कविता

निरोप

27 ऑगस्टला मुकेशचा स्मृतीदिन झाला. त्याच्याच एका गाण्याचा भावानुवाद. पहा ओळखते का...

स्वप्ने निमाली गळाले विसावे
तुझ्या हंदक्यांना कुणी सावरावे?

वचने विसर तू विसर प्रेमभाषा
बदलू शके का कुणी हस्तरेषा
ऐश्या जगाला कशाला स्मरावे?

आयुष्य पुरते सखे दग्ध झाले
झुरणे सुखांच्या ललाटी निघाले
अश्रू मला दे तुला सुख उरावे

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

म्हणते मी....

सगळे चांगले चालू असतांना
हे काय झाले म्हणते मी
विनाकारण तुझ्याच बाबतीत
असे का घडावे म्हणते मी

विद्या विनयेन शोभते
शाळेत शिकले होते मी
विनय सोडण्याचे कारण
काय घडले म्हणते मी

तुझी प्रतिभा, तुझी शैली
यावर फिदा इतके सारे
तरी नको तिथे डोकावायला
जायचे कशाला म्हणते मी

खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे
ठाऊक असूनही द्वेष अर्पायला
जायचे कशाला म्हणते मी

त्रास होतोय बघून सारी
जुगलबंदी चाललेली
कंपूशाही माबोवर ही
हवी कशाला म्हणते मी

इतका संवेदनशील आहेस तू
फिकीर नको ती सोडून दे
पुढच्या कथेची वाट पाहतेय
लिहिणार कधी म्हणते मी

रविंद्रनाथांच्या कविता - ३ - तुझे प्रेम ...

तू गेल्यावर
तुझे इथे
हे प्रेम कसे राहिले ?
रस्ते हरवून
तुझे परतणे
दूर कसे राहिले ?

हृदयामध्ये
तुला घेऊनी
फिरतो आता दुनिया ...
खळखळ पाणी
अवखळ पाने
वसंतवेडी माया !

सांडून गेलेले
प्रेमाचे तारे
वरती हसले ..
तिथेच कोठे
तुझ्या घराचे
दार मला का दिसले ?

मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर
मुक्त मराठी अनुवाद मी चैत्र या नाटकासाठी केला.

रविंद्रनाथांच्या कविता - २ - लाल चाफा

तुझ्या वाहत्या पाण्याच्या लाटांवर
माझं चित्र कसं विखुरलय ...

तुझ्या काठावर मी उभा
अविचल, निश्चल
माझ्या फुलांच्या डोळ्यांचा मी !

माझ्या गंभीरतेतच आत
खोल खोल दडलंय माझं झुलणं ..
माझं पालवणं
बहरणं
आणि
एक अनामिक जीवनेच्छा !

गंभीर गाभार्‍यातून सरसरतो
फुलणारा पूर
भिडतो आभाळाला
आणि
नीरव शांततेची एक पहाट
छेदतो ..
पूर्व दिशेला !

मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर
मुक्त अनुवाद मी केला ''चैत्र'' या नाटकासाठी

रविंद्रनाथांच्या कविता १ - तुझ्या नव्या रूपाबद्दल ...

तुझी वाट अनिवार पाहाता पाहाता
अन
आयुष्याचे कण मोजता मोजता
वसंताच्या एका शुभ्र सकाळचं तुझं येणं ..

मृत्यूच्या सूक्ष्म जाणिवांवरही विजय मिळवलेलं तुझं रूप ...

चैतन्याने भारलेला तुझा आवाज ...

सृष्टीतल्या अवघ्या फुलांचा दरवळ
केसांत माळलेली फुलं ?
की
चांदण्यात हरवलेली ?
असे लाखो संभ्रम !
आणि
त्यातच आणखी संभ्रमात पाडणारं
तुझं हे हंसू !

या तुझ्या दिसण्यात,
हसण्यात ..
मृत्यूने
आपले बाण तर लपवून ठेवले नाहीत ना ?

स्वप्न

कल्पनेतली तुझी आठवण कशी साठवू नयनी
स्वप्नातून ओसंडून आली अशी कुशाशी शयनी

विझलेल्या रातीच्या प्रहरी
गुडूप गाढ झोपली सारी
अशी जाहली गम्मत न्यारी
वाऱ्यावर उडवून बटाना टाकून कटाक्ष जुलमी
आली सुंदर नार सामोरी निखळ रम्य हासुनी

डोळ्यावर विश्वास बसेना
हृदयाचा ठोकाच पडेना
झाले मजला काय कळेना
हात धरुनी माझा हाती मंजुळ आवाजात म्हणाली
तुला भेटण्या आले इथवर सर्व बंध तोडूनी

काय मी वर्णू रूप तिचे
चंद्राला लाजवेल असे
नक्षत्राचे तेज दिसे
आकाशातून शोधून कोणी तिला जशी आणली
तिच्या अभावी जणू तारका व्यथित जाहल्या गगनी

हातामध्ये हात घालूनी
डोळ्यांनी डोळ्यांशी बोलुनी
अनुरागाचे गीत गाउनी

लापता...!..हरवला आहे .....!!!

भर स्टेशनच्या बाहेर
पाटी बघून तो म्हातारा काहीसा थबकला
एका खांबावर लटकली होती पाटी
हरवला आहे ...! सापडवून देणार्यास योग्य ते बक्षीस !!!
हसला किंचितसा
फोटोतर वयाच्या मानाने वाटत होता दहा वर्षापूर्वीचा
काहीसा पोक्त ..! काहीसा म्हातारा …!!
तो हलकेच म्हणाला कोण ब्वा हा म्हातारा ..??
नि कसे हरवतात नि पळून जातात
कंटाळून आपल्या घराला ..?
कोठल्या आठवणी असतील
ह्या उभ्या म्हातार्याकडे कुणास ठाऊक…?
पाटीकडे बघून कशास कुणास-ठाऊक ….
किंचित वाटला भाऊक …!!
कशास जगतात एवढी हि चिकट म्हातारी माणसे ……?
फतवा काढायला लावतो सरकारला
जगण्यातून रिटायर करा योग्य वयाला

लापता...!..हरवला आहे .....!!!

भर स्टेशनच्या बाहेर
पाटी बघून तो म्हातारा काहीसा थबकला
एका खांबावर लटकली होती पाटी
हरवला आहे ...! सापडवून देणार्यास योग्य ते बक्षीस !!!
हसला किंचितसा
फोटोतर वयाच्या मानाने वाटत होता दहा वर्षापूर्वीचा
काहीसा पोक्त ..! काहीसा म्हातारा …!!
तो हलकेच म्हणाला कोण ब्वा हा म्हातारा ..??
नि कसे हरवतात नि पळून जातात
कंटाळून आपल्या घराला ..?
कोठल्या आठवणी असतील
ह्या उभ्या म्हातार्याकडे कुणास ठाऊक…?
पाटीकडे बघून कशास कुणास-ठाऊक ….
किंचित वाटला भाऊक …!!
कशास जगतात एवढी हि चिकट म्हातारी माणसे ……?
फतवा काढायला लावतो सरकारला
जगण्यातून रिटायर करा योग्य वयाला

कधीच ही आयुष्य कहाणी खरी वाटली नाही

अस्तित्वाची जबाबदारी कधी घेतली नाही
कधीच ही आयुष्य कहाणी खरी वाटली नाही

नुसते बसण्याहून म्हणालो जीव गुंतवावा हा
पृथ्वीसंगे मीही फिरलो सूर्यासभोवताली
प्रदक्षिणा चाळीस जाहल्या, धाप लागली नाही

नवे पुराणे अब्ज प्रवासी होते गाडीमध्ये
संपत होते, जन्मत होते, जिंकत, हारत होते
उभाच होतो, बसायला जागाच लाभली नाही

कधीच ही आयुष्य कहाणी..

गोविंदा

तरुणाईत उसळली होती
लाट...................
गोविंदाच्या आगमणाची

पथकांनी धरली होती
वाट.................
करतबी दाखवण्याची

युवक-युवती एकसंघ
जोडीने...............
उभे होते

बक्षिस अमाप लुटण्यास
मंडळही.................
सज्ज होते

ढोल-लेझीमच्या तालावर
स्तरावर-स्तर............
होते चढत

रिमझिम त्या वर्षात
हर्ष..............
सारखे होते खुलत

बघता-बघता पथक
गगनाला...........
होते भिडत

आजुबाजुची गर्दी ती,
साहसद्रुष्य..........
होती टिपत

अचानक! त्या पथकाचा,
पाया हो ढासळला
स्तरावरचा गोविंदा मग
खाली हो आदळला

पथकाने त्याला बाजु सारत
प्रयत्न चालु ठेवले