अचानक त्वचेवर प्रलयपात झाले,
बटांचे तुझ्या रेशमी घात झाले.
सखे ठेव ताब्यात ती लांब वेणी,
किती ठार प्रत्येक झोक्यात झाले.
कसे तरसलेले खुळे हे दिवाणे,
तुझा गंध धरण्या पुढे हात झाले.
परम भाग्य तू माळल्या मोगऱ्याचे,
अमोदित तुझ्या पुष्पगंधात झाले.
तुझ्या अस्मितेचाच ताऱ्यांस हेवा,
जळजळून ते उजळ गगनात झाले.
निघालीस बाहेर या निग्रहाने,
जुने पुरुषप्राधान्य हे मात झाले.
जरी काल हरलीस तू ती लढाई,
तुझे शौर्य विश्वात विख्यात झाले.
गुलामी लथडलीस तू कुंडलीची,
कर्नाटकी शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा यांनी कला, कलासाधना यासंदर्भातली सहसा चर्चा न होणारी एक मिती या पुस्तकात सुस्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकानुनय, रसिकानुनय, आनंद, विरंगुळा - कलाविष्कारांवरचे असे जगमान्य पापुद्रे काढून टाकून जगण्याचा शोधक प्रवास म्हणून कलेला आपलंसं केलं पाहिजे; कलेला जातीभेद, वर्गभेद, धर्मभेद यांच्या चौकटीत अडकवून ठेवता कामा नये; कला ही त्यापलिकडचीही एक वेगळी जाणीव आहे; असं ते ठासून सांगतात. हे सांगत असताना त्यांनी आपल्या अनुभवांतून आलेली काही खणखणीत विधानं केली आहेत.
सफाई कामगार, ड्रेनेज मध्ये उतरून साफसफाई करणारा, मैला साफ् करणारे हे समाजातील दुर्लक्षित घटक आहेत.
समाजाने केलेली घाण साफ् करण्याचे काम ते करतात.
मात्र त्याबद्दल तुटपुंजा मोबदला व समाजाच्या तिरस्कृत नजरा त्यांना झेलव्या लागतात.
महात्मा गांधी व गाडगेबाबा ह्यांनी स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून देण्याचे कार्य केले.कुठलेही काम हलके नसते अशी शिकवण आपल्या विचारसरणीतून दिली त्या मागे प्रसिद्धी लोलुपता नव्हती खरी तळमळ होती.
"and yet I found in this dome a lot of love, kindness, spirit, life, moments - and pure art... I felt: yes, I am a citizen of the world and I have a safe place."
-- माजिद आदिन, इलस्ट्रेटर, इराण
-----
कुणाल कामरा यांच्या Shut up ya Kunal या कार्यक्रमात जावेद अख्तर आणि योगेन्द्र यादव आलेले असताना, त्या कार्यक्रमाच्या शेवटी जावेद अख्तर यांनी साजिश ही कविता सादर केली. सद्यपरीस्थितीवर घणाघाती प्रहार करणारी ही कविता माझ्या ऑल टाईम फेवरेट मधे आहे. ही कविता तुम्ही युट्युब वर इथे बघु शकता. पुढे वाचायच्या आधी हे दोनच मिनीटांचं अत्यंत सुंदर सादरीकरण आवर्जुन बघा.
“अशा भाकरी तुज्या कुनी केल्या व्हत्या गं ये भवाने.. हयेचं शिकीवलं व्हय तुज्या आयनं तुला?”
रुक्मिन बाई नेहमी प्रमाणे सुनेवर खेकसत होती.
पण सून तिच्या वरची..
“ये म्हातारे, माज्या आयवर जाऊ नको.. दिसाच्या इस-पंचइस भाकर्या थापायच्या म्हंजी काय गम्मत वाटली काय तुला? त्या करून अजून तिकडं आंगणवाडीत खिचडी शिजवायला जायाच असतया मला, जर्रा येळ झाला की ती बाय वरडती. त्यात आता येळच्या येळी फोनवरून सगळं वर कळवाव लागतं. तुमास्नी काय कळणार हाय त्यातलं! पातळ-पातळ थापत बसले तर घरलाच बसावं लागल मला कायमच. जे बनतय ते खावा गुमान नायतर थापा भाकर्या तुमी!”
जगभर 2020 मध्ये पसरलेल्या आणि अजूनही चिंताजनक स्थिती असलेल्या ‘कोव्हीड-19’ महासाथीच्या पार्श्वभूमीवर अखेर 2021 मध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोक्यो ऑलिंपिक स्पर्धा होत आहेत. या महासाथीमुळे वर्षभर लांबलेल्या या स्पर्धांच्या आयोजनाबाबत अगदी महिन्याभरापूर्वीपर्यंत अनिश्चितता होती. हो-नाही-हो-नाही या वादावर अखेर पडदा पडला आहे.
भारतात सामाजिक, सरकारी आणि राजकीय पातळीवर ऑलिंपिकबाबत निराशाजनक वातावरण असूनही गेल्या पाच-सहा ऑलिंपिकमध्ये खासगी क्रीडा प्रशिक्षण संस्थामध्ये घडलेल्या आणि पदके जिंकणाऱ्या भारताच्या ऑलिंपिकपटूंचा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्यांपेक्षा जास्त अभिमान वाटत आहे.
*महेशदादा थोरात...* या गृहस्थाला त्याच्याच हितचिंतकाने बाजारातून एक किलो दु:ख दिले. अर्धांगिनी सविताची पूर्ण ताकीद, काहीपण घरी आणायचं नाही. त्यामुळे गडी विवंचनेत होता. पण पिशवी घेऊन रस्त्याने येताना एकेक हितचिंतक, मित्र भेटत गेला आणि पिशवीतून काही अंश तो मुठ भरून घेऊन गेला. घरी जाईपर्यंत त्याची पिशवी रिकामी झाली होती. तुला कशाला त्रास.... म्हणत सहकारी मित्र त्याच्याकडचा दु;खाचा प्याला ते रिचवितात , आणि सुखाचा प्याला मात्र त्याच्या वाट्याला देतात. ही त्या स्वामी नुनियानंद यांची किमया...! असे अनेक मित्र आहेत. दुसऱ्यांची दु:ख वाटून घेतात. सुखात सहभागी होतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन करुन लेखाची सुरुवात करत आहे...
कधी ,कधी सरतील ह्या भयानक विषाणूचे दिवस चार?
भगवंता तुझ्या ह्या लेकरांना शक्तीची गरज आहे फार
आता या आभासी(virtual) दुनियेचा आला आहे कंटाळा
पोरंही विचारू लागली आहेत कोणती असती ती शाळा?
हा विषाणू जणू कली आहे या विचारात वेळ चाललाय व्यर्थ
भगवंता तुझ्या कल्की अवताराचे चे दाखव बरं सामर्थ्य
इतके तर कळाले धन,दौलत ,पद, पैसा निष्फळ आहे सर्व
त्यामुळेच तर उमगले माणसातला,धवल, खाकीतला देव
हे भगवंता,कित्येकांनी श्वास सोडला, कित्येकांचा घास पळाला
त्यामुळेच त्यांच्या जीवलगांचा रडून रडून डोळ्यांचा ही बांध फुटला