पुलाव

कश्मिरी पुलाव : साधा पण झटपट

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

2 कप बासमती तांदुळ,
2 कप दूध,
1 चमचा साखर,
1/2 चमचा जीरे,
3 लवंग,
1 तेज पान,
3 वेलची
दालचीनी,
2 चमचा तुप,

मीठ

ड्राय फ्रुट्स
आणी छोट्या आकारात कापलेली फळ [सफरचंद, द्राक्ष, पपई, अननस,डाळींब]

क्रमवार पाककृती: 

पुलाव करायच्या अगोदर तांदुळ अर्धा तास भिजत ठेवावे.दुध साखर एकत्र करुन ठेवा.
कढईत जीरे , लवंग, तेज पान, वेलची,दालचीनी तुपावर गलाबी परतुन घ्या.
त्यावर भिजत ठेवलेले तांदुळ ३-४ मिनीटे परता. मग दुध-साखर , मिठ आणी अर्धा कप पाणी वाढवुन शिजवा. गॅस बंद केल्यावर ड्राय फ्रुट्स आणी छोट्या आकारात कापलेली फळांनी सजवा..

[पुलाव केल्यावर फोटो टाकेन .. ]

वाढणी/प्रमाण: 
४ जण
अधिक टिपा: 

- यात भाज्या पण घालु शकतो [शक्यतो वाटाणे, फरस्बी, गाजर ]
- जर भाज्या घालायच्या असतिल तर वरील प्रमाण ६ जणासाठी होईल.
- वेलची आवडत नसल्यास २ दालचीनी घ्यावी.

माहितीचा स्रोत: 
आई

पालक राईस

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बासमती तांदूळ ३ वाट्या
पालक बारीक चिरलेला ३ वाट्या
मटार १ वाटी
बटाटा १ (चौकोनी तुकडे )
कांदा १ मोठा (उभा चिरून)
हि. मिरची-आलं-लसूण पेस्ट २ चमचे
खडा मसाला ( ३ लवंगा. ३ काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र, वेलची)
गरम मसाला
मीठ
दही ( २ जमचे)

क्रमवार पाककृती: 

-३ कप बासमती तांदूळ धुवून ६ कप पाणी व मीठ घालून मोकळा शिजवून घ्या. शिजवताना त्यात १ चमचा तुप घाला.
- पॅन मधे तेलाची फोडणी करून त्यात खडा मसाला, जीरं , मिरची-लसूण-आलं पेस्ट , हळद घाला,
-यावर बटाटा घालून अर्धवट तळून घ्या.
-बटाटा अर्धा शिजला की त्यात कांदा घाला.
- नंतर पालक आणी मटार घालून एक वाफ द्या.
- गरम मसाला, मीठ, दही घालून त्यावर शिजवलेला भात घालून परता.

वाढणी/प्रमाण: 
४ माणसे
अधिक टिपा: 

- दही नाही घातले तरी चालते त्याऐवजी लिंबू घालू शकता.
- बीन्स, ब्रोकोली पण हव्यातर घालता येतात.
- दह्यातला रायत्या बरोबर सर्व्ह करा

1.JPG

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणी माझे प्रयोग.