६ लिंबु, १ छोटी वाटी साखर, अंदाजे मीठ, १/२ चमचा तिखट, आवडत असल्यास थोडेसे जिरे.
६ लिबे चांगली धूऊन पुसुन घ्यावीत. त्याच्या नेहमीप्रमाणे १ लिंबाच्या ८ याप्रमाणात फोडी कराव्यात.
नंतर त्यात साधारण १ चमचा मीठ, १ छोटी वाटी साखर घालुन मिक्स करुन बरणीत भरुन ठेवावे. नंतर
१५ दिवसांनी त्याला रस सुटलेला दिसेल. फोडी चिरतानाच त्यातील सगळ्या बिया काढुन टाकाव्यात.
व १/२ चमचा तिखट घालुन ते सर्व मिश्रण मिक्सर मधुन काढुन घ्यावे. अगदी चटणी वाटल्याप्रमाणे
बारीक करुन घ्यावे.झाले मस्तपैकी उपवासाचे लोणचे तयार. आंबट-गोड असल्यामुळे लहान मुले पण
आवडीने खातात. व संपुर्ण वाटल्यामुळे लिंबाची साले पण वाया जात नाहीत.
फक्त १ काळजी घ्यावी लागते कि एखादी बी जर राहीली तर ते कडु होण्याची शक्यता असते. म्हणुन
काळ्जीपुर्वक सगळ्या बिया काढाव्यात. उपवासाला खिचडीबरोबर छान लागते.
अगदीच १५ दिवसांनी जमले नाही तर १ महिन्यांनी जरी मिक्सरमधुन काढले तरी चालते. नंतर फ्रिज मधे
ठेवावे. जसे जसे मुरेल, तसे सुंदर लागते.


