पास्ट लाईफ रिग्रेशन

Submitted by अंजन on 27 April, 2012 - 02:32

इथे पास्ट लाईफ रिग्रेशनचा अनुभव असलेले कोणी आहे का? मी याबद्दल बरेच वाचले आहे. ठाण्यात एक बाई याचे सेशन्स घेतात हे ऐकले आहे. त्यांच्या पुढच्या सेशनला उपस्थित राहायचे ठरवले आहे. पण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले कोणी ओळखीत नाही किंवा कोणा ओळखीच्या ओळखीतही नाही. म्हणुन इथे विचारायचे ठरवले. जर कोणाला अनुभव असेल तर कृपया लिहा. अर्थात मी स्वतः तर जाणार आहेच पण जायच्या आधी खालिल गोष्टींबद्दल जाणुन घेतले तर थोडी मदत होइल असे वाटते-

१. आधीच्या जन्माच्या आठवणी कितपत स्पष्टपणे दिसतात?
२. या जन्मात आपल्या अवतीभवतीची माणसेच आधीही असतात असे ऐकले. मग ती माणसे आपल्याला कशी ओळखु येतात. की जस्ट आपल्याला अंतप्रेरणा होते की हा जो दिसतोय तो सध्याच्या जन्मात अमुकअमुक आहे म्हणुन?

आणि कृपया -

मी जरी आज सभासद झालोय तरी मी गेली ५ वर्षे रोमातला मायबोलीकर आहे, इथल्या प्रतिसादांशी मी खुपच चांगल्या प्रकारे परिचित आहे. आणि म्हणुन खालील सुचना -

१. ज्यांचा या सगळ्यावर विश्वास नाही त्यांनी इथे येऊन 'हे फाल्तु आहे' हे सांगण्यात आपला वेळ वाया घालवायची गरज नाही. हे फाल्तु आहे की कसे हे जाणण्यासाठी मी माझा वेळ आणि पैसा वापरतोयच. आलेले अनुभव इथे टाकेनच.

२. इथे आल्या आल्या इतके छान मराठी टायपिंग कसे जमतेय ह्याही शंका घेऊ नयेत. मी जरी इथे आजच सभासद झालोय तरी मायबोली ही एकच मराठी साईट नाहीय. माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर आणि संकेतजालावर इतरत्रही मराठीतुन लिहिण्याची सोय आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयः सुक्ष्म जगांत तुम्ही स्थान (position) आणि संवेग (momentum) एकाच वेळी अत्यंत अचुकपणे
मोजू शकत नाही. मोजलीच तर दोघांच्या अनिस्चिततेचा गुणाकार १०^-३४ असेल. आता येथे मानवी इंद्रियांच्या मर्यादा का आल्यात, त्यांचा संबंध कसा येतो हे समजले नाही.

गा पै: माझ्या डोळ्यांचं रेझोल्युशन जर १०^-४० SI units असतं, तर स्थानाची अनिश्चितता प्रचंड प्रमाणावर उणावली असती. साहजिकच संवेगीय अनिश्चितता आणि स्थानीय अनिश्चितता यांचा गुणाकार आजून कमी झाला असता. जो अन्यथा १०^-३४ SI units आहे.

उदय: निव्वळ डोळ्याचे (detector) रिझोल्युशन याने ध्येय साध्य होत नाही, तो अनेक अडचणीतील एक महत्वाचा घटक आहे, बस. कुठलिही वस्तु बघण्यासाठी वस्तु, योग्य तरंगलांबीचा (wavelenght) असा प्रकाश, माध्यम आणि detector हवेत. मानवी डोळा हा केवळ visible (400 - 600 nm) तरंगलांबी साठी काम करतो, त्यापेक्षा कमी किंवा जास्त तरंगलांबी असेल तर कुचकामी आहे.

आता थोडावेळ आपण आपल्या डोळ्याचे रिझोल्युशन अनंत (infinite) आहे असे मानू.
कुठलिही वस्तू आपल्याला दिसण्या मधे पुढील प्रक्रिया आहेत: (अ) पदार्थावर (उदा: electron) योग्य अशा तरंगलांबीचा प्रकाश पडायला हवा, (ब) तो प्रकाश पदार्थापासुन scatter परावर्तित व्हायला हवा (क) परावर्तित झालेला प्रकाश detector ने बघायला हवा. मुख्य अडचण अशी आहे हा जो प्रकाश हवा आहे त्याची तरंगलांबी ही जो पदार्थ बघायचा आहे त्याच्यातुलनेत किंवा त्यापेक्षा कमी असणे अत्यंत गरजेचे आहे. अशा कमी तरंगलांबी साठी तुम्हाला अत्यंत शक्तीशाली गॅमा किरणांचा (gamma rays) वापर करावा लागेल. आणि या शक्तीशाली गॅमा किरणांच्या पहिल्याच फटक्यात electron ने त्याचा नियोजित मार्ग बदललेला असेल. परावर्तित गॅमा तुमचा डोळा बघु शकेल, पण तुम्ही जो पदार्थ मोजणार आहात त्याच्या मार्गात अमुलाग्र असा बदल केलेला असेल. याला कॉम्प्टन स्कॅटरिंग असे म्हणतात.
http://en.wikipedia.org/wiki/Compton_scattering

मोजतांना जे काही मोजत आहोत ते बदलायला नको - नाही तर उद्देश साध्य होत नाही.

Energy = (constant) (light velocity) / (wavelength)

To measure the position of an electron precisely, wavelength in the denominator should be small enough and compare to the size of electron. The trajectory of an electron will be disturbed by crash with the high energy gamma ray photons.
Slide1.JPG
शेवटी, लहान जगात तुम्ही अचुकपणे स्थान (किंवा संवेग) मोजू शकाल पण संवेग (किंवा स्थान) नाही पण अत्यंत अचुकपणे दोन्ही एकाच वेळी नाही.

थोडं वेगळ्या शब्दांत मांडायचं झालं तर स्थान आणि संवेग या इंद्रियगम्य गोष्टी आहेत. त्या एकाच वेळी पाहायला जाणं शक्य नाही. म्हणून अनिश्चिततेचं तत्त्व हे मानवी इंद्रियांच्या मर्यादा दाखवतं असं म्हणता येईल.
---- पुर्णत: असहमत... स्थान आणि संवेग अत्यंत अचुकतेने मोजता येणार नाही असे detectors नाहीत म्हणुन मर्यादा आलेल्या आहेत असे नाही. इंद्रियांच्या मर्यादांचा दुरान्वयेही संबंध येत नाही.

येथे क्वांटम जगतातील गोष्टींना (Electron) अचुक स्थान आणि अचुक संवेग नसतो. क्वांटम जगताला ह्या निसर्गतः आलेल्या मर्यादा आहेत.

येथे चर्चा भरकटत असेल (कमालीचे विषयांतर होत असेल) तर नवा बाफ उघडू या.... Happy

उदय,

>> क्वांटम जगताला ह्या निसर्गतः आलेल्या मर्यादा आहेत.

अगदी बरोबर! मात्र इंद्रियगम्य मर्यादा अशासाठी म्हंटलं की मला एखादं जादूचं इंद्रिय असतं (?!;-)) तर प्रकाशाविना (फोटॉनशिवाय) इलेक्ट्रॉन बघता आला असता! (जय रजनीकांत! :खोखो:) ज्या पद्धतीने मानवी इंद्रिये (=डोळा) कार्य करतात त्या पद्धतीमुळे (=पाहण्यासाठी फोटॉनची गरज पडणे) ती अनिश्चितता आली आहे.

मात्र प्राप्त परिस्थितीत इंद्रियगम्य मर्यादा म्हणण्यापेक्षा त्यांना निसर्गदत्त मर्यादा म्हणणं अधिक समर्पक आहे.

आ.न.,
-गा.पै.

बाकी काहीही असले तरी गा.पै. ह्यांचा पेशन्स सॉलिड आहे.
मला त्यांच्या पोष्ट्स फार आवडल्या. अतिशय मुद्देसुद आणि समर्पक.

काही गोष्टी विज्ञानाच्या आकलनापडीकडे असू शकतात हे ज्यांना पटू शकते किंवा त्यावर जे विश्वास ठेऊ शकतील त्यांच्यासाठीच हा विषय आहे.

गा.पै. पुढे चालू ठेवा. अन्जन ह्यांनी ते सेशन केले का? कृपया अनुभव टाकावेत.

काही गोष्टी विज्ञानाच्या आकलनापडीकडे असू शकतात हे ज्यांना पटू शकते
------ हो पण त्याला पुरावे, सिद्धतेला सामोरे जावेच लागेल ना... नाहीतर मागच्या जन्मी मी ओसामा होतो, भोर होतो असे दावे करणारे पुढे येतात, ते मान्य किंवा अमान्य कसे करायचे?

पुट्ट्पुर्तीचे सत्यसाई बाबा जाण्याच्या अगोदरच त्यांचा पुढचा अवतार कुठे जन्म घेणार आहे त्या जागेचे नांव जाहिर झाले. ते गेल्यावर सर्व गरोदर स्त्रियांनी त्या गावाकडे धाव घेतली, कोण जाणो प्रेमा साई (त्या पुण्यात्म्याने धारण केलेले पुढचे शरिर - असे भक्त गण मानतात) आपल्याच पोटी जन्म घेईल म्हणुन.

अन्जन ह्यांनी ते सेशन केले का? कृपया अनुभव टाकावेत.
------ रिग्रेशन वा रिग्रेटस काहीही असले तरी वाचायला नक्कीच आवडेल तेव्हढेच वाचकांना शहाणे होण्याची संधी मिळेल :स्मित:.

.

आत्ता पर्यंत मायबोलीवर वाचलेली सर्वात सुंदर चर्चा. कुठे मुद्याला सोडुन चर्चा नाही. असंबंध पोस्टींना पुर्ण पणे दुर्लक्षीत करुन मुद्देसुद आणि संयमित चर्चा. फारच सुंदर.

देव आहे का? आणि त्याला सिंधातात मांडता आलं तर आपणच देव होऊ ना.

ते असो, पण संमोहन ही संक्लपना विज्ञान सिद्ध करू शकत का? निसर्गात प्रत्येक गोष्ट ईतकी पर्फेक्ट कशी काय? आज जे आपल्याला अशक्य वाटतं ते उद्या शक्य होउ शकेल.

टीव्ही आणि माइक्रोफोनचा शोध लागण्या पुर्वी हे शक्य आहे असं कोणाला वाटलं तरी असेल का? विज्ञान जे सिद्ध करू शकत नाही ते अस्तित्वातच नाही हा युक्तीवाद फारसा पटलेला नाही.
माणुस का हसतो? का रडतो? ज्याला आपण अ‍ॅनिमल ईस्टींक्ट म्हणतो ते कसे येतात? भावना म्हणजे काय? कासवाची पिल्ल जन्मल्या जन्मल्या समुद्रा कडेच धाव का घेतात? त्यांना काय माहीत हाच समुद्र आहे? आपल्याला जिव का निर्माण करता येत नाही? जस आपण बनवलेल्या उपकरणात काही बिघाड झाला की तो नक्की का झाला हे आपण सांगू शकतो, पण दुसर्‍याने बनवलेल्या उपकरणात बिघाड झाल्यास तो का झाले हे आपण सांगु शकत नाही आणि ते उपकरण समजुन त्यात दुरुस्तू करण्यास कीती वेळ लागेल हे सांगता येणं अशक्य. आणि ते कसं चालत हे जर कळाल नाही तर ते तसं चालतच नव्हत हे सिध्द करण सहज शक्य आहे, कारण ते सध्या चालत नाही आहे पण ते अस चालत होत हे कोणी सिद्ध करू शकेल का?

अनेक गोष्टी आहेत, मी अशी लोकं पाहीली आहेत ज्यांना शॉक बसत नाही मग त्यांच्या साठी इलेक्ट्रीसीटी अस्तित्वात नाही, असम म्हंटल तर चालेल का?

देव ही संक्लपना किंवा शक्ती किंवा अजुन काही म्हणा जी शक्ती, माझ्या आजुबाजुला जी प्रत्येक गोष्ट घडते त्या साठी ती कारणीभुत आहे. ती माना किंवा नका मानू आणि तिच अस्तित्व जाणवण हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबुन आहे. मला गरम होत आहे पण तुम्हाला होत नाही म्हणुन मला गरम होत नाही हे तुम्ही हवेच तापमान बघुन ठरवू शकत नाही ना. तसच आहे.

"बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल" ही म्हण उगाच नाही आलेली.

पण मग देव मानणार्‍यांना त्रास का व्हावा? मग भटांनी सांगितलेले सगळे उपचार करुन कोणी बरा होत का नाही? जर देव आहे तर मग पत्रीका का ज्योतिष का बघायच, जर माझ्या पत्रीकेत अस अस लिहील आहे तर मग मी काही केलं तरी तसच होणार आहे. आणि काही करुन जर ते बदलणार असेल तर मग पत्रीकेत तस का लिहील आहे? जर माझ्या हातावरच्यारेषा मी काय होणार आहे हे कस काय ठरवतात? जर ह्या प्रश्नाची उत्तर जे शास्त्र देऊ शकत नाही ते शास्त्र कसं? पण मानणारे मानतात त्यांना त्याचे अनुभव देखिल येतात, तसच देवाच देखिल आहे.

दुबळ्या मनाची लोकं देव मानतात असं ही म्हणता येईल. पण कट्टर नास्तिक आस्तिक झालेले आणि कट्टर आस्तिक नास्तिक झालेले देखिल मी पाहीलेले आहेत. म्हणुनच देवा आहे की नाही हा वाद न संपणारा आहे. आत्मज्ञान प्राप्त झालेले काही समाधी घेतात कारण, त्यांना हे सगळ असं का आहे चाललं आहे हे कळतं अस्त आणि प्रत्येक गोष्टीला कारण असत हे देखिल कळत असत. मग जगण्यात काही अर्थ नाही म्हणुन समाधी घेतात (ज्ञानेश्वर) तर काही आत्मज्ञानी लोकांना ज्ञान वाटत फिरतात, असं का? हजार मंत्र म्हणुन पाण्याचा रंग बदलून देवाच अस्तित्व कसं सिद्ध होत? मग जर कोणी देव आहे हे सिद्ध करू शक्त नाही तर मी त्याला का मानावा? आणि तुम्ही तरी का मानावा?

मला ताप आला, मी एखाद औषध घेतल आणि मला बर वाटलं आणि तेच औषध घेउन तुम्हाला बर वाटल नाही म्हणजे तुम्हाला ताप आला नव्हता की मी जे घेतल ते औषधच नव्हत?

मग औषध वगैरे काही नसत बरं होण न होंण हे देवाच्या हातात होतं की औषध घेउन बर वाटल म्हणजे देव नाही.

चर्चा चांगलीच आहे पण आपण नक्की काय सिद्ध करत आहात? त्या मुळे एखादी गोष्ट अशीच आहे किंवा अशी नाही हेच मला मान्य नाही. आपण जमतिल तसे प्रयत्न करत रहायच.

There is no perfect world but I am certain that I can find it.

देव हि संकल्पनाच भावनेवर्/श्रध्देवर आधारीत आहे. देअर इज नो गॉड. जगरहाटी त्याच्या मर्जीने चालत नाहि; बिकॉज हि डझंट एक्झिस्ट. इट्स ऑल फिजीक्स.

हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्त्वानुसार ईलेक्ट्रॉनचा संवेग(momentum) आणि जागा (position) एकाच वेळी अचूकपणेमोजता येत नाहीत. याचा अर्थ इलेक्ट्रॉनसंबंधी आपल्या आकलनात काहीतरी मूलभूत त्रुटी आहेत.
आत्म्याला वस्तुमान, विद्युद्भार, इत्यादि उपाध्या नाहीत म्हणून त्याचं अस्तित्व नाकारावं का?
अधिक खोलात जाऊन म्हणायचं झालं तर इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे rest mass म्हणून मोजलं जातं. आता व्यवहारात इलेक्ट्रॉन स्थिर कधीच नसतो. मग rest mass of electron ही अमूर्त संकल्पनाच नव्हे काय? तरीपण कुणीतरी जर एखादा इलेक्ट्रॉन स्थिर केलाच, तरअनिश्चिततेच्या तत्त्वानुसार त्याच्या संवेगात (momentum) प्रचंड चढउतार होतील. आता संवेग म्हणजे वस्तुमान गुणिले वेग, बरोबर? तर मग स्थिर इलेक्ट्रॉनचं वस्तुमान पराकोटीचं अनिश्चित असेल. कारण स्थिर इलेक्ट्रॉनचा वेग सुनिश्चित आहे. आणि तो ०आहे. मग rest mass of electronया संज्ञेला काय अर्थ राहिला?
हा शब्दच्छ्ल नाही. इलेक्ट्रॉनविषयीच्या मानवीआकालनावरील मर्यादांचा लेखाजोखा आहे>>>गापै, मुलभुत कणांना वस्तुमान प्राप्त करुन देणारे हीग्ज फिल्ड असते. हीग्ज फिल्डशी जे मुलकण interact होतात त्यांनाच वस्तुमान प्राप्त होते. फोटॉन सारखे कण हीग्ज फिल्डशी interaction करत नाहीत त्यामुळे ते वस्तुमानरहीत आहेत.हिग्ज फिल्ड हे क्वांटम फिल्ड आहे आणि त्याचे अस्तित्व सर्वत्र आहे ज्याला vaccum किंवा निर्वात पोकळी म्हणतात ते खरेतर हिग्जफिल्ड असते काही मुलकण जे ह्या फिल्डशी interaction करतात ते या हीग्ज फिल्डमध्ये जेव्हा गतीशील होतात तेव्हा हीग्ज फिल्डमुळे कणांवर ड्रॅग(drag) किंवा अवरोध निर्माण होतो, हा अवरोधच कणांना वस्तुमान प्राप्त करुन देत असतो. जेव्हा ह्या अवरोधाने हिग्ज फिल्डमध्ये तरंग निर्माण होतात त्या तरंगांनाच बोसॉन्स किंवा गॉड पार्टिकल असे म्हणतात. अश्या बोसॉन्सचा शोध घेण्यासाठी LARGE HADRON COLLIDER चा महाप्रयोग चालु आहे आणि प्रारंभिक पुराव्याने त्याचे अस्तित्व सिद्ध झाले आहे.
rest mass of electron हि संकल्पना फोल ठरण्याचीच शक्यता आहे, कारण जर ईलेक्ट्रॉन स्थिर झाला तर त्याची गती आणि त्वरण ,संवेग शुन्य होईल आणि drag किंवा अवरोध राहणार नाहि, थोडक्यात ईलेक्ट्रॉन वस्तुमानरहित अवस्थेत जाईल व uncertaintityला काहिच अर्थ राहणार नाही .
क्वांटमगतिकीतील संकल्पनांचा गैरअर्थ लावुन सध्याचे अध्यात्मिक गुरु आणि mystics अनेक फोल दावे करत असतात. अश्याच एका प्रश्नाला रीचर्ड डॉकिन्स या जगप्रसिद्ध रॅशनलिस्टने दिलेले उत्तर खुप छान आहे.
http://www.youtube.com/watch?desktop_uri=%2Fwatch%3Fv%3DR9Wr-nmXIFk&v=R9...

अंजन तुम्हाला पास्ट लाईफ रिग्रेशनचा काही अनुभव आला का ? तुमचे ठाण्यातील सेशन झाले का ? क्रुपया तुमचे अनुभव शेयर करा , जाणुन घ्यायची खुप उत्सुकता आहे..... तसेच इतर कुणाला याविषयी माहिती असेल तरी क्रुपया शेयर करा.

@राजः

बिकॉज हि डझंट एक्झिस्ट.

गॉड च जेंडर काय असाव अस मलाही खूप कुतुहल होत. सिलेक्टिव्ह हिअरिंग मुळे दाट संशय होता की गॉड मस्ट बी अ मॅन! तुमच्या पोस्टीमुळे बळकटी मिळाली. हलक घ्या बर का! Light 1

Er.Rohit,

तुमचा इथला संदेश वाचला. नक्की काय सांगायचंय ते पूर्णपणे कळलं नाही.

१.
>> rest mass of electron हि संकल्पना फोल ठरण्याचीच शक्यता आहे,

माझाच युक्तिवाद परत मलाच सांगून आपल्याला काय साध्य करायचं आहे ते कळलं नाही.

इलेक्ट्रॉनचं स्थिरवस्तुमान ही संकल्पना मोडीत काढण्यासाठी हिग्ज फील्ड थियरीची गरज नाही. तरीही हिग्जच्या थियरीत इलेक्ट्रॉनचं वस्तुमान बसवायचा प्रयत्न करूया.

वस्तुमान म्हणजे हिग्ज फील्डला होणार्‍या अवरोधाचा परिणाम आहे हे मान्य. स्थिर इलेक्ट्रॉनला अवरोध नसणार. म्हणूनच त्याचं (आणि सर्व मूळकणांचं) स्थिरवस्तुमान ही संकल्पना मोडीत निघणार आहे, हेही मान्य. अर्थात त्यासाठी हिग्ज बोसॉन सापडायला हवा. तो आजून सापडला नाहीये.

आता हिग्ज बोसॉनला गॉड पार्टिकल का म्हणतात ते माहित नाही. पण सापडला असं गृहीत धरूया. तरीपण इलेक्ट्रॉनचं स्थिरवस्तुमान मोजून त्याद्वारे विकसित केलेलं तंत्रज्ञान फोल ठरणार नाही. उदय यांचे डॉक्टरेट प्रयोगयंत्र सायक्लोट्रॉन सामुग्रीवर बेतले आहे. त्याचे चित्र इथे आहे. मूळ लेख इथे आहे.

माझं म्हणणं परत सांगतो. मूळकणाच्या स्थिरवस्तुमानास अर्थ नसला तरी तो गृहीत धरून तंत्र विकसित करता येतं. विज्ञान आणि तंत्रज्ञान वेगवेगळे आहेत. विज्ञान हे आकलन दर्शवतं, तर तंत्रज्ञान हे प्रक्रियाकौशल्य दर्शवतं. आकलन परस्परविरोधी असलं तरी प्रक्रिया विकसित करता येते.

तद्वत आत्म्यासंबंधी आकलन मर्यादित असलं, तरी आत्मप्राप्ती होऊ शकते.

२.
>> क्वांटमगतिकीतील संकल्पनांचा गैरअर्थ लावुन सध्याचे अध्यात्मिक गुरु आणि mystics अनेक फोल दावे
>> करत असतात. अश्याच एका प्रश्नाला रीचर्ड डॉकिन्स या जगप्रसिद्ध रॅशनलिस्टने दिलेले उत्तर खुप छान आहे.

हे मात्रं कळलं. Happy

तुम्ही दिलेले चलच्चित्र पाहिले. त्यातला डॉकिन्स यांचा युक्तिवाद ऐकला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अचूक भाकीतांमुळे पुंजवादास (क्वांटम थियरी) अधिक महत्त्व द्यायला हवे.

एका अर्थी त्याचं म्हणणं योग्यच आहे. मात्र एक मत (=थियरी) सिद्ध करेपावेतो असंख्य चुकीची भाकिते केली जातात. तद्वत अध्यात्मिक क्षेत्रात प्रावीण्य मिळेपर्यंत परतपरत अभ्यास (=सराव) करावा लागतो.

तसेच उपरोल्लेखित चलच्चित्रातला अध्यात्मिक पंथ वाळवंटी आहे. याचा पारंपारिक हिंदू तत्त्वज्ञान वा विज्ञानाशी काडीमात्र संबंध नाही. अशा पंथांचे अनुयायी चिकित्सक दृष्टी बाळगणारे नसतात. याउलट हिंदू धर्म म्हणतो की : अथ तो ब्रह्मजिज्ञासा.

त्यामुळे कुडमुड्या मिस्टिकांचा हवाला देऊन अध्यात्माची आधुनिक विज्ञानाशी तुलना करणे हे विषयांतर आहे.

तसंही पाहता मी पुंजवादी उदाहरणे देऊन भंपक मत पुढे रेटत नाहीये. तर पुंजवादी संकल्पना मुळातून कशा परस्परविरोधी आहे हे दाखवून देतोय.

आ.न.,
-गा.पै.

नमस्कार मित्रांनो,

इतर कामात अडकल्याने इथे प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला नाही. या धाग्यावर मुद्दाम येऊन प्रतिसाद देणा-या सगळ्यांचे आभार.

शेवटी मी पास्ट लाईफच्या एका वर्कशॉपला हजेरी लावलीच. जाऊ की नको, नेमके काय दिसेल? अशी धाकधुक मनात असताना शेवटी आता जाऊयाच, जे होईल ते होईल असा विचार करुन फायनली गेलो. खुप इंटरेस्टींग विषय आहे हा. माझ्यासोबत सेशनला जवळजवळ ७-८ जण होते. त्यातल्या काहींना खुप अनुभव आले. काहींना फारच कमी आले. मला अजिबातच काही अनुभव आला नाही.

वर्कशॉपमध्ये वेगवेगळे विषय घेऊन त्याप्रमाणे सेशन्स घेत होते. संमोहनाच्या माध्यमातुन मागे नेतील असा माझा अंदाज होता. पण तसे न करता काही विशिष्ट ब्रिदींग टेक्निक्स, काही शब्दोच्चार वगैरेच्या सहाय्याने मागच्या जन्मात डोकवायचा प्रयत्न करायला वर्कशॉपमध्ये मदत केली जात होती. असे डोकावताना काहीतरी प्रश्न मनात घेऊन हा शोध घ्यायचा म्हणजे कुठे चाललोय त्याला एक दिशा प्राप्त होते. पास्ट लाईफ रिग्रेशन फक्त मागचा जन्म पाहायची उत्सुकता म्हणुन करायचे नाही तर जे काय झाले त्यातुन आपल्याला काय शिकायला मिळेल काय आणि त्या धड्याचा आपण या जन्मात उपयोग करु शकतो का हे पाहायचे. या जन्मातल्या इशुजचे शक्य तितके हिलिंग मागच्या जन्माचा आधार घेऊन करायचे हा या वर्कशॉपचा एकुण हेतू होता.

मला जरी मागच्या जन्मात जाता आले नाही तरी माझे हिलींग मात्र खुप झाले. जाता आले नाही याचे कारण बहुतेक मनावरील तणाव हे असावे. पण वर्कशॉपनंतर मात्र मनात कायम उमटत राहणारे काही प्रश्न शांत झाले. हिलींगचा प्रभाव असावा.

अजुन अशी काही वर्कशॉप्स अटेंड करायची असे ठरवुन ठेवलेय. परत कधी संधी मिळतेय ते बघुया.

माझाच युक्तिवाद परत मलाच सांगून आपल्याला काय साध्य करायचं आहे ते कळलं नाही.>>>गामा पैलवान, ईलेक्ट्रॉनचे स्थीरवस्तुमान ही संकल्पना' पॅरॉडॉक्स 'तयार करते म्हणुन ती अनाकलनीय आहे असे तुम्ही सांगत आहात. स्थीरवस्तुमान ही संकल्पनाच निकालात निघण्याची प्रबळ शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे पॅराडॉक्सही शिल्लक राहणार नाही हेच मला सांगायचे आहे.

>>वस्तुमान म्हणजे हिग्ज फील्डला होणार्‍या अवरोधाचा परिणाम आहे हे मान्य. स्थिर इलेक्ट्रॉनला अवरोध नसणार. म्हणूनच त्याचं (आणि सर्व मूळकणांचं) स्थिरवस्तुमान ही संकल्पना मोडीत निघणार आहे, हेही मान्य. अर्थात त्यासाठी हिग्ज बोसॉन सापडायला हवा. तो आजून सापडला नाहीये.>>>>हिग्ज बोसॉन सापडला नाही हे तितकेसे खरे नाही .डीसेंबर 2011 ला LHC तील वैज्ञानिकांना बोसॉनचे प्रारंभीक पुरावे मिळाले आहेत. BBCची तशी बातमी आहे .पंचवीस वर्षे आणि अब्जावधी डॉलर खर्चुन प्रयोग उभे केले जातात. याचाच अर्थ जगभरातील वैज्ञानिकांना हिग्ज बोसॉनविषयी प्रयोग आणि निरक्षणांती खात्री आहे.BBC ची लिंक http://www.bbc.co.uk/news/science-environment-16158374

>>तसेच उपरोल्लेखित चलच्चित्रातला अध्यात्मिक पंथ वाळवंटी आहे. याचा पारंपारिक हिंदू तत्त्वज्ञान वा विज्ञानाशीकाडीमात्र संबंध नाही. अशा पंथांचे अनुयायी चिकित्सक दृष्टी बाळगणारे नसतात. याउलट हिंदू धर्म म्हणतो की: अथ तो ब्रह्मजिज्ञासा.>>>>अध्यात्मवाद हा सब्जेक्टीव आहे. विज्ञानात आणि जगातल्या कोणत्याही ज्ञानशाखेत सब्जेक्टीव्हीला स्थान नाही .शुद्ध ज्ञान आणि विश्वाचे आकलन होण्यासाठी भौतिक पुरावे आणि भौतिक गोष्टींचे डायनॅमिक्स अचूक सिद्ध करावे लागते. आत्मवादी असे काहि सिद्ध करत नाहीत हेच डॉकिन्स यांना सांगायचे आहे . फिल्ड ईज रीजन ऑफ ईन्फ्लुयन्स ,आत्मा हे एक अमुर्त(Non material) फिल्ड आहे असे गृहित धरुया. आत्मा भौतिक शरीरात वास करतो, त्याचा भौतिकावर परिणाम होतो असे अनेक अध्यात्मवादी सांगतात. आता ही जबाबदारी आत्मवाद्यांची आहे कि त्यांनी या अमुर्त फिल्डचा आणि भौतिकाचा अन्योन्यसंबंध आणि त्याचे डायनॅमिक्स प्रयोगांती सिद्ध करावे.

Er.Rohit,

१.
>> स्थीरवस्तुमान ही संकल्पनाच निकालात निघण्याची प्रबळ शक्यता निर्माण झाली आहे

प्रबळ शक्यता कशाला, स्थिरवस्तुमान ही संकल्पना मूळकणांच्या बाबतीत विरोधाभासामुळे (paradox) पूर्णपणे निकालात निघालेली आहेच. मात्र असं असलं तरीही ती निरुपयोगी नाही. तिचा उपयोग होतो. उदा : सायक्लोट्रॉनची संरचना (cyclotron design), उर्जाचाळणी (energy filter).

त्याचप्रमाणे आत्म्यासंबंधीच्या संकल्पना वरवर विरोधी वाटल्या तरी योग आचरणात आणून आत्म्याची अनुभूती घेता येते.

२.
>> .पंचवीस वर्षे आणि अब्जावधी डॉलर खर्चुन प्रयोग उभे केले जातात. याचाच अर्थ जगभरातील
>> वैज्ञानिकांना हिग्ज बोसॉनविषयी प्रयोग आणि निरक्षणांती खात्री आहे

सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी मायकेलसन व मोर्ले यांनी ईथरचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी (आता जगप्रसिद्ध झालेला) प्रयोग केला होता. तेव्हाही यश मिळायची खात्री होती. मात्र ईथरच्या अस्तित्वाचा पुरावा आजिबात मिळाला नाही. हाच प्रयोग अनेकांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी परतपरत केला आहे, पण ईथरचा पुरावा मिळाला नाही. त्यामुळे आपले विधान हिग्ज बोसॉन सापडेपर्यंत एक कयास म्हणूनच असणार आहे.

अर्थात हिग्ज बोसॉन सापडला किंवा नाही सापडला तरी मूळकणांच्या स्थिरवास्तुमानांचा विरोधाभास तसाच राहील.

३.
>> विज्ञानात आणि जगातल्या कोणत्याही ज्ञानशाखेत सब्जेक्टीव्हीला स्थान नाही

विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) कसोट्या कोणत्या त्यावर वैज्ञानिकांचं आणि तत्त्ववेत्त्यांचं एकमत नाही. यावर याच बाफवर पूर्वी एक उदाहरण दिले आहे. परत सांगतो की (आधुनिक) वैज्ञानिक अर्थाने विज्ञान (science), स्यातविज्ञान (pseudo science), तत्त्वज्ञान (philosophy) आणि रिलीजन यांच्यातील सीमारेषा विवादास्पद आहेत. वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानी एकमताने या मर्यादा निश्चित करू शकले नाहीत.

त्यामुळे विज्ञानातदेखील व्यक्तीनिष्ठा अवतरू शकते. मात्र असं असलं तरीही वैज्ञानिक प्रक्रियेबद्दल (scientific method) बर्‍यापैकी एकमत आहे. त्यानुसार प्रयोग करून निष्कर्ष तपासावे लागतात.

मग हीच प्रक्रिया योगाच्या बाबतीत करायला काय हरकत आहे? साधना (=प्रयोग) करून निष्कर्ष काढलेले चांगले नाहीका?

४.
>> शुद्ध ज्ञान आणि विश्वाचे आकलन होण्यासाठी भौतिक पुरावे आणि भौतिक गोष्टींचे डायनॅमिक्स
>> सिद्ध अचूक करावे लागते. आत्मवादी असे काहि सिद्ध करत नाहीत हेच डॉकिन्स यांना सांगायचे आहे .

युक्तिवादाकरिता म्हणून हे विधान ठीक आहे. मात्र हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्त्वानुसार सूक्ष्म जगतात अचूक भाकिते करता येत नाहीत.

आत्मवादी भाकिते करीत नाहीत. कारण अशी भाकिते आगोदरच उपलब्ध आहेत. त्यांना महावाक्य असे म्हणतात. उदा: तत्त्वमसि, अहं ब्रह्मास्मि, अयं ब्रह्म आत्मा, सर्वं खल्विदं ब्रह्मासि, आत्मा एव ब्रह्म, इत्यादि.

५.
>> आता ही जबाबदारी आत्मवाद्यांची आहे कि त्यांनी या अमुर्त फिल्डचा आणि भौतिकाचा
>> अन्योन्यसंबंध आणि त्याचे डायनॅमिक्स प्रयोगांती सिद्ध करावे.

याचं उदाहरण याच बाफवर पूर्वी दिलं आहे. परत देतो. आयुर्वेद हे शास्त्रच मुळी आत्मज्ञानातून उद्भवलेलं आहे. शरीरातले कफ, पित्त आणि वायु हे त्रिदोष कोणालाही दिसत नाहीत. त्यांचं अस्तित्व प्रयोगांती सिद्ध करता येत नाही. परंतु तरीही त्यांच्या सहाय्याने रोगचिकित्सा व उपाय करता येतात.

अशा रीतीने आत्म्याच्या अमूर्त प्रभावक्षेत्राचा भौतिक परिणाम दाखवता येतो.

आ.न.,
-गा.पै.

गामाजी
आयुर्वेद हे मुळात शास्त्रच नाही. आयुर्वेदात शास्त्रिय पद्धती, Controlled Double Blind Study वगैरे काहीही नाही.

>>आयुर्वेद हे मुळात शास्त्रच नाही.

या युगातला हा मोठाच विनोद म्हणायला हवा.. Happy
(नेट चे एक बरे असते, कुणीही ऊठावे काहिही लिहावे.. अर्थात या बाफ वरील चर्चा मुद्दाम भरकटवण्यासाठी ही पोस्ट असावी अशी मात्र दाट शंका आहे!)

vijaykulkarni,

>> आयुर्वेद हे मुळात शास्त्रच नाही

रोग तर बरे होतात ना? ठराविक पद्धतीनेच रोगांचा अभ्यास व्हायला हवा हा अट्टाहास कशासाठी? जर त्रिदोषांच्या सहाय्याने रोगचिकित्सा होत असेल आणि रोग्यास आराम पडत असेल तर double blind आणि triple blind प्रकारच्या अभ्यासांवर उगीच वेळ आणि पैसा कशाला उधळा?

आ.न.,
-गा.पै.

जर त्रिदोषांच्या सहाय्याने रोगचिकित्सा होत असेल आणि रोग्यास आराम पडत असेल तर double blind आणि triple blind प्रकारच्या अभ्यासांवर उगीच वेळ आणि पैसा कशाला उधळा?

.. उचलली जीभ लावली टाळ्याला.

प्रबळ शक्यता कशाला, स्थिरवस्तुमान ही संकल्पनामूळकणांच्या बाबतीत विरोधाभासामुळे (paradox) पूर्णपणे निकालात निघालेलीआहेच. मात्र असं असलं तरीही ती निरुपयोगी नाही. तिचा उपयोग होतो. उदा : सायक्लोट्रॉनची संरचना (cyclotron design), उर्जाचाळणी (energy filter).
त्याचप्रमाणे आत्म्यासंबंधीच्या संकल्पना वरवर विरोधी वाटल्या तरी योग आचरणात आणून आत्म्याची अनुभूती घेता येते.>>>>इलेक्ट्रॉनला रेस्ट मास असे काही नसते, ती एक सैद्धांतिक संकल्पना आहे आणि नजिकच्या काळात ती कशी फोल ठरणार आहे हे मी आधिच्या प्रतिसादात सांगितले आहे.त्यामुळे रेस्ट मास संकल्पनेचा वापर करुन घुमजाव नका. ईलेक्ट्रॉन जरी strange वाटत असला, तरी त्याचे बरेचसे आकलन झाले आहे आणि ते पडताळुन पाहता येते. तुम्ही आत्म्याचे असे पॅरामीटर्स सांगा जे objectively पडताळता येतील. तसे पॅरामीटर्स नसतील तर तुमचे सगळे दावे फोल समजायला हवेत.
>>>मग हीच प्रक्रिया योगाच्या बाबतीत करायला काय हरकत आहे? साधना (=प्रयोग) करून निष्कर्ष काढलेले चांगले नाहीका?>>>scientific method ग्राह्य आहे असे तुम्ही म्हणता, मग साधनेचे वगैरे experimental evidence अगर दृश्य परिणाम वैज्ञानिक पद्धतीने पडताळायला तुमचा आक्षेप का?
>>>सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी मायकेलसन व मोर्ले यांनी ईथरचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी(आता जगप्रसिद्ध झालेला) प्रयोग केला होता. तेव्हाहीयश मिळायची खात्री होती. मात्र ईथरच्या अस्तित्वाचापुरावा आजिबात मिळाला नाही.हाच प्रयोग अनेकांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी परतपरत केला आहे, पण ईथरचा पुरावा मिळाला नाही. त्यामुळे आपलेविधान हिग्ज बोसॉन सापडेपर्यंत एक कयास म्हणूनच असणार आहे.>>>>1880 चे फिजिक्स आणि आताचे फिजिक्स यात बरीच प्रगती झाली आहे. grand unification theoryच्या जवळपास वैज्ञानिक पोचले आहेत. त्यामुळे हिग्ज बोसॉन सापडणार याची खात्री आहे आणि त्याचे प्रारंभिक अस्तित्व मिळाले आहे. http://www.bbc.co.uk/news/science-environment-16158374

>>याचं उदाहरण याच बाफवर पूर्वी दिलं आहे. परत देतो. आयुर्वेद हे शास्त्रच मुळी आत्मज्ञानातून उद्भवलेलं आहे. शरीरातले कफ, पित्त आणिवायु हे त्रिदोष कोणालाही दिसत नाहीत. त्यांचं अस्तित्व प्रयोगांती सिद्धकरता येत नाही. परंतु तरीही त्यांच्या सहाय्याने रोगचिकित्सा व उपाय करता येतात.
अशा रीतीने आत्म्याच्या अमूर्त प्रभावक्षेत्राचा भौतिक परिणाम दाखवता येतो.>>>>वात कफ पित्त दिसत नाहीत, मग शोधले कुणि ?जगभरात असले कफ पित्तवगैरे कुठल्याच संस्कृतीत सापडले नाही, आपल्याले कसे सापडले याची methodology द्याल का?

गामाजी
आयुर्वेद हे मुळात शास्त्रच नाही. आयुर्वेदात शास्त्रिय पद्धती, Controlled Double Blind Study वगैरे काहीही नाही.>>>विजयजी अगदी योग्य निरीक्षण.
रोग तर बरे होतात ना? ठराविक पद्धतीनेच रोगांचा अभ्यास व्हायला हवा हा अट्टाहास कशासाठी? जर त्रिदोषांच्या सहाय्याने रोगचिकित्सा होत असेल आणि रोग्यास आराम पडत असेल तर double blind आणि triple blind प्रकारच्या अभ्यासांवर उगीच वेळ आणि पैसा कशाला उधळा?
आ.न.,
-गा.पै.>>>ही पळवाट झाली, विश्वात प्रत्येक गोष्टीत functionality आहे .आपण आर्युवेदाची functionality मुळातुन सिद्ध करावी.

अहो अंजन, मला वाटत होते कि तुम्हाला पुर्नजन्माचा खुप चांगला अनुभव आला असेल, पण तुम्ही थोडा भ्रमनिरास केलात Sad मी "राज पिछले जनम का" खुप आवडीने बघायचे , मी भगवतगीता आवडीने वाचते, नुसता धार्मिक ग्रंथ म्हणून नाही तर एक खुप आवडते पुस्तक म्हणून देखिल.... त्यामध्ये पुर्नजन्माविषयी कितीतरी वेळा सांगितले गेले आहे. तसेच आता हल्लीच्या शतकात होउन गेलेले संत स्वामी समर्थ, साई बाबा,गजानन महाराज यांच्या कथांमध्ये देखिल कितीतरी वेळा एखाद्या त्यांच्या भक्ताविषयी किंवा अन्य व्यक्तिविषयी पुर्नजन्माची कथा येते. त्यामधून कर्मसिद्धांत कसा असतो, आपल्या विविध कर्मांमुळे आपल्यास कशाप्रकारच्या जन्माला जावे लागते हे कळून येते.
तुम्ही पुन्हा जर अश्या प्रकारचे कोणते वर्कशोप अटेंड केलेत तर क्रुपया आपले अनुभव इथे नक्की शेयर करा, तसेच आपल्या इतर कोणा ओळखीमध्ये याविषयी काही अनुभव असतील तरी इथे शेयर करा.

>>त्यामुळे होमियोपॅथीप्रमाणे आर्युवेद थोतांडच ठरते

आयला हा बाफ वारच विनोदी होत चालला आता... म्हणजे दोन्ही प्रकारचे औषध घेवून बरे झालेले लोक आहेत, दोन्हीची "अधिकृत" वैद्यकीय क्षेत्र, ऊपचार, सुश्रुषा, म्हणून सरकार दरबारी देखिल नोंद आहे..
आता "थोतांडाची" व्याख्या करायची वेळ आली आहे.., तेही एक थोतांडच असेल.. Happy
चालू द्या.. अजून नेहेमीप्रमाणे, ज्योतिष, वास्तू, ई. शास्त्रे देखिल थोतांडेच आहेत या मार्गाने चर्चेची गाडी वळायची आहे का..?
(सत्या, नजर लावलीस काय भाऊ या बाफ ला..?)

मला स्वतःला अनुभव आले नाहीत (एका सेशनमध्ये फक्त थोडे जाणवले, पण तेवढ्यापुरतेच. परत काही जाणवले नाही).

प्रत्येक सेशननंतर लगेच कोणाशी कसलीही चर्चा न करता आपल्याला जे काही अनुभव आले ते लिहुन काढायचे होते आणि नंतर ते इतरांशी शेअर करायचे होते. वर्कशॉपमध्ये एक कॉलेजमध्ये जाणारी मुलगी होती. तिला अगदी विस्त्रुत अनुभव आले. इतरांनाही आले पण मला तिच्या प्रत्येक सेशनमधल्या अनुभवामध्ये काहीतरी लिंक आहे असे वाटले म्हणुन इथे देतोय.

पहिल्या दिवशीच्या सेशनमध्ये दोघा-दोघानी मिळुन एकत्र काम करायचे होते. ह्या सेशनमध्ये त्या मुलीबरोबर एक प्रौढ बाई होत्या. हे सेशन संपल्यावर त्यांनी सांगितले की मुलीसाठी त्यांना एक मेसेज मिळाला. मेसेज हा होता - रागावर कंट्रोल ठेव. मुलीला ह्या मेसेजचा काहीच संदर्भ लागला नाही.

दुस-या दिवशी ५ सेशन्स होती. त्यातल्या एका सेशनम्ध्ये आपल्या मनात असणा-या भितीचा उगम कुठेतरी मागे आहे का हे शोधायचे होते. मुलीने पाण्याची भिती हा विषय निवडला होता. तिला असे दिसले/जाणवले की ती एक मुलगा आहे, तो मुलगा पाण्यात पोहतोय आणि ते जाणवत असताना तिला स्वतःला पाण्यात पोहतानाची अनुभूती मिळत होती. ह्या जन्मात ती पोहणे शिकलेली नाहीय कारण तिला पाण्याची खुप भिती वाटते. असे असतानाही तीला पाण्यात पोहतानाची मजा अनुभवायला येत होती. ह्या सेशनदरम्यान 'तुमचा मृत्यु कसा झाला' हे पाहण्याची एक सुचना होती. ह्या सुचनेनंतर तिला असे दिसले की त्या मुलाला रस्त्यावरुन चालताना चक्कर आली आणि त्याला जाग आली तेव्हा त्याला पुर्ण बांधुन त्याच्या पायाला दगड बांधलेले होते आणि त्यानंतर त्याला लगेच विहिरीत ढकलुन देण्यात आले. आत पाण्यात तो खुप धडपडला पण बांधलेले असल्याने त्याला काहीच करता आले नाही. काही कालाने त्याला आपले शरीर पाण्यात आहे आणि आपण शरिराबाहेर आहोत असे दिसले. त्या शरीरात परत जाण्याचा त्याने प्रयत्न केला पण मध्ये काच आहे हे न पाहता आपण जर जोरात काचेतुन चालत जायचा प्रयत्न केला तर जसे आपटल्याचा अनुभव येतो तसे त्याला वाटले. त्या अवस्थेत असताना त्याला प्रचंड राग, चिड आलेली. त्याला विहिरीत ढकलुन देणारी मुले वर काठावरुन पाहात होती. त्यांचे काहीतरी वाईट करावे अशी भावना मनात येत होती. अशावेळी त्या मुलीला आदल्या दिवशीचा मेसेज परत ऐकु आला - रागावर कंट्रोल ठेव. पण कंट्रोल ठेवावा अशी परिस्थिती त्यावेळी नव्हती.

अजुन एका सेशनमध्ये ह्या जन्मातल्या करीअर्/आवडीच्या विषयाशी मागच्या जन्मीची काही लिंक आहे का हे पाहायचे होते. त्या मुलीला ह्या सेशनमध्ये परत तो मुलगा दिसला. तो मुलगा शिक्षक होता. तिला ह्या जन्मात जो विषय आवडतो तोच विषय तो मुलगा मुलांना शिकवत होता. पण सोबत अजुन एक विषय तो शिकवत होता जो ह्या जन्मात मुलीला अजिबात आवडत नाही. त्याला तो विषय शिकवता येत नव्हता. आणि त्याचा राग तो वर्गातल्या मुलांवर काढत होता. मुलांना रोज वर्गात मारहाण करत होता. त्याचे पर्यवसान शेवटी मुलांनी त्याला विहिरीत ढकलुन देण्यात झाले. पण ह्या दुस-या सेशनच्या वेळेस मात्र तिला त्या मुलांचा राग आला नाही. तो मुलगा मुलांशी ज्या प्रकारे वागत होता त्याबद्दल तिने मनोमन त्या मुलांची माफी मागितली आणि ती मुले त्याच्याशी जे वागली त्याबद्दल तिने त्यांना माफही केले.

त्या मुलीचे अनुभव मला अगदी अमेझींग वाटले. अजुनही इतर सेशन्समध्ये तिला असेच रिलेटेड अनुभव आले. मला वाटले कि ती अजुन लहान असल्याने तिचे माईंड कलुषित/प्रभावित झालेले नाहीय आनि त्यामुळे तिला एवढे सगळे दिसु शकले. माझे मनही तिच्यासारखे फ्री असते तर मीही पाहु शकलो असतो.

वर कोणीतरी लिहिलेय की सगळ्यांना आधीच्या जन्मात आपण माणुसच होतो हे कसे काय दिसते? इतर प्राणि/पक्षी/झाडे वगैरे का दिसत नाही? यावर उत्तर असे पिएलाअर करताना एक विषय मनात ठरवुन जातात म्हणजे त्या संदर्भातल्या गोष्टी दिसतात. पण याशिवायही पिएलाअर करता येते जिथे तुम्हाला तुमचे प्लांट लाईफ्/अ‍ॅनिमल लाईफ पाहता येते. पण ह्यासाठी तेवढा वेळ द्यायला पाहिजे. आज पिएलाअर केले आणि लगेच ३ तासाचा चित्रपट डोळ्यासमोर सुरू झाला असे होत नाही. काही जणांना अगदी डोळ्यांसमोर चित्रे दिसतात तर काहीजणांना फक्त जाणवते की अमुक अमुक असे घडतेय. दिसत काही नाही.

मी ज्यांचाकडे वर्कशॉपसाठी गेलो होतो त्या बाईंना आजवर त्यांच्या पास्ट लाईफमधले काही दिसलेले नाही. पण त्यामुळे काही फरक पडत नाही. जरी प्रत्यक्ष काही दिसले नाही तरी हिलिंग होणे जास्त महत्वाचे असते. आणि माझ्याबाबतीत मला तरी हिलिंगची प्रक्रिया सुरू झाली असे वाटले. परत परत अनुभव घ्यायला मला तरी आवडेल.

Er.Rohit,

१.
>> ती एक सैद्धांतिक संकल्पना आहे आणि नजिकच्या काळात ती कशी फोल ठरणार आहे हे मी
>> आधिच्या प्रतिसादात सांगितले आहे.त्यामुळे रेस्ट मास संकल्पनेचा वापर करुन घुमजाव नका.

मी कुठे घुमजाव करतोय? इलेक्ट्रॉनचं स्थिरवस्तुमान मोजण्यातील अंतर्विरोध मीच सर्वप्रथम दाखवला. तोही हिग्जच्या थियरीशिवाय. हिग्जचा विषय तुम्ही आणलात. मी नाही. मला माझं म्हणणं पटवून देण्यासाठी हिग्जमताची गरज भासत नाही.

तुम्हाला का बरं भासते? आणि मला घुमजाव करू नका म्हणून उलट उपदेश करताय? Uhoh

२.
>> तुम्ही आत्म्याचे असे पॅरामीटर्स सांगा जे objectively पडताळता येतील.

मागे सांगितलं आहे. परत सांगतो की, माणूस जिवंत असेपर्यंत देह सडत नाही. जो देह ७०/८० वर्षे सुखेनैव चालू होता, तो अचानक दोनतीन तासांत सडून नष्ट व्हायच्या मार्गाला लागतो. कारण की या देहाला जिवंत ठेवणारा आत्मा देह सोडून गेलेला असतो.

मेलेला देह सडणे हा एक वस्तुनिष्ठ (objective) अनुभव आहे. आत्म्याचं देहातील अस्तित्व हा एक गण्यगुण (पॅरामीटर) वस्तुनिष्ठपणे (objectively) पडताळता येतो.

३.
>> मग साधनेचे वगैरे experimental evidence अगर दृश्य परिणाम वैज्ञानिक पद्धतीने पडताळायला
>> तुमचा आक्षेप का?

आजिबात आक्षेप नाही.

४.
>> 1880 चे फिजिक्स आणि आताचे फिजिक्स यात बरीच प्रगती झाली आहे. grand unification
>> theoryच्या जवळपास वैज्ञानिक पोचले आहेत. त्यामुळे हिग्ज बोसॉन सापडणार याची खात्री आहे

इ.स. १८८० साली पुंजावाद (quantum theory) अस्तित्वात नव्हती. तिचा उदय इ.स. १९२५ च्या सुमारास झाला. तिच्यामुळे स्थूल वस्तुमान, स्थान, संवेग, इत्यादि स्थूल आकलने मोडीत निघाली. म्हणूनंच इ.स.१८८० सालचे निश्चित्यवादी (deterministic) भौतिकशास्त्र आज शक्यतावादी (probabilistic) झाले आहे.

प्रगतीमुळे काटेकोरपणा येण्याऐवजी अनिश्चितता येऊ घातलीये. Uhoh

या पार्श्वभूमीवर आपलं हिग्ज बोसॉन मिळाल्याचं विधान धाडसी वाटंत नाही काय? भविष्यात तो मिळू शकतो, नाही असं नाही. मात्र जोवर तो मिळत नाही तोवर थांबायला पाहिजे.

५.
>> वात कफ पित्त दिसत नाहीत, मग शोधले कुणि ?

आत्मज्ञानातून यांचा शोध लागला.

६.
>> जगभरात असले कफ पित्तवगैरे कुठल्याच संस्कृतीत सापडले नाही, आपल्याले कसे सापडले
>> याची methodology द्याल का?

रीतीमान (methodology) सोपी आहे. आत्मज्ञान झालेल्या ऋषींनी आत्म्याबाबत असलेल्या करुणेमुळे मनुष्याच्या हितासाठी ध्यान लावून शरीरशास्त्र शोधून काढले. आयुर्वेद हे ध्यानावस्थेत प्राप्त झालेलं ज्ञान आहे (किंवा असावं).

जगभरात इतर कोणालाही हे सापडलं नाही कारण तशी जिज्ञासा कोणी दाखवली नाही (वा नसावी). मात्र वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची तंत्रे सापडली आहेत. उदा : बिंदूदाबशास्त्र (अ‍ॅक्युप्रेशर) भारताबाहेर उगम पावले आहे.

७.
>> ही पळवाट झाली, विश्वात प्रत्येक गोष्टीत functionality आहे .आपण आर्युवेदाची functionality
>> मुळातुन सिद्ध करावी.

पळवाट कशातून? ज्याला कोणाला इच्छा आहे त्याने डबल ब्लाइंड अथवा ट्रिपल ब्लाइंड प्रकारे अभ्यास जरूर करावा. कोणी अडवलंय? अर्थात सुयोग्य प्रकारचा अभ्यास निजोजित (study design) करावा लागेल.

आता तुम्ही जर आयुर्वेद शास्त्रंच नाही असं म्हणायला लागलात तर मग आधुनिक पद्धतीचा अभ्यास कसा करणार?

आ.न.,
-गा.पै.

Pages