माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
काहि तेलांना, भेसळीमूळे फेस
काहि तेलांना, भेसळीमूळे फेस येतो. तेव्हा ब्रॅंड चेक करावा.
तसेच कबाबमधे अंडे असेल किंवा कोटींगमधे वापरलेला रवा / मैदा / पावाचा चुरा जर सुटा झाला, तरी फेस येतो.
दिनेश अनुमोदन. तेलात भेसळ
दिनेश अनुमोदन. तेलात भेसळ असेल. आधी तळण केलेले तेल असेल तर त्यात काही रेसिड्यू/ इम्प्युरिटिज आल्या असतील. तेलाचा वास घेऊन बघा, जर शंका आली तर ते तेल वापरू नका. तेल ब्रँडेड आहे कि सुटे? वापरलेले आहे की फ्रेश.
तेल जुनं, किंवा बर्याचदा
तेल जुनं, किंवा बर्याचदा वापरलेलं वगैरे होतं का अवनी?
बापरे, माझं नाव किचन किंगांच्या यादीत??? लाजेकाजेस्तव आज किचनमध्ये जास्त खटाटोप करावा लागेल.
तेल जुनं, किंवा बर्याचदा
तेल जुनं, किंवा बर्याचदा वापरलेलं वगैरे होतं का अवनी? >> नाही ना..
पिशवी तलं काढून वापरलं होतं.. रॉकेट असाव बहुदा..
पअॅन तापला होता नीट..मीठाची कणी पण घालून पाहिली तरिही फेस काहि जाईना.
माझ्या च तोंडाला फेस यायची वेळ आलिती :-प
अवनी, मग तेलच वाईट
अवनी, मग तेलच वाईट आहे.
तापलेल्या तेलात,चिंचेचे बोटूक टाकल्यावर फेस येत नाही, असा एक जूना उपाय आहे खरा. पण तेलाबाबत
शंका असेल, तर तो उपाय करायचा सल्ला मी देणार नाही.
सायो,
सायो,
'रॉकेट'च ते ...धूर सोडला असेल
'रॉकेट'च ते ...धूर सोडला असेल रॉकेटने तेलात.
प्राची लोल..
प्राची लोल..
सशलच्या या
सशलच्या या http://www.maayboli.com/node/30046 पाकक्रुतीने रवा बेसन लाडु केले पण पाकासाठी १ कप पाणी घेण्याऐवजी चुकुन २ कप
घेतले. आता लाडु (शिरा?) तर मऊ झाले आहेत , चवीलाही छान लागतायत. पण टीकतील का? काय करावे?
पिहु, माझेही रवा-बेसन लाडु
पिहु, माझेही रवा-बेसन लाडु बिघडलेले. सशलच्या पाककृतीने नव्हते हं केलेले. मला पाकाचा नेमका अंदाजच येत नाही. तर माझे लाडु म्हणजे चिकट,मऊ झालेले. वळताच येत नव्हते. पण चव मात्र एकदम मस्त. मग मी त्याच्या सांज्याच्या पोळ्या करतात तशा केल्या. त्या खुप छान झाल्या... बेसन असल्याने थोडी पुरणपोळीची चव आणि थोडी सांज्याची चव. पण माझ्या नवर्याला ते चिकटगुळ लाडुच एवढे आवडले कि पुन्हा तसेच कर अशी त्याची मागणी असते. आहे की नाही मजा!.....
शेवयाच्या खीरीसाठी शेवया
शेवयाच्या खीरीसाठी शेवया तुपात भाजल्यात. (गॅस गेला असल्याने मावेमध्ये भाजल्या) पण बहुधा तूप खूपच जास्त झालंय... काय करू?
तूप अगदी तरंगत असेल तर ओतून
तूप अगदी तरंगत असेल तर ओतून घे कशाततरी, आणि ते पोळ्यांना लावून टाक. शेवयांमधे अजून शेवया घालून भाजून घे, आणि जास्तीच्या शेवया पूर्ण थंड करून हवाबंद डब्यात घालून फ्रिजमधे ठेव, नंतर परत कधीतरी खीर कर.
नव्यांबरोबर जुन्यावाल्या आधीच
नव्यांबरोबर जुन्यावाल्या आधीच ब्राऊन-लाल झालेल्या शेवया जळणार नाहीत का पण?
मी मुर्खासारख्या सुरूवातीला घेताना खूप जास्त पण घेतल्यात(एरवी असं होत नाही कधी), त्यामुळे वाया गेल्या तर बर्याच जास्त वाया जातील, म्हणून विचारतेय.
काहीच नाही झालं तर पेपर
काहीच नाही झालं तर पेपर नॅपकीनवर पसरून ठेवीन, असा विचार आहे.
जुन्या शक्यतो जळत नाहीत, कारण
जुन्या शक्यतो जळत नाहीत, कारण विस्तवाची आच नव्यांवर आपले लक्ष केंद्रित करते असा अनुभव आहे
पण भिती वाटत असेल तर पेपर नॅपकिनवर पसरून ठेवणे ठीक राहील.
मावेत करायच्या आहेत गं. असो.
मावेत करायच्या आहेत गं. असो. उपायांबद्दल धन्यवाद.
त्यातच शेवया घातल्या तर
त्यातच शेवया घातल्या तर आधीच्या नक्कीच जळतील. स्टिलच्या गाळणीने तूप गाळून ते, चपातीला वगैरे लावून संपवता येईल, पण तळण्यासाठी नकोच. शेवया फ्रीजमधे राहतील, हवा तेव्हा शिरा / खीर करता येईल.
गोड नको असेल तर मस्त शेवयाचा
गोड नको असेल तर मस्त शेवयाचा उपमा पण होईल!
मी ह्यावेळी आणलेले शेंगदाणे
मी ह्यावेळी आणलेले शेंगदाणे मावेत भाजले तर त्याला तेल सुटले. असे का झाले असावे?
>>>>जुन्या शक्यतो जळत नाहीत,
>>>>जुन्या शक्यतो जळत नाहीत, कारण विस्तवाची आच नव्यांवर आपले लक्ष केंद्रित करते असा अनुभव आहे<<
आँ? ए. ते. न.
धारास, मावेला सुद्धा जुनं-नवीन नाही कळत बहुधा. (अगदी मायबोलीसारखेच). त्या जुन्या (शेवया) आणखी करपतील हो नवीन आल्या की.
तुम्ही नुसती तूप का नाही काढून ठेवत?
नव्या शेवया कोरड्या भाजून
नव्या शेवया कोरड्या भाजून मिक्स करता येतील ना पण?
अजून एक. भाजलेल्या शेवयांमधे थोडे गरम पाणी घालून मग ते गाळणीतून गाळून घ्यायचे. गाळणीत शिजलेल्या शेवया वर रहातील त्यातले तूप खालील पाण्यात उतरेल. व मग त्या शिजलेल्या शेवयांची नेहमीप्रमाणे ख्रीर करायची. तुपयुक्त पाणी आमटी, भाजी वगैरेसाठी पुढील काही दिवस वापरायचे.
विद्याक ओले (म्हणजे खुडणी
विद्याक ओले (म्हणजे खुडणी केल्यावरचे) असतील शेंगदाणे किंवा वेगळी जात असेल शेंगदाण्यांची. थोडं ऊन दाखवून भाजले तर कदाचित तेल जास्ती सुटणार नाही. आणि तेल सुटल्याने फार प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही. भाजी आमटीत किंवा खिचडीत वापरायचं असेल तर मग आधी तेल थोडं बेताचं घालायचं. आणि हे नको असेल तर मग सरळ अवल च्या पद्धतीने सोलापूरी चटणी ट्राय करा. ओलसर (तेल सुटलेली) चटणी नको असेल तर मिक्सरमधून काढा आणि चालणार असेल तर दगडीत ठेचा.. अमेझिंग लागते.
तुम्ही नुसती तूप का नाही
तुम्ही नुसती तूप का नाही काढून ठेवत?>>>> एवढं जास्त तूप नाहीये की खूप ओघळेल.
सुमेधाव्ही, मी नव्या शेवया कोरड्या भाजल्या नाहीत, पण तुम्ही नंतर म्हणता आहात, 'एगझॅक्टली' तेच केलं.
उरलेलं तूपाचं पाणी भातात घालून शिजवला.
सगळ्यांचे धन्यवाद.
ह्म्म.. तुपाच्या पाण्यातला
ह्म्म..

तुपाच्या पाण्यातला मऊ-भात उत्तम लागतो..
केळिच्या पानावर खाल्ला तर आणिकच भारी ..
दक्षिणा, दाणे भाजताना कधीच
दक्षिणा, दाणे भाजताना कधीच असे झाले नव्हते. तेल बाहेर आल्याने तसा काही प्रोब्लेम नाही. तु म्हणतेस तशी दाण्याची वेगळी जात असेल. ईथे आता थंडी पडायला लागली. त्यामुळे उन्हात दाणे घालता येणार नाही. तसेच वापरीन. धन्यवाद लगेच उत्तर दिल्यावद्दल.
अरे, मग त्या तेल सुटलेल्या
अरे, मग त्या तेल सुटलेल्या दाण्यांची चटणी फर्मास लागेल

अवनी >तुपाच्या पाण्यातला मऊ-भात उत्तम लागतो..
केळिच्या पानावर खाल्ला तर आणिकच भारी ..>< तोंपासु
माझं इतक्या दिवसात (वर्षात)
माझं इतक्या दिवसात (वर्षात) पहिल्यांदा ईडली चं पीठ बीघडलं.:-(
सगळ्या इड्ल्या बसल्या. मग सोडा घलुन परत एक घाणा केला त्या पण बसल्या - फुगल्याच नाहीत. काय चुकलं असेल? आणि अजुन १/२ दबा पीठ आहे त्याचं काय करता येइल. डोसे घालुन पहीले... ते पण फसले... उपाय सांगा.....प्लीज.....
जाड बुडाच्या तव्यावर थोडे
जाड बुडाच्या तव्यावर थोडे तेल घालुन मोहरी, सुकीमिरची, उ डाळ, च डाल कढिपत्ता अशी फोडणी करा. ती नीट सगळीकडे पसरा. त्यावर हलक्या हाताने इडलीचे पीठ ओता - साधारण १ सेमी जाड थर झाला पाहिजे. झाकण ठेवून मंद आचेवर खरपूस होईतो भाजा. फोडणीची भाजी खरपूस झाली की वर्च्या बाजून तेल घालून मग परता अन परत खरपूस होईतो भाजा.
वेजेस कापून चटणीबरोबर सर्व्ह करा..
@ swarth: इडली व्रताचा भंग
@ swarth: इडली व्रताचा भंग केल्याचा परिणाम आहे हा.
हे व्रत कसं करावं? एके दिवशी डाळ तांदूळ भिजत घालावेत. पीठ फुगत नसल्यास, नानबाला बोलवावं आणि पीठाकडे बघ ग म्हणून साकडं घालवं. थोड्याच वेळात पीठ छान फुगतं. (अनुभवः अनु३)
मग त्या पीठाच्या इडल्या कराव्यात. नानबाला खाऊ घालाव्यात.
असं व्रत जो मधेमधे करेल त्याच्या इडल्या बिघडत नाहीत. बिघडल्या तरी डोसे होतात. ते ही नाही झाले तर थोडं डाळीचं पीठ आणि तांदळाची पिठी घालून धिरडी तरी होतातच होतात.
मात्र एक करावं.
उतू नये मातू नये, घेतला वसा टाकू नये.
मेधा - करुन पाहीन...
मेधा - करुन पाहीन... धन्स....
नानबा - देवी आमची चुक झाली अम्हाला माफ करा...... त्या दिवसापसुन स्वार्थ ने हे व्रत नित्य नियमाने केलं ईडली देवी (नानबा) जशी तीला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो.....ही साठा पीठा ची कहाणी....इडली दोशी संपुर्ण? ओ देवी सम्पुर्णा ला काय करावे ते पण लिहा ना......;-)
Pages