''ती मला नाही म्हणाल्यामुळं माझ्या आयुष्यात एक
कायमची पोकळी निर्माण झालीय..आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी, तू मला आणखी एक ओल्ड मंकचा खंबा आणून दे''.. अशा विव्हळ स्वरात रात्री-बेरात्री कुणीतरी फोन करायचं.
होस्टेलच्या टेरेसवर आम्हा लोकांचं प्यायला बसणं, हे नेहमीचंच.. पिताना सगळ्या काल्पनिक समस्यांवर
रिकामटेकड्या चर्चा करणं, हेही काही विशेष नाही..
पहिल्या वर्षाच्या शेवटच्या परीक्षेच्या तडाख्यात सापडून निम्मी-अर्धी जनता जबर जखमी व्हायची. पण कसंतरी करून, रडत खडत पुढच्या वर्षाचा जुगाड लागायचा. उरलेली जी जनता गचका खायची त्यांची व्हॅकन्सी डिप्लोमाच्या पोरांनी भरून काढायची शासनाची पॉलिसी असायची.
ज्याप्रमाणे नवीन लग्न होऊन आलेल्या सुनेला तिची सासू वेगवेगळ्या आयडिया काढून, घरात मिसळून घ्यायची टाळाटाळ करते, त्याच प्रकाराची एक आवृत्ती रेग्युलरची पोरं ह्या डिप्लोमाच्या पोरांच्या बाबतीत सादर करायची.