साहित्य संमेलन

८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच महाबळेश्वर येथे पार पडले. या संमेलनातील निवडक कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणे इथे आपल्याला ऐकता येतील. संमेलनात सहभागी झालेल्या लेखकांची भाषणे, परिसंवाद, कविसंमेलने, कथाकथन यांचा आस्वाद जगभरातील मराठी साहित्यप्रेमींना घेता यावा, हा यामागील हेतू आहे.

संमेलनातील इतर कार्यक्रम लवकरच क्रमाक्रमाने इथे आपल्याला ऐकता येतील. साहित्य संमेलनातील कार्यक्रम आंतरजालाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या पहिल्याच प्रयत्नाचे आपण स्वागत कराल, ही अपेक्षा.

साहित्य संमेलनातील कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणे श्री. आनंद परांजपे (समन्वयक, ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) व अपर्णा करंदीकर (उपाध्यक्ष, चौफेर) यांनी उपलब्ध करून दिली. हे कार्यक्रम जगभरातील रसिकांपर्यंत पोहोचवताना श्री. आनंद परांजपे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याबद्दल व ही ध्वनिमुद्रणे वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचे, तसंच डॉ. वि. भा. देशपांडे, डॉ. माधवी वैद्य, श्री. सुधीर गाडगीळ यांचे मनःपूर्वक आभार.

श्री. प्रदीप माळी (स्वरांजली), सौ. शुभदा अभ्यंकर, श्री. अंशुमान सोवनी यांच्या विशेष सहकार्याबद्दल धन्यवाद.

श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांचे भाषण

Submitted by चिनूक्स on 13 May, 2009 - 14:22

महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केलेले भाषण.

KTP.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

फक्त माझंच डोकं फिरलंय का?

Submitted by माने गुरुजी on 27 March, 2010 - 00:48

आत्ता थोडा वेळेपर्यत मला खात्री होती की मी ठीक होतो.

मराठी साहित्यसंमेलनात काय चाललंय म्हणून नेटवर शोध घेतला तर साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण सापडलं, मला कोण आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात अख्खं भाषण प्रिंट करून घेतलं. म्हटलं वाचूया मस्त बसून.
http://www.sahityasammelan2010.org/sites/default/files/pdf/D_B_Kulkarni_...

विषय: 

आजी-माजी संमेलनाध्यक्षांची ग्रंथनगरीकडे पाठ..

Submitted by अ. अ. जोशी on 30 December, 2010 - 11:31

आजपर्यंत मराठी साहित्यिकाच्याच बाबतीत जे विधान केले जात होते ते आता संमेलनाध्यक्षांच्या बाबतीतही करावेसे वाटते. दिनांक २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६:३०वाजता ग्रंथदिंडी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये वेळेवर पोहोचली. त्यावेळी सपट परिवार लोकमानसचा चर्चेचा कार्यक्रम मुख्य मंडपात नुकताच संपला होता. चर्चेत डॉ. द.भि. कुलकर्णी हेही सहभागी होते. त्यामुळे ते त्याच मंडपात होते. ते ग्रंथप्रदर्शनासाठी येणार आहेत काय हे पहायला मी गेलो. तोपर्यंत त्यांना कोणी चहा दिला नव्हता. म्हणून चहाची ऑर्डर द्यायला मी मंडपाच्या बाहेर आलो खरा...! पण त्याचवेळेस श्री. उत्तम कांबळेसाहेब ग्रंथदिंडी घेऊन पोहोचले सुद्धा. द.भि.

गुलमोहर: 

चिपळूणचे शरद पवारांचे भाषण

Submitted by pkarandikar50 on 12 January, 2013 - 10:00

शरद पवारांचे रोखठोक भाषण.

आपल्या आजवरच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात शरद पवारांनी अनेक सभा-संमेलनातून उत्तम भाषणे केलीत. त्यापैकी काही मोजक्या भाषणांमध्ये, चिपळूणच्या साहित्य संमेलनातील उदघाटनपर भाषणाचा क्रम वरचा राहील. आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर कराडला भरलेल्या साहित्य संमेलनात कै. यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख आजही गौरवाने केला जातो. तसाच पवारांच्या चिपळूणच्या भाषणाचाही उल्लेख यापुढे वरचेवर होत राहील यात शंका नाही.

विषय: 

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत

Submitted by अभय आर्वीकर on 15 March, 2015 - 00:46

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत

शेती साहित्य आणि पत्रकारिता – परिसंवादाचा वृत्तांत
(वृत्तसंस्थांच्या सौजन्याने)

महात्मा फ़ुले साहित्य नगरी, वर्धा दिनांक ०१/०३/२०१५