भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी,
मी त्याचा लेख खरच ऊघडून वाचेन असे तुला वाटले की काय..? Sad
(ईतर जे म्हणत आहेत तेच तोही म्हणतोय ना..? थोडक्यात ईकडचे ऊचलून तिकडे?)

(ईतर जे म्हणत आहेत तेच तोही म्हणतोय ना..? थोडक्यात ईकडचे ऊचलून तिकडे?)>> नाहि रे. चांगला लेख आहे. मला तरी त्याचे लिखाण आवडते. संयत असते नि knee jerk reactions नसतात, त्यामूळे stating obvious आहे असे वाटणे साहजिक आहे. पण गेल्या ५-१० वर्षांमधे त्याचे views unbiased आणि मुख्य म्हणजे अतिशय संयतपणे मांडलेले असतात असे मी बघितले आहे. शेवटी किती म्हटले तरी BCCI has lot of power to flex muscles and hence its tough to point fingers to them.अगदी गावस्करची सुद्धा हिम्मत होत नाहि (त्याचे १-२ करोड अडकले आहेत त्यावर त्याअची ट्टिपणी वाचली असशीलच. कप्तान असताना निवड समितीला आहे ते स्पष्ट सांगणारा हाच का तो असा प्रश्न पडावा) त्यामूळे धोरणीपणे चूका दाखवून देणारे लेख मला तरी आवडतात. उगाच बेदी सारखे comments मारण्यात काय हशील आहे ?

शिवण ज्या बाजूला जास्त कलवाल तिकडे चेंडू स्विंग होतो. लकाकि मुळे चेंडू स्विंग होतो ही माहीती नवीन आहे. .>> एव्हढे सरळसोट उत्तर नाहि. नवीन नसलेला चेंडू घेऊन स्विंग करता येतो का ? reverse swing साठी एकाच बाजूवर shining का ठेवावी लागते ?

https://secure.wikimedia.org/wikipedia/en/wiki/Swing_bowling

मायकेल वॉन च्या मते तर NASA scientists have provided notion that nothing really matters to swing than speed. Take your own pick.

असामी

मी लिंक वाचली नाही. कॉलेजात याच पद्धतीने खेळायचो. त्या अनुभवावरून लिहीलं. चु.भुं. दे.घे. शाईनच एक भाग घालवण्याचं कारण म्हणजे चेंडू जेव्हां स्विंग होईल तेव्हां शाईन नसलेली बाजू अचानक समोर आल्याने बॅट्समनची चेंडूवर बसलेली नजर विचलीत होऊ शकते हा हेतू त्यामागे असायचा.

अर्थात यावर पंडितांच मत वाचनात आलेलं नाही. वाडियाच्या मैदानावर त्या वेळी सलील अंकोला यायचा. आम्हाला बराच सीनियर होता. याशिवाय ग्रेगरी डिमॉण्टेपण कधी कधी यायचा. त्यांच्याकडून मिळालेल्या या टिपा. पुढे आम्ही काही प्रगती केली नाही भाग निराळा.

धोनीची सराव सामन्यातही वाट लागलेली दिसत आहे. आजच्या सामन्यात त्याने फक्त २ धावा केल्या.

>>> तेव्हा मुकुंद आणि गंभीरला ओपनिंगला पाठवावे.

अजूनही तुला मुकुंद संघात हवा आहे? गंभीर व सेहवाग आत आणायचे असतील तर वरच्या ७ जणांपैकी दोघांना बाहेर ठेवावे लागेल. त्यातले सचिन, द्रविड, लक्ष्मण व धोनी बाहेर जाणे अशक्य आहे. त्यामुळे रैना, मुकुंद व युवराज यांपैकी दोघांना काढायला लागणार. त्यामुळे मुकुंदलाच बाहेर पडावे लागणार.

आता बहुतेक पडलाच तो बाहेर! शतक काढले पण जखमी. ? गंभीर, सेहेवाग द्रवीड हे अजून खेळायला फिट आहेत का?

आता हा दौरा हातचा 'गेला' असे समजून सर्व ज्येष्ठ लोकांनी आत्ताच भारतात परत जावे. एक दीड महिना पूर्ण आराम करावा. इंग्लंडहि कदाचित् या दौर्‍याच्या अनुभवावरून आपले चांगले खेळाडू अ‍ॅशेससाठी जपून ठेवतील.
म्हणजे ऑक्टोबरमधे इंग्लंडचा संघ दौर्‍यावर येईल तेंव्हा त्यांना जबरदस्त मार देता येईल.
कशी काय आहे कल्पना? हे असे निर्णय घेणार्‍यांना म्हणजे भारतीय संघाचे कोच, बीसीसीआय, यांना कुणि कळवाल का?

मी कळवत नाही कारण मी भारतीय क्रिकेटसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एक नवा पैसा सुद्धा खर्च केला नाही, म्हणून माझ्या मताला तिकडे किंमत नाही. शिवाय श्री. शरद पवारांच्या प्रचंड देहयष्टीसमोर मी उभा राहून उड्या मारल्या तरी त्यांना मी समोर असल्याचे कळणार नाही. कदाचित् एका काठीला बर्‍याचश्या दोन तीन हजार कोटींच्या नोटा लावल्या तर ते एक सेकंद वेळ देतील मला.

<<<असे समजून सर्व ज्येष्ठ लोकांनी आत्ताच भारतात परत ज >>>

म्हणजे तिथं स्थायिक झालेल्या ज्येष्ठ लोकांनी असं म्हणायचय का ?

नव्हे. सचिन तेंडूलकर, झहीर, सेहेवाग, गंभीर, द्रवीड, लक्ष्मण, धोनी अश्या लोकांनी. इथे स्थायिक झालेले ज्येष्ठ लोक भारतात कशाला जातील, विकतचे दुखणे!

विकतचे दुखणे!

अहो इथं खूप गंमत आहे. राजेशाही थाट आहेत. सिग्नलला देखील थांबत नाही कुणी Happy आणि कुणीच काही म्हणत नाही. लोकशाही इथंच आहे.

<< मिश्राने ४८ काढले. चला बोनस मध्ये तो धावाही काढेल.>> मला मिश्राच्या गोलंदाजीबद्दल [ एकंदरीतच फिरकी गोलंदाजीबद्दल] खूप व रास्त अपेक्षा आहेत; हॉकीमधे जसं आपण गोर्‍यांचं अनुकरण करून आपली शैली पूर्णतः सोडली [व पस्तावलो] ,तसंच फक्त जलद गोलंदाजीवर अवलंबून क्रिकेटमधेही आपण करत आहोत, असं मला नेहमीच जाणवतं. धोनी तर फिरकीचा द्वेष्टाच असावा !

>>> आता हा दौरा हातचा 'गेला' असे समजून सर्व ज्येष्ठ लोकांनी आत्ताच भारतात परत जावे. एक दीड महिना पूर्ण आराम करावा.

आराम कशाला करायचा? या एकदीड महिन्यात एखादी मिनी आयपीएल खेळता येईल की.

<<रैना, मुकुंद व युवराज यांपैकी दोघांना काढायला लागणार>>
युवराज जखमी होऊन मालिकेतुन बाहेर पडला की.
आज वन डे आणि २०-२०ची टीम जाहीर होणार आहे.

आत्तासाठी नाही, पण सेहवागने त्याला (सचिनच्या निवृत्तीनंतर) चौथ्या क्रमांकावर खेळायला आवडेल असे म्हटले होते. तसाही तो सलामीला ढकलला गेला होता.
प्रश्न इतकाच आहे की सेहवाग सचिनच्या आधी निवृत्त झाला तर? Happy

द्रविड वनडे संघात.............बहुतेक कुणावर भरोसा नाही ठेवला निवड समितीने.......... Happy

भज्जी आनी युवी बाहेर.............

द्रविडला वन- डेत घेणं हा(ही) त्याच्यावर अन्याय आहे. उद्या युवराज फिट झाला की द्रविडची कामगिरी कशीही असली तरी त्याला परत दरवाजा दाखवणार.
यापूर्वीही संघाची गरज म्हणून त्याला एकदिवसीय संघात घेऊन नंतर डंप केले गेले होते. द्रविडच्या दर्जाच्या खेळाडूला अशी वागणूक देणे योग्य नाही.

जे होतय ते चांगल आहे. कसोटी क्रिकेटला शॉर्टकत नाही. २०-२० च्या कामगिरीवर घेतलेले खेळाडू कसोटीला उपयोगी ठरू शकत नाहीत हे सोनाराने कान टोचून सांगितले. मी पुन्हा म्हणतोय, न्युझिलंड मधे सपाटून मार खाल्ल्यावर पर्थ आणि अ‍ॅडलेडला जेव्हा आपण विजय मिळवला तेव्हा खेळपट्ट्या मंदच होत्या. चेंडू चांगला बॅटवर येत होता. सिडनेला मात्र उसळी चांगली होती. द. आफिकेचा दौरा त्यानंतर पार पडला. गांगुली तेव्हा कॅप्टन होता. चॅपेल गुरूजी होते. जागून पाहीलेले सामने आहेत ते.

या अशा शॉर्टकटने टीम कशी काय मजबूत होणारै ? उपखंडात वाघ असणारे इंग्लंडात बॉल स्विंग व्हायला लागल्याबरोबर ढेपाळले. कठोर मेहनत आणि सरावाशिवाय पर्याय नाहीच. २० - २० च्या सर्कस मधून मिळणा-या पैशाने टेस्ट सीरीजकडे दुर्लक्ष केलं कि असच होणार. वेस्ट इंडीज बोर्डाकडून कमी पैसे मिळतात म्हणून वरिष्ठ खेळाडूंना आराम करू देणा-या बीसीसीआयचे डोळे उघडतील अशी अपेक्षा ठेवूयात. विंडिज ऐवजी श्रीलंकेतील मिनी आयपीएल असतं तर हेच जायबंदी खेळाडू उड्या मारत कोलंबोत दाखल झाले असते याबद्दल शंकाच नाही.

द्रविडला एकदिवसीय संघात घेतलं ते योग्यच झालं. युवराजला काढणे ही चूक आहे. तो जर आजारी नसेल तर तो संघात पाहिजेच. भज्जीची हकालपट्टी योग्यच आहे.

विनयकुमार नामक व्यक्ती का वारंवार संघात घेतात? तो म्हणे जलदगती गोलंदाज आहे. त्याच्याकडे वेग, स्विंग, कटर्स, भेदक यॉर्कर्स इ. काहिही नसताना तो कसा काय संघात येतो? मुरली विजय, रविंद्र जडेजा, युसुफ पठाण सारखे, ज्या आयपीएल नावाच्या जत्रेत धमाल करतात (आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात ज्यांची भंबेरी उडते), त्या आयपीएल मध्ये सुध्दा विनयकुमार पूर्ण फ्लॉप आहे. मग कशाच्या जीवावर तो आत येतो?

रोहीत शर्मा अनपेक्षितरित्या विंडीजमध्ये यशस्वी ठरला होता. इंग्लंडमध्ये स्विंगसमोर तो बहुतेक अपयशी ठरेल. इंग्लंडमध्ये तो चांगला खेळला तर मात्र त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे.

नेहरा विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यानंतर दुखापतीमुळे जो बाहेर पडला, तो अजून आत आलेला नाही. स्रिसांथ देखील बाहेर पडलेला आहे.

सोनवणे,

तुमचा बराच गोंधळ झालेला दिसतोय. तुम्ही वेगवेगळे कालखंड व मालिका एकत्र केलेल्या आहेत.

>>> मी पुन्हा म्हणतोय, न्युझिलंड मधे सपाटून मार खाल्ल्यावर पर्थ आणि अ‍ॅडलेडला जेव्हा आपण विजय मिळवला तेव्हा खेळपट्ट्या मंदच होत्या. चेंडू चांगला बॅटवर येत होता. सिडनेला मात्र उसळी चांगली होती. द. आफिकेचा दौरा त्यानंतर पार पडला. गांगुली तेव्हा कॅप्टन होता. चॅपेल गुरूजी होते. जागून पाहीलेले सामने आहेत ते.

न्यूझीलँड मध्ये आपण जाने-फेब्रु २००३ मध्ये सपाटून मार खाल्ला. तेव्हा जॉन राईट गुरूजी होते. ग्रेग चॅपेल गुरूजी २००५ मध्ये झाले. जानेवारी २००९ मध्ये आपण न्यूझीलॅंडला त्यांच्या देशात एकदिवसीय मालिकेत ३-१ व कसोटी मालिकेत १-० असे हरविले होते.

पर्थला विजय जाने २००८ मध्ये मिळविला. तेव्हा गुरूजींची खुर्ची रिकामी होती. चॅपेल गुरूजींनी २००७ मध्येच गुरूजींची खुर्ची रिकामी केलेली होती.

अ‍ॅडलेडला मिळविलेला विजय जानेवारी २००४ मध्ये होता.

द आफ्रिकेचा दौरा २००७ (कर्णधार द्रविड) व २०११ मध्ये (कर्णधार धोनी) होता.

तुम्ही ह्या वेगवेगळ्या मालिका, वेगवेगळ्या खेळपट्ट्या व वेगवेगळ्या गुरूजींचे कालखंड एकत्र केले आहेत. Biggrin

मायकेल वॉन च्या मते तर NASA scientists have provided notion that nothing really matters to swing than speed. Take your own pick.

अंशतः सहमत. मास अ‍ॅण्ड डिस्टन्स मॅटर्स अ‍ॅज वेल. वाहणारा वारा पण कधी कधी चेंडु हवेत हलवु शकतो. असो.

स्विंगसमोर लेट अ‍ॅडजेस्टमेंट करता आली पाहिजे, किंवा कमीट न होता क्षणभर उशीराने फटका खेळला जावा. आपल्याकडे त्यासाठी उपजत कलाकार सचिन, तंत्र घोटवुन आणि अनुभवाने तयार झालेला द्रविड, नैसर्गिक लक्ष्मण हेच ही जबाबदारी समर्थपणे पेलु शकतात. तसेच मुळात दीड-दोन फूट बाहेर उभं राहुन पुन्हा फ्रंट्फुटवर खेळुन, स्विंग होण्याआधीच ब्लोक करण्याचें तंत्रसुद्धा उपयोगी पडु शकतं (गंभीर आणि सेहवाग हे करु शकतात).

न्युझिलंड च्या वेळी जॉन राईट .. बरोबर.

त्या वेळी खेळपट्ट्यांवर टीका झाली होती. कर्णधार गांगुली. आफिकेत गांगुली आणि चॅपेल गुरूजींचं फाटलं म्हणून द्रवीड कर्णधार झाला. काही काळाकरता. पण गांगुली ड्रेसिंग रूममधे होता. गांगुली नॉन प्लेयिंग कॅप्टन होता. आठवा सचिनचं द्विधतक होण्याच्या आधी डाव घोषीत केला म्हणून झालेला गोंधळ.

महेंद्रसिंग धोनीच्या सघाच्या दौ-याबद्दल मी बोलतच नाहीये. कारण क्रिकेट पाहणं हे तेव्हापासून सोडून दिलय जेव्हापासून खेळपट्ट्यांच्या बाबतीतला वाद वाचला. गांगुली पाच सहा वर्षे कर्णधार असणारच. थोड्या फार चुका झाल्या तर वाईट वाटून घेत नाही Proud कारण गूगलण्याची तसदी घेतच नाही. मुळात इतकं महत्व देतच नाही . ढोबळमानाने समजलं तरी पुरे !

>>> आफिकेत गांगुली आणि चॅपेल गुरूजींचं फाटलं म्हणून द्रवीड कर्णधार झाला. काही काळाकरता. पण गांगुली ड्रेसिंग रूममधे होता. गांगुली नॉन प्लेयिंग कॅप्टन होता. आठवा सचिनचं द्विधतक होण्याच्या आधी डाव घोषीत केला म्हणून झालेला गोंधळ.

पुन्हा गोंधळ Biggrin

सचिनचे द्विशतक व्हायच्या आधी (सचिन १९४ वर नाबाद होता), द्रविडने (गांगुलीच्या सांगण्यावरून) डाव घोषित केल्याची घटना आहे पाकिस्तानविरूध्दची. त्यावेळी राईट गुरूजीपदावर होता.

२००५ मध्ये चॅपेल गुरूजीपदावर विराजमान झाल्यावर, ऑसीज परंपरेप्रमाणे, त्यांनी वरीष्ठ खेळाडूंना (त्यांच्या मताप्रमाणे वयस्कर) बाहेर काढण्याची योजना आखली. त्यांना गांगुली, सचिन, द्रविड, लक्ष्मण व कुंबळेला बाहेर काढायचे होते. त्यातून त्यांचे व गांगुलीचे मतभेद झाले. परिणामी द्रविडला कर्णधार केले गेले. संघात खूप गोंधळ व मतभेद वाढले. परिणामी २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे पानिपत झाले.

असू द्यात गोंधळ. मुद्दा समोर आला हे ही नसे थोडके Proud

२००५ मध्ये चॅपेल गुरूजीपदावर विराजमान झाल्यावर, ऑसीज परंपरेप्रमाणे, त्यांनी वरीष्ठ खेळाडूंना (त्यांच्या मताप्रमाणे वयस्कर) बाहेर काढण्याची योजना आखली.

ऑस्ट्रेलियाकडे तेव्हा गिलेस्पीसारखा गोलंदाज होता. त्याला बाहेर ठेवण्याची श्रीमंती त्या संघात होती. प्रमुख चार गोलंदाजांचा बॅक अप त्यांच्याकडे होता. मायकेल वॉ सारख्या दर्जेदार फलंदाजाला घरी पाठवण्याची मग्रुरी त्यांच्याकडे होती. कारण तत्यांची जागा घ्यायला दुसरे तयार होते. आपल्याकडे तेच ते खेळाडू खेळत राहीले परिणामी बॅक अप टीम तयारच नाही. हे आत्ता समोर येतंय.

कुणी असंही म्हणेल कि या वरिष्ठ खेळाडूंना पर्याय नाही.

संथ खेळपट्ट्यांवर दर्जेदार वेगवान गोलंदाज कसे तयार होणार हा अनादिकालापासून विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि पाटा पीचेस वर खेळल्यामुळे उपखंडात डरकाळ्या फोडणारे खेळाडू उसळीची सवयच नसल्याने बॅटींग करू शकत नाहीत हाच जुना रोग पुन्हा डोकावतोय. नवीन काहीही नाही त्यात. मध्यंतरी काम चालून गेलं...

छळू द्यात. त्यात काय वाईट वाटून घ्यायचं ? क्रिकेट आहे ते. आर्य भारतात कधी आले हा वद नाही

Rofl

अगदी अगदी, मायला ५७५ पोस्टी पडल्या... अजुन कसं मस्त मजेत चाल्लय. उणीदुणी नाहित, कोणी चिडलं नाही की वैयक्तीक बोचरी टीका नाही. क्रिकेट का बीबी हय भाय कोइ ऐरा गैरा बाफ समझ्या क्या Proud . ( एक पण फीमेल आयडीची पोस्ट दिसली नाही... Wink ह्यात तर दडलेलं नसावं रहस्य Proud )

Pages