राजकारण

अफगाणिस्तान - एक शोकांतिका ( भाग ०१ )

Submitted by Theurbannomad on 16 August, 2021 - 11:04

" आमचं भवितव्य अंधारात आहे आता....सगळं संपलं ! " माझा एक अफगाणी मित्र अतिशय कळवळून माझ्याकडे मन मोकळं करत होता. " खूप सोसलंय आमच्या देशाने....खेळणं केलं आमच्या देशाचं त्या खवीस रशियाने आणि अमेरिकेने....दहशतवादी आम्ही आहोत की ते? तालिबान तयार यांनी केले, आणि मग त्यांना संपवायला हे स्वतःहूनच आमच्या देशात आले...म्हणाले होते लोकशाही आणू...कसली लोकशाही आणली यांनी???" त्याच्या या प्रश्नांना उत्तर द्यायचं माझं धाडस झालं नाही. प्रश्न थेट होते, उत्तरं मलाच काय पण समस्त जगाला माहित होती पण त्यावर तोडगा मात्र कोणाकडेच नव्हता.

विषय: 

'खेळरत्न पुरस्कार' नाम बदल..योग्य की अयोग्य?

Submitted by सचिन पगारे on 12 August, 2021 - 15:10

भारता चे महान सुपुत्र दिवंगत प्रधानमंत्री राजीवजी गांधी यांच्या नावाने 'खेळरत्न' हा पुरस्कार् देण्यात येतो. सध्याच्या मोदी सरकारने राजीवजींच्या नावे देण्यात येणाऱ्या ह्या पुरस्काराचे नाव बदलून ध्यानचंद ह्या खेळाडूच्या नावाने हा पुरस्कार् देण्याचा निर्णय घेतला.

पीएम ह्यांनी लोकांची मागणी म्हणून हे नाव बदलल्याचे
सांगितले.अर्थात कोण लोक, कुठे मागणी झाली, कुठे मोर्चे निघाले याबद्दल अवाक्षरही नाही.अर्थात सत्ताधारी म्हणून त्यांनी त्यांचा अधिकार वापरला. अशीच तात्परता बेरोजगारी, लसीकरण,पेट्रोल डिझेलचे वाढते भाव, अशक्त जिडीपी। ह्याबाबत त्यांनी दाखवल्यास जनता त्यांची। ऋणी राहील.

केंद्र सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाचेही राजकारणच केले।

Submitted by ashokkabade67@g... on 7 August, 2021 - 12:53

केंद्र सरकारकडे मोठ्या आशेने पहाणाऱ्या मराठा आरक्षणाचे शेवटी केंद्र सरकारने राजकारणच केले .राज्याला आरक्षणाचे अधिकार देतांनाच आरक्षणाचा चेंडू राज्याकडेच परतवला पण अधिकार देतांनाच पन्नास टक्क्यांची मर्यादा मात्र कायम ठेवत आरक्षण लटकवून ठेवले व जाती जातीत भांडण लावत स्वताचा स्वार्थ साधण्याचे राजकारण केले महाराष्ट्रात भाजप नेते कितीही भलावण करत असले तरही केंद्र सरकारला आरक्षण द्यायचे नाही हे मात्र स्पष्ट झाले नरसिंहराव सरकिरच्या काळात तामिळनाडू राज्याला आरक्षणाबाबत पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलाडण्याची परवानगी देत काँग्रेस सरकारने आरक्षण मर्यादा वाढवून दीली तेच मोदी सरकारला करता आले नाही वा करा

विषय: 

'तबर'चा राजनय

Submitted by पराग१२२६३ on 31 July, 2021 - 02:33

भारत आणि रशिया यांच्यातील घनिष्ट संरक्षण संबंधांचे एक प्रतीक असलेली ‘भा. नौ. पो. तबर’ (आयएनएस तबर) ही युद्धनौका नुकतीच रशियन नौदल दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाली होती. त्या सोहळ्याच्या निमित्ताने रशियाच्या सदिच्छा भेटीवर असलेल्या ‘तबर’ने 22-26 जुलैदरम्यान सेंट पीटर्सबर्गमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर 28-29 जुलैला ‘तबर’ने दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या ‘इंद्र’ युद्धसरावातही भाग घेतला.

हाँग काँग आणि चीन

Submitted by पराग१२२६३ on 9 July, 2021 - 08:49

हाँग काँगला मुख्य चीनशी पूर्णपणे एकरुप करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 24 जून 2020 पासून ॲपल या लोकशाहीवादी दैनिकाचे प्रकाशन बंद करण्यात आले आहे. त्याआधी चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने जून-2020 मध्ये हाँग काँगसाठीचा ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ एकमताने मंजूर केला होता. त्यानंतर लगेचच त्या कायद्यानुसार हाँग काँगमधील लोकशाहीवादी आंदोलन चिरडून टाकण्यास सुरुवात झाली. लोकशाहीवादी आंदोलकांच्या म्होरक्यांची धरपकड सुरू करून त्यांच्यावर खटले दाखल करण्यास सुरुवात झाली. या कायद्याने हाँग काँगवरील आपली पकड मजबूत करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे.

नादिया मुराद - द लास्ट गर्ल

Submitted by स्वेन on 2 July, 2021 - 05:06

अडॉल्फ हिटलरचं मेईन काम्फ, एपीजे अब्दुल कलाम यांचं विंग्ज ऑफ फायर, नेल्सन मंडेला यांचं लाँग वॉक टू फ्रिडम, राकेश मारिया यांचं लेट मी से इट नाऊ, बराक ओबामा यांचं अ प्रॉमिस्ड लॅंड, देव आनंद यांचं रोमान्सींग विथ लाईफ ही अशी आत्मकथनाची पुस्तकं हातात पडल्यावर आपण वाचायला सुरुवात करतो आणि मग ते पुस्तक वाचून संपवल्याशिवाय खाली ठेववत नाहीं.

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे नाव का देण्यात यावे?

Submitted by उरणकर on 26 June, 2021 - 02:52

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन करुन लेखाची सुरुवात करत आहे...

राम आणि महाभारत।

Submitted by ashokkabade67@g... on 17 June, 2021 - 04:45

काल राममंदिर ट्रस्ट ने खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेत महाभारत घडले .जमीन खरेदीबाबत भ्रष्टाचार झाला की नाही याबाबत शिवसेनेन अग्रलेखात चौकशीची मागणी केली आणि भाजपचा तिळपापड झाला तशी चौकशीची मागणी कुणीही ज्यांनी देणगी दिली आहे तो प्रत्येक माणूस करु शकतो आणि माहिती देणे हे ट्रस्टचे न्याय कर्तव्य आहे तसे पाहिले तर मोदीजी आणि भाजप नेहमीच पारदर्शकतेची भाषा करत असतात मग पारदर्शकता दाखवत याबाबत योग्य ती माहिती देऊन प्रकरण सहज मिटवता आले असते पण महाराष्ट्रात सत्ता गेल्यापासून अस्वस्थ झालेले भाजपनेते आता मोदीजींच्या म्हणन्याप्रमाणे फक्त आंदोलनजीवी झाले आहेत .ख

विषय: 

गोरक्षण आणि राजकारण

Submitted by प्रजननविरोधी on 30 May, 2021 - 00:37

२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गोरक्षण चळवळी अधून मधून चालत होत्या. अहिंसेच्या तत्वांचा भाग म्हणून महात्मा गांधींनी त्यांना हातभार लावताना गुरांची कत्तल करणाऱ्या आणि आवश्यक सफाईचे काम करणाऱ्या दलित आणि मुसलमानांच्या दानवीकारणालाही विरोध केला. स्वातंत्र्या नंतर, गांधी हत्येचा डाग पुसण्याचा चांगला मार्ग म्हणून हिंदुत्ववाद्यांनी गोरक्षणाचे मुद्दे उचलून धरले आणि तिथून चळवळीला वेग प्राप्त झाला.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण