रोजच्या जगण्याचं हे दैनंदिन धबडगं इतकं आवश्यक का होऊन बसतं, काही कळत नाही. हंड्याहंड्याने पाणी भरताना माठालाच भोक असल्याने शेकडो हजारो हंडे टाकूनही तो भरू नये, पण तो भरत राहणं मात्र श्वास घेण्याइतकंच आवश्यक होऊन बसावं, असं काहीतरी. श्वास घेण्याला निदान काही निश्चित अर्थ आहे, प्रयोजन आहे. इथं मात्र ते हंडे, माठ, पाणी आणि ते भरणं- सारंच निरर्थक.

