"आता प्रत्येकाने आपल्या डाव्या हाताने बटूच्या पायावरून एक एक पळी अर्घ्य सोडावे. उजव्या हातात ते जमा करून तीर्थ समजून प्राशन करावे"
एक एक जण आला,
कोणी ओलं बोट ओठांना लावलं,
कोणी केवळ हात तोंडाजवळ नेला,
कोणी ओला हात केसांवरून फिरवला.
अगदी शेवटी ती आली आणि तिनं अर्घ्य दिलं. बटूच्या पायावरून ओघळणारा शेवटचा थेंब जमा झाल्यानंतर, उजव्या हातात जमा झालेलं तीर्थ तिनं मनोभावे प्राशन केलं..
ती परतताना बटूचा हात आशीर्वाद देण्यासाठी वर आलेला मी बघितला.
- भूषण
कधीकधी आपल्याला एखादा छोटासा प्रश्न असतो पण त्यासाठी नवा धागाच काढायची गरज नसते. तर अशा प्रश्नांसाठी हा धागा वापरता येईल.
वेबमास्तर, असा धागा पाहिल्याचे आठवत नाही. असल्यास हा काढून तरी चालेल. तसेच असा धागा असलेला चालेल का? चालत नसल्यास, खिचडी होण्याची शक्यता वाटल्यास देखील काढून टाकला तरी चालेल.
(काल एक प्रश्न होता पण काय होता ते आता विसरले आहे)
एकेकाळी ती तशी होती.. एकेकाळी मी तसा होतो..
एकेकाळी काळ तसा होता..
आणि तेव्हा ती एकदा अचानक म्हणाली होती की,
इथे मी तुझ्याबरोबर फिरते हे माझ्या घरी कळलंय..!
तेव्हा मी आतली धाकधूक आतल्या आत जिरवत,
उसन्या खेळकर आवाजात म्हणालो होतो की,
कळ्ळं तर कळ्ळं..! त्यात काय??
ती : पप्पांनी तुला भेटायला बोलावलंय.
मी : ओह्..! म्हणजे कशाला? त्यांचा काय संबंध?
आपलं चाल्लंय की चांगलं..!
ती : त्यांचा काय संबंध म्हणजे? अरे त्यांचाच तर सगळा
संबंध आहे ना..! मी काय आभाळातनं पडलेय
की काय..!
मी प्लॅटफॉर्मवर पोहचलो. भरपूर लोक दिसत आहेत. थोडी गर्दी आहे. पण माझ्यासारखा कोणीच नाही. मला एकटेपणाची तीव्र जाणीव झाली. कोणीही माझ्यासारखा दिसत नाहीय. असह्य एकटेपणा! मला खूप अस्वस्थ व बेचैन वाटतंय. नकळत मी सारखा बघतोय कोणी माझ्यासारखा दुसरा आहे का.
किती तरी वेळ गेला. गर्दीतही मी एकटाच. भीड में भी अकेला. असह्य एकटेपणा मला अस्वस्थ करतोय. मनात विचार सुरू आहे की माझ्यासारखा दुसरा कधी येईल, कधी येईल.
मायबोली वर राजकीय आणि सामाजिक विषयांवर उत्साहाने चर्चा होतात. त्या कधीकधी खूप माहितीपूर्ण असतात, आणि कधीकधी गोलाकार असतात, त्यांना ना सुरुवात असते ना अंत.
मला अशा चर्चांमध्यें सहभागी असलेल्या सदस्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, कधी मायबोली वरील चर्चेमुळे एखाद्या विषयावर मतपरिवर्तन झाले आहे का ?
जर मत बदलले असल्यास कोणत्या विषयावर बदलले आणि कशामुळे बदलले ?-
व्हॉट्स अॅप ग्रुपवर जुन्या मित्राचा फोन आला. त्याने पार्टीला बोलावलं होतं. मला स्पेशली लिहीलं होतं कि ओली पार्टी नाही. पण मासेपार्टी आहे.
ओल्या पार्टीचे ठिकाण वेगळे होते , ते मला कळवले नव्हते. पण मला ते इतरांकडून पाचच मिनिटात समजले. दारूवर लेक्चर द्यायचे ठरवूनच मी होकार देऊन टाकला. तर बाकीच्या मित्रांनी मला कंट्रोल करायला सांगितलं. आधी कारण तर विचार म्हणाले. शिवाय खास तुला सामील होता यावं म्हणून दारूची वेगळी पार्टी ठेवलीय ते बघ ना.
दगडाची ठेच लागता
रक्त येई पायात
कशास होता पडला
दगड असा रस्त्यात
कितीतरी असे अडले असती
ठेच लागून पडले असती
परी न कुणी विचार करती
फेकून द्यावा तो दगड कुठती
असाच आला वेडा कुणी
खाली वाकला तो झणी
उचलूनी दगड तो पायी
लांबवर कुठे फेकूनी देयी
- पाषाणभेद
१९/०३/२०२२
माननीय ॲडमीन, इराची कहाणी तिच्याच शब्दात, हिंदीत मांडली आहे. हिंदी आपल्या नियमात बसत नसेल तर ही कथा काढून टाकावी. धन्यवाद.
इरा, काश्मिरी पंडित. द काश्मीर फाईल्स या इंग्रजी शीर्षक असलेल्या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने इराची कहाणी तिच्याच शब्दात:
" हां इरा, अब आप सुना दो जो कहानी आप कहने जा रही है।"
सर्व प्रतिसादीत वाचकांचे आभार! लेखनाला सुरवात केली तेव्हा वाटलं होतं की फार काही मोठा किस्सा नाहीये. तेव्हा एकच किस्सा लिहून खतम करू म्हणून. पण मग लिहायला लागल्यावर कळतंय किती कठीण काम आहे ते. त्यामुळे जमेल तसे छोटे छोटे भाग टाकतोय.
बहिणीकडे जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आई बॅग भरत होती. दोघेच बसने जाणार म्हणून अगदी गरजेपुरते सामान एकच बॅग भरून घेऊन जायचं असं बाबांनी बजावून सांगितल्यामुळे आईचा थोडा गोंधळ उडाला होता. त्यातच कन्येने "मी पण आत्या कडे येणार" असा हट्ट धरला होता.
साधारण १०-१२ वर्षापूर्वी घडलेली घटना. त्यावेळी मी, पत्नी, दोन मुले - मुलगी व.व. ४, मुलगा व.व. ०.७५, आई आणि वडील असे सर्वजण इचलकरंजीला एकत्र राहत होतो. गेले २-३ महिने सौ व आई यांचा जुन्या गाद्या मोडून नवीन करण्याबद्दल पाठपुरावा चालू होता. आता मोडून म्हणजे काय तर गादीवाला जो असतो तो घरी येतो, जुन्या गाद्यांचे वजन करतो आणी घेऊन जातो. मग आपण त्याच्या कारखान्यात जायचं. आपल्याला हवं ते कापड सिलेक्ट करायचं. साधारण साइज व नग सांगायचे. जर जादा कापूस लागणार असेल तर त्याचे पैसे व कापडाचे पैसे आगाऊ घ्यायचे . मग २-३ दिवसात तयार गाद्या घरी डिलिव्हरी देऊन जातात.