लाडका
तो सर्वांचाच लाडका होता.. तीन भावांत शेंडेफळ म्हणून आईचा लाडका.. आपले नाव हाच काढणार म्हणून बापाचा लाडका.. अभ्यासात हुशार म्हणून शिक्षकांचा लाडका.. आणि मित्रांच्या ग्रूपची, बोले तर जान होता.. शांत स्वभाव आणि लाघवी बोलणे, कामानिमित्त जिथे जाईल तिथे आपली छाप पाडणारच.. ऑफिसमधल्या बॉसचाही लाडका न झाल्यास नवलच..!!
एक दिवस पुढे आलेल्या पोटावरून हात फिरवत बायको म्हणाली, इथेही आईपेक्षा बाबाच जास्त लाडके होणार वाटते.. तो फक्त हसला, तशी पुढे म्हणाली, "आता माझ्या बाबांचाही लाडका जावई होणार आहेस, नातवंड देण्यात पहिला नंबर लावला म्हणून दिवाळीला तुला बाईक घेऊन देणार आहेत.."
रात्रीची वेळ होती.
घनदाट नांदते जंगल.
एका मोठ्या थोरल्या तळ्याचा काठ.
जरा म्हणून शांतता नाही. कधी जवळूनच झाडीतून येणारा खुसफुस आवाज तर कधी लांबवरून ऐकू येणारी कोल्हेकुई. कधी तळ्यातून आलेले चुळुक डुबुक आवाज आणि रातकिड्यांचा आवाज हे तर कायमस्वरूपी पार्श्वसंगीत.
अचानक सारे काही स्तब्ध झाले.
एकदम निरव शांतता.
कानठळ्या बसवणारी शांतता.
माझ्या मनात एक अनामिक भीती, हुरहूर, उत्कंठा अशी संमिश्र भावना दाटून आली.
आता काहीतरी घडणार, कोणत्या तरी मोठ्या प्राण्याचे तळ्यावर आगमन होणार! मनामध्ये काहीही संदेह नव्हता.
"अभिनंदन... मुलगी झाली!"
अन् ती आली माझ्या हातांत.
हवेत हात हलवत ती बोलावत होती जणू मला... नव्हे... माझ्यातल्या कुणालातरी.
चेहरा हळूवार नेला तिच्या जवळ आणि तिचा पहिला स्पर्श झाला! सर्वांग भारून गेलं! कुरळ्या ओलेत्या जावळात... चुळबुळणार्या गुलाबी तळव्यांत... मी शोधू लागलो मलाच.
अचानक पाहिलं तिनं थेट माझ्या डोळ्यांत. आणि खुदकन हसली. त्याक्षणी आमची पहिली ओळख पटली. माझ्यातला बाप अखेर तिनं शोधलाच!
"माझ्याकडे बघू बाळ...." कुणीतरी माझ्या हातून तिला घेऊ लागलं. मी चिडलो. ही माझी... माझ्यापासून दूर नेऊ देणार नाही हिला....
बूट महागातले होते. त्यासाठी पैसे जमवायला त्याला बराच प्रयास करावा लागला होता. पण त्याला हवे तसे बूट त्याने मिळवलेच शेवटी.
कधी एकदा ते घालुन मिरवतोय असे त्याला झालेले. पण त्याने ठरवले आमच्या एका मित्राच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या दिवशी नवीन बुटांचे उद्घाटन करावे.
अगदी नियम असल्याप्रमाणे, आपले काही लग्नकार्य असले की हमखास पडतो, तसा, त्याही दिवशी पाउस पडला. रिसेप्शन नेमके गावाबाहेर गार्डन लॉनवर होते. सगळीकडे चिखल झालेला. पण ह्याला त्याचे काहीच नव्हते. नवीन कोरे बूट घालून खुशाल हिंडत होता. मी त्याला म्हणालो सुद्धा, अरे काय हे किती चिखल लागलाय तुझ्या बुटांना. जरा चिखल टाळून चालावे.
ती म्हणाली, राजा, मला किनई, दिवसभर घरी राहून कामे करायचा अगदी कंटाळा आलाय.
ती म्हणाली, आपण किनई भांडी घासायला एक बाई ठेवू, धुणी धुवायला एक.
मला किनई दिवसभर घरी राहून कामे करायचा अगदी कंटाळा आलाय
तो म्हणाला होय राणी.
ती म्हणाली, आपण किनई खोल्या झाडायला एक बाई ठेवू, फरश्या पुसायला एक.
मला किनई दिवसभर घरी राहून कामे करायचा अगदी कंटाळा आलाय
तो म्हणाला होय राणी.
ती म्हणाली, आपण किनई स्वैपाक बनवायला एक बाई ठेवू, वरकामाला एक.
मला किनई दिवसभर घरी राहून कामे करायचा अगदी कंटाळा आलाय
तो म्हणाला होय राणी.
दिवेलागणीची वेळ म्हणजे शुभंकरोती, उदबत्तीचा सुगंध, आणि आजीच्या गोष्ट. रोज वेगळी गोष्ट. रामायण, महाभारतापासून जादुगारापर्यंत अगदी कुठलीही.
"आज्जी ग! खरच घडलय का ग हे रामायण महाभारत वगैरे?" मी एकदा तिला विचारलं होतं.
"मनु, ह्या गोष्टींना ना आपल्यामधे... आपल्या आजुबाजुला शोधायचं असतं, मग नाही हा प्रश्न पडत" तिने पट्कन सांगितलं होतं
तिच्याकडे जादुसारखी उत्तर मिळायची नेहमीच.
मग मी पण छांदिष्टासारखी आजुबाजुला शोधायला सुरुवात केली आणि जाणवलं घडतय की महाभारत इथेही.
तो एक नवतरुण.
नवनवीन विचारांनी भारावलेला.
नुकतेच शिक्षण आटोपून, परत आपल्या माणसात आलेला.
प्रत्येक गोष्ट तार्कीकतेच्या कसोटीवर घासून पहायची सवयच लागलेला.
आपल्यातील अनेक गोष्टीत सुधारणा करायला भरपूर वाव असला तरी आपलीच माणसे आहेत, समजून घेतीलच आपल्याला, अशी त्याची खात्री होती.
चांगल्या कामाची सुरुवात नेहेमी देवापासून करावी म्हणतात. त्यानेही केली. तो विचारी, कशावरून नारळातील पाणी ही देवाची करणी? कधी उठतो-निजतो देव? का करायची काकड-आरती, शेजारती? कोण ठरवतो त्याने किती झोपावे?
तो म्हणे, माणसाने नेहेमी कशावरून? कधी? का? किती? कुठे? केव्हा? कोण? अशी ‘क’ची बाराखडीच विचारावी?
गोष्ट तिची आणि त्याची.. तशी सरळ साधी
कॉलेजच्या वाटेवर सुरु होणारी.. आणि वाटेतल्या बकुळीच्या झाडाजवळून जाताना क्षणभर थबकणारी
ओंजळभरुन फ़ुलं वेचून त्याचा सुगंध तिने भरुन घ्यावा आणि त्याने तो सोहळा लांबुनच हळूच टिपावा हे ही नेहमीचच
मग बराच वेळ तो गंध पाठलाग करायचा तिचाही आणि त्याचाही अगदी समांतर रस्ते आपापली वळणं घेत दिसेनासे होई पर्यंत
बरच काही बदललं, तरी इतक्या वर्षांनंतरही तिचं बकुळ वेड मात्र तसच राहिलं
"बकुळच का आवडते तुला? स्वप्नांना..नात्यांना आणि स्वत:लाही फ़ुलू द्यायच्या वयाच्या लेकीने जेव्हा हे विचारलं तेव्हा,
लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल क्षणाक्षणाला वाढत होता..
मी मी म्हणवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रुपाला पाहून दबकले होते..
त्या बेफाम प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याच जणू..
खुद्द तिच्या बापाने आशा सोडली होती..
इतक्यात पैलतीरावरून तीरासारखा तो धावत आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला..
काही काळासाठी सार्यांचे श्वास रोखले गेले, मात्र तो तिला घेऊनच काठावर आला..
वाहव्वा..! सर्वत्र एकच जल्लोष..!!
थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली.. मात्र त्याची हालचाल मंदावली होती..
इतक्यात कोणीतरी अॅम्ब्युलन्स आली म्हणून आवाज दिला..
सालाबादाप्रमाणे येणारा प्रेमदिवस.. उधळायला संस्कृतीरक्षकांची जय्यत तयारी होतीच..
निषेधाचे बॅनर शहरभर लागले होते..
कट्ट्यावरच्या राहुल’चीही तयारी झाली होती.. चॉकलेट परफ्यूम ग्रीटींग अन फुले...
आणखी काय लागते..!
गेल्या तीन वर्षांचा त्याचा रेकॉर्ड होता, एकही वॅलेंटाईन डे फेल गेला नव्हता..
यावेळी मात्र अंदाज फसला.. त्याला हसूनच नकार देत ती पुढच्याकडे वळली..
टाय विस्कटतच त्याने पुष्पगुच्छ जमिनीवर आदळला..
अर्थातच, अपमान अन पराभवाची निशाणी कोणाला आवडते !
ते निघून गेले अन एवढा वेळ जवळच उभी.. नुसतेच बघत असलेली ‘ती’ ... लगबगीने पुढे आली..
पडलेली फुले उचलून हृदयाशी कवटाळली..