भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी चिडलं नाही की वैयक्तीक बोचरी टीका नाही>>>

एखाद्याने चुकीची माहिती दिली (लिहिण्याच्या ओघात होऊ शकते) तर दुसरा कोणीतरी लिहितो हे चुकले म्हणून, त्यात एखाद्या कमी लेखायचा उद्देश असतो असे (इथे, क्रिकेट बाफवर) वाटत नाही. क्रिकेटच्या बाफवर कधीही भांडण झालेली मी बघीतली नाहीत, हे बोलणे, माहिती मनोरंजकपणे चालू असते व तितक्याच खिलाडूपणे पब्लीक घेतं. अर्थात हा पास्ट, पण उद्या इथेही आर्य भारतात आलेच म्हणून कोणी गोंधळ घालू शकतो हे ही खरेच. Happy

पेक्षा असे म्हण की सचिन, सेहवाग, द्रविड हे आर्य आहेत का म्हणून वरचढ आहेत का? Happy हा गोंधळ घातल्यास याही बाफ वर मनोरंजनाबरोबरच वादही होतील.. आर्य स्विंग गोलंदाजी चांगले खेळतात याचा काही सबळ पुरावा असेल तरच चर्चा पुढे जावू शकेल Happy
ईथे स्विंग च्या दर्जात्मक पातळ्या व रसग्रहण यावर गोंधळ ऊडायला मात्र वाव दिसतोय..
~द

मला आज सकाळपासुनच वाटत होते की द्रवीडला संघात स्थान द्यायला पाहिजेल.... गांगुलीला जसे परत बोलावुन सन्मानाने निवृत्त होण्याची संधी दिली तशी द्रवीडलाही मिळायला हवी... आणि त्यासाठी या दौर्‍याइतकी योग्य वेळ दुसरी नसावी....सुदैवाने तो चांगल्या फॉर्म मध्ये आहे... काळाची पावले ओळखुन द्रवीडने ही वनडे सिरीज गाजवुन जर वनडेतुन निवृत्तीचा निर्णय घेतला तर तो त्याच्या वनडे कारकिर्दीचा उचित शेवट असेल!
Happy

<< आर्य स्विंग गोलंदाजी चांगले खेळतात याचा काही सबळ पुरावा असेल तरच चर्चा पुढे जावू शकेल >> ठिकठीकाणी योजलेल्या यज्ञांमुळेच आपण विश्वचषक जिंकला ना ! उलट,'द्रविड'च स्विंग चांगले खेळतात हे तर आत्ताच सिद्ध झाले आहे !! Wink

ईथे स्विंग च्या दर्जात्मक पातळ्या व रसग्रहण यावर गोंधळ ऊडायला मात्र वाव दिसतोय >>. Lol

ठिकठीकाणी योजलेल्या यज्ञांमुळेच आपण विश्वचषक जिंकला ना >>. सहमत. ह्याचे श्रेय आद्य (आर्य की लोकल ते ठरायचे आहे) श्री विक्रम ह्यांनाच जाते, त्यांनी वल्डकप चालू असताना जागा न बदलन्याचे व्रत घेतले होते व यज्ञात हालचाल नावाची आहूती दिली होती. Happy

आम्हास असे वाटते की ते सद्या मायबोलीवरील क्रिकेट बाफवर लिहित नसल्यामुळे भारत हारत आहे. त्यांनी तात्काळ लिहायला सुरू करावे.

मास्तुरेंशी सहमत.

अनिलजी तुमचा मुद्दा आताच्या काही खेळाडूंना उसळते/स्विंग होणारे चेंडू खेळता येत नाहीत हा असेल तर त्याला कोणत्याच आकडेवारीची गरज नाही.

पण तुमचा मुद्दा "खेळपट्ट्या मंदावल्यामुळे (किंवा बीसीसीआय ने त्या मॅनेज केल्याने) भारत जिंकतो" हा असेल तर तुमची त्याला सपोर्टिंग म्हणून दिलेली आकडेवारी खूप मिक्स झालेली आहे आणि त्याला धरून तुम्ही तो मुद्दा मांडत असल्याने ती अचूक असणे महत्त्वाचे आहे. मागच्या ७-८ वर्षांतील अनेक गोष्टी त्यात मागेपुढे झालेल्या आहेत. त्यामुळे "आकडेवारी सोडा पण मुद्दा योग्य आहे" असे म्हणता येत नाही. तुमच्या याबद्दल च्या पोस्ट ला मी उत्तर दिले होते त्याबद्दल आपले काय मत आहे?

मी पर्थ ची लिन्क वरती दिलेली होती, तुम्ही दरबान, लीड्स, पर्थ वगैरेचे स्कोअरकार्डस चेक करा. तुमच्याही लक्षात येइल. इशांतने पॉन्टिंगला टाकलेली बोलिंग, दरबान ची कॅलिसची श्रीशांतने काढलेली विकेट ही प्रातिनिधिक होती. लीड्स ला २००२ मधे केवळ द्रविड व बंगर ने एक दिवस खेळून काढला व पिच जेव्हा सर्वात डेडली असते तो काळ टिकून राहिल्याने भारताला ६००+ रन्स करता आले व आपण ती मॅच जिंकलो. २००८-०९ च्या सुमारास झहीर-इशांत ही जगातील सर्वोत्कृष्ठ नवीन चेंडू वाली जोडी समजली जाऊ लागली होती.

मास्तुरे फकत १९४ व डिक्लेअर आणि गांगुलीचा काही संबंध नाही. गांगुलीने लगेच "मी हे केले नसते" असे वक्तव्य केले होते. निदान तेव्हातरी तो द्रविडला तोंडघाशी पाडणे शक्य नव्हते. तेव्हा भारत ऐन भरात होता. तसेच जॉन राईटने त्याच्या इंडियन समर्स मधे लिहील्याप्रमाणे हा पूर्णपणे द्रविडचाच निर्णय होता. सचिनचा आणि त्याचा लगेच वादही झाला होता आणि मिटलाही होता. आपल्याला द्विशतक करू द्यायला हवे होते असे सचिनला वाटत होते असे त्यानेच सांगितले होते, मॅचमधे वेळही चिकार होता. द्रविड चा त्यात काही अजेंडा नसेल पण ह्यूमन अँगल बघायला तो कमी पडला. नंतर चॅपेलच्या काळातही तेच झाले. याउलट गांगुलीला याच फॅक्टरची उत्तम समज होती. त्याचे बरेचसे यश हे चांगल्या खेळाडूंच्या मागे ठाम उभे राहणे व त्यांना बरोबर मॅनेज करणे यामुळेच असावे.

>>> मास्तुरेंचा सेल नंबर सचिन ने मागितलाय

सध्या मी खूप बिझी आहे. सचिनला माझा नंबर अजिबात देऊ नका. सचिनला काही सल्ला हवा असेल तर त्याला डंकन फ्लेचरला विचारायला सांगा. Rofl

>>> तर काय! का छळताय राव, मास्तुरे....

अहो, छळत नाही हो. सोनवण्यांनी बर्‍याच मालिका, खेळपट्ट्या, खेळाडू, गुरूजी, आकडेवारी इं. ची सरमिसळ केली म्हणून राहवलं नाही. वरती फारएण्डने बरोबर लिहिले आहे. मंद खेळपट्ट्या असल्यामुळे भारत जिंकला किंवा भारताला मुद्दामहून मंद खेळपट्ट्या दिल्या हे खरे नाही. पर्थच्या खेळपट्टीवर पाँटिंगसारख्या कसलेल्या फलंदाजाला इशांतसारख्या नवोदिताने घाम फोडला होता तो केवळ जिवंत खेळपट्टीमुळेच. स्रिसांथने २००७ व २०११ मध्ये आफ्रिकेत जबरदस्त गोलंदाजी केली ती सुध्दा खेळपट्टीकडून मदत मिळाल्यामुळेच. न्यूझीलँड व विंडीजमध्ये भारत जिंकला तो खेळपट्टी मंद होती म्हणून नव्हे तर प्रतिपक्ष भारतापेक्षा खूपच दुर्बल होता म्हणून. श्रीलंकेत सुध्दा खेळपट्ट्या मंद असतात. पण भारत तिथे आजवर एकही मालिका जिंकलेला नाही, कारण, लंकेचा संघ भारताइतकाच तुल्यबळ आहे आणि स्वदेशी लंकन्स जास्तच चांगली कामगिरी करतात.

>>> क्रिकेटच्या बाफवर कधीही भांडण झालेली मी बघीतली नाहीत, हे बोलणे, माहिती मनोरंजकपणे चालू असते व तितक्याच खिलाडूपणे पब्लीक घेतं.

काही "नेहमीचेच यशस्वी कलाकार" या धाग्यापासून सध्या लांब आहेत, म्हणून हा धागा सुरळीत चालू आहे. एकदा त्यांचे आगमन झाले की मग बघा. "विश्वचषकाचा" धागा, "सचिनच्या भारतरत्नचा" धागा आठवतो का?

>>> मास्तुरे फकत १९४ व डिक्लेअर आणि गांगुलीचा काही संबंध नाही. गांगुलीने लगेच "मी हे केले नसते" असे वक्तव्य केले होते. निदान तेव्हातरी तो द्रविडला तोंडघाशी पाडणे शक्य नव्हते.

असेल कदाचित. त्यावेळी दादा आजारी असल्याने सामना खेळत नव्हता व द्रविड त्या सामन्यापुरता कर्णधार होता. त्यावेळी बर्‍याच वृत्तपत्रात आले होते की दादानेच द्रविडला सचिनच्या द्विशतकाची वाट न बघता डाव घोषित करण्याचा सल्ला दिला होता. या निर्णयावर सचिननेही नाराजी व्यक्त केली होती.

फारएण्ड
मला चुकांचं समर्थन करायचं नाही. पण..
क्रिकेट बद्दल इतकं अभ्यासपूर्ण लिहायची गरज नाही असं माझं मत आहे. मी ढोबळमानाने लिहीलय. पीच च्या संदर्भातला मुद्दा गाजला होता आणि त्याबद्दल काही आर्टिकल्स वाचले होते. ते आर्टिकल्स कुठे वाचलेत हे आता सांगू शकत नाही. अर्थात सहमती नसल्याने वाद उत्पन्न झाला इतकेच. असो. २००२ साली इंग्लंडची टीम काय दर्जाची होती हे आपण जाणताच. रच्याकने, मी लिंक देऊ शकत नसल्याने आणि हा मुद्दा फार ताणण्याची तयारी नसल्याने मी इथच थांबतोय.

माझा मुद्दा साधा आहे. ज्याला आपण नंबर वन म्हणतोय त्या पात्रतेचा हा संघ नाहि हे मान्य करायला हवे. या संघाला उसळते चेंडू खेळता येत नाहीत. बॅक अप टीम तयार नाही. इशांतचा वेगही आता मंदावत चाललाय. दर्जेदार गोलंदाज नाहीत आणि तीन फलंदाज.. त्यातलेही केवळ दोनच सातत्यपूर्ण खेळून नेहमीच जिंकता येत नाही.

>>> ज्याला आपण नंबर वन म्हणतोय त्या पात्रतेचा हा संघ नाहि हे मान्य करायला हवे.

हे मान्य आहे. भारत निव्वळ आकडेवारीमुळे प्रथम क्रमांकाचा संघ बनलेला आहे. १९८६ नंतर भारताने आजतगायत (२००४ च्या पाकिस्तानच्या मालिकेचा अपवाद वगळता) एकाही परदेशी मालिकेत १ पेक्षा जास्त कसोटी सामने जिंकलेले नाहीत. श्रीलंकेत, ऑस्ट्रेलियात व द आफ्रिकेत आजवर भारताने एकदाही कसोटी सामन्यांची मालिका जिंकलेली नाही. २ महिन्यांपूर्वी विंडीजमध्ये ३ र्‍या सामन्यात ४७ षटकांत जेमतेम १८० धावा करायचे आव्हान भारताने न पेलता शेपूट घातलेली होती. सध्याच्या मालिकेत तर भारताची दारूण अवस्था झालेली आहे. ही कामगिरी नंबर १ च्या संघाला अजिबात शोभत नाही.

ज्यावेळी द्रविड, सचिन व लक्ष्मण संघात नसतील, त्यावेळी भारताचा उलट्या दिशेने प्रवास सुरू झालेला असेल.

बेल ला परत का बोलवण्यात आले त्या सन्धर्भात मजेशीर लिन्क.
http://www.theunrealtimes.com/2011/08/03/bell-recall-what-transpired-in-...

असाच परत बोलावण्याचा प्रकार गोल्डन ज्युबिली मॅच मधे घडला होता. त्या सामन्यात टेलर ला कर्णधार विश्वनाथ ने परत बोलावले होते....

क्रिकेट बद्दल इतकं अभ्यासपूर्ण लिहायची गरज नाही असं माझं मत आहे. मी ढोबळमानाने लिहीलय>>काय त्रास आहे ? हा क्रिकेटचा बाफ आहे इथे क्रिकेटबद्दल sensible लिहायचे नाहि ? मागे म्हणालात कि "क्रिकेट का seriously घेताय ?" क्रिकेटच्या बाफवर अजून काय seriously घ्यायचे ?
ढोबळमानाने लिहितोय म्हणत तुम्ही मुद्दे सरमिसळ करुन मांडताहात, तुमच्या मुद्द्याला पुष्टी द्यायला जि आकडेवारि देता ती पूर्ण (अंशतः) नाहि चूकीची आहे. गुगल करून बघायची तसदी घेणार नाहि म्हणता. पण सुरुवातीलाच माझ्याकडे कसलेही पुरावे नाहित पण असे मला वाटतेय म्हणून पिचेसबद्दल व मॅच फिक्सिंग बद्दल ("श्रीलंका धोकादायक आहे. पण घेतात म्हणे पैसे ते पण. फायनलला घेतले होते म्हणे ! पुरावे बिरावे नाहीत माझ्याकडे...") अशी राळ सोडून मोकळे झालात. तुम्हालचूवर लोकांनी तुमची आकडेवारी नि पर्यायाने मुद्दा चूकीचा आहे हे सांगितल्यावर 'ढोबळमानाने लिहितोय पण मुद्दा बरोबर आहे' असे म्हणत वेगळा मुद्दा (पिचेस, मॅच फिक्सिंग वरून undeserving no 1 team) सरकवलात.

England series च्या आधी हा संघ एक नंबरच्या पात्रतेचा नाहि हा साक्षात्कार का झाला नसावा ? एक लक्षात घ्या, ICC ने ठरवलेल्या पद्धतीने गूणांकन होऊन भारत एक नंबरची टिम बनला होता. ज्या कालखंडामधले गुण धरून मानांकन ठरवले जाते त्याप्रमाणे हि नंबर वन बनली होती. (जसे की सध्या गेल्या दोन वर्षांमधे मह्त्वाची ODI bi lateral series सुद्धा मुष्किलीने जिंकणारी Aus टिम पहिल्य/दुसर्‍या क्रमांकावर आहे नि भारत तिसर्‍या. ह्यात काहि कपट कारस्थान नसून ज्या तर्‍हेने points मिळतात त्याचा वाटा आहे) ह्यात "खेळपट्ट्या मंदावल्यामुळे (किंवा बीसीसीआय ने त्या मॅनेज केल्याने) भारत जिंकतो" ह्याचा इथे संबंध नाहि. ढोबळमानानेहि नाहि नि अभ्यासपूर्ण विश्लेषणानेही नाहि.

तसेच जाता जाता, ही टिम 80 च्या WI किंवा ९० s च्या aussies प्रमाणे world dominating आहे असा दावा ही कोणी केलेला नाहि. ही टिम नं १ राहिल असे भविष्य कोणी वर्तवलेले नाहि हा मुद्दा लक्षात घ्यावा.

क्रिकेट बद्दल इतकं अभ्यासपूर्ण लिहायची गरज नाही असं माझं मत आहे. >>>> केदार, असामी, मास्तुरे, चिमण, फारेंड, योग हे सगळे आकडेवारी सकट आपली मतं मांडत असतात. तुम्ही दिलेल्या तपशिलांमध्ये धडधडीत चूका आहेत हे मास्तुरेंनी आकडेवारी देऊन अतिशय नीटपणे मांडलं आहे. त्यावर "चूका असल्या तर असल्या.. उगाच इतकं अभ्यासपूर्ण कशाला लिहायचं" छाप विधान फारच हास्यास्पद वाटतं.
आणि नेहमीप्रमाणेच क्रिकेटच्या बाफं वर क्रिकेटबद्दल लिहिलेलं अभ्यासपूर्ण लिखाण वाचायचा कोणीच कोणाला आग्रहं केलेला नाही. !

@ असामी

त्रास कशाला करून घेताय ? एन्जॉय करा ना ! तुमचं स्विंग बद्दलचं अभ्यासपूर्ण मत आम्ही नाही का एन्जॉय केलं ? Proud त्रास करून घ्यायचा म्हटल्यावर अशक्य आहे बुवा ! प्रत्यक्ष खेळलेल्या माणसाला गूगलच्या लिंका काय कामाच्या ? Biggrin हा खेळ आहे एन्जॉय करावा असं माझं मत आहे. गूगळून स्विंग येत नाही असं मला वाटतं. ते ट्राय करून पहावं. मला तर टीपा घेऊनही हुकमी आउटस्विङ जमला नाही. स्विंग हा चेंडूची शिवण धरण्याची पद्धत, बॉलिंग अ‍ॅक्शन आणि फॉलोथ्रू यामुळं मिळवता येतो हा अनुभव आहे. निव्वळ वेगाने नाही. नाहीतर विंडीजचा पॅट्रिक पॅटरसन हा कोर्टनी वॉल्शपेक्षा यशस्वी गोलंदाज झाला असता. कारण वेगाच्या बाबतीत पीटरसन सरस होता. जवागल श्रीनाथने पदार्पण केलं तेव्हा त्याचा वेग मॅकग्रापेक्षा कितीतरी जास्त होता. त्याचाच का, कित्येकांचा वेग मॅकग्रापेक्षा जास्त होता. मॅकग्रा ११५ ते १२८ किमी ने बॉल टाकायचा. क्वचित १३० च्या पुढे. पण तो यशवी बॉलर ठरला. कृपा करून त्याने किती विकेटस घेतल्या ही आकडेवारी देउ नये. एका बाजूने मॅकग्राने बाजू लावून धरल्यावर दुसरीकडून शेन वॉर्न . गिलेस्पी यांनी विकेटस काढल्यात. मॅकग्रानेही काढल्यात. सांगायचा मुद्दा इतकाच अभ्यासपूर्ण् मतांनी क्रिकेट नाही खेळता येत. बघा पटलं तर आग्रह नाही. खेळावर लिहीताना इतकं खोलात जाऊन लिहायची खरच गरज नाही. आपण विश्लेषक नाहीत. हा. कुणाला तरी मूर्खात काढण्याचा आनंद मिळत अस्ले तर नक्कीच तो लुटावा Proud

जे आकडेवारी देत आहेत त्यांच्याबद्दल आदरच आहे. पण ज्यांना आकडेवारी द्यायचीये त्यांनी देऊ नका असा फतवा मी नाही काढलेला. ते माझं मत आहे. आपण आपली अभ्यासपूर्ण मतं मांडत रहावं शुभेच्छा !

मुद्दे खोडून काढताना पदरचे शब्दप्रयोग टाळावेत. नंबर वन कपटाने मिळालय असं कधी कुणी म्हटलय का ? गुण मिळाल्यानेच ते मिळतं. ते गुण मिलवण्यासाठी आधी कार्यक्रमात नसलेले दौरे आखणं आणि खेळपट्ट्यांचा वाद मीडियात वाचायला मिळणं हे आक्षेपार्ह वाटतं. दर्जा असल्यास नंबर वनची कशाला फिकीर हवी ? आता सर्वत्र नंबर वन संघाला पराभवाचा सामना करावा लागण्यामुळं जी चर्चा होतीये ती होऊ नये असं मला वाटतं. दर्जा नसल्यास नंबर वन गेलं तरी वाइट वाटून घेऊ नये.

<<< England series च्या आधी हा संघ एक नंबरच्या पात्रतेचा नाहि हा साक्षात्कार का झाला नसावा ? >>>

क्रिकेट पाहणं खूप दिवसांपासून सोडून दिलय. मी जेव्हा केनिया वगैरे देशांचा उल्लेख केला तेव्हा हे देश टेस्ट खेळत नाहीत असा उल्लेख झाला. खर तर वन डेमधे नंबर वन मिळवण्यासाठी या देशांचे झटपट दौरे आकहण्यात आले होते. तेव्हा अतिक्रिकेटची चर्चा झाली. यासाठी मला तपशिलात जायची गरज नाही. तस्च कुणी विरोधी मत मांड्लं म्हणून गूगल सर्च देऊन लिंका द्यायचीही गरज नाही. नंबर वन साठी तेव्हा बीसीसीआयने केलेले प्रयत्न हे दर्जा वाढण्यासाठी केले नाहीत.

क्रिकेट बद्दलच ममत्व तेव्हाच संपलं जेव्हा बीसीसीआयने कोर्टात हा संघ एशाचे प्रतिनिधित्वकरत नाही हे शपथपत्राद्वारे सांगितलं. इतर प्रत्येक खेळात तो तो संघ देशाचं प्रतिनिधित्व करीत असतो. असो.

या पोस्टमधेही ब-याच कालखंडांची सरमिसळ झाली आहे. आढावा घेताना ती होतेच. मी ही कुठलाही दावा केलेला नाही कि वेगवेगळ्या कालखंडांची सरमिसळ आहे नाही म्हणून. ती आहेच !! आता यावरून पुन्हा कोणती घटना कोणत्या साली घडली आहे हे दाखवून द्यायचं असल्यास मी कोण बंदी घालणारा ? लगे रहो !

मी जेव्हा केनिया वगैरे देशांचा उल्लेख केला तेव्हा हे देश टेस्ट खेळत नाहीत असा उल्लेख झाला. खर तर वन डेमधे नंबर वन राखण्यासाठी या देशांचे झटपट दौरे आकहण्यात आले होते. तेव्हा अतिक्रिकेटची चर्चा झाली. >>>>> हे भारता बद्दल आहे का ? म्हणजे (भारताचा) वन डेमधे नंबर वन राखण्यासाठी (भारताने ) या देशांचे झटपट दौरे आखले होते ? तसं असेल तर मला वाटतय पुन्हा तपशिलात गफलत होते आहे. वन डेमध्ये नंबर वन "राखण्यासाठी" मुळात तो भारताला कधी मिळालाच नव्हता (अगदी वर्ल्डकप जिंकल्यावर पण) . जाणकारांनी कृपया प्रकाश टाका.

तसं असेल तर मला वाटतय पुन्हा तपशिलात गफलत होते आहे

ऑस्ट्रेलिया नंबर वन असताना आपण क्रमांक दोनवर होतो. नंबर वन मिळवण्यासाठी आपल्याला काही दौरे आखण्याची गरज होती ते आपल्या बोर्डाने दुय्य्म देशांचे दौरे आखून ते काम केलं होतं. तिथे आपल्याला आवश्यक ते गुण मिळाले नाहीत. नक्की पहावं गूगळून.

मी आत्तापर्यंत क्रिकेट किंवा खेळांबद्दल वाचलय त्यात "राखणे" म्हणजे एखादी गोष्ट मिळवलेली असताना ती टिकवणे अश्या अर्थाने वापरला जातो. जसे की : (गतविजेत्या) अमुकतमुक संघाने विजेतेपद राखले. किंवा ह्या विजेतेपदासह ह्या खेळाडूने वर्षाअखेरी आपला अव्वल क्रमांक राखला.
तुम्ही म्हणताय भारताने वनडे मधला अव्वल क्रमांक "राखण्यासाठी" केनिया वगैरे देशांचे दौरे केले. भारताला अव्वल क्रमांक राखण्यासाठी मुळात तो कधी मिळालाच नव्हता.

माझा आक्षेप "राखणे" ह्या शब्दावर (आणि तो शब्द जर बरोबर असेल तर तपशिलावर) होता ... असो !

इंग्लंडमधील मालिकेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे राहुल द्रविडने घोषित केले आहे.

क्रिकेट बद्दल इतकं अभ्यासपूर्ण लिहायची गरज नाही असं माझं मत आहे. >>> अनिलजी, असहमत. तुम्ही वरती ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या प्रत्येक क्रिकेट फॅन्सना वेळोवेळी येत असतात. पण त्यातील काही शंका अनाठायी असू शकतील असेही होऊ शकते.
पण येथे बाफच्या विषयाबद्दलच एवढा गंभीर मुद्दा मांडल्यावर त्याचे सष्टीकरण/आकडेवारी देणे आवश्यक होते.

सचिन श्रेष्ठ की द्रविड, की रिचर्ड्स यात एका लेव्हलच्या पुढे आकडेवारी फार उपयोगी नाही हे समजू शकतो (एका लेव्हलच्या पुढे हे महत्त्वाचे, नाहीतर पठाण च्या सिक्सेस बघून तो ही यात धरला जाईल). पण भारत मंद खेळपट्ट्यांवरच जिंकतो, नं. १ ला लायक नाही अशा क्लेम्सना आकडेवारीची गरज आहेच.

आता तुमचा नं १. ला लायक नसण्याचा मुद्दा. "भारत नं १" म्हणजे जर ८० ची विंडीज किंवा आत्तापर्यंतची ऑस्ट्रेलिया अशा अर्थाने असेल तर नक्कीच सहमत आहे तुमच्याशी. पण मग दुसरे कोण आहे? ना इंग्लंड, ना आफ्रिका ना ऑस्ट्रेलिया. कारण तेवढे भारी कोणीच नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात "घरी व बाहेर" कसोटी सामने जिंकणार्‍या संघाला हे रॅन्किंग मिळते. ही सिरीज जर भारत हरला तर ते जाईल आणि ते योग्यच आहे, पण कदाचित अजून एक दोन दौर्‍यात भारत ते परत मिळवेलही.

आणि ते केनिया दौरा वगैरे तुम्ही अझरच्या वेळचे म्हणत असाल कदाचित. फार पूर्वीची गोष्ट आहे. मला लक्षात नाही पण आता तुम्ही काढलाच आहेत मुद्दा तर चेक करतो. नाहीतर दिवसभर इतर गोष्टीत लक्ष लागणार नाही Happy

बाकी वाद जोपर्यंत वैयक्तिक होत नाही तोपर्यंत आणखी चालू ठेवायला काय हरकत आहे? Happy

>>इंग्लंडमधील मालिकेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे राहुल द्रविडने घोषित केले आहे.
if this is true, not surprised at all!! he deserves to retire on his terms..त्यातही एकदिवसीय मध्ये त्याचे पुनरागमन आणि मग निवृत्तीची घोषणा याला पोएटीक जस्टीस म्हणावे लागेल, दुर्दैव, तो विश्वचषक विजेत्या संघात नव्हता-- त्याच्या कपाटात तो कप हवाच होता.. he certainly deserved it.

फारएण्ड ..

ठीकै. त्रास वगैरे शब्दांनी जरा करमणूक झाली होती इतकच. आत्ताही आपण इंग्लंडकडून मार खाल्ल्यावर समजा केनिया, झिंबाब्वे, बांग्लादेश आणि तत्सम देशांना हरवून क्रमांक एक राखला तर त्याला काही अर्थ असेल का ? हा मुद्दा आहे.

इंग्लंडमधील मालिकेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे राहुल द्रविडने घोषित केले आहे.>>> अगदी योग्य निर्णय. त्याला बहुधा दोन तीन वर्षे आधी असाच "इतर कोणाला झेपत नाही" म्हणून निवडला होता - कदाचित आफ्रिकेत, पण लगेच भारतात आल्यावर काढून टाकला. संघाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व, नवोदितांना मार्गदर्शन (क्रिकेटमधे बॅकफुट नावाचा प्रकार असतो, चेंडू गुडघ्यापेक्षा वर उडाला तर नो बॉल नसतो समजावणे वगैरे Happy ) याबद्दल त्याचा रोल ई. त्याला कोणीतरी समोर बसून समजावत असेल काय?

प्रॉब्लेम असा आहे की देशातील सामन्यांत जेव्हा ३५०+ रन्स होतात तेव्हा द्रविड हा योग्य चॉईस नाही. पण परदेशांत २५०-३०० धावा होतात आणि मुळात स्विंग, पेस, बाउन्स समोर उभे राहणेच कठीण असते तेव्हा द्रविड लागतो. असा फ्लेक्सिबल रोल त्याच्यासाठी सन्मानाने बोर्ड ठरवू शकत नाही काय?

आत्ताही आपण इंग्लंडकडून मार खाल्ल्यावर समजा केनिया, झिंबाब्वे, बांग्लादेश आणि तत्सम देशांना हरवून क्रमांक एक राखला तर त्याला काही अर्थ असेल का ?>>> तसे होत नाही. त्या विजयांमुळे रॅन्किंग फारसे बदलत नाही. (मुळात केनिया टेस्ट खेळत नाही आणि झिम्बाब्वे ही आत्ता परत येउ घातलेत, मधे काही वर्ष नव्हतेच). एकूण रॅन्किंग बलाढ्य देशांविरूद्ध तुम्ही कसे खेळता यातील नंबर्स घेउन बनवलेले आहे.

वनडे मधेही तसेच आहे. ९८-९९ च्या सुमारास भारत असले फालतू दौरे खूप करायचा. आजकाल करत नाही आणि केले तरी दुय्यम संघच जातो (सचिन वगैरे कधीच जात नाहीत आजकाल).

टीम रँकिंगचे पॉइंट्स द्यायचीही एक पद्धत आहे. दुसर्‍या क्रमांकावरच्या संघाला हरवून मिळणारे पॉइंट्स आणि नवव्या दहाव्या क्रमांकाच्या संघाला मिळणारे पॉइंट्स यात बराच फरक असतो.
त्यामुळे लिंबू टिंबू संघांना हरवून भारत रँकिंगमधे पहिला आला या तर्कात अर्थ नाही.
ऑस्ट्रेलिया वर्षानुवर्षे पहिल्या रँकवर बर्‍याच मोठ्या फरकाने विराजमान असल्याचे बघायची सवय झाल्याने भारतही तसेच करेल अशी अपेक्षा होती का?(मला तरी नव्हती, झाले असते तर बरेच होते, विशेषतः विंडिजमध्ये २-० असा निकाल न लावल्याने पॉइंट्स कमी झाले). गेले दोन वर्षे सध्या भारत , द आफ्रिका आणि अ‍ॅशेस जिंकल्यापासून इंग्लंड हे तिघेही नंबर वनचे सारखेच दावेदार आहेत. आता इंग्लंड पहिल्या नंबरवर आला तरी त्यांचेही स्थान डळमळीतच राहील.

>>आत्ताही आपण इंग्लंडकडून मार खाल्ल्यावर समजा केनिया, झिंबाब्वे, बांग्लादेश आणि तत्सम देशांना हरवून क्रमांक एक राखला तर त्याला काही अर्थ असेल का ? हा मुद्दा आहे.

नक्कीच अर्थ असेल. कारण तिथेही सामने "जिंकावे" लागतील. साधा नियम आहे "जो जीता वोही सिकंदर"!
क्रिकेट खेळात हार-जीत शेवटी मैदानावरच होते हे काही ईथे नव्याने लिहायला नको. बरोबर? मग ऊगाच कागदी घोडे कशाला नाचवायचे? वरील तर्कानुसार मग या देशांविरुध्द कुणीही क्रिकेट खेळूच नये, किंवा खेळल्यास त्याचा निकाल एकूण मानांकन प्रक्रीयेत धरला जावू नये असे करावे लागेल. कुठल्याही अंगाने पाहिले तरी ते तर्कसुसंगत वाटत नाही.
तेव्हा, तूर्तास ईं. च्या मालिकेबद्दल बोलुयात, पुढचे पुढे काय म्हणता? Happy

द्रविड ने स्पष्ट केले आहे की इंग्लिश वनडे ही त्याची शेवट ची वन डे असनार आहे.......

बीसीसीआय चे वस्त्रहरण झाले आहे..ज्या टिम ने अवघ्या ३-४ महिन्यांपुर्वी विश्वचषक जिंकलेला आहे त्या संघात नवे नवे चेहरे सामील करण्याऐवजी जुने चेहरे सामील करुन आब्रु वाचवण्याचा प्रयन्त केलेला दिसतोय..
द्रविडला खरे तर घ्यायलाच नको होते...त्याने त्याची कामगिरी चोख बजावली आहे...मग बाकिच्यांची कामगिरी त्यांच्या माथी का मारली जाते...वनडे मधे रोहीत शर्मा, अंबाती रायडु.. बद्रिनाथ ..राहाणे इत्यादी तरुण खेळाडु असताना......त्यांच्यावर अविश्वास का दाखवावा.....भले ते होउ दे अपयशी...यातुनच ते शिकतील.........आता नाहीशिकायला मिळनार तर उद्याचा भारतीय संघ हा अत्यंत दुर्बळ संघ म्हणुन ओळखला जाणार...
श्रीशांत ला का नाही घेतला हे अजुन एक कोडे आहे...एकच कसोटी मिळाली आहे त्यात त्यांने चांगली कामगीरी केली आहे...श्रीशांत हा ब्रॉड आहे...जसे इग्लीश समिती ने ब्रॉड ला पाठिंबा दिला तसा श्रीशांत ला दिला तर तो नक्कीच चांगली कामगिरी करेल....त्याचा सारखा एक आक्रमक गोलंदाज नक्कीच हवा संघात...मुनाफ, इशांत ला बघुन तर असे वाटतच नाही की ते आक्रमक जलद गती गोलंदाज आहे... मुनाफ तर असा वाटतो...या मला मारुन जावा...मी काहीच करणार नाही.. समोरच्या फलंदाजावर जर दड्पण टाकायचे असेल तर श्रीशांत योग्य गोलंदाज आहे...त्याला आक्रमण करायला लावुन इतरांनी फलंदाजाच्या चुकांचा फायदा उचलायचा...कारण श्रीशांत च्या भडकपणाचे उत्तर देण्याकरीता फलंदाज काहीना काही अतातायी पणा करणारच......

फारएण्ड

२००८ मधे आपण श्रीलंका बोर्डाला विनंती केली होती. त्याप्रमाणे कार्यक्रमपत्रिकेत नसतानाही ऐन वेळी ५ वन डे ची मालिका खेळली गेली.

http://www.espncricinfo.com/ci/content/current/series/343727.html

त्या वेळी उपहासाने भारताने केनियाचाही दौरा करून टाकावा असं उपहासाने म्हटलं गेलं होतं ते लक्षात राहीलं. बांग्लादेशचाही असाच झटपट दौरा मागेपुढे झालेला होता. सापडलं तर पाहतो.

Pages