2 कप बासमती तांदुळ,
2 कप दूध,
1 चमचा साखर,
1/2 चमचा जीरे,
3 लवंग,
1 तेज पान,
3 वेलची
दालचीनी,
2 चमचा तुप,
मीठ
ड्राय फ्रुट्स
आणी छोट्या आकारात कापलेली फळ [सफरचंद, द्राक्ष, पपई, अननस,डाळींब]
पुलाव करायच्या अगोदर तांदुळ अर्धा तास भिजत ठेवावे.दुध साखर एकत्र करुन ठेवा.
कढईत जीरे , लवंग, तेज पान, वेलची,दालचीनी तुपावर गलाबी परतुन घ्या.
त्यावर भिजत ठेवलेले तांदुळ ३-४ मिनीटे परता. मग दुध-साखर , मिठ आणी अर्धा कप पाणी वाढवुन शिजवा. गॅस बंद केल्यावर ड्राय फ्रुट्स आणी छोट्या आकारात कापलेली फळांनी सजवा..
[पुलाव केल्यावर फोटो टाकेन .. ]
- यात भाज्या पण घालु शकतो [शक्यतो वाटाणे, फरस्बी, गाजर ]
- जर भाज्या घालायच्या असतिल तर वरील प्रमाण ६ जणासाठी होईल.
- वेलची आवडत नसल्यास २ दालचीनी घ्यावी.

