मुंबई परिसर भेट
मुंबई हे बंदर म्हणून ब्रिटिशांनी वाढवले आणि व्यापारी उलाढाल केंद्र म्हणून झाल्यावर लोक इथे येऊन राहू लागले. शैक्षणिक केंद्रही झाले. विविध सुंदर कार्यालय इमारती बांधल्या गेल्या . कापड गिरण्यांनी मध्यमुंबईत जागा व्यापल्या आणि तीस वर्षे जोरात होत्या. मनोरंजनासाठी सिनेमा,नाट्यगृह,बागा तयार झाल्या.
मुंबईत येण्याची कारणे विविध आहेत. धंदा,व्यापार,नोकरी. प्रवासाची अनेक साधने यासाठी तयार झाली आणि केंद्रबिंदू झाला.
_____________________________
मनोरंजनासाठी मुंबई भेट
मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज (ट)’ आणि पंजाबमधील फिरोजपूर कँट यादरम्यान धावणारी ‘पंजाब मेल’ गेल्या 1 जूनला 110 वर्षांची झाली आहे. मुंबईहून ‘पंजाब मेल’ सुरू झाली त्या दिवसाची नक्की तारीख माहीत नाही. पण रेल्वेने ती तारीख 1 जून 1912 असेल असे गृहीत धरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमधून भारतात आलेले अधिकारी आणि अन्य युरोपियन प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी ती गाडी तत्कालीन ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते अखंड भारताच्या वायव्य सीमांत प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरपर्यंत धावत होती.
बेधुंद वारा
संतत जलधारा
भिजूनी चिंब
न्याहळी प्रतिबिंब
सुखद हा गारवा
हातात तुझा हात हवा
झुगारून सारी बंधने
उमगती अबोल स्पंदने
झिरपता केसातून ओहोळ
उठवती आठवणींचे मोहोळ
थेंब थेंब अलगद झेलता
विसरवी साऱ्या जगाला
खरच पावसा किती ही तुझी हुकूमत
स्वप्नांनी फुलवी रित्या मनाचा आसमंत