दहशतवाद

दहशतवाद : मी काय करणं अपेक्षित आहे?

0

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातली/देशातली ही परिस्थिती सुधारून असे हल्ले टाळण्यासाठी एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे?

'मी' म्हणजे भारत देशातला एक सामान्य नागरिक.

कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं

या व्यतिरिक्त.

मला प्रामाणिकपणे हे जाणून घ्यायचे आहे.

अल्झायमर

काल मित्राशी फोनवर बोलता बोलता तो म्हणाला "मुंबईला अल्झायमर झालाय". त्यावरून सुचलेले हे काही शब्द.
याला लेख म्हणता येत नाही म्हणून कविता विभागात टाकतोय.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
बॉम्बस्फोट कुठे झाले हा फक्त एक तपशील आहे
माणसं मेली किती का फक्त एक आकडा आहे
काही दिवस वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरून मजकूर
निषेधाचे नाद घुमतील जगभर भरपूर
आठवडाभर चर्चांचे पीकही आयोजित होईल
महिन्याने घटना सगळ्यांच्या विस्मृतीत जाईल
वर्षभराने होईल पुन्हा कसाबचा वाढदिवस साजरा

षंढ ....

सामर्थ्याचे बदलते परिमाण...
अन् संस्कृतीचे षंढ संदर्भ...
कसाब, अफजल...
तथाकथित उदात्त संस्कृती...(?)

सत्ता, सामर्थ्य ....
दहशतवादाचे राजकारण...
अन् सहिष्णुतेच्या ओझ्याखाली दबलेले...
कोवळ्या मानवतेचे निरागस, निष्प्राण गर्भ !

हम्म्म्म....
सांत्वनाच्या अगतिक.., क्षीण मेणबत्त्या....
आणि गंगातीरावर उसळलेले आगीचे कल्लोळ...
एके ५६, आर. डी.एक्स. अन् बरबटलेली मने..,
निषेधाचे खलिते, संयमाचे (?) नियम अन सौहार्दाचे थोतांड....

कुठलाच हिशोब लागत नाहीये....
समाजकारणाची समीकरणे...
सोयिस्कररित्या बदलेली....!
स्वार्थासाठी सगळीच गणिते चुकवलेली...

आपण दुसरे करणार तरी काय....

आपण कधी शिकणार आहोत धडा घ्यायला?

२६/११ च्या त्या काळरात्रीला आज शुक्रवारी दोन वर्षे पुर्ण होत आहेत. त्या रात्री दहशतवाद्यांनी मांडलेले थैमान, छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक तसेच इतरत्र गेलेले निरपराधांचे बळी, हा हल्ला परतवुन लावताना धारातीर्थी पडलेले वीर अशा या क्रौर्य, शौर्य आणि वेदनेला आज दोन वर्षे होत आहे. त्या हत्याकांडाला बळी पडलेल्या सर्व असहाय नागरिकांना तसेच हा हल्ला छातीवर झेलुन स्वतःच्या प्राणाचे बलिदान देवुन दहशतवादाला आपले सामर्थ्य, आपली एकजुट दाखवुन देणार्‍या सर्व ज्ञात्-अज्ञात महावीरांना विनम्र श्रद्धांजली !

"हुतात्मा हेमंतजी करकरे, हुतात्मा विजय साळसकरसाहेब आणि हुतात्मा अशोकजी कामटे"

कुछ फैसले अभी बाकी हैं...

२६-११-२००८ ते २६-११-२०१०!

त्या नृशंस संहाराला दोन वर्ष झाली.
गोगलगायीच्या पाठीवर बसून न्यायव्यवस्था म्हणाली...कुछ फैसले अभी बाकी हैं

उद्वेग तोच आहे, अन्‌ हाच पेच आहे! अरेरे

भारतीय लोकशाही प्रगल्भ होईल काय?

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण दिवस निर्जला उपवास करून पुढील २-३ दिवस हा लेख मी लिहीत होतो...

बस्स..., बहोत हो गया भिडू....!

आत असताना कधीकधी...
फारच एकटेपणा जाणवायचा
मग माझी चुळबुळ सुरू व्हायची
नेमका त्याचवेळी तो...
आईच्या पोटाला कान लावायचा...
ती उब जाणवून मी म्हणायचो...
बाबा, खुप एकटं एकटं वाटतय रे...
बाबा हसुन म्हणायचा....

"बाप्पा आहे ना ......!"

आपल्या पायातली ताकद जोखत
जेव्हा पहिलं पाऊल टाकलं...
तेव्हा हातात बाबाचं बोट होतं..
मी दुसरा हात पुढे केला...,
बाबा हसुन म्हणाला...
दोन्ही हात मीच धरले तर...
त्याच्यासाठी काय उरेल?
त्याच्यासाठी...?

"बाप्पा आहे ना....!"

नोकरीसाठी पहिली मुलाखत ...
जाताना आई-बाबाला नमस्कार केला
आता पण असेल का रे बाप्पा सवे?
बाबा हसला, हसुन म्हणाला...

मुंबईवर अतिरेकी हल्ला

0

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.