भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला... पार पडले एकदाचे.
आजच्या खेळाचे वर्णन काय करावे ? पानिपत! Happy
प्रविण कुमार कुठल्याही क्षणी बचेंगे तो और भी लडेंगे असे म्हणेल असे वाटले. त्याचे मात्र खरेच कौतूक!

मुकुंद पुनः कधिही आपल्या संघात सब म्हणूनही दिसणार नाही अशी आशा करतो. Happy

सेहवाग चे ईं चे प्रयाण अगदीच निरर्थक आहे. कारण कुठल्याही सरावाशिवाय ईं च्या या गोलंदाजांविरुध्द "ऊभे" रहायचे टेक्निक त्याच्याकडे नाही. खेरीज त्याचा खांदा आणि झहीर ची मांडी कधी दगा देतील भरवसा नाही. तेव्हा अजून एक मटका.
या दौर्‍यानंतर संघाच्या शारीरीक जखमांबरोबर मानसिक जखमांच्या ऊपचारासाठी बिसीसीआय अजून एक कोच नेमतील यात मला तीळमात्र शंका नाही.

ऊर्वरीत मालिका द्रविड वि. ब्रॉड अशी सिंगल विकेट सामन्याच्या फॉर्मॅट मध्ये खेळवून काय तो निकाल दिला जावा. ऊगाच नसत्या काँट्रोवर्सी आणि स्पिरीट ऑफ गेम च्या वायफळ चर्चा करायची गरज राहणार नाही. रैना, युवी, मुकुंद, ई, श्री, या तरूणांनी दौर्‍यातील ऊर्वरीत वेळ "सत्कारणी" लावावा, तेव्हडेच काहितरी समाधान.. Happy (कोच म्हणून शास्त्री आहेच!)

धोणी आणि भज्जी बद्दल एकही अपशब्द न लिहीण्याची शपथ घेतली असल्याने तूर्तास ***
सचिन ला "ते" शतक लवकर पुरे होण्यास अनेक शुभेच्छा.

धोणी आणि भज्जी >>. दोघेही गेल्या अनेक टेस्ट मॅचेस मध्ये फेल्युअर आहेत. कप्तान कप्तान ठिक पण ३-० करू शकत असताना १-० वर समाधान माणले. आता ०-४ होतील असे वाटत आहे. बघू काय होते. आपली बॅटींग क्लिक होत नाहीये म्हणून घोळ. Happy

स्लीपमध्ये कॅच यावे असे वाटत असेल तर थर्ड मॅन नकोच लावायला. हा कसोटी सामना आहे, एकदिवसीय नाही. इंग्लंडनेही थर्ड मॅन नव्हता लावला.
आता सेहवाग आला की लावतील.
पुढच्या सामन्यातही धोनी टॉस जिंकला तर बोलिंगच घेईल. या सामन्यात गोलंदाजांनी त्याचा निर्णय सार्थ ठरवला होता. आणि लॉडसलाही झहीर असता तर वेगळे चित्र असते.

पराभवाला बीसीसीआय जबाबदार आहे. इंग्लंडमधे आणखी सराव सामन्यांची गरज होती. हे गांगुलीचे मत मला पटते.

सचिनचे शतक झाले असते तर बरे झाले असते. पुढच्या सामन्यात तो वळवळणारा किडा राहिला नसता.

<< स्लीपमध्ये कॅच यावे असे वाटत असेल तर थर्ड मॅन नकोच लावायला. हा कसोटी सामना आहे, >> षटकाला चारच्या सरासरीने धांवा मुख्यतः थर्ड मॅन च्या दिशेने होत असल्या तरीही ? इंग्लंड तर एकदिवसीय सामना असल्यासारखेच फटकेबाजी करत होते ना ! मग क्षेत्ररक्षणही तसं कां नको ?
<< या सामन्यात गोलंदाजांनी त्याचा निर्णय सार्थ ठरवला होता. >> जुगारात कधी तरी घबाड लागतंच ! पण म्हणून आपला फलंदाजीचा हुकमी एक्काच लपवतच रहायचं ?
मयेकरजी, आपण खूप क्रिकेट पाहिलंय व जाणतांही, याची जाणीव आहे. पण या दौर्‍यातले धोनीचे अनेक निर्णय मला तरी बुचकळ्यात टाकणारे वाटतात, हे खरंच नम्रपणे नमूद करतो.
आणि, हो, सराव सामन्यांशिवाय इंग्लंडमधे खेळणं घातक ठरतं, हें मी कदाचित सौरवच्याही आधीपासून इथं सांगतो आहे; जरा माझीही पाठ थोपटा कीं ! Wink

काही निरिक्षणे? (मते)

१. चांगला खेळाडू भारताचा कर्णधार झाला की खेळाडू म्हणून कमी पडतो

२. नशीब व भावनिकता यावर भारतीय खेळाडू अधिक अवलंबुन असतात

३. मुळातच आपण इतका चांगला संघ नाही आहोत की जो परदेशात 'हुकुमी' किंवा 'हमखास' प्रतिस्पर्ध्याला हारवेल. एकदिवसीय क्रिकेटचे विश्वविजेते असल्याची झिंग अजूनही असावी की काय कारण टेस्टला शोभेल असे खेळणे कुणीच प्रदर्शीत केले नाही.

४. देशातून चौफेर टीका झाली की अचानक पराक्रम करू शकणारा असा हा संघ आहे.

५. निदान आजच्या संघात असे तरी (फारसे) खेळाडू नाहीत की जे केवळ त्यांच्या रेकॉर्ड्समुळे टिकून आहेत. (पुर्वी गावसकरने इतरांना अभूतपुर्व कंटाळा येईपर्यंत संघात राहण्याचा विक्रम केला होता. असे पुर्वी अनेक खेळाडू असायचे. हल्ली स्पर्धा वाढल्यामुळे व काही प्रमाणात टॅलेन्टही वाढल्यामुळे तो प्रश्न फारसा येत नाही.) मात्र आपल्या संघाची मानसिकता ही पुर्वीच्याच संघाप्रमाणे (कसोटी क्रिकेटमध्ये तरी निदान) 'सामना वाचवू' स्वरुपाची राहिलेली असावी.

बेफिकीर,
सचिन अलिकडेच म्हणाला होता: "कसोटी" क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे. त्या दृष्टीकोनातून, आपल्या संघातील दोन चार खेळाडू सोडल्यास गेल्या दशकात "कसोटी" पास होण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक "ग्रूमिंग" व तयारीचा अभाव आहे. आणि कसोटी ऐवेजी खोर्‍याने पैसा देणार्‍या आयपिल मध्ये हेच खेळाडू ढोर मेहेनत, दुखापती, ई. सर्वासाठी तयार असतात यातच काय ते आलं. तेव्हा पैशासाठी स्वताचे लाँग टर्म करीयर व गुणवत्ता पणाला लावणार्‍यांना बोर्डा कडे बोट दाखवायचा अधिकार खचितच नाही. ईं. च्या संघातील अनेक खेळाडूंनी अ‍ॅशेस दौर्‍याची तयारी म्हणून आयपिल मध्ये खेळायला नकार दिला होता- पैशापेक्षा देश मोठा हा त्यांचा दृष्टीकोन आहे.

या दौर्‍यात सराव सामन्याचा अभाव, खेरीज बिसीसीआय ने बनवलेले "जीवेघेणे" वेळापत्रक या दोन गोष्टी आपल्या संघाच्या हिता विरुध्द झाल्या यात दूमत नाही. शेवटच्या डावात आपले जवळ जवळ सर्वच खेळाडू अक्षरशः जीवघेणे थकलेले दिसत होते (द्रवीड ची विकेट ही मला एका थकलेल्या फलंदाजाची विकेट वाटली... शेवटी तो ही माणूसच आहे यंत्र नाही). शारीरीक थकव्याबरोबरच अश्या चुरशीच्या आणि प्रचंड दबाव असलेल्या दौर्‍यात मानसिक थकवा लवकर येतो. खेरीज पहिल्या व दुसर्‍या कसोटी मध्ये निव्वळ ३ दिवसांचे अंतर होते!
थोडक्यात याच संघाला किमान २ आठवडे तयारीला व विश्रांतीला दिले तर हाच सांघ मैदानावर वेगळा वाटेल.
पण आता मागाहून बोर्डाला दोष देण्यात काय अर्थ? झहीर, युवी, सचिन, श्री हे तर "नव्या" दमाचेच आहेत ना? बोर्डाच्या दोषाचा एक भाग वगळता बेसिक क्रिकेट मध्ये ज्या चूका आपल्या संघाने केल्या त्याचे काय? मला वाटते सचिन, द्रविड, लक्षमण सोडल्यास ऊर्वरीत संघाला बाद करायला ८ ऊसळते चेंडू पुरेसे आहेत ही वस्तूस्थिती आहे, त्याचे काय? टॉस जिंकून देखिल वि. संघाला प्रथम फलंदाजी देवून भज्जी सारख्यांना खेळवण्याच्या अगम्य निर्णयांचे काय? "मैदानावर" च सामन्याचा निकाल ठरतो- तेव्हा बोर्डाला दोष देणे ही पळवाट आहे- गांगूली कितीही महान असला तरिही त्याच्याकडून बोर्डाचे कारण देणे म्हणजे पराभवात "दुसर्‍याकडे" बोट दाखवण्याची आपली जुनीच मानसिकता पुनः एकदा दिसून येते.

कालच्याही डावात सर्व जण एक-एकटे खेळत होते असे वाटत होते- "संघ" कुठे दिसलाच नाही..
आणि अर्थात ईं. ने सर्वच विभागात आपल्यापेक्षा २००% अधिक चांगली "संघिक" कामगिरी केली.

२-१ मालिका सुटली तरी लज्जा रक्षणाला एक कपडा शिल्लक राहिला म्हणायचं. Happy
---------------------------------------------------------------------------------
सेहवागच्या ईं. प्रयाणाचा हाईप म्हणजे निव्वळ फुग्यात हवा भरणे आहे. आणि ईं. च्या अशा चेंडू स्विंग होणार्‍या खळपट्ट्यांवर आणि त्यांच्या गोलंदाजांसमोर सेहवाग हा फलंदाजीतील हुकूमी एक्का नाही, तीन पत्ती डावामधला पत्ता आहे, तो आपल्या बाजूले "लागला" तर एकहाती डाव आपला आहे हे निश्चीत! तेव्हा Bet at your own risk!

काल मुलाला झोपवुन मॅच बघु म्हणुन TV लावला तर धोनीचे speech चालु होते.:-) झोपायला जायच्या आधी सचिन व भज्जी व्यवस्थीत खेळत होते. वाटले मॅच हरली तरी सचिन शतक करुन तळातील पब्लिकला घेवुन पराभव लांबवेल.

इंग्लडने काल युवी व रैनाचे कच्चे दुवे हेरून त्यांना लागोपाठ उसळते चेंडू टाकून हैराण केले व शेवटी त्यांना बाद व्हायलाच लावले. इंग्लंडच्या ११ व्या फलंदाजाविरूध्द तरी आपली अशी एखादी योजना आहे का?
युवी ११ वर्षांहून अधिक काळ व रैना ६ वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहे. अजूनही त्यांना उसळते चेंडू नीट खेळता येत नाहीत.

>>> पुर्वी गावसकरने इतरांना अभूतपुर्व कंटाळा येईपर्यंत संघात राहण्याचा विक्रम केला होता.

गावसकर? इतरांना कंटाळा येईपर्यंत संघात राहिला? काहीतरीच काय.

बेफिकीर तुमचे गावस्कर बद्दलचे मत वस्तुस्थितीला धरून नाही. कृपया रेकॉर्ड चेक करा. एकंदरीत तुमचा पाचवा मुद्दा अगदीच चुकीचा आहे. स्वतः सचिन २० वर्षे व द्रविड लक्ष्मण १५ वर्षे खेळत आहेत ते त्यांची जागा कुणी घेउ शकत नाहीत म्हणून. तसेच गावस्करचे होते.

योग सेहवाग न्युझिलंड मध्ये ही खेळला होता. पण तरी तुमचा मुद्दा बरोबर आहे.

आता या मॅच बद्दल : चांगली टीम जिंकतेच असे नाही. तसे असते तर क्रिकेट हा फारफारच रटाळ गेम झाला असता.

वेस्ट इंडिज मध्ये शेवटच्या कसोटीत जेंव्हा जिंकण शक्य असताना मॅच सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता तेंव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली होती. डंकन फ्लेचर आणि कर्स्टन मध्ये बराच फरक आहे. ८ आउट १२४ नंतर अजून १०० रन्स करू देण , एका दिवसात ४०० धावा करू देण.इत्यादी मधे कोच चे अपयश ही सामावले आहे. युवराज काल ६ वेळा तरी आउट होता होता वाचला. याचा अर्थ उरलेल्या दोन्ही कसोटीत त्याचे काही खरे नाही. तसाच रैना. यांचे प्रॉब्लेम कोच नीच सोडवायला हवेत. नाहीतर कोच कशाला पाहिजे.

माझ्या मते दोन्ही मॅचेस बॉलर्सच्या फिटनेस च्या अभावाने गेल्या. हे मुख्य कारण. आपला ऑल आउट लवकर झाला यात नवल काय. पहिल्या इनिंगला इंग्लंडची ही बसली होतीच की.

काल हर्षा भोगले ने धोनीला विचारले, हरभजन ला "एक्झॅक्टली" काय झाले होते. त्यावर धोनीचे उत्तर मजेशीर होते.

"हरभजनला "एक्झॅक्टली" काय झाले होते हे मला माहित नाही काहितरी अ‍ॅबडोमेन मसलचा प्रॉब्लेम असावा, फिजेओला जर हरभजनला "एक्झॅक्टली" काय झाले होते हे माहित असेल तर मी त्याला विचारून हरभजनला "एक्झॅक्टली" काय झाले होते हे तुम्हाला सांगीन.
याचा अर्थ हरभजन चे करियर संपत आले आहे काय.?

असो. फक्त खेळाडूंनाच काय म्हणून दोष द्यायचा. मी पण काल एका जागी बसू शकलो नाही. Happy म्हणून मॅच च्या दिवशी मला पेड लीव देणे हे देशहिताच्या द्रूष्टीनी आवश्यक आहे. हा खूप जणांचा प्रोब्लेम असू शकतो. आपल्या इंडस्ट्रियालिस्टना ही क्रिकेट बद्दल जाणीव असणे जरूरीचे आहे. Happy

गावसकरच्या शेवटच्या २० कसोटी व शेवटचे काहि एक दिवसीय सामने यांची आकडेवारी पाहिल्यास ते पटू शकेल. माझ्याकडे आकडेवारी नाही, पण इतके आठवते की तो काहीही न करता कित्येक महिने संघात होता. (काहीही न करता म्हणजे संघाला फलंदाज म्हणून उपयुक्त न होता) Happy

गावस्करने ८०-९० बॉल मध्ये न्युझिलंड विरूद्ध काढलेले एक दिवशीय सामन्यातील शतक हे त्याच्या शेवटच्या काही सामन्या मधील होते.
टेस्ट मध्ये त्याच्या बंगलोर मधल्या पाकिस्तान विरूद्ध च्या ९६ धावा वन ऑफ द ग्रेटेस्ट इनिंग्स ऑन टर्निंग विकेट हेही त्याच्या शेवटच्या सामन्या मधे. Happy तुमच्या भाषेत एक गझल. Happy

>>> गावसकरच्या शेवटच्या २० कसोटी व शेवटचे काहि एक दिवसीय सामने यांची आकडेवारी पाहिल्यास ते पटू शकेल.

गावसकरची शेवटच्या २० कसोटीतील आकडेवारी -

एकूण डाव - ३०, नाबाद - २, एकूण धावा - १४७७, सरासरी - ५२.७५, शतके - ४ (१०३, १६६, १७२, १७६), अर्धशतके - ८ (त्यात ३ वेळा ९० च्या पुढे धावसंख्या)

गावसकरची शेवटच्या २० एकदिवसीय सामन्यातील आकडेवारी -

एकूण डाव - २०, नाबाद - ३, एकूण धावा - ७३७, सरासरी - ४३.३५, शतके - १ , अर्धशतके - ७

गावसकर ऑक्टोबर १९८७ मध्ये विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यानंतर निवृत्त झाला. १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याची कामगिरी होती - ३७, २, ४३, ६१, ५०, १०३*, ४

>>>> पण इतके आठवते की तो काहीही न करता कित्येक महिने संघात होता. (काहीही न करता म्हणजे संघाला फलंदाज म्हणून उपयुक्त न होता)

हे चुकीचे विधान आहे. वरील ७ एकदिवसीय सामन्यातल्या ५ सामन्यात भारत विजयी होता व २ सामन्यात (पहिल्या व शेवटच्या सामन्यात) भारत पराभूत झाला. जिंकलेल्या सामन्यात त्याची कामगिरी होती - २, ४३, ६१, ५० आणि १०३*

गावसकरचा बॅड पॅच म्हणात येइल असा टाईम डिसे. ८३ च्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या त्या विक्रमी शतकानंतर सुमारे दोन वर्षे होता. या काळात त्याने एकही शतक मारले नाही, पण अर्धशतके बरीच मारली. ८४ पासून त्याला पुढे चौथ्या क्रमांकावर खेळायचे होते (८४ च्या लंका सिरीज मधे तो खेळलाही), पण कपिलला तो आघाडीलाच हवा होता. या काळात त्याचे हुकमी मोठे डाव कमी झाले होते. मग ८५-८६ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यापासून तो पुन्हा नेहमीसारखा खेळू लागला ते निवृत्त होईपर्यंत.

शेवटी शेवटी तो स्वतः क्रिकेट खूप एन्जॉय करत होता. वन डे मधे मस्त फटकेबाजी करायचा. कधी स्कल कॅप घातलेला, कधी मिशा वाढवलेला गावसकर बघायला गंमत वाटायची Happy

>> त्याने दोन्ही कसोटीत नाणेफेक जिंकूनसुध्दा गोलंदाजी घेण्याची चूक केली.
माझ्या मते तो योग्य निर्णय होता. पहिल्या मॅचमधे झहीर मोडल्यामुळे आणि इशांतला सूर न मिळाल्यामुळे तो चुकला. पण दुसर्‍या मॅचमधे २२१ ऑल आउट करायला जमलं. आपण पहिल्यांदा खेळलो असतो तर १५०/२०० तच गेलो असतो. दुसर्‍या इनिंगमधे त्यांनी किती धुतला त्यावरून ढग असले तर आपल्या गोलंदाजीला जास्त धार येते.

>> सेहवाग, गंभीर व झहीरला आत आणावे. द्रविड यष्टीरक्षण करेल. द्रविड किंवा सचिनला कप्तान करावे.
सेहवागचा काही उपयोग नाही. गंभीर व झहीर मोडलेले नसतील तर येतीलच. द्रविड किंवा सचिनला कप्तान करून काय साध्य होणारे? युवराज रैना इ. ना शॉर्ट बॉल खेळता येणारे का लगेच?

मास्तरा तुझ्या बाकीच्या पॉईंट मधे नवीन काही नाही.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9445640.cms

इंग्लंड बरोबर सगळेच म्हणत आहे की बेल चुकला होता आणि त्याला धोनी ने परत बोलवायला नको होते....

मग काय धोनी दबावा खाली आला...की .....उदारपणाचा कीडा वळवळु लागला....इतिहासात नाव स्वतःचे लावण्या करीता..............???????/

इतर कोणी काहिही म्हणो. धोनीने बेलला परत बोलावल हे माझ्या मते अतिशय योग्यच केल. विश्वनाथने तेच केल होत. आणि तसच बरोबर आहे. आपण त्यांच्या सारख का वागयच. मग चॅपल आणि आपल्यात फरक काय राहिला. ? वेल डन धोनी. कारण काहिही असो.

नासीर ला हर्षाने विचारल तू काय केल असतस. नासीर म्हणाला. आय वुड लाइक टू बिलीव आय वुड हॅव डन द सेम. Happy

मी लहान असताना पुण्याला वेस्ट झोन विरूद्ध साउथ झोन ही मॅच पहायला गेलो होतो. मॅच अगदी रंगात आली होती. पहिल्या इनिंग मधे आघाडी घ्यायला काही धावांचीच गरज होती साउथ झोनला. त्यावेळेस हैदर अली नावाच्या बॅटस्मन्ला वेस्ट झोन ने बेल सारखेच आउट केले. पण अपिल परत घेतले नाही. वाडेकर कॅप्टन होता. गावस्करही त्या टीम मध्ये फिल्ड वर होता असे वाटते. साउथ झोन मॅच हरली. मी अगदी लहान असताना सुद्धा आपणच काही तरी गुन्हा केलाय अस वाटून गेले. त्यानंतर मॅच मध्ये बरीच कटूता आली होती.

सौरव कॉमेंट्री करत असल्याने मजा येते. विशेष करून तो जेंव्हा ड्रेसिंग रूम मधले वातावरण, थिंकिंग व गमती सांगतो तेंव्हा. आअणि सचिन, द्रविड व लक्ष्मण बद्दल बोलत असतो तेंव्हा. Happy

मग चॅपल आणि आपल्यात फरक काय राहिला.>>>>>>>>. मग ठीक आहे.....हारु द्या भारताला.....इतर संघ आणि आपल्यात काही तरी फरक हवा ना............ Happy

>>शेवटी शेवटी तो स्वतः क्रिकेट खूप एन्जॉय करत होता. वन डे मधे मस्त फटकेबाजी करायचा

अगदी!
सचिन ने देखिल गेले २ वर्षे तेच केले पण नेमकी या दौर्‍यात खेळ एंजॉय करण्यापेक्षा दबाव/दडपणाने त्याच्या मनाचा ताबा घेतलेला दिसतोय.. कालचे त्याचे काही फटके छान होते पण तरीहि देहबोली दबावाखालीच वाटते संपूर्ण दौराभर! (सचिन चे काही कळतच नाही.. एव्हरेस्ट सर केलेल्याने पर्वती चढायचा धसका घेण्यासारखे आहे हे.)

>>पण ब्रॉड च्या कडक आणि तिखट चकल्या फोडणे आपल्याला अजून जमलेले नाही, त्या "हजम" करणे बहोत दूरकी बात है!
कालच्या डावात ब्रॉड च्या चकल्या चाखून बघण्या आधीच ब्रेसनन ने आपली कवळी काढून हातात दिली होती :(.
आता विरू हनुमान कुठली संजीवनी घेवून ईंग्लंडात पोचतो ते बघायचे.

बाकी आकडेमोड फार झाली. थोडे वातावरण हलके करूयात. सद्य दौर्‍यातील आपल्या संघाची ही काही गुणात्मक लक्षणे, शक्य होईल तिथे गाण्याच्या स्वरूपात:
१. मुकुंदः ये कहा आ गये हम..
२. द्रविडः थकले रे नंदलाला..
३. लक्षमणः लक्षमण फक्त बाद होतो तेव्हाच चेहेर्‍याने "व्यक्त" होतो, तेही अगदी फोटोग्राफर पोझ साठी, अन्यथा अख्खा डाव मधुबालाच्या पुतळ्यासारखा असतो. ठसठशीत सेक्सी पण अबोल!
४. रैना: मारू का सोडू
५. सचिनः कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..
६. युवी: शोधू मी कुठे कशी प्रिया तुला..
७. धोणी: ये क्या हुवा..
८. ईशांतः जाने कहा गये वो दिन
९. श्रीशांतः दिस जातील दिस येतील..
१०. भज्जी: आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना..
११. प्रविणः जीया जले जान जले.. (दिल से फेम)
१२. गंभीरः दिल ढुंडता है फै वही फुरसत के रात दिन..
१३. झहीरः हम बेवफा हरगीज ना थे

सेहवाग साठी गाणे तयार ठेवले आहे: देवाघरचे ज्ञात कुणाला!

मग चॅपल आणि आपल्यात फरक काय राहिला.>>> विक्रमशी सहमत. आपण काल हरलो ते भिकार खेळामुळे, बेल ला परत बोलावल्याने नव्हे. इंग्लंडचे बोलर्स आपल्या बोलर्स पेक्षा कितीतरी चांगली बोलिंग करत होते, ती त्यांना करू दिली जात होती. नाहीतरी १५० मधेच आडवे व्हायचे होते तर निदान टॉप च्या एखाद्याने त्यांची लय बिघडवायचा तरी प्रयत्न करायचा.

याच ब्रॉडला सहा सिक्स मारणारा युवराज बाउन्सर्स वर चाचपडताना बघवत नव्हते. फॉर्ममधे असताना कधीच भिरकवून दिले असते असे बॉल्स त्याने.

सचिन मात्र मस्त खेळला. थोडा अजून टिकायला हवा होता, पण लॉर्ड्स पेक्षा हे खूप चांगले. एखाद्याने त्याला सपोर्ट दिला असता तर तीनशे वगैरे पर्यंत जाऊ शकले असते.

अरे बाबा उदया! तुला असं वाटतंय की बेलला परत बोलावल्यामुळेच आपण हरलो. नीट काय झालं ते बघून बोल.

सचिनला १०० व्या १०० चं नक्कीच टेन्शन आलंय! कुणी काही म्हणा! जितक्या लवकर त्याच्या १०० होतील तितक्या लवकर तो आणि त्याचे चाहते सुटतील!

एजबॅस्टनच्या पिच वरती आपलं रेकॉर्ड काय आहे?

योग... गाणी जबरीच...

आता हा धागा बंद करुन पुढच्या सिरीजचा धागा सुरु करा... ही सिरीज ड्रॉ करणे अशक्य आहे.. फार फार तर एखादी मॅच जिंकायला हवी.. किंवा दोन्ही ड्रॉ.. दोन पैकी एक हारली आणि एक जिंकली की आपण नंबर एक वरुन खाली...

हिम्स,
>>दोन पैकी एक हारली आणि एक जिंकली
दुर्दम्य आशावादी दिसतोस..

असो. ईं चा अख्खा संघ मात्र एकच गाणे गातोय: भैय्या ऑल इज बेल
(पहा गाणे देखिल एकच, एकमुखाने, याला म्हणतात सांघिक प्रवृत्ती.. नाहीतर आपले शिंचे.)

पुढील सामान्यांसाठी खालील बदल कसे वाटतात? Happy
मुकुंद च्या जागी गावसकर
रैना च्या जागी गांगुली
भज्जी च्या जागी शास्त्री
धोणी च्या जागी हर्षा भोगले- सामना संपल्यावर मुलाखत/भाषण द्यायला

शेवटी शेवटी तो स्वतः क्रिकेट खूप एन्जॉय करत होता. वन डे मधे मस्त फटकेबाजी करायचा >> एकदम वेगळा गावसकर पाहिल्यासारखे वाटायचे तेंव्हा. बँगलोरची inning तर batting primer against spinners म्हणून लावायला पाहिजे cricket academy मधे Happy

मलाही बेलला परत बोलवणे बरोबर वाटले. जर पूर्ण टीमला तसे वाटत असेल तर बाकीच्यांना काय वाटते ह्याला अर्थ नाहि. Effectively they have to carry burden for that decision. There are enough burdens already lest this one.

टेंट ब्रिजच्या पराभवाचा एकमेव उपयोग म्हणजे भज्जीची guaranteed place आता तरी जाईल असे वाटते. फ्लेचरवर टिका थोडी घाई मधे केलेली वाटते. कोणताही कोच असता तरी आपण जसे खेळतोय आइ ज्या प्लॅनिंगने आलोय त्याला फारसे काहि करता आले नसते. flower ला जसे ECB ने मोकाट सोडलय तसे आपण केलेले कधी बघायला मिळणार ?

जाता जाता, ह्या पराभवाची जबाबदारी निवड समिती अंशतः तरी घेणार का ? Wink

मा़झ्या मते, भारताच्या संघात सर्वश्री फारएण्ड, भाऊ नमस्कर, भरत मयेकर, योग, केदार, असामी, हिम्सकूल, चिमण, उदयवन, अनिल सोनवणे, व मंदार जोशी असे असावेत. मी बारावा किंवा तेरावा होईन. सगळेजण आपापली तब्येत सांभाळूनच असतील. म्हणजे मला काही करायला नको. नुसते पॅव्हिलियनमधे बसून फुकटचे चहा, जेवण! आणि जमल्यास पेपरवाले फोटो काढायले आले की तिथे बाजूला उभे रहायला.
Happy

Pages