दुर नोकरी करयची नाही...का? तर दिल्ली मध्ये संध्याकाळी उशिरा ऑफिसातून येणंही सेफ नाहीये. दिल्लीमध्ये सुरक्षित पब्लिक ट्रांसपोर्ट नाहीये. रात्री उशिरा सिनेमा बघायला जायचं नाही /जेवायला जायचं नाही ..का? तर ही दिल्ली आहे.

आणि खरंतर फक्त दिल्लीचा प्रश्न नाहीये हा. कमी-अधिक प्रमाणात सगळीकडे तेच आहे.

म्हणजे प्रतिकारच करायचा नाही, सहनच करत रहायचे.. असे आहे का ? दिल्लीत हे अनेक वर्षे घडते आहे.
तिथे आजपर्यंत काय केले गेले, याबद्दल काही माहिती आहे का ?

गर्दीने सहाय्य केले पाहिजे ते मी दादरच्या उदाहरणात लिहिलेलेच आहे. इथे गर्दी म्हणजे आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती.

दुसरा मुद्दा म्हणजे आत्ता पिडीत मुलगी ही शिकलेल्या समाजातील आहे. जेंव्हा हाच प्रकार गावोगाव होतो त्याला कोणीच फारशी वाचा फोडत नाही. हे तर सगळ्यात भयंकर आहे. टीवी वाल्यांना तिकडे फारसा टी अर् पी मिळत नसावा त्यामुळे हजारो घटना झाकाल्याच राहत असाव्यात

Pages