१) तांदूळ - अडीज वाट्या
२) चिरलेला किंवा किसलेला गूळ - अर्धा किलो
३) खोवलेला नारळ - अडीज वाट्या (जितका तांदूळ तितकाच नारळ)
४) केशरकाड्या
५) लवंग (८-९)
६) काजू + पिस्ता + बदाम चे तुकडे
७) बेदाणे
८) वेलची पावडर (किंवा एव्हरेस्ट ची दूध मसाला पावडर)
९) तूप (८-९ मोठे चमचे)
१०) पाणी (६ भांडी) (भांडं = फुलपात्र)
(नेहेमीचा भात शिजण्यासाठी जितके पाणी घेता त्यापेक्षा जरा जास्त पाणी घ्यायचे.)
१) प्रेशर पॅन किंवा जरा सपाट बुडाचे पातेले घ्यावे. मंद आचेवर ८-९ मोठे चमचे तूपावर ८-९ लवंगा परतून घ्याव्यात.
२) घुतलेला तांदूळ (आधी भिजवून ठेवायची गरज नाही) या तूपावर परतावा.
३) तांदूळ लालसर होऊ लागला की वर दिलेल्या प्रमाणातील नारळाचा चव घालून परतावा.
४) मिश्रण नीट परतले गेले की ६ भांडी पाणी (वर दिलेले प्रमाण) घालून ढवळावे. झाकण घालून भात शिजू द्यावा. अधून मधून ढवळत राहून भाताची कणी शिजली की नाही ते पाहत रहावे.
५) भात शिजत आला की गूळ घालावा (खूप गोड नको असेल तर अर्ध्या किलोतला थोडासा वगळला तरी चालेल.) व ढवळत रहावे.
६) गूळ वितळला की प्रेशर पॅन खाली तवा टाकावा. शेगडीची आच मंदच असू द्यावी.
७) आता मिश्रणात केशरकाड्या + काजू + पिस्ता + बदाम चे तुकडे + बेदाणे + वेलची पावडर (किंवा एव्हरेस्ट ची दूध मसाला पावडर) टाकावे आणि ढवळावे.
८) पुन्हा झाकण घालून भात मंद आचेवर शिजू द्यावा.
९) साधारण १० मिनिटांत भात शिजेल. अधून मधून झाकण काढून ढवळायला हरकत नाही.
खाताना मिळतो स्वर्गीय आनंद 
आजच केलाय सकाळी नारळी भात. मस्त झालाय. 



