याला म्हणतात होय शिक्षा?
याची कल्पनाच नव्हती.
आकाशच्या मनास तो विचार तीव्रतेने व्यापू लागला. अत्यंत कडक ऊन, सगळीकडे नुसती रणरण आणि कारागृहाच्या मागील प्रचंड जागा खणून फ्लॅट करायचे काम! त्यावर अनेक प्रकारचे लहानमोठे दगड, झाडेझुडुपे आणि मोठाल्ले खडकही! नाश्त्यानंतर सगळेच कैदी तेथे कुदळी अन फावडी घेऊन राबायला लागलेले होते. जवळपास सव्वाशे! आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी दहा हवालदार! त्यातच तोही होता.
पठाण!
"हिमालय देखा नही? तो आपने किया क्या जिंदगीभर?"
सटासट्ट कांदा चिरताना गगनने एका नव्वद पावसाळे पाहिलेल्या माणसाच्या आविर्भावात वसंताला हा प्रश्न विचारला आणि गौरी खो खो हसायला लागली. नेपाळचा विषय चाललेला होता. हे बाळ वयाच्या सातव्या वर्षापर्यंत हिमालय रोज बघायचे. त्यात त्याला काहीही वाटायचे नाही. पण तीन वर्षापुर्वी इतर अनेक नेपाळ्यांबरोबर त्याचेही तीर्थरूप भारतात आले आणि त्यातही पुण्यात आले तेव्हापासून हिमालय दिसेनासा झाला.
दुसर्या जागेत राहायला जाणे यात दोन मोठे प्रॉब्लेम्स होते. एक म्हणजे हवी तशी जागा मिळणे! अर्थात, चितळ्यांनी दिलेला नवीन प्रस्ताव फारच आकर्षक होता. डेक्कन जिमखान्यावरची नवीन शाखा एकहाती चालवणे आणि मदतीला दोन सहकारी, त्यात पुन्हा दोन हजार रुपये पगार आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टीही!
त्यामुळे जागेसाठी अगदी आठशे जरी भाडे द्यायला लागले तरी जमण्यासारखेच होते. उलट हे अधिकच बरे झाले होते. हॉटेल चालवण्याची कटकट चोवीस तास मागत होती दिवसातले! याउलट चितळ्यांचे हे नवीन काम करणे म्हणजे दिवसातील नऊ तास आणि आठवड्यातून एक सुट्टी! पुन्हा कसलीच डोकेदुखी नाही.
पण दुसरा प्रश्न अधिक मोठा होता.
ब्रिस्टॉल पेटवून आढ्याकडे पाहात नवलेने पहिल्या झुरक्याचा धूर सोडला आणि कुशीत आवळून धरलेल्या मिनीला म्हणाला..
"मझा आया... स्साली तू आजकल भाव बहोत खाती है.... पंधरा दिनमे आती है"
"बाबूसे मिलना था"
"तेरी *** की... चल्ल... फ्रेस हो के आजा वापस... दस मिनिटमे..."
दचकलेली मिनी त्याच्या मिठीतून विलग होत उठली. याचसाठी ती जेलमध्ये यायला नाखुष असायची. बाबूव्यतिरिक्त तिचे यार नव्हते असे नव्हते. स्वतः निर्मल जैनने तिला काही वेळा बोलावलेले होतेच, त्या शिवाय रॉजर म्हणून एक ख्रिश्चन श्रीमंत म्हातारा होता जवळपास राहणारा! तोही बोलवायचा तिला!
आपल्या खोलीत गौरी रडून रडून अर्धमेली झालेली होती. कारण उघड होते. ती लग्न करून इथे आल्यानंतर पहिल्यांदा वसंताचा चितळेंकडचा जॉब गेला. नंतर हॉटेल चांगले सुरू झालेले असले तरीही 'तो जॉब गेला' हे सत्य होतेच! जेमतेम कुठे 'यात गौरीच्या पत्रिकेचा दोष नाही' हे सत्य सगळ्यांना मनातल्या मनात मान्य होतंय तोवर हा दुसरा धक्का!
आईंना कर्करोग झाला.
हे बाबांनी सगळ्यांना सांगीतले त्याला आता दिड महिना झालेला होता. आणि आईंची प्रकृती वरून ठणठणीत दिसत असली तरी पाऊल खूपच दुखत होते आणि वेदना वाढलेल्या होत्या.
कॅन्सर म्हणजे मृत्यू हे समीकरण रूढ असण्याचा काळ तो!
"आमची इमारत त्या निर्मल जैनलाच विकली! इमारत म्हणजे फ्लॅट सिस्टीम नव्हती.. एका बिल्डिंगमध्ये चार चार खोल्यांची चार घरे... खालची दोन्ही घरे मालकांची.. आम्ही आणि शर्मा भाडेकरू... शेजारी शेजारी, वरच्या मजल्यावर... निर्मल जैनला तेथे मॉल बांधायचा आहे.. बांधेलही तो... आम्हाला पर्यायी जागा देणार होता.. ती जागा आहे कात्रज घाटापाशी... काय संबंध पुणे स्टेशन आणि कात्रज घाटाचा... कसे काय जाऊ आम्ही तिथे? तर म्हणे तुम्ही रेन्टवरच राहताय..
कित्येक वर्षांनी .... कित्येक वर्षांनी आईंनी पुन्हा वसंताच्या पाठीवरून हात फिरवला होता. आज हॉटेल सुरू करणार होता तो! अर्थातच घरातल्या रीतीप्रमाणे सगळ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेणारच होता तो!
आणि बाबांना नमस्कार केला तेव्हा त्यांनी तोंडभर आशीर्वाद दिले.
"जे करशील ते विचारपुर्वक कर, यशस्वी होशीलच, पण आता तू एकटा नाहीस, गौरीची पण जबाबदारी आहे, तेव्हा सांभाळून राहा..."
असा दिवस स्वप्नातही नव्हता गौरीच्या!
गेल्या दोन महिन्यात सहन केलेले टोमणे, त्यावर अजिबात प्रत्युत्तर न देण्याची जिंकलेली कसोटी आणि घरकामात कोणताही हलगर्जीपणा न दाखवण्यातील सातत्य या तिच्या गुणांमुळे अंजली वहिनी आणि तारका वहिनींना 'आता काय करावे' हे समजेनासे झालेले होते. अण्णाच्या विनोदी मिश्कील स्वभावाने उलट वातावरण थंड थंडच होत चालले होते. वसंताने 'गौरीला असे बोलत जाऊ नका, तसे बोलत जाऊ नका' हे विधान करण्याचे धाडसही पुन्हा केलेले नव्हते.
मानवी स्वभावाची गुंतागुंत क्लिष्ट असतेच! आपली प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक मुद्दा हा आपल्यावर वर्षानुवर्षे झालेल्या संस्कारांमुळे निर्माण होत असतो. हे माणसाला कळत असले तरी संतांप्रमाणे अलिप्त राहणे अंगवळणी पडणे अशक्य असते. माणूस अधिकाधिक गुंततच जातो या गुंत्यात!
तसे पाहायला गेले तर अंजली वहिनी किंवा तारका वहिनी मुळात वाईट नव्हत्याच! पण आपले चष्मे जसे तसे दिसते हे खरे!
नातेवाईक या प्रकारासारखे खरे तर वाईट काही नाही. जितके चांगले तितकेच वाईट!
सणासुदीला, लग्नकार्यांना, मयतीला अगदी झाडून सगळे हजर! एकमेकांशी इतके हसून खेळून की असे वाटावे की एकत्रच राहतात.
आणि पाठी फिरल्या की द्वेष सुरू, गॉसिपिंग सुरू, टीका सुरू!
असेच असते असे नसेलही, पण अनेक ठिकाणी असेच असते.