भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ध्या तेव्हढा वेळहि नाहिये, हेहि लक्षात घ्या. >> कमॉन असाम्या, अरे इंटरनॅशनल लेवलला खेळत आहात तर तुम्हाला सगळे माहित पाहीजे. उद्या फेडरर म्हणला मला बॅकहॅन्ड नाही जमत तर चालणार आहे का?

भाऊ - अशा पिच बनवायला कोणी रोखले आहे का? किती वर्षे आपण हेच सांगत राहणार? गावस्कर ते म्हणतोय, तंत्र नाही तर शिका आणि शिकण्यासाठी आवश्यक ते सर्व करा. सराव सामान्यात कोणी आपले डावपेच उघडे करेल असे मला वाटत नाही.

खरंय, कधी कधी आमच्या शाळेच्या प्रॅक्टीस नेटवर मॅटींग असायचे आणि सुरवातीला त्यावर खेळताना उसळत्या चेंडूंची भितीच वाटायची [ म्हणजे, माझं क्रिकेट आपलं तेवढ्यापुरतंच बरं का ]. पण दौरे आंखताना ह्या सर्वासाठी व्यवस्था व वेळ देणं हे काम बोर्डाचं नाही ? आपल्या उपखंडात येताना बाहेरचे संघ फिरकी खेळायची खास तयारी करतात व मुद्दाम इथले सराव सामने मागतातच ना. कीं फिरकी खेळायचं तंत्रच वेगळं म्हणून सरळ पॅड बांधून कसोटी खेळायलाच उतरतात.

कमॉन असाम्या, अरे इंटरनॅशनल लेवलला खेळत आहात तर तुम्हाला सगळे माहित पाहीजे. उद्या फेडरर म्हणला मला बॅकहॅन्ड नाही जमत तर चालणार आहे का? >>अरे तू जर तर मधे बोलतो आहेस. असायला हवे का ? हो असायला हवे. पण त्या सर्वाला जो वेळ लागतो तो कुठे आहे FCC calendar मधे ? ह्यत फक्त BCCI दोषी आहे असे नाहितर ICC नि खेळाडू पण आहेतच कि. पैशाच्या मागे लागले आहेत हे म्हणणे ठिक आहे रे पण त्यांच्या ड्रुष्टीने विचार करून बघ. Call it compromise but I do not see any other option than to have more practice matches with current situation as is.

जाता जाता bouncy pitch आहे ठिक आहे, पण उद्या spinning assisted असेल तेंव्हा English players पण ढेपाळतत कि. फक्त spin ला adjust करणे तौलनिक द्रुष्ट्या सोपे आहे एव्हढेच.

सराव सामने असले तरी आपण पूर्वी ढेपाळलो नाहीत का? अफ्रिकेमध्ये काय झाले? सराव सामने होतेच ना तेंव्हा. प्रश्न असा आहे की एक सराव सामना खेळून प्रश्न सुटत नाही. सराव सामने असावेतच ह्या मताचा मी पण आहे. पण तंत्र सुधारायला मुळात माणसाची आवड पाहीजे. झहीरला बॉलींगचा प्रॉब्लेम होता तो त्याने सुधारला तर आता तो भेदक झाला आहे. झहीरने मेहनत घेतली. बोर्ड किंवा ICC ने नाही.

शिवाय तुमच्याकडे १५ चा बेंच आहे. अगदी रोज मॅच खेळल्यातरी तेच ते खेळाडू कशाला हवेत. एखाद्याला प्रॉब्लेम (रैना, युवी) असेल तर त्यांनी हा सोडवण्यासाठी एक दोन सिरिज न खेळता प्रॉब्लेम सोडविणे माझ्या दृष्टीने महत्वाचे. मग स्केड्युल कितीही टाईट असले तरी इतर लोक खेळू शकतातच. दुसरे उदा म्हणजे विरूला जेंव्हा टेस्ट मधून काढले, त्यानंतर त्याने खेळलेल्या प्रत्येक इनिंग मध्ये त्याने मोठ्या धावा केल्या आहेत. तो ही बॅडपॅच मधून गेलाच होता. एकेकाळी हा माणूस प्रत्येक इनिंग मध्ये १५० काढेल असे वाटायचे ते उगाच नाही, बसून विचार केल्याचा परिणाम.

सराव सामने तात्पुरता उपाय आहे, जो मलाही मान्य आहेच, पण मी मुळ प्रश्न (रूट कॉज) सोडवा ह्या मताचा आहे.

सराव सामने असले तरी आपण पूर्वी ढेपाळलो नाहीत का? अफ्रिकेमध्ये काय झाले?>>एक मिनीट, गेल्या दौर्‍यामधे आपण ढेपाळलो नाहि. draw series होती. त्यातही सराव सामना एकच होता बहुतेक पण कर्स्टनने त्याच्या academy मधे आधी टिममधील काहि जणांना नेले होते. झहिरचे उदाहरण गैरलागू आहे, त्याला बॉलिंगचा प्रॉब्लेम नव्हता तर attitude चा होता. टिममधून बाहेर गेल्यावर ती सुधारली नि बॉलिंग पण सुधारली.

मी वर म्हटले तसे स्पर्धात्मक युग आहे, स्वत:हून बाहेर कोण कशाला बसेल ? परत एखादा बसलाच तर परत आत येईल ह्याची खात्री आपल्याकडे नक्की नसते (तो चांगला खेळला तरी) तेंव्हा दोष खेळाडूंचा नाहि असे नाही तर त्याच्या पेक्षा सिस्टीमचा आणि पर्यायाने BCCI चा अधिक आहे. root cause BCCI ची अनास्था हे आहे.

ध्या तेव्हढा वेळहि नाहिये, हेहि लक्षात घ्या.

माझ्या मते या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही इ. कारणे नसून, गरज नाही हे खरे कारण आहे. बक्कळ पैसा मिळतोच की, हरले काय नि जिंकले काय? मग कशाला कष्ट घ्या! किती लोक जे काय काम करतात त्यात प्राविण्य मिळवावे असा विचार करतात? बहुतेक सर्वजण लवकरात लवकर, कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील हे बघत असतात. अपवाद आहेतच.

'नवीन, सुधारलेला, अधिक प्रभावी' साबण अशी नुसती जाहिरात करायची असते, लोक घेतात. त्यासाठी साबण खरोखर सुधारायची गरज नसते.

मी काय म्हणतो, कशाला इतकं महत्व त्या क्रिकेटला देता ?

जिंकत होतो तोपयंत ठीक होतं. मध्यंतरी बीसीसीआयच्या दबावाखाली न्यूझिलंड दौ-यावरच्या खेळपट्टीच्या वादानंतर खुद्द ऑस्ट्रेलियातही आपल्याला कोरड्या ठणठणीत खेळपट्ट्या दिल्या तेव्हा जिंकलोच कि आपण पर्थला. पण सिडनेला गवत राहील. गवत आणि आपला ३६चा आकडा ! वेस्ट इंडीजतर काय, त्या बोर्डाला पैसे टाकले कि हव्या तशा खेळपट्ट्या पाहुण्यांना मिळतात. द. आफ्रिकेनेही तीच री ओढली. हेवी रोलर फिरवलेल्या खेळपट्ट्या आपल्याला मिळाल्या. नंबर वन साठी आवश्यक असलेले गुण मिळवण्यासाठी झिंबाब्वे, केनिया इ. संघ दाखल करून घेतले गेले. हल्ली बांग्लादेश जरा टफ जातंय. श्रीलंका धोकादायक आहे. पण घेतात म्हणे पैसे ते पण. फायनलला घेतले होते म्हणे ! पुरावे बिरावे नाहीत माझ्याकडे...

इंग्लंडावर मात्र बीसीसीआयचा प्रभाव पडत नाही असं दिसतय. त्याआधी कित्येक वर्षे इग्लंडच्या टीमबद्दल असं बोललं जायचं कि इंग्लंडच्या टीमकडून हरणारी टीम कुठली असेल तर ती खुद्द इंग्लंडच. पण या परिस्थितीतून वर येऊन आजची जी टीम बांधली गेलीये ती टीम इंडियाला झेपत नाही. इतकी वर्षे उसळत्या चेंडूंचा, बाऊन्सी खेळपट्ट्यांचा सारावच नव्हता. दोष झाकले गेले होते. त्यातही कित्येक सामने उपखंडातच झालेत.

अर्थात कोंबडं तरी किती दिवस झाकायचं त्यालाही मर्यादा आहेतच कि ! आपण गोट्या, विटीदांडू, झिम्मा, सूरपारंब्या, लंगडी, कबड्डी, लपा छपी अशा अस्सल भारतीय खेळांकडं का वळू नये ?

अनिल, त्या खेळपट्ट्या तशा बनवण्याचे कारण बीसीसीआय जी ताकद हे एक नक्कीच आहे (उलट अर्थाने १९८३ ला वेस्ट इंडिज ला व इतर अनेक दौर्‍यात भारताने इतर देशांच्या संघांना भारतात 'ग्रीन टॉप' देणे हे ही). पण गेल्या चार पाच वर्षांत झहीर, इशांत, श्रीशांत, आरपी सिंघ यांच्यामुळे भारता विरूद्ध वेगवान पिच बनवणे अंगावर उलटते (लीड्स, पर्थ, दरबान ई. ठिकाणचे विजय ही उदाहरणे) हे इतर देशांनाहे लक्षात आले. हे ही तितकेच खरे आहे.

पिच कसे असावे यात पूर्वी नक्कीच इंग्लंड व ऑस्ट्रेलिया ई. क्रिकेट मंडळे हस्तक्षेप करत असतील. आता आपण करत असू.

पर्थच्या तुम्ही उल्लेख केलेला आहे. ते पिच गेल्या काही वर्षात स्लो झाले आहे असे म्हणतात पण तरीही अजून ते क्रिकेटमधल्या सर्वात फास्ट पिचेस पैकी आहे. पाटा नक्कीच नाही. इशांत वि. पॉन्टिंग लढत पाहिलीत तर लक्षात येइल.
http://www.youtube.com/watch?v=27kftYqcv2I&playnext=1&list=PLB6A0A6D5049...

तुम्ही अशा काही मॅचेस ची स्कोअरकार्ड्स बघितलीत तर त्यात फास्ट बोलर्सच्या विकेट्स खूप आहेत.

ही लिन्कही वाचा.
http://www.espncricinfo.com/ausvind/content/story/332278.html

बलाढ्य देशाचे क्रिकेट मंडळ प्रभाव टाकते हे पूर्वीही होत असेल (पण बीसीसीआय एवढा त्रास करून घेते का स्वतःला? Happy ), पण हा फास्ट बोलर्सचा मुद्दाही महत्त्वाचा आहे.

सेहवाग जर पहिल्या मॅच मधे यशस्वी नाही झाला.............? तर .................... धोनी कडे बॅकअप प्लान आहे का.....??????? सेहवाग आला सेहवाग आला......दिवाळी साजरी केली जात आहे मिडिआ मधे...तिच मिडीया उद्या तो लवकर आउट झाला तर त्याच्या नावाने शिमगा करत बोंबलायला सुरुवात करेल.......

>>> मध्यंतरी बीसीसीआयच्या दबावाखाली न्यूझिलंड दौ-यावरच्या खेळपट्टीच्या वादानंतर खुद्द ऑस्ट्रेलियातही आपल्याला कोरड्या ठणठणीत खेळपट्ट्या दिल्या तेव्हा जिंकलोच कि आपण पर्थला.

पर्थची खेळपट्टी कोरडी ठणठणीत नव्हती. ती चांगली जिवंत व गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी होती. सुदैवाने आपण नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यामुळे आपल्याला ४ थ्या डावात फलंदाजी करावी लागली नाही आणि म्हणूनच आपण जिंकलो. जर आपल्याला ४ थ्या डावात फलंदाजी करावी लागली असती तर ऑसीज ऐवजी आपण हरलो असतो.

>>> नंबर वन साठी आवश्यक असलेले गुण मिळवण्यासाठी झिंबाब्वे, केनिया इ. संघ दाखल करून घेतले गेले.

नंबर १ आणि झिम्बाब्वे व केनियाशी खेळण्याचा काहिही संबंध नाही, कारण, हे दोन्ही संघ कसोटी सामने खेळत नाहीत (झिंबाब्वेवर कसोटीसाठी गेल्या ५-६ वर्षांपासून बंदी आहे.).

>>> त्याआधी कित्येक वर्षे इग्लंडच्या टीमबद्दल असं बोललं जायचं कि इंग्लंडच्या टीमकडून हरणारी टीम कुठली असेल तर ती खुद्द इंग्लंडच. पण या परिस्थितीतून वर येऊन आजची जी टीम बांधली गेलीये ती टीम इंडियाला झेपत नाही.

अजिबात अभ्यास न करता परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्याची जी अवस्था होते, तीच अवस्था भारतीय संघाची झालेली आहे. फारसा सराव न करता संघातले बरेचसे खेळाडू थेट मैदानात उतरल्यामुळे पहिल्या २ कसोटीत भारताची दारूण अवस्था झालेली आहे.

>>> वेस्ट इंडीजतर काय, त्या बोर्डाला पैसे टाकले कि हव्या तशा खेळपट्ट्या पाहुण्यांना मिळतात. द. आफ्रिकेनेही तीच री ओढली. हेवी रोलर फिरवलेल्या खेळपट्ट्या आपल्याला मिळाल्या.

हे खरे नाही. द आफ्रिकेतल्या खेळपट्ट्या जिवंत होत्या. दुसर्‍या कसोटीत भारताला ४ थ्या डावात फलंदाजी न करावी लागल्यामुळे भारताचा विजय झाला होता. वेस्ट इंडिजचा संघ सध्या लिंबूटिंबू संघाच्या पात्रतेचा आहे. त्या संघाविरूध्द कोणत्याही खेळपट्टीवर भारत जिंकू शकतो. आपल्याला ठणठणीत खेळपट्टीमुळे तिथे विजय मिळालेला नसून विंडीजचा संघ आपल्या तुलनेत अत्यंत दुर्बल असल्याने (आपले ७ प्रमुख खेळाडू खेळत नसताना सुध्दा आपण दोन्ही मालिका तिथे जिंकलो) आपण तिथे जिंकलो.

>>अजिबात अभ्यास न करता परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्याची जी अवस्था होते, तीच अवस्था भारतीय संघाची झालेली आहे. फारसा सराव न करता संघातले बरेचसे खेळाडू थेट मैदानात उतरल्यामुळे पहिल्या २ कसोटीत भारताची दारूण अवस्था झालेली आहे.

you said it!!

मला तरी अपयशाचे खापर बोर्डावर फोडणे पटत नाही, युवी, रैना, गंभीर यांचे ऊस्ळत्या चेंडूविरुध्दचे तंत्र पहिल्या दिवसापासूनच कमकुवत आहे.. ती काही ईंग मध्ये अचानक प्रकाशात आलेली बाब नाही. अशा वेळी या खेळाडूंनी जेव्हा दौरे नसतात तेव्हा जाहिरताबाजी, व ईतर पार्टीबाजी सोडून आपला खेळ सुधारण्याचा सराव केला तर नक्कीच फरक पडेल, पडायला हवा होता. सचिन जन्मजातच गुण घेवून आला होता पण शिवाजी पार्कावर रोज १२ तास घासून त्याने आपले फटके घोटवून पक्के केले आहेत. अजूनही एखाद्या चेंडूवर बाद झाल्यावर त्याला सदोष तंत्र जबादार असेल तर तर नेट मध्ये तो ते सुधारायला दिवसभर सराव करत असतो. वेस्ट ईंडीज दौर्‍याची तयरी म्हणून सन्नीभाय असा दिवसभर एमाराय च्या टॅनिस चेंडूवर, कॉक्रीट पट्ट्यावर सराव करत असे. या व अशा ईतर ऊदाहरणात बोर्ड, दौरे, पैसा यांचा कुठे संबंध आहे हे मला कुणीतरी समजावून सांगा

तात्पर्य, मैदानात खेळाडू आणि त्याचा खेळ याची संपूर्ण जबाबदारी ही त्या खेळाडूची असते. त्या अनुशंगाने सदोष तंत्र असलेल्या फलंदाजांनी ऊनाडक्या बंद करून ते तंत्र सुधारायचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्यासाठी आयपिल चा झटपट पैसा, जाहिरातबाजी, आणि क्रिकेट व्यतिरीक्त ईतर सर्व धंदे यावर पाणी सोडायची तयारी हवी. मूळ लोचा ईथेच आहे!
गोलंदाजांच्या बाबतीतही तेच लागू होते. खेळाडू सोडून बोर्डाला दोष देणार्‍यांना काय म्हणायचे आहे की मुरली, वॉर्न, कुंबळे, मॅक्ग्राथ, ली असे गोलंदाज वा द्रविड, लारा, सचिन, गावसकर, रिचर्ड्स, ईत्यादी मंडळी ही निव्वळ कमी क्रिकेट खेळल्याने मोठी झाली? सर्वांना एकाच पंक्तीत बसवून तुलना करता येणार नाही हे मलाही माहित आहे कारण काळ, गणित, एकंदर खेळाचे स्वरूप हे सर्वच बदलले आहे. पण मुद्दा तोच आहे ना- तंत्र, सराव, मेहेनत, जिद्द, स्वतः मध्ये कायम सुधारणा करण्यासाठी प्रयत्न, आणि खेळावर अपार निष्ठा.

बाकी मुद्यांना विशेष महत्व ऊरत नाही.

>>>> विरू, विराट कडे देखिल ते अपेक्षित तंत्र आहे असेही नाही.
>> सेहवाग चा दमदार खेळ आवश्यक आहे
योग्या, तूच तुला कॉन्ट्रॅडिक्ट करत नाहीयेस का? विरू कडे ते तंत्र नाहीये तर तो दमदार खेळ करणार कसा?

चिमण,
तंत्रिक दृष्ट्या सेहवाग बाबतीत माझे विधान परस्परविरोधी आहे हे मान्य! (डोळ्यात तेल घालून माझ्या पोस्ट कुणितरी वाचतय हे पाहून बरे वाटले!). Happy
पण सेहवागचा अ‍ॅप्रोच आणि आक्रमकता त्याच्या सदोष तंत्रावर मात करते- हे मी नाही तर गावसकर सारखे महान लोक म्हणतात. कारण तो टिकण्यासाठी नाही तर गोलंदाजांवर हुकूमत गाजवण्यासाठी, जिंकण्यासाठी खेळतो. क्रिकेट च्या तंत्राचे पुस्तक सेहवाग ला लागू होत नाही असे शास्त्री पासून पार गांगुलीपर्यंत सर्वांचे एकमत आहे. थोडक्यात त्याच्याकडे सदोष तंत्र असले तरी दमदार खेळाची कुवत ईतर कुठल्याही खेळाडूपेक्षा अधिक आहे. २२ शतके आणि ८८ ची सरासरी हे आकडेच बोलके आहेत.
सद्य ईं च्या दौर्‍यात याच मानसिकतेची गरज आहे हेच मी अगदी पहिल्या सामन्यापासून लिहीतोय.. त्या दृष्टीने सेहवाग आपल्या संघासाठी संजीवनी ठरू शकतो. ईं देखिल त्याच्यावर ऊसळत्या चेंडूंचा सापळा लावून तयार असेल याची मला तीळमात्र शंका नाही. त्या डावपेचात जो जिंकेल त्याचा संघ जिंकायची शक्यता अधिक आहे. असो... दिल्ली अब दूर नही... Happy

सेहवागला स्विंग आणि शॉर्ट बॉल खेळायचा प्रॉब्लेम आहे. त्यातला स्विंगचा प्रॉब्लेम त्याला युवराजच्या नंबरवर खेळायला पाठवून कमी करता येईल. तेव्हा बॉल जुना झालेला असतो. स्वान एका बाजूला असतो. तेव्हा धुलाईला जास्त स्कोप असतो. प्रायर/ब्रॉडने एकदा आणि स्वान/ब्रॉडने एकदा आपल्याला ते दाखवलंच आहे. पण माझ्या म्हणण्याकडे कुणी लक्ष देणार नाही हे मला माहिती आहे. Proud

तेव्हा मुकुंद आणि गंभीरला ओपनिंगला पाठवावे. मग द्रवीड, सचिन, सेहवाग असे. झहीर येणार असेल तर कुणाला बसवायचं हा प्रॉब्लेम आहे. मी प्रवीणकुमारला बसवेन, दोन दोन कमी गतीचे बॉलर नको म्हणून.

यापुढे आपल्याला एखादी मॅच जिंकायची असेल तर हा एकमेव सिनॅरिओ मला दिसतोय.. आता आपण टॉस जिंकू असं वाटत नाही. त्यामुळे इंग्लंड पहिली बॅटिंग घेईल असं वाटतंय आणि ते ४५० च्या आसपास करतील. द्रवीड, सचिन, लक्ष्मण पैकी कमितकमी दोघांना प्रत्येक इनिंग मधे शतकं ठोकायला लागतील. बाकीचे २०/२५ करून आउट होतील असं गृहीत धरलं तर आपल्या ३५० च्या आसपास धावा होतील आणि पहिल्या इनिंगचा डेफिसिट १०० च्या आसपास येईल.

दुसर्‍या इनिंगमधे इंग्लंडला २०० च्या आसपास गुंडाळायला पाहीजे. हे शक्य आहे असं मला अजूनही वाटतं कारण आत्तापर्यंतच्या ४ पैकी २ इनिंग्जमधे आपण त्यांच्या टॉप ऑर्डरची वाट लावली आहे. मिश्रा सारखा बॉलर टेल एंडरची लेव्हल करू शकेल.

मग ३०० च्या आसपासचं लीड राहील. आणि परत आपल्या ३ वाघांपैकी २ जणांनी डरकाळी फोडली तर...

>>पण माझ्या म्हणण्याकडे कुणी लक्ष देणार नाही हे मला माहिती आहे.
चिमण,
आकडेवारी तुझ्या पक्षात नाही. सेहवाग ने सलामीलाच (कायम) येवून धावांचा पाऊस पाडला आहे. सेहवाग जुन्या नव्हे नव्याच चेंडूवर जास्त प्रभावी फलंदाज आहे हे निर्विवाद सत्य आहे. त्याच्या फलंदाजीला नवा चेंडूचा वेगच मानवतो. तो सेट झाला की मग जुन्या चेंडूची पिसे काढतो हेही तितकेच सत्य आहे. पण सेहवाग ला मुळात खालच्या क्र. वर खेळायला पाठवणे म्हणजे कटरिना कैफ चं आलेलं स्थळ पत्रिका जमत नाही म्हणून दुसर्‍याकडे पाठवण्यासारखे आहे. Happy

योग्या,
सेहवाग टेस्ट मधे प्रथम आला तेव्हा ओपनिंगला आला नव्हता. त्यानं आणि सचिनने शतकं ठोकली होती. (दोघेही स्लिपच्या डोक्यावरून बॉल मारून चौकार घेत होते, पण थर्ड मॅन ठेवला नाही बराच वेळ! हे वरच्या कुठल्या तरी 'धोनीने थर्ड मॅन ठेवला नाही' या पोस्टला उद्देशून आहे). नंतर तो ओपनिंगला यायला लागला. त्यानंतर एकदाच त्यानं इंग्लंडची वारी केलेली आहे, त्याला आता बरीच वर्ष झाली.

मलाही त्यानं पिसंच काढायला हवी आहेत. पण तो खाली खेळणं त्याच्या स्टाईलला जास्त फेवरेबल आहे असं मला वाटतं. इंग्लंडमधे त्यांच्या सध्याच्या बॉलिंगची आणि ओपनिंग सेहवागची पत्रिका जमणार नाही आहे. ओपनिंगला येऊन तो ५/७ चौकार मारेल नाही असं नाही. पण ती पिसं काढणं होणार नाही. खरं तर तो पुढच्या ४ ही इनिंग्ज मधे १५ ओव्हरच्या वर जरी टिकला तरी मी त्याला मानेन.

योगीच्या डोक्यावर द्वारकानाथ संझगिरींनी हात ठेवलेला दिसतोय :p फरक एव्हढाच की ऐश्वर्या संझगिरींची फेव्हरिट Wink

>>खरं तर तो पुढच्या ४ ही इनिंग्ज मधे १५ ओव्हरच्या वर जरी टिकला तरी मी त्याला मानेन.

चिमण,
नेमके तिथेच सामना ५०-५० आहे. तो १५ पेक्षा जास्त षटके टीकला तर मग सामना आपल्या बाजूने आहे निश्चीत!

>> तो १५ पेक्षा जास्त षटके टीकला तर मग सामना आपल्या बाजूने आहे निश्चीत!
असं कसं काय ठामपणे म्हणू शकतोस तू? तो टिकला तरी पुढचे खेळले पाहीजेत, मग आपल्याला त्यांचे लवकर आउट करायला पाहीजेत. आणि हे एकदा नाही दोन्ही इनिंग्जमधे!

बघू याच कुणाचं खरं होतय ते!

अरे महाराजा.. ते सर्व तर आहेच रे... फक्त सेहवाग बाबत तो १५+ जास्त षटके टिकला तर फायदा आहे असे म्हणतोय. चिमण, तू रसग्रहण बाफ फार वाचतोयस काय? Happy

इंग्लंडमधे त्यांच्या सध्याच्या बॉलिंगची आणि ओपनिंग सेहवागची पत्रिका जमणार नाही आहे.
>>

पटतय. पण तरी त्याने ओपन्च करावी इनिंग. चेंडु टणक असताना स्विंग होतो तसच टायमिंग असेल तर फटकेही सणसणीत तेव्हाच बसतात. आणि सेहेवागच टायमिंग तसच हँड्स-आय कोऑर्डीनेशन जबरा आहे अजुनही. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करालाच हवा.

ओपनिंगला येऊन तो ५/७ चौकार मारेल नाही असं नाही.
>>>

५/७ चौकार मारेपर्यंत टिकला तर पुढे तो पिसं काढणार हे नक्की. पण हे कठीण दिसतय हेही खरं

खरं तर तो पुढच्या ४ ही इनिंग्ज मधे १५ ओव्हरच्या वर जरी टिकला तरी मी त्याला मानेन.
>>>

१५ ओव्हर्स टीकला तर तो मोठी इनिंग खेळणार हे नक्की. तो समोर असताना दडपणाशिवाय गंभीर टीच्चुन खेळतो हा अनुभव आहे.

थोडक्यात काय.. सेहेवाग आलाय म्हणुन हुरळुन जाणे आणि निर्धास्त होणे शक्य नाही. तसच इतरांनाही कामगिरी सुधारण्याला पर्याय नाही. एकटा सेहेवाग एकहाती वन डे किंवा २०-२० काढुन देउ शकतो. टेस्टला किमान एक दोन फलंदाज आणि २० विकेट घेणारे गोलंदाज हवेतच साथीला.

पर्‍या करेक्शन, चेंडु टणक असल्यामुळे स्विंग होत नाही, तर अर्ध्या बाजुला कमी शाईन आणि उरलेल्या अर्ध्यात जास्त शाईन ठेवल्यामुळे होतो.

मेल्या तेच ते रे चिमण्या... स्विंग एकाच बाजुला जास्त ठेवलेल्या शाईन मुळे होतो ते म्हायत्ये मला. पण तेव्हाच नविन असतांना टणक पण असतो ना... आणि तीच लकाकी घालवण्याचच काम सेहवाग लागला तर १५-२० ओव्हर्स मधे उरकुन टाकतो. मग किती पण घासा, नो शाईन.

अवांतर: उगा तांत्रीक मुद्दे नको काढु. खरच रसग्रहणांत रमलेला दिसतोयस योग म्हणतोय तसा. Wink

आरे, १५-२० ओव्हरीत लकाकी कमी होतेच, सेहवाग ऑर नो सेहवाग! म्हणून तर नवीन चेंडूच्या तितक्या ओव्हरी खेळण्याला महत्व असतं!

चेंडू टणक असल्यामुळे बाउंडरीकडे लवकर जातो, जास्त उसळतो इ. इ.

अजून कशाचा कीस काढून हवाय? Proud

१५-२० ओव्हरीत लकाकी कमी होतेच

अमान्य. असो... बाकी चर्चा पुढे जाउद्या.
>> अमूक over मधे लकाकी कमी जास्त होणे हे outfield कसे आहे, बॉल किती वेळा नि कसा बॅट, gloves च्या contact मधे आला आहे ह्यावर पण अवलंबून असते. England मधे shine जास्त वेळ राहतो.

योग

मला तरी अपयशाचे खापर बोर्डावर फोडणे पटत नाही, युवी, रैना, गंभीर यांचे ऊस्ळत्या चेंडूविरुध्दचे तंत्र पहिल्या दिवसापासूनच कमकुवत आहे.. ती काही ईंग मध्ये अचानक प्रकाशात आलेली बाब नाही. अशा वेळी या खेळाडूंनी जेव्हा दौरे नसतात तेव्हा जाहिरताबाजी, व ईतर पार्टीबाजी सोडून आपला खेळ सुधारण्याचा सराव केला तर नक्कीच फरक पडेल, पडायला हवा होता. >> दौरे नसताना is key word. I rest my case. गावसकर किंवा गेला बाजार तेंडुलकर, द्रविड ह्यांच्या सुरूवातीचे दिवस आणि आत्तचे scheduling ह्यात जमिन अस्मानाचे अंतर आहे. आहे त्या परिस्थितीमधे बोर्ड नि खेळाडू दोघेहि दोषी आहेत नि शहाम्रुगासारखे डोके खुपसून बसलेले बोर्ड अधिक दोषी आहे. आपल्या गेल्या काही वर्षांच्या चांगल्या कामगिरी मधे बोर्डाचा वाटा किती हा प्रश्न विचारून पहा स्वतःलाच (आणि हे Aus, england borad बद्दल विचारून पहा) माझा मुद्दा लक्षात येईल. तरीही नसेल तर तुझ्या "आवडत्या" लेखकाचा आज आलेला लेख बघ Happy
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/525931.html

सोनवणे हे गणूचे दुसरे रुप असल्यासारखे का लिहिताहेत ?

पर्‍या करेक्शन, चेंडु टणक असल्यामुळे स्विंग होत नाही, तर अर्ध्या बाजुला कमी शाईन आणि उरलेल्या अर्ध्यात जास्त शाईन ठेवल्यामुळे होतो.>> बेसिक मे वांदा. Happy
अगदी नवा कोरा चेंडू घेउन विकेट किपर कडे सीम पोझीशन तिरकी पण उभी धरून वेगात थ्रो करायचा प्रयत्न करा. Happy

Pages