मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
चित्रपट
विहिर
उद्याच्या शुक्रवारी (१९ मार्च) विहिर हा उमेश कुलकर्णीचा (वळु चित्रपटाचा दिग्दर्शक) सती भावे-गिरिश कुलकर्णींच्या कथा/पटकथेवरचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मी जानेवारीमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बघितला होता. त्याच दिवशी हे टिपण लिहिले होते पण इतके दिवस इथे डकवायचे राहून गेले. आता चित्रपट प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने आज इथे पोस्ट करत आहे.
------------------------------------------------------------------------------
कठोपनिषद:
बहूनामेमि प्रथमो बहूनामेमि मध्यम:
किंस्विद् यमस्य कर्तव्यं यन्मयाऽऽद्य करिष्यति
मी पाहीलेला अवतार!
संवाद : गुरू ठाकूर
'नटरंग'च्या प्रोमोजनी चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली होतीच. गाण्यांच्या क्लिप्स पाहून तर कधी एकदा पूर्ण गाणी ऐकायला मिळतील असं झालं. वर्तमानपत्रांत जेव्हा 'नटरंग'बद्दल लिहून आलं, तेव्हा त्यात अतुल कुलकर्णीशिवाय एक नाव प्रामुख्याने होतं, ते गुरु ठाकुर ( Guru Thakur ) यांचं. या चित्रपटाचे संवाद आणि गाणी - दोन्ही गुरु ठाकुर यांनीच लिहिलंय. मुळात त्यांची गाणी केवळ अप्रतिम, आणि त्यांना लाभलेली अजय-अतुलच्या संगीताची साथ म्हणजे दुग्धशर्करा योगच! एव्हाना ही गाणी सर्वांच्या ओठांवर खेळत आहेत यात नवल नाही. 'नटरंग'च्या संवादांत वापरलेली भाषा ही अस्सल कोल्हापुरी माणसाने लिहिलीय, असं वाटतं.
हरिश्चंद्राची फॅक्टरी
आजकालच्या 'एक ग्रॅम-गोल्डन नेकलेस' आणि 'इमिटेशन ज्वेलरी'च्या काळात 'बावनकशी सोन्याचा चपलाहार' दुर्मिळच झालाय! 'हार'च कशाला घेऊन बसता? 'सोनंच' महाग झालंय म्हणा ना..
कितीही 'टुकार' सिनेमा असला तरी 'वन टाईम सी' आहे असे म्हणत बघण्याच्या आजच्या काळात आत्ताच 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' पाहिला आणि थेट 'बावनकशी सोन्याचा चपलाहार'च आठवला!
कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत...
म्हणजे खरंच नाहीत.
अख्खा सिनेमा संपेपर्यंत बसल्या जागेला माणुस खिळुन राहिलेला.
कुठेच 'रॉकेलचा वास' नाही हो या 'साखरेला'... खरंच....
आणि गोड, गोड साखर! वाह!
'ते, अमुक-अमुक होतं, ते असं नाही करायला हवं होतं.... '
चित्रपटांची सौंदर्य-कला समिक्षा (फायनर पॉइन्ट्स)
इश्कियांचं शूटिंग वाई पाचगणी भागात झालय हे वाचलेलं असल्याने मला खेड्याचा महाराष्ट्रीय लूक आहे हे लक्षात आलं होतं. पण फिल्म इन टोटॅलिटी आवडल्याने, किंवा तशा कोनातून विचारच न केल्याने ते खटकलं नाही. पण त्या क्षेत्रांशी संबंधीत असल्यांना खरोखरच खटकलं आणि तो महत्वाचा मुद्दा आहे हे माझ्याही लक्षात आलं. खूपदा काही फायनर पॉइन्ट्स त्या क्षेत्राशी संबंधित नसल्याने सामान्य प्रेक्षकांच्या नजरेत खरंच येत नाहीत.
मायबोली चित्रपट महोत्सव, ११-१८ फेब्रूवारी २०१०. नागपूर
झ्येंडा !!!
गेल्या आठवड्यात झेंडा चित्रपट पाहिला..! एका पुनःस्थापित होउ इच्चिणार्या राजकीय नेत्याची छबी काळी करण्याचा प्रयत्न आहे असे वाटले. पण त्यात सामान्य कार्यकर्त्यांची जी घुसमट दाखवलीय...ती लाजवाब! प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने अगदी मनाला भिडले.
सगळे नेते सारखेच! कार्यकर्ते वापरुण घेणे अन सत्तेत सहभाग फक्त जवळच्या लोकांनाच देणे, हा एकजात धंदा! कार्यकर्त्यांना पण त्या वयात काही अक्कल नसते! नुसती मेंढरं, कुणी पण हाका.
शेवटी जेंव्हा नेत्याचे पण पाय मातीचेच आहेत, हे लक्षात येते, तोवर कार्यकर्त्याची माती झालेली असते!
जोगवा - ५ राष्ट्रीय पुरस्कार
जोगवा या चित्रपटाला ५ राष्ट्रीय मिळाले आहेत.
उत्क्रुष्ट अभिनेता : उपेंद्र लिमये
उत्क्रुष्ट संगीतकार : अजय-अतुल
उत्क्रुष्ट गायक (पुरुष) - हरीहरन
उत्क्रुष्ट गायिका (स्त्री) - श्रेया घोषाल
उत्क्रुष्ट सामाजिक चित्रपट
तसेच 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' याला सर्व्श्रेष्ठ प्रादेशिक चित्रपट हा पुरस्कार मिळाला.
जोगवा व 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' च्या सर्व कलाकारांचे व टीम चे अभिनंदन.
नटरंग
काल नटरंग पाहिला. प्रचंड ताकदीचा अप्रतिम, देखणा चित्रपट. शीर्षक जेव्हा पडद्यावर दिसते तेव्हापासून जी मनाची पकड घेतो ती शेवटच्या श्रेयनामावलीतले शेवटचे नाव पडद्यावरुन नाहीसे होईपर्यंत!
तमाशाच्या कलेसाठी स्वतःचं जीवन वाहून घेतलेल्या तमाम कलाकारांना हा मानाचा मुजरा, या निर्मितीबाबत आपल्यालाही मुजरा करायला लावतो यात शंका नाही.