आरती यांचे रंगीबेरंगी पान

'अंक'

लहानपणी कोणताही विषय आला तरी २०-२५ ओळी निबंध आपण ठोकूनच द्यायचो परीक्षेत. मध्यंतरी असेच एक पुस्तक वाचले. वेगवेगळ्या ८०-९० विषयांवर दीड-दोन पानांचे लेख होते. सहज वाटले आपणही प्रयत्न करावा अजून 'ते' स्कील आहे का स्मित. दिवाळीचा सुमार होता, दिवाळी अंकांची चर्चा जोरात होती, म्हणून तोच विषय घेतला.

'अंक'

गंगासागर

टाईप करण्यासाठी इथे धागा उघडला होता. तो ना आता मला डिलिट करता येत आहे ना तेंव्हा तो मला तिकडे हलवता आला. तो तसाच अप्रकाशीत पडुनच रहाणार होता तर त्याचा उपयोग करावा असे वाटले. आणि माझे सगळे लिखाण, माझ्या रंगीबेरंगीवर एकत्र असावे हा पण एक हेतु आहेच. त्यासाठी ही लिंक इथे आहे. (इतर कुठलेही (गैर)समज करुन घेउ नये.)

http://www.maayboli.com/node/30839

लिखाण जुने झाले की शोधा-शोध करायचा कंटाळा येतो.
- आरती.

' पान '

ऑफिसच्या खिडकी बाहेर पिंपळाचे मोठ्ठे झाड होते. रोज दुपारी जेवण झाल्यावर खिडकीतून बाहेर बघत बसले कि, पिंपळाची पानं पडताना दिसायची. पिंपळाचे पानं कधीच झाडावरून 'टपकन' खाली पडत नाही. ते फांदीपासून विलग झाले कि हवेत किमान २-३ गिरक्या घेउन मगच जमिनीवर टेकते. मला तो छंदच जडला होता, सुटलेले पानं कुठे जाऊन पडते ते बघण्याच्या. असेच कधीतरी बघता बघता हि कविता सुचली.

रोजच बघतो पक्षी नवे
उंच उडणारे थवेच थवे
मनात असते नभी झेपावे
घेउन भरारी, मजेत गावे

त्याच फांद्या, तीच पाने
तेच तेच ते नकोच जिणे
तोडून सारे पाश जावे
रोज नव्या वल्लरी वसावे

आज अचानक काय हे घडले
वाऱ्याने मज अलगद खुडले

' मुक्त '

http://www.maayboli.com/node/30444

माझे सगळे लिखाण, माझ्या रंगीबेरंगीवर एकत्र असावे या आणि केवळ याच हेतुने ही लिंक इथे ठेवली आहे. (इतर कुठलेही (गैर)समज करुन घेउ नये.)

लिखाण जुने झाले की शोधा-शोध करायचा कंटाळा येतो.
- आरती.

साठवण

[२००३ च्या हितगुज दिवाळी अंकातुन]

नंदा आणि तिच्या काही कविता

नंदा माझ्याकडे कामाला येत असे. सकाळी सात वाजता न चुकता बेल वाजायची आणि ही आत यायची. काल माझ्याघरुन गेल्यापासुन आज येईपर्यंत मधल्या वेळात जे जे काही तिच्या आयुष्यात घडले, तो सगळा पाढा माझ्यासमोर वाचल्याशिवाय ती कामाला हातही लावत नसे.

मी ब्रश करत असेल तर ती लगेच चहा टाकणार, मी चहा केलेला असेल तर ही गरम करुन तो घेणार. मी स्वयंपाक करे पर्यंत तिथेच बघत उभी रहाणार आणि मी करत असलेली भाजी, तिच्या पध्दतीने केल्यास कशी जास्त चवदार होईल हे मला पटवुन देण्याचा प्रयत्न करणार.

अनुभूती रंगांची

हिरवट रंगाभोवती छोटासा पिवळसर पटटा, त्याला तपकिरी रंगाची किनार. मधे लाल चुटुक, त्यावर जांभळे टिपके, आणि वरच्या बाजुला हिरवा गार.

हे वर्णन माझ्या एखाद्या रंगीबेरंगी ओढणीचे किंवा साडीचे नसुन माझ्या घरी कुंडीत वाढलेल्या एका अननसाचे आहे.

आवडत्या फळांपैकी एक असलेला अननस आमच्या भागातही मिळत असल्याने दिसतो कसा, लागतो कसा हे जरी माहीती असले तरी, पैदास त्या भागात होत नसल्याने, त्याचे 'झाड' कसे असते, तो येतो कसा, एकुण प्रक्रिया काय असते, हे बघण्याचा कधीच योग आला नव्हता, किंवा तशी उत्सुकता पण कधी वाटली नाही.

आपके पीसी मे कौन रेहता है ?

[माझ्या लिखाणाचे इतर कुठल्याही, चर्चाग्रस्त / वादग्रस्त बाफ शी सा'धर्म्य' आढळल्यास, तो निव्वळ एक योगायोग समजावा]

"आपके PC मे कौन रेहता है, व्हायरस या अँटी व्हायरस ?"

ईईई हा काय वेड्यासारखा प्रश्ण आहे, असाच विचार आला ना तुमच्या मनात. माझी पण रोज-रोज अशीच चिड-चिड होते, कारण रोजच रेडीओ सिटीवर ही जाहिरात लागते आणि मी विचार करायला लागते अरे हे विचारावे का लागते आहे, किती साधे आणी सरळ उत्तर आहे या प्रश्णाचे.

वाढदिवस स्मृतीतला ....

माझ्या लहानपणी वाढदिवस साजरा करणे म्हणजे, आईने घरी माझ्या आवडीचा पदार्थ करणे [पाकातले चिऱोटे स्मित ], मला नविन फ्रॉक शिवणे. आणि त्यानिमीत्ताने, 'आवश्यक' असलेली एखादी वस्तु गिफ्ट म्हणुन आणणे. माझ्या वर्गातल्या ज्या एखाद्या मैत्रिणीच्या लक्षात असेल ती संध्याकाळी घरी येत असे, मग आई काहीतरी मस्त खायला करायची, एवढेच.

मुलखा वेगळी माणसं

९७ साली नगरला मराठी साहित्य संमेलनाला जायचा योग आला. संमेलनाचे अध्यक्ष होते, ना. सं. इनामदार. संमेलन नगर कॉलेजच्या परिसरात आयोजीत केले असल्याने आणि ना. सं ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असल्याने, अध्यक्षांची ओळख करून देण्याची जबाबदारी नगर कॉलेजच्याच एका इतिहासाच्या प्राध्यापकांवर सोपवण्यात आली होती.